शहरं
Join us  
Trending Stories
1
"तर मी फडणवीसांना या जन्मी माफ करणार नाही", अंजली दमानियांची पोस्ट, 'तो' फोटोही केला शेअर
2
"पंडित नेहरूंची पत्रे अजूनही सोनिया गांधींकडेच"; केंद्राचा खळबळजनक दावा; म्हणाले, 'हा देशाचा वारसा'
3
“मी माझ्या पक्षाचा पर्मनंट चिफ, कुणी बायपास करणार नाही, तसा प्रयत्न झाला तर…”: रामदास आठवले
4
IND vs SA 4th T20I : शुभमन गिल 'आउट'; टॉसला उशीर! जाणून घ्या त्यामागचं कारण
5
गुरुवारी मार्गशीर्ष शिवरात्रि २०२५: ‘असे’ करा व्रत, शिवाचे विशेष पूजन; काही कमी पडणार नाही!
6
"मला कधीच वाटलं नव्हतं की इतकी पर्सनल..."; MMS लीक प्रकरणावर Payal Gaming चे स्पष्टीकरण
7
“माणिकराव कोकाटेंना वाचवण्याचा सरकारकडून प्रयत्न, २४ तास झाले अद्याप अटक का नाही?”: सपकाळ
8
वांद्रे-वरळी सी लिंकवर २५२ किमी प्रतितास वेगाने पळवली लॅम्बॉर्गिनी, पोलिसांनी केली अशी कारवाई  
9
आवळा कँडी ते च्यवनप्राश... आरोग्यासाठी ठरू शकतं घातक; न्यूट्रिशनिस्टने सांगितले साइड इफेक्ट
10
"शिक्षा देण्यापेक्षा माफ करण्यातच कायद्याचा मोठेपणा"; बूट फेक प्रकरणावर माजी सरन्यायाधीश गवईंचे रोखठोक भाष्य
11
Maruti Suzuki ने लॉन्च केली नवीन WagonR; वृद्ध आणि दिव्यांगांसाठी मिळणार खास 'स्विव्हल सीट'
12
प्रियंका आणि राहुल गांधी यांच्यात वाद, कुटुंबीयांशी भांडून परदेशात गेले; केंद्रीय मंत्र्याचा मोठा दावा
13
“SIR प्रक्रिया निरर्थक, ५०० परदेशींसाठी ८ कोटी लोकांचा छळ”; माजी निवडणूक आयुक्त थेट बोलले
14
९९६६ धावा आणि ७०५ विकेट्स…तरीही तो अनसोल्ड! देशांतर्गत क्रिकेटमधील ‘कपिल देव’ची अनटोल्ड स्टोरी
15
"दिल्लीत प्रदूषण वाढवण्यासाठी ठिकठिकाणी कचरा जाळतेय AAP"; पर्यावरण मंत्र्यांचा गंभीर आरोप
16
गडकिल्ल्यांवरील अतिक्रमण हटवण्यासाठी समिती; नितेश राणेंची माहिती, सरकारचा महत्त्वाचा निर्णय
17
भारतात टीशर्टवर राहणाऱ्या राहुल गांधींना जर्मनीत भरली 'हुडहुडी'! स्वेटरवर दिसले
18
आई-वडिलांचा केला खून, मृतदेहांचे तुकडे करून गोणीत भरले, अन् नदीत फेकले, मुलाचं धक्कादायक कृत्य 
19
‘महाराष्ट्रात येणाऱ्या सर्व विमानांमध्ये मराठी भाषेत उद्घोषणा करा’, नाना पटोले यांची मागणी 
20
हृदयद्रावक! 'तो' सेल्फी ठरला अखेरचा; लग्नाच्या वाढदिवशी पतीसमोर पत्नीचा पाय घसरला अन्...
Daily Top 2Weekly Top 5

ब्रिटिश राजवटीपासून इंग्रजी साहित्याचे अनुकरण सुरू

By admin | Updated: February 15, 2015 01:01 IST

ब्रिटिश राजवटीपासून इंग्रजी साहित्याचे अनुकरण सुरू

नाशिक : मराठी साहित्याचा पाया असणाऱ्या संत साहित्याला ब्रिटिश काळापासून वाईट दिवस आले. तत्पूर्वी ज्ञानदेवांपासून ते निळूबारायांपर्यंत सर्वच संतांनी जगण्याविषयीचे तत्त्वज्ञान सोप्या भाषेत मांडले होते. ते घराघरात पोहोचले होते, परंतु ब्रिटिश राजवटीपासून इंग्रजी साहित्याचे अनुकरण सुरू झाल्याने संतसाहित्याची पीछेहाट झाल्याचे मत ८८व्या मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष डॉ. सदानंद मोरे यांनी व्यक्त केले. साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल नाशिक जिल्हा वारकरी संप्रदायाच्या वतीने आयोजित सत्कार सोहळ्याप्रसंगी ते बोलत होते. याप्रसंगी व्यासपीठावर अध्यक्षस्थानी नीलिमा पवार, आमदार देवयानी फरांदे, आमदार सीमा हिरे, लक्ष्मीचंद्र शेंडे, मविप्र संस्थेचे अध्यक्ष प्रतापदादा सोनवणे, सभापती नितीन ठाकरे, केशव पाटील, त्र्यंबक गायकवाड आदि उपस्थित होते. ते म्हणाले संतसाहित्य मराठी साहित्याचा पाया आहे. वर्तमानकाळाचा अभ्यास करून अध्यात्माद्वारे त्यावर मार्गदर्शन करण्याचे काम संतांनी केले. राज्याची संस्कृती व्यापक आहे, तिची जडणघडणही संतांनीच केली. संतांनी त्यांच्या काळात साहित्यातून वर्तमानकाळातील परिस्थितीवर प्रहार केले. संत निवृत्तिनाथांपासून ते निळोबारायांपर्यंत सर्वांनीच साहित्य घराघरांत पोहोचविले. १३व्या शतकात स्थापन झालेल्या भागवत धर्माने जाती पाती तोडत नव्या धर्माची स्थापना केली. त्यात अनेक पंथांच्या आणि धर्माच्या लोकांनी त्यात प्रवेश केला. त्यानंतर भेदभावाची तीव्रता कमी झाली होती, संतसाहित्याच्या विचारांची ती क्रांती होती. त्यानंतर पेशवाईच्या काळात मराठा साम्राज्याचा विस्तार झाल्यानंतर संतसाहित्यावर आधारितच लावण्या तयार होऊ लागल्या. तोपर्यंत संतसाहित्य घराघरात होते. परंतु त्यानंतर इंगजांबरोबर आलेल्या त्यांच्या साहित्याचे अनुकरण मराठी साहित्यात होऊ लागल्याने तेव्हापासूनच संतसाहित्याकडे दुर्लक्ष झाल्याचे मत डॉ. मोरे यांनी व्यक्त केले. त्यानंतरही स्वातंत्र्यपूर्व काळात महात्मा फुलेंच्या सत्यशोधक समाजाची आरती, प्रार्थना समाजाची तत्त्वे यांच्यामध्येही संतसाहित्याचाच वारसा दिसून आला. त्यामुळे महाराष्ट्रात जन्माला आलेल्या प्रत्येकावर संतसाहित्याचेच संस्कार होत असतात, असे माझे मत असल्याचेही ते म्हणाले. मी संतसाहित्याबरोबरच आधुनिक साहित्याचाही लेखक आहे. त्यामुळे संतसाहित्यिकाच्या दृष्टीतून आधुनिक पद्धतीचे लिखाण करताना मी दोन्हीकडे समतोल साधतो असेही ते म्हणाले. प्रारंभी दामोदर गावले यांनी प्रास्तविक केले. त्यानंतर प्राचार्य डॉ. दिलीप धोंडगे यांनी परिचय करून दिला. वारकरी शिक्षण संस्थेचे विश्वस्त मारुतीबुवा कुऱ्हेकर, कार्यक्रमाच्या अध्यक्ष नीलिमा पवार यांनी मनोगत व्यक्त केले. विनायकदादा पाटील यांनी सूत्रसंचालन केले. (प्रतिनिधी)