शहरं
Join us  
Trending Stories
1
बांगलादेशमध्ये हिंदूंवर होत असलेल्या अत्याचारावरून मुंबईपासून दिल्लीपर्यंत संताप, तीव्र आंदोलने
2
‘उद्धवसेनेसाठी मुंबई सोन्याची अंडी देणारी कोंबडी’,एकनाथ शिंदे यांची टीका  
3
कणकवलीचे नगराध्यक्ष संदेश पारकर यांनी घेतली एकनाथ शिंदेंची भेट, शिंदेसेनेत प्रवेश करणार? चर्चांना उधाण
4
अवजड ट्रक नियंत्रण सुटून कारवर उलटला, भीषण अपघातात पाच जणांचा मृत्यू 
5
पाकिस्तानला 'लॉटरी' लागली... १,३५,००,००,००,०००च्या बोलीवर PIA एअरलाईन्सचा सौदा पक्का !
6
IND W vs SL W : गोलंदाजीत शर्मा; फलंदाजीत वर्मा! दुसऱ्या टी-२० सामन्यातही लंकेसमोर टीम इंडियाचा डंका!
7
'भारताच्या दोन्ही शत्रूंकडे न्यूक्लिअर वेपन', CDS अनिल चौहान यांचे भविष्यातील युद्धाबाबत मोठे वक्तव्य
8
खरंच दारूच्या नशेत बेधुंद होते इंग्लंड क्रिकेटपटू? ECB नं चौकशीची तयारी दाखवली, पण...
9
ठाकरे बंधूंच्या युतीचा मुहुर्त ठरला, बुधवारी होणार घोषणा, अधिकृत कार्यक्रम पत्रिका समोर
10
उल्हासनगर: शिंदेसेनेत 'जुने विरुद्ध नवे' संघर्ष; तरुणांना संधी देण्याची युवासेनेची मागणी
11
IND W vs SL W : 'शर्माजी की बेटी' वैष्णवीसह श्री चरणीनं घेतली श्रीलंकेच्या बॅटर्सची फिरकी!
12
चिनी शस्त्रास्त्रे विकून पाकिस्तान मिळवतोय पैसे; लिबियाशी केला ४ अब्ज डॉलर्सचा लष्करी करार
13
T20I पदार्पणात वर्ल्ड रेकॉर्ड! या पठ्ठ्यानं पहिल्याच षटकात ५ विकेट्स घेत फिरवली मॅच
14
"नरेंद्र मोदींपेक्षा देवेंद्र फडणवीस जास्त फेकाफेकी करतात’’, हर्षवर्धन सपकाळ यांची बोचरी टीका
15
Jemimah Rodrigues: मुंबईकर जेमीला DC कडून मोठं सरप्राइज! फोटोशूटला गेली आणि दिल्लीची कॅप्टन झाली!
16
ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित साहित्यिक विनोद कुमार शुक्ल यांचे निधन, पीएम मोदींनी वाहिली श्रद्धांजली
17
लेकीला शाळेत सोडण्यासाठी आलेल्या वडिलांचा गेटवर अचानक मृत्यू; Video पाहून पाणावतील डोळे
18
गोल्डन बॉय नीरज चोप्राने सपत्निक घेतली पंतप्रधान मोदींची भेट, खास फोटो सोशल मीडियावर पोस्ट
19
मुंबईतील एवढ्या वॉर्डात मुस्लिम मतदार निर्णायक, काँग्रेस उद्धवसेनेसह 'या' पक्षांची मुस्लिम मतांवर नजर
20
फास्ट फूड बनलं सायलेंट किलर; चाऊमीन, पिझ्झा-बर्गरमुळे आतड्यांना छिद्र; १६ वर्षीय मुलीचा मृत्यू
Daily Top 2Weekly Top 5

प्रशासन-लोक प्रतिनिधींच्या समन्वयामुळे टळला पुराचा धोका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 17, 2021 04:19 IST

इगतपुरी, त्र्यंबकेश्वरसह नाशिक धरण परिसरात पडणाऱ्या पावसामुळे धरणांतून होणाऱ्या विसर्गामुळे चांदोरीसह सायखेडा करंजगाव, शिंगवे यासह गोदाकाठ परिसर नेहमी पुराच्या ...

इगतपुरी, त्र्यंबकेश्वरसह नाशिक धरण परिसरात पडणाऱ्या पावसामुळे धरणांतून होणाऱ्या विसर्गामुळे चांदोरीसह सायखेडा करंजगाव, शिंगवे यासह गोदाकाठ परिसर नेहमी पुराच्या संकटाचा सामना करत आहे. नेहमीच येतो पावसाळा यानुसार पावसाळा व महापूर हे नेहमीचं समीकरण. त्यामुळे प्रशासनासह नागरिकांची धावपळ नेहमीची. गेल्या दोन वर्षांपूर्वी ऑगस्टमध्ये आलेल्या महापुरामुळे प्रचंड वित्तहानी होऊन शेतीचेही नुकसान झाले. त्याचे शासकीय सोपस्कार पार पाडत पंचनामे केले गेले, परंतु अजून ही त्याची नुकसानभरपाई मिळाली नाही. त्यातच दारणासह इतर छोट्या धरणांतून होत असलेल्या विसर्गामुळे गोदाकाठच्या शेतकऱ्यांची चिंता निर्माण झाली होती.

आमदार दिलीप बनकर यांनी जलसंपदाचे अधिकारी तसेच जिल्हा प्रशासनातील अधिकारी यांच्यासमवेत समन्वय साधून धरणांतील होणाऱ्या विसर्गापेक्षा जास्त विसर्ग नांदूर मध्यमेश्वर धरणातून केला गेला. नांदूर मध्यमेश्वर धरणातून १६ सप्टेंबरपर्यंत १५१७८६ क्युसेक विसर्ग झाला आहे.

१३ टीएमसी पाणी जायकवाडीकडे रवाना झाले. त्यामुळे संपूर्ण गोदाकाठ भागात नांदूर मध्यमेश्वर धरणाच्या बॅकवॉटरचा प्रभाव जाणवला नाही. त्यामुळे थोड्याशा चुकीमुळे निर्माण होणारा महापूर लोकप्रतिनिधी व जलसंपदाचे अधिकारी यांच्या समन्वयातून टळला गेला असून शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे.

चौकट...

मागील वर्षीदेखील असेच नियोजन

मागील वर्षी ऑगस्ट महिन्याच्या अखेरीला सर्व धरणे भरलेली असताना जोरदार पाऊस सुरू झाल्याने धरणातून विसर्ग करण्यात आला होता तेव्हादेखील जलसंपदा विभागाच्या योग्य नियोजनामुळे पूरपरिस्थिती टळली होती.

कोट...

जलसंपदाचे अधिकारी यांच्या सोबत समन्वय ठेऊन पूरनियंत्रणाचा प्रयत्न केला. नांदूरमध्यमेश्वर प्रकल्पात येणाऱ्या पाण्यापेक्षा जास्त विसर्ग वाढवला. प्रसंगी मध्यरात्री धरणाचे गेट उघडण्याच्या सूचना दिल्याने गोदाकाठ भागाला बॅकवॉटरचा फटका बसला नाही.

-दिलीप बनकर, आमदार, निफाड.

इगतपुरी त्र्यंबकेश्वर भागातील धरणांत होणाऱ्या पाण्याचा विसर्ग व नांदूर मध्यमेश्वर धरणातील पाणीसाठा यात योग्य समन्वय राखल्याने गोदाकाठ भागात पूर परिस्थिती निर्माण झाली नाही. यामुळे आमदार दिलीप बनकर व जलसंपदाचे अधिकारी यांचे कौतुक करावे लागेल.

- सिद्धार्थ वनारसे, सदस्य जि.प. नाशिक.

दारणा व गंगापूर धरणातून पाण्यातून विसर्ग केल्याने नांदूरमध्यमेश्वर धरणात पाणी पोहोचण्यास साधारणतः ८ ते १० तास लागतात. पाणी पोहोचण्याचे अंदाज करून विसर्ग केला जात असल्याने पाण्याचा फुगवटा यामुळे निर्माण होणारी पूरपरिस्थिती टाळता आली.

- शरद नागरे, शाखा अभियंता, नांदूरमध्येश्वर धरण.

पूरपरिस्थिती सांभाळताना लोकप्रतिनिधी व प्रशासन यांच्या योग्य नियोजनामुळे शेतकरीबांधवांचे पूरपाण्यामुळे होणारे नुकसान टळले आहे.

- सूरज राजोळे, शेतकरी, चांदोरी.

(१६ चांदोरी १) नांदूर मध्यमेश्वरमधून होणारा विसर्ग.