शहरं
Join us  
Trending Stories
1
जातनिहाय जनगणनेचे स्वागत, पण कधी पूर्ण करणार ते सांगा; राहुल गांधी यांनी केंद्र सरकारच्या निर्णयाला दिला पाठिंबा
2
दहशतवाद्याने विचारले, आप काश्मिरी हो क्या? जालन्यातील युवकाचा दावा : रेखाचित्र पाहताच ‘एनआयए’ला ई-मेल
3
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आता वर्षा बंगल्यामध्ये; अक्षय्य तृतीयेचा मुहूर्त साधून केली विधीवत पूजा
4
ग्रामीण भागात रोजगार वाढले; तरुणांपुढे आव्हाने, तरुणांपुढे गुणवत्तापूर्ण उपजीविकेशी संबंधित आव्हाने कायम
5
एफआयआर नोंदविण्यास नकार हे दुर्दैव; अक्षय शिंदे एन्काऊंटरप्रकरणात क्राइम ब्रँचच्या ‘एसआयटी’वर उच्च न्यायालयाची नाराजी
6
एमएमआरटीएकडून बेस्ट भाडेवाढ मंजूर; अधिकृत घोषणेची प्रतीक्षा
7
रेल्वेच्या बैठकीला पाच खासदारांची दांडी; प्रवाशांना चांगल्या सुविधा पुरविण्याचे आश्वासन
8
पुढील जनगणनेची तारीख लवकरच जाहीर; काेराेनामुळे झाला नव्हता निर्णय
9
भारतासोबतच्या टॅरिफ वाटाघाटी प्रगतिपथावर; अमेरिकी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे प्रतिपादन
10
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
11
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
12
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
13
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
14
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
15
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
16
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
17
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
18
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
19
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
20
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू

सिन्नर येथे दोन वीज उपकेंद्रांची उभारणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 25, 2018 23:16 IST

सिन्नर : शहराला पुरेशा दाबाने वीजपुरवठा होण्यासाठी ३३ केव्हीए क्षमतेच्या दोन वीज उपकेंद्रांची निर्मिती केली जात असून, त्याची कामे प्रगतीवर आहेत. त्यामुळे संपूर्ण शहर, उपनगरे एकाचवेळी अंधारात जाण्याची समस्या निर्माण होणार नाही तसेच खंडित वीजपुरवठ्यापासूनही सिन्नरकरांची सुटका होणार आहे.

ठळक मुद्देवीजपुरवठा : दहा वर्षांची सुटणार समस्या

सिन्नर : शहराला पुरेशा दाबाने वीजपुरवठा होण्यासाठी ३३ केव्हीए क्षमतेच्या दोन वीज उपकेंद्रांची निर्मिती केली जात असून, त्याची कामे प्रगतीवर आहेत. त्यामुळे संपूर्ण शहर, उपनगरे एकाचवेळी अंधारात जाण्याची समस्या निर्माण होणार नाही तसेच खंडित वीजपुरवठ्यापासूनही सिन्नरकरांची सुटका होणार आहे.शहरासाठी दोन वीज उपकेंद्रांची कामे सुरू आहेत. ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडे आमदार राजाभाऊ वाजे यांनी उपकेंद्रांची मागणी केली होती. प्रत्यक्षात दोन्ही केंद्रांवर ५० टक्के कामे पूर्ण झाली आहेत. येत्या तीन महिन्यांत उपकेंद्र कार्यान्वित होऊन सिन्नर शहरातील विजेच्या समस्या निकाली निघतील, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. शहर व उपनगरांचा विस्तार वाढल्याने वीज समस्येने गेल्या काही वर्षांपासून मोठ्या प्रमाणात डोके वर काढले आहे. माळेगाव, मुसळगाव औद्योगिक वसाहत व सेझमुळे शहराचा विस्तार वेगाने झाला. वीज मागणीतही त्याच वेगाने भर पडली. त्यामुळे सध्याच्या अस्तित्वातील १३२ केव्हीए केंद्रातून होणारा वीजपुरवठा कमी दाबाने होण्याबरोबरच शहर व उपनगरे एकाचवेळी अंधारात जाण्याचे प्रकार नियमित घडत आहेत.५ मेगावॉट क्षमतेचे ट्रान्सफार्मर आडवा फाटा येथे व सरदवाडी जवळील पांगरवाडीत असे ३३ केव्हीए क्षमतेचे दोन उपकेंद्र उभारणीचे काम प्रगतीवर आहे. प्रत्येकी ५ मेगावॉटचे दोन ट्रान्सफार्मर यात बसविण्यात आले आहेत. २० मेगावॉटची क्षमता या केंद्रात उपलब्ध होणार असल्याने पुढील १० वर्षे शहराला पुरेशा दाबाने वीजपुरवठा होऊ शकेल. नवीन उपकेंद्रातील चारही ट्रान्सफार्मर शहर, उपनगरांचे भाग विभागणी करण्यात येणार आहेत. त्यामुळे कोणत्याही ठिकाणी बिघाड झाल्यास केवळ एक रोहित्र बंद करता येईल. त्यामुळे अन्य तीन भागातील पुरवठा बंद करण्याची वेळ वीज कर्मचाऱ्यांवर येणार नाही. त्यामुळे एकाच वेळी शहर, उपनगरे अंधारात जाण्याची समस्या सुटणार आहे.