शहरं
Join us  
Trending Stories
1
गुवाहाटीची खरी कथा मला विचारूनच लिहावी लागेल- उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे
2
न्यूयॉर्कचे पहिले मुस्लीम मेअर बनले जोहरान ममदानी, ट्रम्प यांच्या धमक्यांनंतरही मोठा विजय!
3
भारतात श्रीमंतांच्या संपत्तीत ६२% वाढ, इतर ९९% लोकांची संपत्ती वाढली १%, पण प्रगतीला धोका
4
अमिताभ बच्चन यांनी विकले २ लक्झरी फ्लॅट्स; ‘बिग बीं’ची प्रॅापर्टीमधून बंपर कमाई, कितीमध्ये झाली ही ‘सुपर डील’?
5
"आम्ही कार्यक्रम वेळेत सुरु केलेला, पण..."; माधुरी दीक्षितच्या उशीरा येण्यामागचं खरं कारण आयोजकांनी सांगितलं
6
२०२६ला डबल धमाका, ७ राशींवर असीम शनि कृपा; उत्पन्नात लक्षणीय वाढ, घर खरेदीचे स्वप्न पूर्ण!
7
“६ महिन्यात ४८ लाख मतदार वाढ, डबल स्टार नाही, डबल मतदारांची यादी हवी”; शरद पवार गटाची मागणी
8
आजचे राशीभविष्य,०५ नोव्हेंबर २०२५: बोलण्यावर संयम ठेवा; रागावर व वाणीवर संयम ठेवावा लागेल
9
१३,००० कोटींचे कोकेन प्रकरण: डॉन वीरूच्या मुलाला पकडण्यासाठी १८० देशांची फौज; इंटरपोलची रेड नोटीस जारी
10
पालघरमधील तीन नगरपरिषदा, एका नगरपंचायतीत रणधुमाळी; यंदा कोण मारणार बाजी?
11
“निवडणूक आयोगाचा कारभार ‘दस नंबरी’, दुबार तिबार नावांची जबाबदारी कोणाची?”: हर्षवर्धन सपकाळ
12
'चिप'ची भीती दाखवून मुलीवर अत्याचार; जन्मदात्या आईचे हादरवणारं कृत्य, कोर्टाने दिली १८० वर्षांची शिक्षा!
13
बदलापुरात युतीत लढाई? तर अंबरनाथमध्ये मविआत तडजोड? निवडणुकांमध्ये चुरशीची लढाई
14
“मतदार याद्यांमध्ये घोळ, सत्ताधाऱ्यांकडून कबूल, दुबार मतदानावर आयोग गप्प का?”: सुप्रिया सुळे
15
आशिया चषकाचा वाद: जय शाह यांच्या उपस्थितीमुळे मोहसिन नकवींची बैठकीला दांडी
16
रायगडमध्ये १० नगरपरिषदांमध्ये धूम युतीची की आघाडीची..? सर्व राजकीय पक्षांकडून हालचाली
17
रेल्वे अपघातानंतर नातेवाइकांचा आक्रोश; हेल्पलाइन नंबरवर टीबीमुक्त अभियानाचा जागर
18
चेंबूरमधील मेंदी प्रकरणाला नवी कलाटणी; शाळा प्रशासनाने सर्व आरोप फेटाळून लावले
19
अखेर बिगुल वाजला ! राज्यातील २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींच्या निवडणुकांची घोषणा
20
चीनची कार थेट आकाशातून जाणार, ‘उडणाऱ्या कार’चे उत्पादन झाले सुरू

‘भय’ संपल्याने कोरोना इथला संपत नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 12, 2021 04:18 IST

शैलेश कर्पे सिन्नर : कोरोनाच्या पहिल्या लाटेत नागरिकांमध्ये भीती जास्त होती. पण दुसऱ्या लाटेनंतर नागरिकांमधील कोरोनाबद्दलचे भय संपल्याने कोरोना ...

शैलेश कर्पे

सिन्नर : कोरोनाच्या पहिल्या लाटेत नागरिकांमध्ये भीती जास्त होती. पण दुसऱ्या लाटेनंतर नागरिकांमधील कोरोनाबद्दलचे भय संपल्याने कोरोना अजून पूर्णपणे संपला नसल्याचे चित्र सिन्नर, निफाड व मालेगाव तालुक्यात पाहायला मिळत आहे. नागरिकांनी मास्क, सॅनिटायझर व सामाजिक अंतर या त्रिसूत्रीकडे कानाडोळा केल्याचे चित्र आहे. त्यामुळे या तीन तालुक्यांत कोरोनाने आपला मुक्काम वाढविल्याचे दिसून येते. नाशिक जिल्ह्यात दुसऱ्या लाटेनंतर कोरोना रुग्णांची संख्या वेगाने कमी झाली आहे. नाशिक शहरात तर अतिशय कमी प्रमाणात कोरोना रुग्ण आढळून येत असले तरी, नाशिक जिल्ह्यातील ग्रामीण भागात कोरोना रुग्णांची संख्या पाहिजे त्या प्रमाणात थांबली नसल्याचे चित्र आहे.

सिन्नर तालुक्यात आजही ८४ रुग्ण कोरोनाबाधित असून त्यांच्यावर सिन्नर ग्रामीण रुग्णालय व इंडिया बुल्स कोविड रुग्णालयात उपचार सुरू आहेत. त्यात सिन्नर शहरातील ७, तर जिल्हा परिषद हद्दीतील म्हणजे ग्रामीण भागातील तब्बल ७७ रुग्ण आहेत. अनलॉकनंतर ग्रामीण भागातील नागरिकांनी कोरोना उपाययोजनांकडे दुर्लक्ष केल्याचे दिसून येते. ग्रामीण भागात काही गावांमध्ये आठवडे बाजार बंद असले तरी, गुजरीच्या किंवा भाजीपाला बाजाराच्या नावाखाली मोठी गर्दी होत असल्याचे चित्र आहे. खरीप हंगामात शेतीची कामे सुरू असल्यानेही वर्दळ वाढली आहे. दुकानांच्या वेळा वाढल्याने सिन्नरसह ग्रामीण भागात बाजारपेठेत गर्दी होत आहे. अनेकांनी रुमाल किंवा मास्कचा वापर करणे बंद केल्याने जोखीम वाढली आहे. बाजारपेठेत सोशल डिस्टंसिंगचा फज्जा उडाल्याचे चित्र आहे. राज्य परिवहन महामंडळाच्या बसेस सुसाट सुटल्या असून प्रवाशांकडून नियमांचे पालन केले जात नाही. मास्क वापरला जात नाही. बसमध्ये चढ-उतार करताना गर्दी केली जाते. शाळा-महाविद्यालये सुरू झाल्याने बसला गर्दी वाढली आहे. सार्वजनिक ठिकाणी कोरोना प्रतिबंधक नियमांचे पालन केले जात नाही. विवाहसोहळे व अन्य कार्यक्रमांना नागरिकांकडून गर्दी केली जात आहे. नियमांचे काटेकोरपणे पालन केले जात नसल्याने कोरोना रुग्णांची संख्या पाहिजे त्या प्रमाणात कमी होत नसल्याचे चित्र आहे. त्यातच गेल्या महिन्यात स्वॅब घेतलेल्या १५ रुग्णांना डेल्टा प्लस असल्याचे निष्पन्न झाल्याने खळबळ उडाली होती. मात्र याचा अहवाल एक ते दीड महिन्यापूर्वीचा असल्याने व ते रुग्ण ठणठणीत बरे झाल्याने संकट कमी झाले आहे. आरोग्य विभागाकडून टेस्टिंग केली जात असल्याने रुग्णसंख्येत वाढ दिसून येत असल्याचेही सांगितले जात आहे. आरोग्य विभागाने रुग्ण ट्रेसिंगवर भर दिला आहे. लक्षणे असलेल्या रुग्णांची तपासणी केली जात आहे. सिन्नर तालुक्यात लसीकरणानेही वेग घेतला आहे. आतापर्यंत तालुक्यातील ८५ हजार नागरिकांचे लसीकरण करण्यात आले आहे.

-----------------------

सिन्नर तालुक्यात बाजारपेठेची गावे जास्त आहेत. जनतेचा नाशिक, अहमदनगर, पुणे व औरंगाबाद या लगतच्या जिल्ह्यांसोबत संपर्क येतो. शेतीच्या कामांमुळे नागरिक बाहेर पडत आहेत. टेस्टिंग सुरूच आहेत. त्यामुळे रुग्णवाढ दिसते. लक्षणे असलेल्या रुग्णांची तपासणी व बाधित आढळल्यानंतर ताबडतोब ट्रेसिंग केले जात आहे.

- डॉ. मोहन बच्छाव, वैद्यकीय अधिकारी, सिन्नर

फोटो ओळी-

सिन्नर बसस्थानकावर प्रवासी व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांची गर्दी.

(१० सिन्नर ३)

100821\10nsk_15_10082021_13.jpg

१० सिन्नर ३