शहरं
Join us  
Trending Stories
1
Satyapal Malik Death: माजी राज्यपाल सत्यपाल मलिक यांचे निधन; राम मनोहर लोहिया रुग्णालयात त्यांनी घेतला अखेरचा श्वास
2
“मुंबई महानगरपालिका निवडणुकीत ठाकरे बंधूंना चांगले यश मिळेल”; महायुतीतील नेत्याचा मोठा दावा
3
डोनाल्ड ट्रंप टॅरिफविरोधात भारतीय सैन्याची एन्ट्री; ५४ वर्षांपूर्वीची कारस्थाने बाहेर काढली...
4
'विरोधकांनी स्वतःच्या पायावर धोंडा मारुन घेतला', 'ऑपरेशन सिंदूर'बाबतच्या चर्चेवरून PM मोदींचा टोला
5
शर्टचा फोटो, अज्ञात चेहरा...४३४ कोटींच्या एमडी ड्रग्जबाबत खुलासा; कर्नाटकातून मुंबईत कसं यायचे?
6
शांतता अन् निसर्ग सौंदर्याचा अनोखा मिलाफ; बीच लव्हर असाल तर भारतातील 'या' समुद्र किनाऱ्यांना नक्की भेट द्या!
7
"कोण खरा भारतीय, कोण नाही हे कोर्ट ठरवू शकत नाही’’, प्रियंका गांधींनी केला राहुल गांधींचा बचाव
8
ये वर्दी सिर्फ हिंमत नही बलिदान भी मांगती है! फरहान अख्तरच्या '१२० बहादुर'चा टीझर रिलीज
9
राज ठाकरेंशी युतीला कौल? इंडिया-मविआवर पाणी सोडण्याची तयारी? दिल्लीत उद्धव ठाकरेंची परीक्षा
10
Anil Ambani at ED Office : अनिल अंबानी ED च्या कार्यालयात दाखल; १७ हजार कोटींच्या कर्जाच्या फसवणुकीप्रकरणी झाले हजर
11
मी तिचा पहिला रूग्ण, ती माझी शेवटची डॉक्टर, १३ दिवसांचा ड्रामा नको...; इंजिनिअरनं संपवलं जीवन
12
बँकेचा CEO बदलताच शेअरला 'रॉकेट' स्पीड! एका झटक्यात गुंतवणूकदारांना झाला इतका फायदा
13
'या' महिला खासदाराचे क्रश आहेत पंकज त्रिपाठी, कॉफी डेटची दिलेली ऑफर, म्हणाल्या- "मी त्यांना पत्रही लिहिलं होतं पण..."
14
Mahabharat: महाभारतात ४५ लाख योद्ध्यांसाठी १८ दिवस कोण करत होतं स्वयंपाक?
15
ऑपरेशन सिंदूरचा जोरदार दणका! पाकिस्तानचं रहीम यार खान एअरबेस अजूनही बंद; पुन्हा जारी करण्यात आला NOTAM
16
IND vs ENG: 'या' विकेटने सामना फिरला...; सुनील गावसकरांनी सांगितला सामन्याचा 'टर्निंग पॉईंट'
17
खळबळजनक! एकतर्फी प्रेमात वेडा झाला तरुण, १५ वर्षांच्या मुलीवर दिवसाढवळ्या झाडल्या गोळ्या
18
"लाल किल्ल्यावर भगवा फडकवा पण तिरंगा मानलाच पाहिजे"; संभाजी भिडेंच्या विधानाची चर्चा
19
'दीवार'मधला चिमुकला आहे 'या' मराठी अभिनेत्रीचा मोठा भाऊ, कुटुंबासोबत परदेशात झाला स्थायिक
20
FD की सोने? गुंतवणुकीचा राजा कोण? बहुतेकांना यातील फायदे तोटे माहिती नाही, कशी करायची योग्य निवड?

कोरोनाचा भाजीपाला उत्पादकांना फटका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 15, 2021 17:57 IST

जळगाव नेऊर : येवला तालुक्यात ग्रामीण भागातील आठवडे बाजार बंद झाल्यामुळे,, त्याचा फटका शेतकऱ्यांच्या भाजीपाल्याला बसत असून, अनेक शेतकऱ्यांना भाजीपाला शेतातच सोडून देण्याची वेळ आली आहे. अगोदरच भाजीपाला पिकातून शेतकऱ्यांचा खर्चही वसूल झालेला नाही, त्यातच कोरोना संकटामुळे अनेक ठिकाणी आठवडे बाजार बंद ठेवण्याचा निर्णय ग्रामपंचायतीने घेतल्याने, त्याचा फटका मात्र भाजीपाल्याला बसत आहे.

ठळक मुद्देशेपू, कोबीसह इतर पिके शेतातच सोडून देण्याची वेळ

जळगाव नेऊर : येवला तालुक्यात ग्रामीण भागातील आठवडे बाजार बंद झाल्यामुळे,, त्याचा फटका शेतकऱ्यांच्या भाजीपाल्याला बसत असून, अनेक शेतकऱ्यांना भाजीपाला शेतातच सोडून देण्याची वेळ आली आहे. अगोदरच भाजीपाला पिकातून शेतकऱ्यांचा खर्चही वसूल झालेला नाही, त्यातच कोरोना संकटामुळे अनेक ठिकाणी आठवडे बाजार बंद ठेवण्याचा निर्णय ग्रामपंचायतीने घेतल्याने, त्याचा फटका मात्र भाजीपाल्याला बसत आहे.जळगाव नेऊर परिसरात अनेक शेतकऱ्यांनी कांद्याचे रोप न मिळाल्यामुळे भाजीपाल्याला पसंती दिली, परंतु त्याचेही उत्पादन जास्त झाल्याने, मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांना कवडीमोल भावाने विक्री करावे लागत आहे. गेली आठ दिवसांपासून कोरोनामुळे आठवडे बाजार बंद ठेवण्याचा निर्णय अनेक ग्रामपंचायतींनी घेतल्याने, बारमाही भाजीपाला उत्पादन घेऊन आपल्या प्रपंचाचा गाडा चालविणाऱ्या कुटुंबाचे हाल होत आहेत. शासनस्तरावर कोरोनाची साखळी तोडण्यासाठी येवला तालुक्यातील विविध गावांतील आठवडे बाजार बंदमुळे त्यावर आधारित भाजीपाला उत्पादक शेतकऱ्यांना आपला शेतमाल विक्री करता येत नसल्यामुळे शेतकरी मोठ्या आर्थिक संकटात सापडला आहे. तोडून ठेवलेला माल कुठे विक्री करावा, असा प्रश्न निर्माण झाला आहे, तर काही शेतकऱ्यांनी भाजीपाला शेतात सोडून दिला आहे.

पर्यायाने भाजीपाला उत्पादक शेतकरी मोठ्या आर्थिक संकटात सापडला असून, ऐन उन्हाळ्यात भाजीपाला पिकातून चार पैसे पदरात पडतील. या आशेवर असलेल्या शेतकऱ्यांना मात्र या नुकसानीमुळे त्यांच्या प्रपंचाचा गाडा कसा चालवावा व उधार, उसनवारी करून शेतीसाठी घेतलेला पैसा कसा फेडावा, हा यक्षप्रश्न भाजीपाला उत्पादक शेतकऱ्यांसमोर उभा ठाकला आहे, तसेच भाजीपाला ठोक खरेदीतून चिल्लर विक्री करणारे फेरीवाले, शेतमजूर यांच्यावर आठवडी बाजार बंदमुळे उपासमारीची वेळ आली आहे.मी पन्नास गुंठे क्षेत्रावर वाट्याने कोबीची लागवड केलेली आहे. या क्षेत्रावर सोळा हजार काडी कोबीची लागवड केलेली असून, त्यासाठी साठ हजार रुपये खर्च झालेला आहे. कोबी आठवडे बाजारात विक्री करत होत़ो, पण अचानक अनेक ग्रामपंचायतींनी आठवडे बाजार बंद केल्यामुळे कोबी मात्र शेतातच पडून आहे.- राजेंद्र पानसरे, कोबी उत्पादक शेतकरी 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याagricultureशेती