शहरं
Join us  
Trending Stories
1
सूर्यकुमार अन् रायनचा झंझावात, नमन धिरनेही चोपले; लखनौसमोर 216 धावांचे आव्हान...
2
मदरसे, मशिदी तीन दिवसांत ओस पडल्या! स्ट्राईक होणार या शक्यतेने दहशतवादी पळाले
3
"लाडक्या बहि‍णी १५०० मध्ये खूष, २१०० रुपये देऊ असं कुणीच म्हटलं नाही"; नरहरी झिरवाळांचे विधान
4
BRICS ची महत्वपूर्ण बैठक; परराष्ट्र मंत्री अन् राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांची अनुपस्थिती, कारण काय...
5
राणा सांगा वाद! सपा खासदार रामजीलाल सुमन यांच्या ताफ्यावर हल्ला; अनेक वाहनांचे नुकसान...
6
आले किती, गेले किती...! एकट्या दिल्लीत ५००० पाकिस्तानी, IB ने यादी सोपविली; पुढे काय...
7
खळबळजनक! भाजी बनवण्यासाठी मोठा बटाटा घेतला म्हणून पत्नीची कुऱ्हाडीने हत्या
8
एथर कंपनीसाठी बॅड न्यूज? ग्रे मार्केटमध्ये चांगले संकेत नाही, आयपीओ उघडण्यापूर्वीच जीएमपी क्रॅश
9
जरा थांबा! चमचमीत खाण्याच्या नादात 'या' गोष्टी गुपचूप वाढवताहेत तुमचं वजन, आरोग्यासही घातक
10
"मला अनुभव आला तो मांडला, तरी दिलगिरी व्यक्त करतो"; पोलिसांविषयी वादग्रस्त वक्तव्य करुन गायकवाडांचा माफीनामा
11
रेखा झुनझुनवाला ते खन्ना यांच्यासह ५ मोठ्या गुंतवणूकदारांची शेअर्स खरेदी, तुमच्या पोर्टफोलिओमध्येही आहे का?
12
"एक दिवस पाकिस्तानी स्वतःच्याच सरकारविरोधात बंड पुकारतील" विजय देवरकोंडा स्पष्टच बोलला
13
बायकोसोबत काश्मिरमध्ये अडकलेल्या मराठी कलाकाराचा सुन्न करणारा अनुभव, म्हणाला- "गेल्या पाच दिवसात आम्हाला..."
14
लेडी सिंघम! डॉक्टरने पाहिलं UPSC चं स्वप्न; दिवसा रुग्णांवर उपचार अन् रात्री अभ्यास, झाली IPS
15
Cars24 ने एकाच वेळी २०० कर्मचाऱ्यांना नोकरीवरुन काढलं; कपातीचे कारणही सांगितलं
16
पहलगाम हल्ल्यातील मृतांच्या वारसांना शासकीय नोकरी देण्याबाबत मुख्यमंत्र्यांचं मोठं वक्तव्य; म्हणाले...
17
"मी तिच्याशिवाय राहू शकत नाही, दहशतवाद्यांना कठोर शिक्षा झाली पाहिजे"; आईपासून दुरावली मुलं
18
रिकी पाँटिंगमुळे पंजाब आयपीएलची ट्रॉफी जिंकणार नाही, माजी क्रिकेटपटूचे गंभीर आरोप
19
परदेशी गुंतवणूकदारांची आठवड्यात १७,४२५ कोटी रुपयांची गुंतवणूक; 'ही' आहेत २ मुख्य कारणं

वणी परिसरात दूषित पाणीपुरवठा

By admin | Updated: August 21, 2014 00:20 IST

आरोग्याची समस्या : विषाणूजन्य रुग्णांची संख्या चिंताजनक

वणी : दूषित पाणी व अस्वच्छतेमुळे साथीचे आजार बळावले असून, हिवताप, अतिसार, कावीळ, विषमज्वर व विषाणूजन्य रुग्णसंख्येची एप्रिल ते जुलै महिन्याची आकडेवारी चिंताजनक आहे. एप्रिल ते जुलै २०१४ या चार महिन्यांत हिवताप-४, अतिसार-१४३, कावीळ-८, विषमज्वर-७१, विषाणूजन्य आजार -१५५ ही रुग्णांची अधिकृत आकडेवारी वणी ग्रामीण रुग्णालयातील असून, याव्यतिरिक्त अनेक खासगी रुग्णालयांत अशाच आजाराचे रुग्ण उपचार घेत असल्याचे बोलले जात आहे. हे सर्व आजार दूषित पाणी व परिसर अस्वच्छतेमुळे होत असल्याची माहिती वैद्यकीय अधिकाऱ्यांनी दिली. प्रत्यक्षात एका वैद्यकीय अधिकाऱ्यालाही डेंग्यू झाला होता.पंचवीस हजार लोकवस्ती असलेल्या वणी शहराच्या पाणीपुरवठा योजनेची स्थिती अशी ओझरखेड धरणालगतच्या विहिरीतून सुमारे सहा किलोमीटर अंतरातून जलवाहिनीद्वारे पाणीपुरवठा योजनेच्या फिल्टर हाऊसमध्ये पाणी सोडण्यात येते. एका तासात २० हजार लिटर पाणी शुद्ध करण्यात येते. जलशुद्धी केंद्रातून हे पाणी पंपहाऊसमध्ये येते. या पंपहाऊसची क्षमता ७० हजार लिटर इतकी आहे. येथून दोन लाख लिटर क्षमतेच्या जलकुंभात पाणी जमा होते ही प्रक्रिया सातत्याने सुरू असते.तद्नंतर पिंपळगाव रस्त्यावरील दोन लाख लिटर, टोकाडीपाडा येथील एक लाख ५० हजार लिटर, बोरीचा पाडा येथील ५० हजार लिटर, शिलपाडा ५० हजार लिटर व इतर जलकुंभाद्वारे वणी शहरात पाणीपुरवठा करण्यात येतो.स्वच्छ व शुद्ध पाण्यासाठी टीसीएल, तुरटी आदिंचा वापर करण्यात येतो तसेच जलशुद्धीकरण केंद्रात राजस्थान येथून आणलेली रेती साठविण्यात येते. १५ टन इतकी क्षमता या केंद्राची आहे. पाणीशुद्धी करणासाठी अडीच वर्षांनी ही रेती बदलणे आवश्यक आहे. आत असणाऱ्या रेतीला अडीच वर्षाचा कालावधी झाला आहे. ग्रामपालिकेने दुसरी रेती मागविली आहे. मात्र मनुष्यबळाअभावी हे काम लांबणीवर पडले आहे. दरम्यान, डासांची उत्पत्तीस्थाने दूषित पाणीपुरवठ्याची माहिती ग्रामविकास अधिकाऱ्यांना दिल्याचे पांडाणे अधिकारी डॉ. आहिरे यांनी सांगितले.