शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
2
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
3
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
4
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
5
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
6
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
7
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
8
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
9
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
10
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
11
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
12
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
13
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
14
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
15
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
16
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
17
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
18
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
19
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
20
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'

हरसूलला  ३५० दुकानांवर बांधकाम विभागाचा हातोडा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2021 01:19 IST

हरसूल येथे सोमवारपासून (दि.४) सार्वजनिक बांधकाम उपविभागामार्फत अतिक्रमणविरोधी मोहीम पोलिसांच्या कडेकोट पोलीस बंदोबस्तात सुरू असून, या मोहिमेत जवळपास अतिक्रमित ३५० दुकानांवर हातोडा पडला.

ठळक मुद्देअतिक्रमणविरोधी मोहीम : बांधकाम विभागाची कारवाई

त्र्यंबकेश्वर : हरसूल येथे सोमवारपासून (दि.४) सार्वजनिक बांधकाम उपविभागामार्फत अतिक्रमणविरोधी मोहीम पोलिसांच्या कडेकोट पोलीस बंदोबस्तात सुरू असून, या मोहिमेत जवळपास अतिक्रमित ३५० दुकानांवर हातोडा पडला.

नाशिक- हरसूल- ठाणापाडा या राज्य महामार्गावर गेल्या अनेक महिन्यांपासून लोकांनी अतिक्रमण करून दुकाने टाकून व्यवसाय सुरू केले होते. सार्वजनिक बांधकाम विभागाने अतिक्रमण हटविण्यासंबंधी वारंवार सूचना केल्या होत्या. परंतु, व्यावसायिक त्याला दाद देत नव्हते. या रस्त्यावर अनेकवेळा छोटे-मोठे अपघात घडल्याचे सांगितले जाते. अखेर सार्वजनिक बांधकाम विभागाने सोमवारपासून जेसीबी, ट्रॅक्टर आदींच्या साहाय्याने काढणार असल्याच्या नोटिसा अतिक्रमणधारकांना दिल्या होत्या. त्यानुसार वीज वितरण उपकेंद्रापासूनअतिक्रमण काढण्यास सुरुवात केली. काहींनी नुकसान व्हायला नको म्हणून स्वतःहून अतिक्रमणे काढून घेतली तर काहींच्या दुकानांची मोडतोड झाली. या मोहिमेमुळे पीडब्ल्यू हद्दीतील सर्व रस्ता मोकळा झाला आहे.

इन्फो

विस्थापितांचे होणार पुनर्वसन

या मोहिमेमुळे विस्थापित झालेल्या व्यावसायिकांचे पुनर्वसन ग्रामपंचायतीतर्फे करण्यात येणार असल्याची माहिती उपसरपंच नितीन देवरगावकर यांनी दिली. कृषी उत्पन्न बाजार समितीच्या उपबाजार आवारात नाशिक कृषी उत्पन्न बाजार समिती गाळे काढणार असून, काही व्यावसायिक तिथे तर ग्रामपंचायत भविष्यात गाळे काढणार असून, उर्वरित व्यावसायिकांचे तेथे पुनर्वसन करण्यात येणार असल्याचेही ते म्हणाले.

इन्फो

अनेकांनी स्वत:हून काढले अतिक्रमण

अनेक व्यावसायिकांनी प्रशासनाला सहकार्य करून स्वतःहून अतिक्रमण काढून घेतले. यावेळी कडेकोट पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता तसेच बांधकाम विभागाचे उपअभियंता संदीप पांडांगळे, उपविभागीय पोलीस अधिकारी भीमाशंकर ढोले, हरसूलचे सहायक पोलीस निरीक्षक गणेश वारुळे आदींनी शांततेचे आवाहन केले होते. कोणताही अनुचित प्रकार न घडता शांततेच्या वातावरणात मोहीम पार पडली.

 

फोटो- ०७ हरसूल २/३

टॅग्स :NashikनाशिकEnchroachmentअतिक्रमण