शहरं
Join us  
Trending Stories
1
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विधान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
2
टीव्ही, रेफ्रिजरेटर आणि मोबाईल फोन दुरुस्त करण्याचा त्रास संपला; या सरकारी योजनेमुळे लोकांचे हजारो रुपये वाचणार
3
पाकिस्तानच्या हरिस रौफवर दोन सामन्यांसाठी बंदी; ICC ची मोठी कारवाई, बुमराहासह सूर्यकुमारलाही ठोठावला दंड
4
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
5
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
6
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
7
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
8
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
9
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
10
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
11
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
12
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
13
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
14
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
15
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
16
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
17
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
18
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!
19
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
20
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 

वणी परिसरात दूषित पाणीपुरवठा

By admin | Updated: August 21, 2014 00:20 IST

आरोग्याची समस्या : विषाणूजन्य रुग्णांची संख्या चिंताजनक

वणी : दूषित पाणी व अस्वच्छतेमुळे साथीचे आजार बळावले असून, हिवताप, अतिसार, कावीळ, विषमज्वर व विषाणूजन्य रुग्णसंख्येची एप्रिल ते जुलै महिन्याची आकडेवारी चिंताजनक आहे. एप्रिल ते जुलै २०१४ या चार महिन्यांत हिवताप-४, अतिसार-१४३, कावीळ-८, विषमज्वर-७१, विषाणूजन्य आजार -१५५ ही रुग्णांची अधिकृत आकडेवारी वणी ग्रामीण रुग्णालयातील असून, याव्यतिरिक्त अनेक खासगी रुग्णालयांत अशाच आजाराचे रुग्ण उपचार घेत असल्याचे बोलले जात आहे. हे सर्व आजार दूषित पाणी व परिसर अस्वच्छतेमुळे होत असल्याची माहिती वैद्यकीय अधिकाऱ्यांनी दिली. प्रत्यक्षात एका वैद्यकीय अधिकाऱ्यालाही डेंग्यू झाला होता.पंचवीस हजार लोकवस्ती असलेल्या वणी शहराच्या पाणीपुरवठा योजनेची स्थिती अशी ओझरखेड धरणालगतच्या विहिरीतून सुमारे सहा किलोमीटर अंतरातून जलवाहिनीद्वारे पाणीपुरवठा योजनेच्या फिल्टर हाऊसमध्ये पाणी सोडण्यात येते. एका तासात २० हजार लिटर पाणी शुद्ध करण्यात येते. जलशुद्धी केंद्रातून हे पाणी पंपहाऊसमध्ये येते. या पंपहाऊसची क्षमता ७० हजार लिटर इतकी आहे. येथून दोन लाख लिटर क्षमतेच्या जलकुंभात पाणी जमा होते ही प्रक्रिया सातत्याने सुरू असते.तद्नंतर पिंपळगाव रस्त्यावरील दोन लाख लिटर, टोकाडीपाडा येथील एक लाख ५० हजार लिटर, बोरीचा पाडा येथील ५० हजार लिटर, शिलपाडा ५० हजार लिटर व इतर जलकुंभाद्वारे वणी शहरात पाणीपुरवठा करण्यात येतो.स्वच्छ व शुद्ध पाण्यासाठी टीसीएल, तुरटी आदिंचा वापर करण्यात येतो तसेच जलशुद्धीकरण केंद्रात राजस्थान येथून आणलेली रेती साठविण्यात येते. १५ टन इतकी क्षमता या केंद्राची आहे. पाणीशुद्धी करणासाठी अडीच वर्षांनी ही रेती बदलणे आवश्यक आहे. आत असणाऱ्या रेतीला अडीच वर्षाचा कालावधी झाला आहे. ग्रामपालिकेने दुसरी रेती मागविली आहे. मात्र मनुष्यबळाअभावी हे काम लांबणीवर पडले आहे. दरम्यान, डासांची उत्पत्तीस्थाने दूषित पाणीपुरवठ्याची माहिती ग्रामविकास अधिकाऱ्यांना दिल्याचे पांडाणे अधिकारी डॉ. आहिरे यांनी सांगितले.