शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानात मोठी कारवाई! खैबर पख्तूनख्वा प्रांतात घुसखोरी करणारे ५४ TTP समर्थक ठार
2
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित एक ओव्हर नाही टिकला; पण दोन चेंडूत विराटची बरोबरी करून परतला
3
मध्य प्रदेशात भीषण अपघात; भरधाव कार विहिरीत कोसळली, 12 जणांचा मृत्यू
4
"शरद पवारांनी जाणीवपूर्वक 'ते' वक्तव्य केले"; पहलगामबाबतच्या 'त्या' विधानावरुन भुजबळांचे स्पष्टीकरण
5
पाकिस्तानात भीतीचे वातावरण; लष्कर प्रमुखानंतर बिलावल भुट्टोचे कुटुंबीय देश सोडून पळाले
6
जसप्रीत बुमराहची रेकॉर्ड ब्रेक स्पेल; मुंबई इंडियन्सकडून 'अशी' कामगिरी करणारा पहिलाच!
7
सीमेवर तणाव वाढताच पाकिस्तानने चीनकडे मागितले १.४ बिलियन डॉलर
8
"लाडक्या बहि‍णी १५०० मध्ये खूष, २१०० रुपये देऊ असं कुणीच म्हटलं नाही"; नरहरी झिरवाळांचे विधान
9
MI vs LSG : बॅटिंग-बॉलिंग सगळ्यात भारी! पुन्हा दिसतोय MI चा चॅम्पियनवाला तोरा
10
IPL 2025: गगनचुंबी षटकार तोही बुमराहला; बिश्नोईचा आनंद गगनात मावेना! पंतची रिॲक्शनही व्हायरल (VIDEO)
11
Suryakumar Yadav : ...अन् सूर्या भाऊ ठरला IPL मध्ये सर्वात कमी चेंडूत ४००० धावा करणारा भारतीय
12
व्हाईट बॉल क्रिकेटमध्ये स्मृती मानधनाची ऐतिहासिक कामगिरी, मेग लॅनिंगचाही विक्रम मोडला!
13
"पहलगाममधील मृतांच्या कुटुंबीयांना नागरी शौर्य पुरस्कार द्या"; सुप्रिया सुळेंचे CM फडणवीसांना पत्र
14
सूर्यकुमार अन् रायनचा झंझावात, नमन धिरनेही चोपले; लखनौसमोर 216 धावांचे आव्हान...
15
दहशतवादी हल्ल्यानंतर अतुल कुलकर्णी पोहोचले काश्मीरला, म्हणाले- "इथे सध्या सुरक्षित असून..."
16
"हिंमत असेल बोलून दाखवा की भारतीय सैन्यात..."; शहीद सैनिकाला निरोप देताना भावाचे अंगावर काटा आणणारे भाषण
17
मदरसे, मशिदी तीन दिवसांत ओस पडल्या! स्ट्राईक होणार या शक्यतेने दहशतवादी पळाले
18
लंकेत टीम इंडियाचा डंका! आधी स्नेह राणाचा जलवा! मग सृती, हरलीनसह प्रतिकानं लुटली मैफिल
19
BRICS ची महत्वपूर्ण बैठक; परराष्ट्र मंत्री अन् राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांची अनुपस्थिती, कारण काय...
20
राणा सांगा वाद! सपा खासदार रामजीलाल सुमन यांच्या ताफ्यावर हल्ला; अनेक वाहनांचे नुकसान...

यंदा अधिक मासानिमित्त होणाऱ्या गर्दीला कोरोनाने लावला ब्रेक !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 19, 2020 18:53 IST

त्र्यंबकेश्वर : दर तीन वर्षांनी येणाºया अधिक मासास कोणी मलमास, कोणी पुरु षोत्तम मास तर कोणी धोंड्याचा महिना म्हणतात. या महिन्यात तिर्थक्षेत्री जाउन स्नान करु न देवाचे दर्शन घेतात. त्याला धोंडा न्हाणे असेही म्हणतात. तर कोणी दुष्काळात तेरावा महिना असेही म्हणतात.यावर्षी भाद्रपदानंतर आश्विन महिन्यात अधिक मास आल्याने नवरात्र, विजया दशमी, दिवाळी आदी सण महिनाभर पुढे सरकले आहेत. मात्र या अधिकमासानिमित्त नहेमी होणाºया गर्दीला कारोनामुळे यंदा ब्रेक लागला आहे.

ठळक मुद्देयावर्षी जवळपास १६० वर्षांनी आलेला हा दुर्मिळ योग आलेला आहे.

लोकमत न्युज नेटवर्कत्र्यंबकेश्वर : दर तीन वर्षांनी येणाºया अधिक मासास कोणी मलमास, कोणी पुरु षोत्तम मास तर कोणी धोंड्याचा महिना म्हणतात. या महिन्यात तिर्थक्षेत्री जाउन स्नान करु न देवाचे दर्शन घेतात. त्याला धोंडा न्हाणे असेही म्हणतात. तर कोणी दुष्काळात तेरावा महिना असेही म्हणतात.यावर्षी भाद्रपदानंतर आश्विन महिन्यात अधिक मास आल्याने नवरात्र, विजया दशमी, दिवाळी आदी सण महिनाभर पुढे सरकले आहेत. मात्र या अधिकमासानिमित्त नहेमी होणाºया गर्दीला कारोनामुळे यंदा ब्रेक लागला आहे.यावर्षी जवळपास १६० वर्षांनी आलेला हा दुर्मिळ योग आलेला आहे. शुक्रवार दि.१८ सप्टेंबर ते १६ आॅक्टोबर २०२० पर्यंत अधिक मास आहे. मीन राशीत सुर्यअसतांना चांद्र मासाचा आरंभ होतो. तोच चैत्र महिना होय. तर मेष राशीत सुर्य असतांना ज्या चांद्र मासाचा आरंभ होतो, तो वैशाख महिना असतो. जर एका राशीत सुर्य असतांना दोन चांद्र महिन्यांचा प्रारंभ झाला तर तो पहिला अधिक मास असतो. तर दुसरा तो निजमास असतो. तीस तिथींचा एक चांद्रमास व ३६० तिथींचे (१२ चांद्र मासाचे एक चांद्रवर्ष होते. तसेच एका सौर वर्षाच्या तशा सुमारे ३७१ तिथी होतात. प्रत्येक चांद्रवर्ष हे सौर मासापेक्षा ११ तिथी शिल्लक ३० तिथी झाल्या की अधिक मास येऊन चंद्र व सौर पध्दतीचा मेळ बसतो. जेव्हा अधिक मास येतो. त्यावेळी तेरा चांद्रमासांचे म्हणजे ३९० तिथींचे एक चांद्रवर्ष असते. एकदा अधिक मास आल्यापासुन मध्यम मानाने साडे बत्तीस चांद्र महिन्यांनी पुन्हा अधिक मास येतो. स्पष्ट मानाने दोन अधिक मासांमध्ये कमीत कमी २७ महिनेव जास्तीत जास्त ३४ महिने अंतर असते. ज्या चांद्र महिन्यात सुर्याचे राशी संक्र मणहोत नाही, तो स्पष्ट अधिक मास समजला जातो. या महिन्यात संपुर्ण महिनाभर उपोषण, अयाचित नक्तभोजन किंवा एकभुक्त राहतात. हे व्रत महिना भर करण्याची पध्दत असली तरी महिनाभर करण्यास जमत नसेल तर एक दिवस केले तरी चालते. या महिन्यात व्यतिपात किंवा वैधृती योग आल्यास ३३ अनारसे दान करण्याची पध्दत आहे.त्र्यंबकेश्वर येथे श्रावण मासाप्रमाणे भाविकांची गर्दी होत असते. विशेषत: महिला वर्गाची गर्दी लक्षणीय असते. सध्या बस सुरु झाल्या असल्या तरी बसमध्ये बसण्यास सहसा प्रवासी कचरत आहेत. पण परिवहन महामंडळ देखील आता प्रवाशांची विशेष काळजी घेत आहे. 

टॅग्स :trimbakeshwarत्र्यंबकेश्वरNashikनाशिक