शहरं
Join us  
Trending Stories
1
आता दोघांनीही थांबावे; डोनाल्ड ट्रम्प यांची भारत-पाकिस्तानमध्ये पुन्हा मध्यस्थीची ऑफर
2
रात्री उशिरा पाकिस्तानी पंतप्रधानांनी त्यांच्या देशाला संबोधित केले; भारताला दिली धमकी...
3
भारताच्या एअर स्ट्राईकमुळे पाकिस्तानमध्ये कितीजण मृत्युमुखी पडले? आकडा आला समोर  
4
बहावलपूरवरील हल्ला पाकिस्तानी सैन्याच्या लागलाय जिव्हारी, कापलं गेलंय नाक, कारण काय?
5
पाकिस्तानच्या गोळीबारात भारतीय जवान शहीद; डॉक्टरांनी वाचविण्याचा खूप प्रयत्न केला...
6
नियंत्रण रेषेवर पाकिस्तानकडून आगळीक, भारतीय नागरिकांच्या मृत्यूनंतर चोख प्रत्युत्तर देण्याचे लष्कराला आदेश 
7
‘ऑपरेशन सिंदूर’ला नागपुरातील ‘नागास्त्र-१’चे बळ ? टेहळणीसोबतच लक्ष्याचा भेद करण्याची क्षमता
8
पॉवरप्लेमध्ये अर्धा संघ तंबूत परतल्यावरही CSK नं काढली मॅच; प्लेऑफ्स शर्यतीत KKR तळ्यात मळ्यात
9
Operation Sindoor 2.0: पाकिस्तानला सहजासहजी सोडणार नाही भारत, आणखी काय-काय घडणार?
10
Thank You Rohit Sharma! हिटमॅनच्या कसोटी निवृत्तीनंतर कोण काय म्हणाले? वाचा सविस्तर
11
ऑपरेशन सिंदूरनंतर पाकिस्तानचे अवसान गळाले, आता म्हणतात, "आम्ही संयम पाळू, तणाव आणखी वाढता नये’’  
12
मुरिदकेमध्ये बड्या दहशतवाद्याचा खात्मा? पाकिस्तानी सैन्यातील अधिकाऱ्यांची अंत्ययात्रेला हजेरी   
13
Mumbai Local: मुसळधार पाऊस आणि वादळी वाऱ्यामुळे मुंबई लोकल सेवा विस्कळीत, प्रवाशांची गैरसोय
14
'ऑपरेशन सिंदूर'बद्दल पंतप्रधान मोदींनी कालच दिले होते संकेत? 'त्या' वाक्यावरून रंगलीये चर्चा
15
Rohit Sharma: रोहित शर्माची कसोटी क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा
16
Operation Sindoor Live Updates: रक्ताच्या एकेक थेंबाचा बदला घेऊन, शाहबाज शरीफ यांची भारताला धमकी
17
"मारुतीरायाच्या आदर्शांचं पालन केलं, आम्ही त्यांनाच मारलं ज्यांनी…’’, राजनाथ सिंह यांचं मोठं विधान  
18
"दहशतवाद्यांना माफी नाही"; 'ऑपरेशन सिंदूर'वर इंग्लंडचे माजी PM ऋषी सुनक यांची रोखठोक प्रतिक्रिया
19
अजिंक्य रहाणेचं अर्धशतक हुकलं; पण IPL मध्ये ५ हजार धावांचा पल्ला गाठत मारली खास क्लबमध्ये एन्ट्री
20
Operation Sindoor : "कलमाबद्दल विचारणाऱ्यांना भारतीय सैन्याने महाभारत सुनावलं, आपल्या शांत झोपेमागे..."

वडाळा गावात दूषित पाणीपुरवठा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 18, 2021 04:13 IST

मनपाच्या पाणीपुरवठा विभागाकडून दररोज पाणीपुरवठा केला जातो. मात्र, काही दिवसांपासून नळांना येणाऱ्या पाण्याला मातीमिश्रित पिवळसर रंग असल्याचे दिसून येत ...

मनपाच्या पाणीपुरवठा विभागाकडून दररोज पाणीपुरवठा केला जातो. मात्र, काही दिवसांपासून नळांना येणाऱ्या पाण्याला मातीमिश्रित पिवळसर रंग असल्याचे दिसून येत आहे, तर काही भागामध्ये अत्यंत गढूळ स्वरूपाचा पाणीपुरवठा होत असल्याने नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे. दूषित पाण्यावाटे पसरणाऱ्या आजारांची साथ यामुळे येण्याची भीती नागरिकांमध्ये व्यक्त केली जात आहे. वडाळा गाव परिसरातील विविध भागांमधील पाण्याचे नमुने तपासून पाणीपुरवठा शुद्ध स्वरूपात कसा करता येईल, यासाठी उपाययोजना करण्याची मागणी जोर धरू लागली आहे.

वडाळा गावाला पाणीपुरवठा करणाऱ्या जलकुंभामध्ये गांधीनगर जलशुद्धीकरण केंद्रावरून पाण्याचा भरणा केला जातो. त्यानंतर या जलकुंभामधून सकाळी गावात दैनंदिन पाणीपुरवठा केला जातो. मागील आठवड्यापासून वडाळा गावातील रामोशीवाडा, माळी गल्ली, राजवाडा, तैबानगर, जय मल्हार कॉलनीचा परिसर आदी भागांत नळांना दूषित पाणी येत असल्याचे नागरिकांनी सांगितले. दूषित पाण्यामुळे काही नागरिकांना पोटदुखी, अतिसाराची लक्षणे दिसू लागली आहेत. यामुळे दूषित पाण्यावाटे पसरणाऱ्या आजारांची भीती व्यक्त केली जात आहे.