शहरं
Join us  
Trending Stories
1
युतीबाबत एक पाऊल पुढे! शिवतीर्थावर उद्धव-राज यांच्यात अडीच तास चर्चा, बंधुऐक्याची ‘फ्रेम’ ठरली 
2
Maratha Reservation: हैदराबाद गॅझेटियर अधिसूचनेला मुंबई उच्च न्यायालयात आव्हान; काय आहे याचिकेत?
3
सोने-चांदीने गुंतवणूकदार मालामाल, गेल्या एका वर्षात मिळाले सोन्यातून ४४ तर चांदीतून ४५ टक्के रिटर्न
4
अग्रलेख: राधाकृष्णन आता देशाचे! नव्या उपराष्ट्रपतींनी हे लक्षात ठेवायला हवेच
5
विम्याचा हप्ता दहा वर्षांत दुप्पट! कंपन्यांकडून ग्राहकांची लूट; भीती दाखवून प्रीमियमवाढ
6
Maratha Reservation: राज्यात आजपर्यंत दिलेल्या कुणबी प्रमाणपत्रांची श्वेतपत्रिका काढावी; ओबीसी मंत्रिमंडळ उपसमितीची भूमिका
7
विशेष लेख: एका परिवर्तनशील, सहृदय नेतृत्वाचा अमृतमहोत्सव
8
नेपाळमध्ये देशभरात संचारबंदी लागू; महाराष्ट्रातील १०० पर्यटकांसह शेकडो प्रवासी अडकले 
9
भारत-अमेरिका यांच्यात चर्चेची दारे खुली होणार; पंतप्रधान मोदी म्हणाले, "ट्रम्प यांच्याशी..."
10
नेपाळनंतर फ्रान्समध्येही जनतेचा उद्रेक; २५० निदर्शकांना अटक 
11
Asia Cup 2025 : बुमराहच्या परफेक्ट यॉर्करशिवाय ही गोष्ट ठरली लक्षवेधी; कारण ६ वर्षांनी असं घडलं
12
सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान; बालेंद्र शाहांचा पाठिंबा, आंदोलकांना केले आवाहन...
13
नागपुरातील कडबी चौकाजवळ भर रस्त्यावर व्यापाऱ्यावर गोळीबार, ५० लाखांची लूट
14
IND vs UAE : अभिषेकनं षटकारासह उघडलं खातं! गिलनं खणखणीत चौकार मारत पॉवरप्लेमध्ये संपवली मॅच
15
रुमाल पडला; तो क्रीजमध्ये यायला विसरला! सूंजचा डायरेक्ट थ्रो; पण Out बॅटरला सूर्यानं दिलं Not Out
16
'तुमचा वापर केला जातोय...', नेपाळमधील सत्तापालटानंतर केपी शर्मा ओलींची पहिली प्रतिक्रिया
17
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल कोण? सीपी राधाकृष्णन राजीनामा देणार; १२ सप्टेंबरला उपराष्ट्रपतीपदाची शपथ घेण्याची शक्यता
18
शोरुममधून बाहेर पडताच नवीन कारचा अपघात झाला तर विमा मिळतो का? जाणून घ्या...
19
दात घासताना ८० वर्षीय वृद्धाच्या अन्ननलिकेत झाडाची काडी अडकली; ७ दिवस उपाशी राहिले अन्...
20
नेपाळमधील सत्तापालटावर चीनची पहिली प्रतिक्रिया; माजी पंतप्रधान ओलींचं नाव घेणं टाळलं!

अभियंत्याच्या पाठराखणीसाठी सरसावले बांधकाम खाते

By admin | Updated: February 17, 2015 00:55 IST

वर्गणीची वसुली : निलंबनासाठी खात्याकडून चालढकल

नाशिक : अधीक्षक अभियंत्याच्या सेवानिवृत्तीनिमित्त मद्यपार्टीचे आयोजन करणाऱ्या बांधकाम ठेकेदाराला ओझर विमानतळ आवाराची मुभा देणारे सार्वजनिक बांधकाम खात्याचे उपअभियंता व कार्यकारी अभियंत्यांना पोलिसी जाचातून वाचविण्यासाठी सार्वजनिक बांधकाम खात्यातील नाशिक विभागातील कनिष्ठ अभियंता वगळता अन्य अधिकाऱ्यांनी मोठ्या प्रमाणावर ‘वर्गणी’ गोळा करून त्या माध्यमातून पोलीस व न्यायालयीन लढ्यासाठी ‘बळ’ उभे केले आहे, तर दुसरीकडे इतक्या गंभीर प्रकरणात पोलिसांत गुन्हे दाखल होऊनही बांधकाम खात्याने निलंबनासाठी चालढकल चालविली आहे.ओझर येथील मद्यपार्टीची घटना घडून दोन आठवड्यांचा कालावधी उलटूनही पोलीस व सार्वजनिक बांधकाम खात्याने या घटनेकडे दुर्लक्ष करून त्याचे गांभीर्य नष्ट करण्याचा प्रयत्न चालविल्याची चर्चा दोन्ही खात्यांमध्ये होऊ लागली आहे. त्यातही ओझर विमानतळाच्या बांधकामापासून ते मद्यपार्टीची अनुमती देणाऱ्या अधिकाऱ्यांच्या कारभाराची सुरस कथा बाहेर पडू लागली आहे. ओझरची हद्द असल्याने निफाडच्या उपअभियंत्यांकडे या विस्तारीकरणाचे काम देण्यात आले होते. त्यावेळी उपअभियंता म्हणून सोनवणे यांच्या अखत्यारित हे काम होते, मात्र निविदाप्रक्रिया सुरू असतानाच सोनवणे यांची नाशिकला बदली झाल्याने त्यांनी विमानतळाच्या कामासकट नाशिकला नियमांचे उल्लंघन करून पदभार स्वीकारला होता. विमानतळ कामातील त्यांचा ‘रस’ आता मद्यपार्टीच्या निमित्ताने उघड झाला आहे. बांधकाम ठेकेदाराला मद्यपार्टीसाठी अनुमती देणारे कार्यकारी अभियंता राजेंद्र पाटील व उपअभियंता सोनवणे यांना या संकटातून वाचविण्यासाठी बांधकाम खात्यातील अधिकारी सरसावले आहेत. त्यासाठी नाशिक विभागातून जवळपास तीन कोटींच्या आसपास रक्कम जमा करण्यात आली असून, या संकटातून दोघांना बाहेर काढता येईल, असा त्यांचा ऱ्होरा आहे. या वर्गणीत कनिष्ठ अभियंत्यांना सहभागी होण्यास नकार दिल्याचे वृत्त असून, त्यामागे कनिष्ठ अभियंत्यांवर ज्या ज्या वेळी बालंट कोसळले त्यावेळी कार्यकारी अभियंता व उपअभियंत्यांनी हात झटकण्याचीच भूमिका आजवर घेतली. त्यामुळे कनिष्ठ अभियंत्यांनी वर्गणी देण्यास स्पष्ट नकार दिला. या वर्गणीतही काही ठेकेदार व उपअभियंत्यांनी पुढाकार घेतल्याची चर्चा होत असून, पोलीस खाते व सार्वजनिक बांधकाम खात्याने दोषी अधिकाऱ्यांकडे कारवाई करण्यासाठी पाठ फिरविल्यामुळे गोळा केलेली ‘वर्गणी’ कामी आल्याचे खात्याच्याच काही अधिकाऱ्यांनी छातीठोकपणे सांगितले आहे. म्हणून की काय, फौजदारी गुन्हा दाखल होऊन दीर्घ कालावधी लोटल्याने ना दोषींना अटक झाली ना खात्यानेही त्यांच्यावर निलंबनाची कार्यवाही केली.