शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहार निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तेज प्रताप यांना वाय प्लस सुरक्षा, गृह मंत्रालयाने घेतला मोठा निर्णय
2
वादग्रस्त पोस्ट मास्तर जनरल मधाळे निलंबित, अधिनस्थ अधिकाऱ्याचा छळ, चिमटे अन् गुदगुल्या भोवल्या
3
'एक रुपयाही न देता व्यवहार झाला, चुकीचे अधिकारी होते की कोण याची चौकशी करणार'; अजित पवारांनी जमीन व्यवहार प्रकरणी स्पष्टच सांगितलं
4
नांदेड हादरलं! सहा वर्षीय चिमुकलीवर २२ वर्षीय तरुणाचे अत्याचार; आरोपीला फाशीची मागणी
5
दिल्लीनंतर आता काठमांडू विमानतळावर तांत्रिक बिघाड, सर्व विमान वाहतूक थांबली
6
TET Exam: नियुक्ती वेळी पात्रता नव्हती म्हणून सेवेतून काढता येणार नाही; टीईटी उत्तीर्ण शिक्षकांच्या प्रकरणात सुप्रीम कोर्टाचा निकाल
7
खुर्चीसाठी भांडल्या, व्हिडिओ वायरल आणि आता निलंबन ! पीएमजी शोभा मधाळे यांचे अनिश्चित काळासाठी निलंबन
8
धावत्या दुचाकीवर तरुणीची छेडछाड, 'त्या' रॅपिडो चालकाला बेड्या; व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांची कारवाई
9
नार्को टेस्ट होणार? धनंजय मुंडेंच्या आरोपानंतर मनोज जरांगे पाटील यांचा थेट पोलीस अधीक्षकांकडे अर्ज 
10
'या' राज्यात स्थानिक निवडणुकीत भाजपानं बिनविरोध ७५% जागा जिंकल्या; आज निकालातही 'क्लीन स्वीप'
11
आधी विष घेतलं पण वाचला, नंतर सागरने तलावात उडी घेत संपवले आयुष्य; असं काय घडलं? 
12
पाकिस्तानने अफगाणिस्तानातील निवासी भागाला लक्ष्य केले, सहा नागरिकांचा मृत्यू
13
अमेरिकन प्रेस सेक्रेटरीवर फिदा, 'या' देशाच्या पंतप्रधानांची मोठी ऑफर, डोनाल्ड ट्रम्पही हैराण
14
"ही आमच्यासमोरील डोकेदुखी आहे, पण..." ऑस्ट्रेलियात मैदान मारूनही असं का म्हणाला सूर्या?
15
Mumbai Local Mega Block: रविवारी तिन्ही मार्गावर मेगाब्लॉक; कधी, कुठे आणि कितीवाजेपर्यंत गाड्या बंद? वाचा
16
"भैया क्या कर रहे हो...!"; बेंगलोरमध्ये Rapido कॅप्टनच्या महिलेसोबतच्या कृत्यावर कंपनीची रिअ‍ॅक्शन
17
बिहारमध्ये रस्त्यावर सापडल्या VVPAT स्लिप्स! निवडणूक आयोगाने ARO ला निलंबित केले, FIR दाखल करण्याचे आदेश दिले
18
Manoj Jarange Patil: मनोज जरांगेंना मुंबई पोलिसांचे समन्स; १० नोव्हेंबरला तपास अधिकाऱ्यांसमोर हजर राहण्याचे निर्देश!
19
कारमध्ये गर्लफ्रेंड-बॉयफ्रेंड किस करत असतील तर पोलीस पकडू शकता? काय सांगतो नियम? जाणून घ्या
20
"निवडणुकीत बुडण्याची प्रॅक्टिस...!" राहुल गांधींच्या तलावातील उडीवरून पंतप्रधान मोदींचा टोला; RJD वरही निशाणा, स्पष्टच बोलले

प्रशासन-लोक प्रतिनिधींच्या समन्वयामुळे टळला पुराचा धोका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 17, 2021 04:19 IST

इगतपुरी, त्र्यंबकेश्वरसह नाशिक धरण परिसरात पडणाऱ्या पावसामुळे धरणांतून होणाऱ्या विसर्गामुळे चांदोरीसह सायखेडा करंजगाव, शिंगवे यासह गोदाकाठ परिसर नेहमी पुराच्या ...

इगतपुरी, त्र्यंबकेश्वरसह नाशिक धरण परिसरात पडणाऱ्या पावसामुळे धरणांतून होणाऱ्या विसर्गामुळे चांदोरीसह सायखेडा करंजगाव, शिंगवे यासह गोदाकाठ परिसर नेहमी पुराच्या संकटाचा सामना करत आहे. नेहमीच येतो पावसाळा यानुसार पावसाळा व महापूर हे नेहमीचं समीकरण. त्यामुळे प्रशासनासह नागरिकांची धावपळ नेहमीची. गेल्या दोन वर्षांपूर्वी ऑगस्टमध्ये आलेल्या महापुरामुळे प्रचंड वित्तहानी होऊन शेतीचेही नुकसान झाले. त्याचे शासकीय सोपस्कार पार पाडत पंचनामे केले गेले, परंतु अजून ही त्याची नुकसानभरपाई मिळाली नाही. त्यातच दारणासह इतर छोट्या धरणांतून होत असलेल्या विसर्गामुळे गोदाकाठच्या शेतकऱ्यांची चिंता निर्माण झाली होती.

आमदार दिलीप बनकर यांनी जलसंपदाचे अधिकारी तसेच जिल्हा प्रशासनातील अधिकारी यांच्यासमवेत समन्वय साधून धरणांतील होणाऱ्या विसर्गापेक्षा जास्त विसर्ग नांदूर मध्यमेश्वर धरणातून केला गेला. नांदूर मध्यमेश्वर धरणातून १६ सप्टेंबरपर्यंत १५१७८६ क्युसेक विसर्ग झाला आहे.

१३ टीएमसी पाणी जायकवाडीकडे रवाना झाले. त्यामुळे संपूर्ण गोदाकाठ भागात नांदूर मध्यमेश्वर धरणाच्या बॅकवॉटरचा प्रभाव जाणवला नाही. त्यामुळे थोड्याशा चुकीमुळे निर्माण होणारा महापूर लोकप्रतिनिधी व जलसंपदाचे अधिकारी यांच्या समन्वयातून टळला गेला असून शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे.

चौकट...

मागील वर्षीदेखील असेच नियोजन

मागील वर्षी ऑगस्ट महिन्याच्या अखेरीला सर्व धरणे भरलेली असताना जोरदार पाऊस सुरू झाल्याने धरणातून विसर्ग करण्यात आला होता तेव्हादेखील जलसंपदा विभागाच्या योग्य नियोजनामुळे पूरपरिस्थिती टळली होती.

कोट...

जलसंपदाचे अधिकारी यांच्या सोबत समन्वय ठेऊन पूरनियंत्रणाचा प्रयत्न केला. नांदूरमध्यमेश्वर प्रकल्पात येणाऱ्या पाण्यापेक्षा जास्त विसर्ग वाढवला. प्रसंगी मध्यरात्री धरणाचे गेट उघडण्याच्या सूचना दिल्याने गोदाकाठ भागाला बॅकवॉटरचा फटका बसला नाही.

-दिलीप बनकर, आमदार, निफाड.

इगतपुरी त्र्यंबकेश्वर भागातील धरणांत होणाऱ्या पाण्याचा विसर्ग व नांदूर मध्यमेश्वर धरणातील पाणीसाठा यात योग्य समन्वय राखल्याने गोदाकाठ भागात पूर परिस्थिती निर्माण झाली नाही. यामुळे आमदार दिलीप बनकर व जलसंपदाचे अधिकारी यांचे कौतुक करावे लागेल.

- सिद्धार्थ वनारसे, सदस्य जि.प. नाशिक.

दारणा व गंगापूर धरणातून पाण्यातून विसर्ग केल्याने नांदूरमध्यमेश्वर धरणात पाणी पोहोचण्यास साधारणतः ८ ते १० तास लागतात. पाणी पोहोचण्याचे अंदाज करून विसर्ग केला जात असल्याने पाण्याचा फुगवटा यामुळे निर्माण होणारी पूरपरिस्थिती टाळता आली.

- शरद नागरे, शाखा अभियंता, नांदूरमध्येश्वर धरण.

पूरपरिस्थिती सांभाळताना लोकप्रतिनिधी व प्रशासन यांच्या योग्य नियोजनामुळे शेतकरीबांधवांचे पूरपाण्यामुळे होणारे नुकसान टळले आहे.

- सूरज राजोळे, शेतकरी, चांदोरी.

(१६ चांदोरी १) नांदूर मध्यमेश्वरमधून होणारा विसर्ग.