शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
4
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
5
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
6
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
7
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
8
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
9
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
10
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
11
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
12
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
13
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
14
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
15
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
16
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
17
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
18
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
19
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
20
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
Daily Top 2Weekly Top 5

कादवाच्या संचालक मंडळाला साथ द्यावी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 26, 2018 00:56 IST

दिंडोरी : राज्यात अनेक साखर कारखाने बंद पडले आहेत. जिल्ह्यातील सर्वच सहकारी साखर कारखाने बंद पडत असताना श्रीराम शेटे यांनी अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत कादवा सुरू ठेवत सहकार क्षेत्रापुढे वेगळा आदर्श ठेवला आहे. कादवा सुस्थितीत सुरू असून, कादवाच्या प्रगतीसाठी सर्वांनी संचालक मंडळाला साथ द्यावी, असे आवाहन आमदार बाळासाहेब सानप यांनी केले.

ठळक मुद्देबाळासाहेब सानप : कादवा साखर कारखान्याच्या गळीत हंगामाचा शुभारंभ

दिंडोरी : राज्यात अनेक साखर कारखाने बंद पडले आहेत. जिल्ह्यातील सर्वच सहकारी साखर कारखाने बंद पडत असताना श्रीराम शेटे यांनी अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत कादवा सुरू ठेवत सहकार क्षेत्रापुढे वेगळा आदर्श ठेवला आहे. कादवा सुस्थितीत सुरू असून, कादवाच्या प्रगतीसाठी सर्वांनी संचालक मंडळाला साथ द्यावी, असे आवाहन आमदार बाळासाहेब सानप यांनी केले.कादवा सहकारी साखर कारखान्याच्या ४२ व्या गळीत हंगामाचा शुभारंभ आमदार बाळासाहेब सानप, नरहरी झिरवाळ, राहुल आहेर, माजी आमदार शिरीष कोतवाल, जिल्हा बँक संचालक गणपतराव पाटील, बाजार समिती सभापती दत्तात्रेय पाटील, संजय पडोळ, सदाशिव शेळके, कारखान्याचे अध्यक्ष श्रीराम शेटे, उपाध्यक्ष उत्तम भालेराव, सर्व संचालक , युनियन अध्यक्ष सुनील कावळे आदींच्या हस्ते उसाची मोळी गव्हाणीत टाकून करण्यात आला. त्यावेळी आमदार सानप बोलत होते. प्रारंभी दिलीप देशमुख, अशोकराव संधान, तानाजी बर्डे, बापू जाधव, मदनराव केदार आदींच्या हस्ते सपत्नीक गव्हाण पूजन करण्यात आले.आमदार सानप यांनी कादवाची वाटचाल प्रतिकूल परिस्थितीत दिमाखात सुरू असल्याचे गौरवोद्गार काढले. कादवाने सर्वाधिक भाव व वेळेत पैसे दिले आहेत; मात्र केवळ साखर उत्पादनातून कारखाने चालविणे अवघड आहे. म्हणूनच केंद्र सरकारने इथेनॉल प्रकल्पाबाबत पॅकेज जाहीर केले असून कादवाने याचा लाभ घ्यावा, असे आवाहन केले. तालुक्यातील अपुरे सिंचन प्रकल्प पूर्ण व्हावे यासाठी नियोजन करण्यासाठी पाठपुरावा करू, असे त्यांनी सांगितले.यावेळी आमदार नरहरी झिरवाळ यांनी तालुक्यातील धरणातील पाण्याचे नियोजन करताना लाभधारक शेतकऱ्यांचे हक्काचे पाणी कमी करू नये यासाठी सातत्याने पाठपुरावा सुरू असून, पाणीप्रश्नावर सर्वांना एकत्र येण्याचे आवाहन केले.यावेळी जिल्हा बँक संचालक गणपतराव पाटील, बाजार समिती सभापती दत्तात्रेय पाटील यांची भाषणे झाली. यावेळी माजी जि.प. उपाध्यक्ष प्रकाश वडजे, बाजार समिती उपसभापती अनिल देशमुख, यू.पी. मोरे, भास्कर भगरे, मधुकर गटकळ, त्र्यंबक संधान, बापू पडोळ, विश्वनाथ देशमुख, बाळासाहेब जाधव, दिनकर जाधव, शहाजी सोमवंशी, सुनील केदार, सुभाष शिंदे, सुनील कावळे आदींसह सभासद, कारखान्याचे अधिकारी कामगार उपस्थित होते.गाळप क्षमता वाढविण्याचा प्रयत्नकारखान्याचे अध्यक्ष श्रीराम शेटे यांनी यंदा कादवाने प्रतिदिन २००० मेट्रिक टन गाळप करीत तीन लाखांहून अधिक मेट्रिक टन ऊस गाळपाचे उद्दिष्ट ठेवले असल्याचे सांगितले. कादवाने एफआरपी अदा केली आहे. साखर उतारा वाढावा यासाठी प्रयत्नशील असून, त्यासाठी सर्वांचे सहकार्य आवश्यक आहे. गाळप क्षमता वाढविण्याचा प्रयत्न सुरू असून, एक बॉयलर, टर्बाइन व मिल टाकल्यास दररोज २५०० मेट्रिक टन गाळप होणे शक्य होणार असून, त्यादृष्टीने प्रयत्न सुरू आहे. शेतकºयांनी पाणी मागणी फॉर्म भरावे ,कार्यक्षेत्रात जास्तीत जास्त ऊस लागवड करण्याचे आवाहन शेटे यांनी केले.