शहरं
Join us  
Trending Stories
1
15 दिवसांत गाझा युद्ध संपणार! आता हमासच्या जागेवर कोण राज्य करणार? नेतान्याहू-ट्रम्प यांनी घेतला मोठा निर्णय
2
आणीबाणीच्या काळात संविधानाच्या प्रस्तावनेत 'धर्मनिरपेक्ष', 'समाजवादी' शब्द जोडले गेले, समीक्षा  व्हावी; संघाची मागणी
3
"जय हिंद, जय भारत..."; आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकातून शुभांशू शुक्ला यांचं पहिलं भाषण, काय म्हणाले...?
4
“इंदिरा गांधींनी आणीबाणी उठवली, पण मतचोरी करुन निवडणुका घेतल्या नाहीत”; काँग्रेसची टीका
5
अमेरिका, रशिया,यूएई, सौदी...; 'या' यादीत लवकरच भारतही येईल, सर्व काही 'सेट'
6
“मी कधीच विरोधासाठी विरोध करणार नाही”; शक्तिपीठ महामार्गावरून शरद पवारांचे मोठे विधान
7
“मराठी भाषा अनिवार्य, हिंदीसह इतर भारतीय भाषा ऐच्छिक”: शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे
8
शुभांशू शुक्ला यांचं आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकात जबरदस्त स्वागत, ठरले अशी कामगिरी करणारे दुसरे भारतीय; बघा VIDEO
9
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
10
“राज्यात हिंदी सक्ती धोरण उद्धव ठाकरेंनी स्वीकारले, आदित्य ठाकरेंकडून पाठराखण”; कुणाचा दावा?
11
ENG vs IND : जसप्रीत बुमराहला दुसऱ्याच सामन्यात दिली जाणार विश्रांती; त्याच्या जागी कुणाची लागणार वर्णी?
12
राज ठाकरेंच्या मोर्चात जाणार का? शरद पवारांचे सूचक विधान; म्हणाले, “दोन्ही ठाकरे बंधू...”
13
इंडियन एअर फोर्समध्ये अग्निवीर होण्याची सुवर्णसंधी...! 11 जुलैपासून सुरू होणार अर्ज प्रक्रिया; जाणून घ्या सविस्तर
14
भारताच्या 'ध्वनि'मुळे शत्रू हादरेल, पाकिस्तान अन् चीनमध्येही उडेल खळबळ! कसं आहे नवं क्षेपणास्त्र?
15
“दिल्लीतील आकाच्या इशाऱ्याने शक्तिपीठ महामार्गाचा घाट, हिंदी सक्तीला विरोधच”; काँग्रेस ठाम
16
आषाढ गुप्त नवरात्र प्रारंभ, वराही देवीची पूजा आणि लवकर विवाह ठरण्यासाठी उपयुक्त मंत्र
17
“जनतेच्या पैशातून शेतकरी योजना, नरेंद्र मोदी पैसे देतात हा भाजपाचा भ्रम”: हर्षवर्धन सपकाळ
18
जगन्नाथ रथयात्रा 2025: लाखो भाविक अनुभवतात अद्भूत सोहळा; पाहा, प्रथा, परंपरा, महात्म्य अन् महत्त्व
19
२०३३ पर्यंत भारतात अजून काय-काय घडेल? जगन्नाथ पुरी मंदिराचे मोठे भाकित; पाहा, १० बडे संकेत
20
मनसेनं मोर्चाची तारीख बदलली, राज ठाकरेंनी जारी केलं निवेदन, काय म्हणाले? जाणून घ्या...

दीक्षान्त समारंभ : ११४ वी तुकडी; जळगावचा कल्पेशकुमार चव्हाण सर्वोत्कृष्ट

By admin | Updated: October 6, 2016 00:39 IST

प्रशिक्षणार्थीपोलिसांवर जनसेवेची जबाबदारी : माथूर

नाशिक : काळानुसार बदललेल्या आव्हानांचा सामना करण्यासाठी पोलिसांना सज्ज रहावे लागणार आहे़ पोलीस दलातील अधिकारी वा कर्मचाऱ्यांनी सर्वसामान्यांसाठी वाहून घ्यावे, असे प्रतिपादन राज्याचे पोलीस महासंचालक सतीश माथूर यांंनी केले़ महाराष्ट्र पोलीस अकादमीच्या मुख्य कवायत मैदानावर बुधवारी (दि़ ५) झालेल्या प्रशिक्षणार्थी पोलीस उपनिरीक्षकांच्या ११४ व्या तुकडीच्या दीक्षान्त संचलनप्रसंगी ते बोलत होते़ यावेळी जळगावच्या कल्पेशकुमार चव्हाण यास सर्वोत्कृष्ट प्रशिक्षणार्थीची मानाची तलवार देऊन माथूर यांच्या हस्ते गौरव करण्यात आला़माथूर पुढे म्हणाले की, राज्य सरकारने नाशिक पोलीस अकादमीला दिलेल्या स्वायत्ततेमुळे पुण्याप्रमाणेच नाशिकचाही नावलौकिक होईल, अशी आशा आहे़ पोलीस दलात सहभागी होणाऱ्यांचे प्रशिक्षण कधीच संपत नसते, त्यामुळे रोज नवीन संधी असते. सद्यस्थितीत पोलीस दलाला नवीन तांत्रिक साहित्य, साधन-सामग्री मिळत असल्याने पोलिसांची कार्यपद्धती तसेच गुन्ह्यांच्या तपासपद्धतीत सुधारणा झाली आहे़ गत ३५ वर्षांमध्ये अकादमीतील सेवा सुविधांमध्ये चांगलीच वाढ झाली असून, हे चित्र आशादायी असल्याचे माथूर यांनी सांगितले़ महाराष्ट्र पोलीस अकादमीचे संचालक नवल बजाज यांनी तुकडीला कालसंगत अशा नवीन अभ्यासक्रम रचनेनुसार प्रशिक्षण दिल्याचे सांगितले़ या अधिकाऱ्यांना कायद्याचे ज्ञान हे प्रात्यक्षिकाद्वारे देण्यात आले असून, गंभीर गुन्ह्यांचा तपास, न्यायालयीन कामकाज, पोलीस कर्मचाऱ्यांबरोबर सौहार्दतेची वागणूक अशा सर्व अंगाने प्रशिक्षण देण्यात आले आहे़ कायद्याची प्रभावी अंमलबजावणी करताना कोणाचीही तमा बाळगू नका, आपली प्रतिमा स्वच्छ ठेवण्याबाबत बजाज यांनी मार्गदर्शनात सांगितले़