शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहारमध्ये शेवटच्या क्षणी NDA चा मास्टर स्ट्रोक...! नीतीश फ्रंटफुटवर, पंतप्रधान सोबत, महिलांच्या 10 हजारी स्कीमसंदर्भात मोठी घोषणा
2
अक्कलकुवाजवळ शालेय बस दरीत कोसळली; अमलीबारी येथे भीषण अपघात, एका विद्यार्थ्याचा मृत्यू, १५ गंभीर
3
बारामतीच्या नगराध्यक्षपद निवडणुकीबाबतच्या जय पवारांच्या चर्चेला अजित पवारांकडून पुर्णविराम
4
रवींद्र चव्हाणांच्या खेळीनं शिंदेसेना संतापली; "भाजपाला युती नको तर स्पष्ट सांगावे, आम्हीही..."
5
RSS मध्ये मुस्लीम सहभागी होऊ शकतात का? मोहन भागवतांनी दिलं असं उत्तर, सभागृहात टाळ्यांचा एकच कडकडाट झाला!
6
निवडणुका जवळ आल्यावर आमच्यावर आरोप होतात; आता आमची बदनामी झाली, अजित पवारांची खंत
7
Digital Gold SEBI: डिजिटल गोल्ड खरेदी असाल, तर थांबा! ऑनलाईन सोने खरेदी करणाऱ्यांना सेबीचा सावधगिरीचा इशारा
8
शशी थरूर यांनी अडवाणींचे कौतुक केले, नेहरू आणि इंदिरा गांधींबद्दल धक्कादायक विधान केले
9
FD सुरक्षित, पण श्रीमंत होण्यासाठी पुरेश नाही! जास्त परतावा हवा असल्यास 'हे' ५ पर्याय बेस्ट
10
...अन् ड्रग माफियाच्या घरात पैसे मोजायला बसले पोलिसवाले; सगळ्या १०, २०, ५० च्याच नोटा, २२ तास लागले
11
Video: 6,6,6,6,6,6,6...भारतीय क्रिकेटरनं रचला नवा इतिहास; अवघ्या ११ चेंडूत सर्वात जलद अर्धशतक
12
चीनमधून MBBS अन् तयार केले खतरनाक विष; गुजरातमध्ये पकडलेल्या ३ दहशतवाद्यांचा प्लॅन काय होता?
13
सामान्यांसाठी मोठा दिलासा! ऑक्टोबरमध्ये शाकाहारी आणि मांसाहारी थाळी स्वस्त; क्रिसीलचा अहवाल आला...
14
मुलीच्या जन्मापासून ते १० वीपर्यंत सरकार देतं आर्थिक मदत! 'या' वर्गातील कुटुंबांसाठी चालवली जाते योजना
15
गेल्या २४ तासांत जपानमध्ये भूकंपाचे धक्के, सर्वात मोठा भूकंप ६.८ रिश्टर स्केलचा; त्सुनामीचा इशारा जारी
16
पाकिस्तानात २७ वी घटना दुरुस्ती, असीम मुनीर यांनी मिळाली जबरदस्त 'पॉवर'; पाहा किती ताकद वाढली?
17
Photo: कोण होणार मिस युनिव्हर्स? मनिका विश्वकर्माचा 'अनारकली' लूक व्हायरल...
18
Delhi Crime: वर्गमित्राला घरी घेऊन आला, वडिलांचे पिस्तुल घेतले आणि घातल्या गोळ्या; कारण...
19
नोकरी सोडल्यानंतरही तुमचा आरोग्य विमा संपणार नाही; 'ही' घ्या पॉलिसी पोर्ट करण्याची प्रक्रिया
20
वंदे भारत एक्सप्रेसच्या उद्घाटनावेळी विद्यार्थ्यांनी गायलं RSS गीत, राजकारण तापलं; केरळ सरकारचे चौकशीचे आदेश

कोरोनाचा भाजीपाला उत्पादकांना फटका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 15, 2021 17:57 IST

जळगाव नेऊर : येवला तालुक्यात ग्रामीण भागातील आठवडे बाजार बंद झाल्यामुळे,, त्याचा फटका शेतकऱ्यांच्या भाजीपाल्याला बसत असून, अनेक शेतकऱ्यांना भाजीपाला शेतातच सोडून देण्याची वेळ आली आहे. अगोदरच भाजीपाला पिकातून शेतकऱ्यांचा खर्चही वसूल झालेला नाही, त्यातच कोरोना संकटामुळे अनेक ठिकाणी आठवडे बाजार बंद ठेवण्याचा निर्णय ग्रामपंचायतीने घेतल्याने, त्याचा फटका मात्र भाजीपाल्याला बसत आहे.

ठळक मुद्देशेपू, कोबीसह इतर पिके शेतातच सोडून देण्याची वेळ

जळगाव नेऊर : येवला तालुक्यात ग्रामीण भागातील आठवडे बाजार बंद झाल्यामुळे,, त्याचा फटका शेतकऱ्यांच्या भाजीपाल्याला बसत असून, अनेक शेतकऱ्यांना भाजीपाला शेतातच सोडून देण्याची वेळ आली आहे. अगोदरच भाजीपाला पिकातून शेतकऱ्यांचा खर्चही वसूल झालेला नाही, त्यातच कोरोना संकटामुळे अनेक ठिकाणी आठवडे बाजार बंद ठेवण्याचा निर्णय ग्रामपंचायतीने घेतल्याने, त्याचा फटका मात्र भाजीपाल्याला बसत आहे.जळगाव नेऊर परिसरात अनेक शेतकऱ्यांनी कांद्याचे रोप न मिळाल्यामुळे भाजीपाल्याला पसंती दिली, परंतु त्याचेही उत्पादन जास्त झाल्याने, मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांना कवडीमोल भावाने विक्री करावे लागत आहे. गेली आठ दिवसांपासून कोरोनामुळे आठवडे बाजार बंद ठेवण्याचा निर्णय अनेक ग्रामपंचायतींनी घेतल्याने, बारमाही भाजीपाला उत्पादन घेऊन आपल्या प्रपंचाचा गाडा चालविणाऱ्या कुटुंबाचे हाल होत आहेत. शासनस्तरावर कोरोनाची साखळी तोडण्यासाठी येवला तालुक्यातील विविध गावांतील आठवडे बाजार बंदमुळे त्यावर आधारित भाजीपाला उत्पादक शेतकऱ्यांना आपला शेतमाल विक्री करता येत नसल्यामुळे शेतकरी मोठ्या आर्थिक संकटात सापडला आहे. तोडून ठेवलेला माल कुठे विक्री करावा, असा प्रश्न निर्माण झाला आहे, तर काही शेतकऱ्यांनी भाजीपाला शेतात सोडून दिला आहे.

पर्यायाने भाजीपाला उत्पादक शेतकरी मोठ्या आर्थिक संकटात सापडला असून, ऐन उन्हाळ्यात भाजीपाला पिकातून चार पैसे पदरात पडतील. या आशेवर असलेल्या शेतकऱ्यांना मात्र या नुकसानीमुळे त्यांच्या प्रपंचाचा गाडा कसा चालवावा व उधार, उसनवारी करून शेतीसाठी घेतलेला पैसा कसा फेडावा, हा यक्षप्रश्न भाजीपाला उत्पादक शेतकऱ्यांसमोर उभा ठाकला आहे, तसेच भाजीपाला ठोक खरेदीतून चिल्लर विक्री करणारे फेरीवाले, शेतमजूर यांच्यावर आठवडी बाजार बंदमुळे उपासमारीची वेळ आली आहे.मी पन्नास गुंठे क्षेत्रावर वाट्याने कोबीची लागवड केलेली आहे. या क्षेत्रावर सोळा हजार काडी कोबीची लागवड केलेली असून, त्यासाठी साठ हजार रुपये खर्च झालेला आहे. कोबी आठवडे बाजारात विक्री करत होत़ो, पण अचानक अनेक ग्रामपंचायतींनी आठवडे बाजार बंद केल्यामुळे कोबी मात्र शेतातच पडून आहे.- राजेंद्र पानसरे, कोबी उत्पादक शेतकरी 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याagricultureशेती