शहरं
Join us  
Trending Stories
1
काल युद्धाचा इशारा, आज राजधानी सोडून पळून गेले... सिरियाचे राष्ट्राध्यक्ष अल-शारांचा अजब कारभार
2
"कुणाचा बाप आला... बापाचा बाप आला... आजोबा आला तरी मुंबई...", CM देवेंद्र फडणवीसांनी ठणकावलं
3
भीषण अपघातात ट्रकखाली चौघे शंभर फूट फरफटत गेले, पित्यासह दोन चिमुकल्यांचा मृत्यू
4
बौद्ध भिक्षूंचे 80 हजारहून अधिक अश्लील फोटो-व्हिडिओ; ब्लॅकमेल करून थायलंडमधील महिलेनं कमावले 102 कोटी
5
कॅनडामध्ये विमान हायजॅक! अधिकाऱ्यांमध्ये घबराट; मागून पाठवले F-35 लढाऊ विमान पण...
6
"CM फडणवीसांनी ४० फोन केले पण..."; ठाकरेंनी मतांची माती केली म्हणत एकनाथ शिंदेंनी सगळचं काढलं
7
गोपिचंद पडळकर यांच्या मागणीला मोठं यश, रायगडाजवळील निजामपूर ग्रामपंचायतीचं नाव बदललं
8
"इन्स्टावर ४ लाख फॉलोअर्स पण गावात ४ लोकांनाही..."; गावकऱ्यांनी केली 'त्या' दोघींची पोलखोल
9
'मै हूँ ना'मध्ये होती 'ही' मराठी अभिनेत्री, तिचं नृत्य पाहून शाहरुख खानही झालेला अवाक
10
नितेश राणे यांना मुस्लीम संघटनेने पाठवला कुरानचा मराठी अनुवाद; मुफ्ती फाजिल म्हणाले, 'आपकी क्या औकात है...!'
11
'तो डान्सबार योगेश कदमांच्या आईच्या नावावर'; अनिल परबांचा सभागृहात गंभीर आरोप
12
जयंत पाटील भाजपमध्ये प्रवेश करणार?; CM फडणवीस विधानसभेतच बोलले, म्हणाले, 'हे कठीणच झालंय'
13
इंडिया आघाडीला मोठा धक्का, बड्या पक्षाने सोडली साथ, विरोधी पक्षांचं ऐक्य कमकुवत होणार?  
14
इशान किशनला टीम इंडियापाठोपाठ आणखी एका संघातूनही डच्चू मिळण्याची शक्यता
15
बाजार गडगडला! एकाच दिवसात गुंतवणूकदारांचे २.५७ लाख कोटी बुडाले, फक्त 'हे' ५ शेअर्स वाढले
16
चीनकडून कोण चोरतंय रेअर अर्थ मेटल? का उडालीये ड्रॅगनची झोप, काय आहे प्रकरण?
17
आरोग्याशी नको खेळ! मीठापासून साखरेपर्यंत... 'या' पांढऱ्या गोष्टी तुमच्यासाठी ठरू शकतात विष
18
"पटोलेंनी उल्लेख केलेली व्यक्ती काँग्रेसचीच"; हनी ट्रॅपची कुठलीही तक्रार नसल्याचे CM फडणवीसांचे स्पष्टीकरण
19
"ये लातों के भूत हैं, बातों से मानेंगे नहीं...!"; मोहरम आणि श्रावणाचा उल्लेख करत मुख्यमंत्री योगींचं मोठं विधान
20
"विधानसभेतील राडा हा जाणीवपूर्वक दहशत निर्माण करण्याचा प्रकार’’, बाळासाहेब थोरात यांची टीका 

अभियंत्याच्या पाठराखणीसाठी सरसावले बांधकाम खाते

By admin | Updated: February 17, 2015 00:55 IST

वर्गणीची वसुली : निलंबनासाठी खात्याकडून चालढकल

नाशिक : अधीक्षक अभियंत्याच्या सेवानिवृत्तीनिमित्त मद्यपार्टीचे आयोजन करणाऱ्या बांधकाम ठेकेदाराला ओझर विमानतळ आवाराची मुभा देणारे सार्वजनिक बांधकाम खात्याचे उपअभियंता व कार्यकारी अभियंत्यांना पोलिसी जाचातून वाचविण्यासाठी सार्वजनिक बांधकाम खात्यातील नाशिक विभागातील कनिष्ठ अभियंता वगळता अन्य अधिकाऱ्यांनी मोठ्या प्रमाणावर ‘वर्गणी’ गोळा करून त्या माध्यमातून पोलीस व न्यायालयीन लढ्यासाठी ‘बळ’ उभे केले आहे, तर दुसरीकडे इतक्या गंभीर प्रकरणात पोलिसांत गुन्हे दाखल होऊनही बांधकाम खात्याने निलंबनासाठी चालढकल चालविली आहे.ओझर येथील मद्यपार्टीची घटना घडून दोन आठवड्यांचा कालावधी उलटूनही पोलीस व सार्वजनिक बांधकाम खात्याने या घटनेकडे दुर्लक्ष करून त्याचे गांभीर्य नष्ट करण्याचा प्रयत्न चालविल्याची चर्चा दोन्ही खात्यांमध्ये होऊ लागली आहे. त्यातही ओझर विमानतळाच्या बांधकामापासून ते मद्यपार्टीची अनुमती देणाऱ्या अधिकाऱ्यांच्या कारभाराची सुरस कथा बाहेर पडू लागली आहे. ओझरची हद्द असल्याने निफाडच्या उपअभियंत्यांकडे या विस्तारीकरणाचे काम देण्यात आले होते. त्यावेळी उपअभियंता म्हणून सोनवणे यांच्या अखत्यारित हे काम होते, मात्र निविदाप्रक्रिया सुरू असतानाच सोनवणे यांची नाशिकला बदली झाल्याने त्यांनी विमानतळाच्या कामासकट नाशिकला नियमांचे उल्लंघन करून पदभार स्वीकारला होता. विमानतळ कामातील त्यांचा ‘रस’ आता मद्यपार्टीच्या निमित्ताने उघड झाला आहे. बांधकाम ठेकेदाराला मद्यपार्टीसाठी अनुमती देणारे कार्यकारी अभियंता राजेंद्र पाटील व उपअभियंता सोनवणे यांना या संकटातून वाचविण्यासाठी बांधकाम खात्यातील अधिकारी सरसावले आहेत. त्यासाठी नाशिक विभागातून जवळपास तीन कोटींच्या आसपास रक्कम जमा करण्यात आली असून, या संकटातून दोघांना बाहेर काढता येईल, असा त्यांचा ऱ्होरा आहे. या वर्गणीत कनिष्ठ अभियंत्यांना सहभागी होण्यास नकार दिल्याचे वृत्त असून, त्यामागे कनिष्ठ अभियंत्यांवर ज्या ज्या वेळी बालंट कोसळले त्यावेळी कार्यकारी अभियंता व उपअभियंत्यांनी हात झटकण्याचीच भूमिका आजवर घेतली. त्यामुळे कनिष्ठ अभियंत्यांनी वर्गणी देण्यास स्पष्ट नकार दिला. या वर्गणीतही काही ठेकेदार व उपअभियंत्यांनी पुढाकार घेतल्याची चर्चा होत असून, पोलीस खाते व सार्वजनिक बांधकाम खात्याने दोषी अधिकाऱ्यांकडे कारवाई करण्यासाठी पाठ फिरविल्यामुळे गोळा केलेली ‘वर्गणी’ कामी आल्याचे खात्याच्याच काही अधिकाऱ्यांनी छातीठोकपणे सांगितले आहे. म्हणून की काय, फौजदारी गुन्हा दाखल होऊन दीर्घ कालावधी लोटल्याने ना दोषींना अटक झाली ना खात्यानेही त्यांच्यावर निलंबनाची कार्यवाही केली.