शहरं
Join us  
Trending Stories
1
पर्यावरणप्रेमींच्या तीव्र विरोधासमोर केंद्र सरकार झुकलं, ‘अरवली’ला वाचवण्यासाठी घेतला मोठा निर्णय   
2
बीडच्या ‘सह्याद्री देवराई’ला भीषण आग; अभिनेते सयाजी शिंदे यांनी जोपासलेली हजारो झाडे संकटात
3
थायलंड-कंबोडिया सीमेवरील विष्णूची मूर्ती बुलडोझरने पाडली, भारताने घेतला तीव्र आक्षेप  
4
बांगलादेशमध्ये हिंसाचार सुरूच, पेट्रोल बॉम्ब हल्ल्यानंतर आता मध्यरात्री ढाका विद्यापीठात मोडतोड
5
नाताळाच्या पूर्वसंध्येला बांगलादेशची राजधानी हादरली, पेट्रोल बॉम्बच्या स्फोटात एकाचा मृत्यू
6
नवीन वर्षात बदलणार काँग्रेसचं 'पॉवर' समीकरण; प्रियांका गांधींना मिळणार महत्त्वाची जबाबदारी
7
IPL 2026 आधीच RCBच्या स्टार खेळाडूला होणार अटक? तब्बल ५ कोटी मोजून घेतलंय संघात
8
पोलिसांवर गुन्हा दाखल करण्याच्या मागणीसाठी सक्षम ताटेची आई व प्रेयसीचा आत्मदहनाचा प्रयत्न, दिला निर्वाणीचा इशारा...
9
‘प्लॅन २०४९’, चीनची भारताच्या अरुणाचल प्रदेशवर नजर, लष्करी बळावर कब्ज्याची तयारी
10
"आम्हाला मतदान केलं तर प्रश्न सोडवू, पण दुसरीकडे केलं तर..."; नितेश राणेंचा मतदारांना इशारा
11
VIDEO: धावत्या ट्रेनमध्ये WWE स्टाईल राडा! 'इंटरसिटी'मध्ये प्रवाशांमध्ये तुफान हाणामारी
12
Sukesh Chandrashekhar : "माय लव्ह, हे तेच घर आहे जे..."; जेलमध्ये असलेल्या सुकेशने जॅकलिनला गिफ्ट केला आलिशान बंगला
13
Vijay Hazare Trophy: ४०० हून अधिक धावांचं लक्ष्य ४७.३ षटकांतच गाठलं, कर्नाटकच्या संघाची इतिहासात नोंद!
14
'मला पंतप्रधान मोदींना भेटायचे आहे', उन्नाव बलात्कार पीडिता राहुल गांधींना म्हणाली...
15
प्रेमविवाह फसला; लग्नाच्या दुसऱ्या दिवसापासून जोडपे झाले वेगळे, ८ दिवसांत घटस्फोट
16
Smartphones: २०२५ मधील 'टॉप ५' पैसा वसूल स्मार्टफोन, यादीत मोठ्या ब्रँड्सचा समावेश!
17
रेल्वे प्रवासादरम्यान माजी मंत्र्यांच्या बॅगवर चोरांचा डल्ला, फोन, रोख रक्कम आणि दागिने लंपास
18
इंडिगोच्या वर्चस्वाला धक्का; केंद्र सरकारकडून ‘या’ दोन नव्या विमान कंपन्यांना मान्यता
19
Prashant Jagtap Resignation: २७ वर्षांची साथ सोडली; प्रशांत जगतापांचा राष्ट्रवादी शरद पवार पक्षाला रामराम
20
“राहुल गांधींसारखे पार्ट टाइम राजकारणी होऊ नका, कठोर मेहनत घेत राहा”; नितीन नबीन यांचा संदेश
Daily Top 2Weekly Top 5

कोरोनाचा भाजीपाला उत्पादकांना फटका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 15, 2021 17:57 IST

जळगाव नेऊर : येवला तालुक्यात ग्रामीण भागातील आठवडे बाजार बंद झाल्यामुळे,, त्याचा फटका शेतकऱ्यांच्या भाजीपाल्याला बसत असून, अनेक शेतकऱ्यांना भाजीपाला शेतातच सोडून देण्याची वेळ आली आहे. अगोदरच भाजीपाला पिकातून शेतकऱ्यांचा खर्चही वसूल झालेला नाही, त्यातच कोरोना संकटामुळे अनेक ठिकाणी आठवडे बाजार बंद ठेवण्याचा निर्णय ग्रामपंचायतीने घेतल्याने, त्याचा फटका मात्र भाजीपाल्याला बसत आहे.

ठळक मुद्देशेपू, कोबीसह इतर पिके शेतातच सोडून देण्याची वेळ

जळगाव नेऊर : येवला तालुक्यात ग्रामीण भागातील आठवडे बाजार बंद झाल्यामुळे,, त्याचा फटका शेतकऱ्यांच्या भाजीपाल्याला बसत असून, अनेक शेतकऱ्यांना भाजीपाला शेतातच सोडून देण्याची वेळ आली आहे. अगोदरच भाजीपाला पिकातून शेतकऱ्यांचा खर्चही वसूल झालेला नाही, त्यातच कोरोना संकटामुळे अनेक ठिकाणी आठवडे बाजार बंद ठेवण्याचा निर्णय ग्रामपंचायतीने घेतल्याने, त्याचा फटका मात्र भाजीपाल्याला बसत आहे.जळगाव नेऊर परिसरात अनेक शेतकऱ्यांनी कांद्याचे रोप न मिळाल्यामुळे भाजीपाल्याला पसंती दिली, परंतु त्याचेही उत्पादन जास्त झाल्याने, मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांना कवडीमोल भावाने विक्री करावे लागत आहे. गेली आठ दिवसांपासून कोरोनामुळे आठवडे बाजार बंद ठेवण्याचा निर्णय अनेक ग्रामपंचायतींनी घेतल्याने, बारमाही भाजीपाला उत्पादन घेऊन आपल्या प्रपंचाचा गाडा चालविणाऱ्या कुटुंबाचे हाल होत आहेत. शासनस्तरावर कोरोनाची साखळी तोडण्यासाठी येवला तालुक्यातील विविध गावांतील आठवडे बाजार बंदमुळे त्यावर आधारित भाजीपाला उत्पादक शेतकऱ्यांना आपला शेतमाल विक्री करता येत नसल्यामुळे शेतकरी मोठ्या आर्थिक संकटात सापडला आहे. तोडून ठेवलेला माल कुठे विक्री करावा, असा प्रश्न निर्माण झाला आहे, तर काही शेतकऱ्यांनी भाजीपाला शेतात सोडून दिला आहे.

पर्यायाने भाजीपाला उत्पादक शेतकरी मोठ्या आर्थिक संकटात सापडला असून, ऐन उन्हाळ्यात भाजीपाला पिकातून चार पैसे पदरात पडतील. या आशेवर असलेल्या शेतकऱ्यांना मात्र या नुकसानीमुळे त्यांच्या प्रपंचाचा गाडा कसा चालवावा व उधार, उसनवारी करून शेतीसाठी घेतलेला पैसा कसा फेडावा, हा यक्षप्रश्न भाजीपाला उत्पादक शेतकऱ्यांसमोर उभा ठाकला आहे, तसेच भाजीपाला ठोक खरेदीतून चिल्लर विक्री करणारे फेरीवाले, शेतमजूर यांच्यावर आठवडी बाजार बंदमुळे उपासमारीची वेळ आली आहे.मी पन्नास गुंठे क्षेत्रावर वाट्याने कोबीची लागवड केलेली आहे. या क्षेत्रावर सोळा हजार काडी कोबीची लागवड केलेली असून, त्यासाठी साठ हजार रुपये खर्च झालेला आहे. कोबी आठवडे बाजारात विक्री करत होत़ो, पण अचानक अनेक ग्रामपंचायतींनी आठवडे बाजार बंद केल्यामुळे कोबी मात्र शेतातच पडून आहे.- राजेंद्र पानसरे, कोबी उत्पादक शेतकरी 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याagricultureशेती