शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs ENG : टीम इंडियाने 'बॅझबॉल'वाल्यांची जिरवली.. संयम अन् धैर्याची लढाई जिंकली; सामना अनिर्णित
2
अहिल्यानगरमध्ये संविधान भवन उभारले जाणार, उपमुख्यमंत्री अजित पवार यांची घोषणा!
3
रेल्वे रुळ ओलांडताना एक्स्प्रेसनं उडवलं, तिघांचा मृत्यू, माढा येथील घटना!
4
IND vs ENG : स्टोक्स हात मिळवायला आला; पण जड्डू-वॉशिंग्टन दोघांनी आम्ही नाही जा.. म्हणत ठोकली सेंच्युरी
5
Pune Rave Party: 'त्या' दोन रुममध्ये तीन दिवसांपासून रेव्ह पार्टी? कधीपासून बुक होत्या रुम, बिल बघितलं का?
6
मुंबई: बँकेकडून आलेल्या महिलेला मागून धरलं, मानेवर चुंबन घेतलं अन् 'नको तिथे' हात...
7
पाकिस्तानमध्ये बस दरीत कोसळून नऊ जण ठार, दोन लहान बाळांचाही समावेश, ३०हून अधिक जखमी
8
Thane Crime: पालन पोषणाचा खर्च परवडेना, पोटच्या तिन्ही मुलींना पाजलं विष, आईला अटक!
9
VIDEO : स्टोक्सनं दुखावलेल्या खांद्यासह गिलला मारला हाताला झिणझिण्या आणणारा बाउन्सर; मग...
10
Pune Rave Party : पुण्यातील 'त्या' हॉटेलचे बुकिंग कुणाचा नावावर झाले होते ? पोलिसांनी दिली महत्वाची माहिती
11
IND vs ENG : वॉशिंग्टनसह जड्डूची फिफ्टी; टीम इंडियावरील मोठ संकट टळलं, पण...
12
Pune Rave Party : प्रांजल खेवलकरांसह सातही आरोपींना 2 दिवसांची पोलीस कोठडी
13
Pune Rave Party: रेव्ह पार्टीतील त्या दोन तरुणी कोण? पोलिसांना फ्लॅटमध्ये काय काय सापडलं?
14
बिजापूरमध्ये सुरक्षा दलांची मोठी कारवाई, १७ लाख रुपयांचे बक्षीस असलेले ४ नक्षलवादी ठार
15
Raigad Boat Capsized: रायगडमध्ये मासेमारीसाठी गेलेली बोट समुद्रात बुडाली, ५ जणांनी नऊ तास पोहून समुद्रकिनारा गाठला, ३ जण बेपत्ता!
16
'मी दोन वेळा मरता मरता राहिलोय'; धनंजय मुंडेंनी मन केलं मोकळं; मंत्रि‍पदाबद्दलही बोलले
17
Crime : आईवडिलांनी लेकीच्या नावावर केली जमीन, चिडलेल्या मुलाने तिघांचीही कुऱ्हाडीने केली हत्या
18
VIDEO: राज ठाकरे तब्बल ६ वर्षांनंतर 'मातोश्री'मधील स्व. बाळासाहेब ठाकरेंच्या खोलीत गेले अन्...
19
IND vs PAK : भारतीय सेनेचा अभिमान वाटतो, ही फक्त नौटंकी होती का? सोशल मीडियावर BCCI विरोधात संतप्त प्रतिक्रिया
20
Pune Rave Party Crime : रेव्ह पार्टीपूर्वी पुण्यातील या दोन ठिकाणी झाल्या पार्ट्या; नेमकं काय घडलं ?

तयार फराळाकडे वाढतोय ग्राहकांचा कल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 27, 2017 00:35 IST

पारंपरिक सणांमध्ये प्रकाशाचा उत्सव असलेल्या दिवाळीचे स्थान महत्त्वाचे असल्याने या सणासुदीच्या घरगुती फराळापासून विविध प्रकारच्या मिठार्इंची घरात रेलचेल असते. परंतु, सध्याच्या काळात बहुतेक महिला आपला कामधंदा सांभाळून घरही सांभाळत असल्याने घरच्या घरी गोडधोड बनवणे साºयांनाच जमते, असे नाही. त्यामुळे फराळ आणि मिठाईचे बरेचसे पदार्थ बाहेरूनच खरेदी करण्याकडे ग्राहकांचा कल वाढतो आहे.

नाशिक : पारंपरिक सणांमध्ये प्रकाशाचा उत्सव असलेल्या दिवाळीचे स्थान महत्त्वाचे असल्याने या सणासुदीच्या घरगुती फराळापासून विविध प्रकारच्या मिठार्इंची घरात रेलचेल असते. परंतु, सध्याच्या काळात बहुतेक महिला आपला कामधंदा सांभाळून घरही सांभाळत असल्याने घरच्या घरी गोडधोड बनवणे साºयांनाच जमते, असे नाही. त्यामुळे फराळ आणि मिठाईचे बरेचसे पदार्थ बाहेरूनच खरेदी करण्याकडे ग्राहकांचा कल वाढतो आहे. ही संधी साधून विविध बचतगटांनी फराळाचे पदार्थ तयार करण्यासाठी नियोजन सुरू केले असून, मिठाईवाल्यांनीही सणासुदीसाठी वेगवेगळ्या मिठाई बनविण्याचे काम सुरू केले आहे.  ‘दिवाळी सण मोठा, नाही आनंदा तोटा’ असा लौकिक असलेला दीपोत्सवाचा झगमगाट आणि गोडधोडाचे फराळ, नवनवीन वस्तू, कपडे आणि आनंदाच्या आठवणी अशी पारंपरिक व्याख्या बनलेली आहे. परंतु सध्याच्या धकाधकीच्या जीवनात सर्वच कुटुंबातील महिलांना घरगुती गोडधोड बनवायला वेळ मिळत नाही. परंतु, दिवाळ सणातील गोडवा कमी होऊ नये म्हणून बदलत्या काळानुसार घराघरांमध्ये बाहेरून दिवाळीचा फराळ करवून घेण्याची पद्धत रूढ होत असताना शहरातील विविध मिठाईच्या दुकानदारांनीही मिठाईसोबतच दिवाळीचा फराळही विक्रीसाठी ठेवण्यास सुरुवात केली आहे.  मिठाई विक्रेते दिवाळीचा फराळ वेगवेगळ्या बचतगटांकडून आॅर्डर देऊन मागवत आहेत. तर काही बचतगट थेट ग्राहकांशी संवाद साधून आॅर्डर मिळवत आहेत. सध्या बाजारपेठेत नवरात्रीच्या प्रसादासाठी व देवीच्या पूजेसाठी लागणारी मिठाई व फराळाला मोठ्या प्रमाणात मागणी आहे. मात्र, यावर्षी जीएसटीच्या प्रभावाने विविध पदार्थांचे भाव वाढणार असल्याने मिठाईवाले मागणीच्या प्रमाणातच मिठाई तयार करण्याचे नियोजन करीत आहेत.दसरा- दिवाळीच्या पार्श्वभूमीवर विविध प्रकारच्या मिठाईला मागणी वाढली आहे. सणासुदीच्या दिवसात मिक्स मिठाईला अधिक मागणी असते. त्याचप्रमाणे पेढे, लाडू, काजू- कतली, वेगवेगळ्या प्रकारच्या बर्फीलाही मागणी वाढली आहे.  - अजिज शेख,  व्यवस्थापक, हाजी मिठाईबचतगटाला दरवर्षी ८० ते ९० किलो वेगवेगळ्या प्रकारचे फराळ तयार करण्याच्या आॅर्डर्स मिळतात. या आॅर्डर्सला दसºयापासूनच सुरुवात होत त्यापार्श्वभूमीवर नियोजन बैठक घेऊन नियोजन करण्यात येते.- मनीषा पवार, अध्यक्ष,  रचना शिल्प बचतगटपारंपरिक ग्राहकांकडून दरवर्षीप्रमाणे मिठाई आणि ठराविक फराळांच्या पदार्थांची चौकशी सुरू झाली आहे. परंतु सध्या अनेक सोसायट्यांमधून महाराज मिठाई बनवून देण्याचे काम करीत असल्याने तसेच विविध पदार्थांवर जीएसटीही लागून असल्याने दरवर्षीपेक्षा यावर्षी मागणीत काही प्रमाणात घट होण्याची शक्यता आहे.- मोहन चौधरी, संचालक, सागर सम्राट