शहरं
Join us  
Trending Stories
1
हसिनाविरोधी नेत्याच्या मृत्यूनंतर हिंसाचार, हिंदू तरुणाला जाळले; उठावातील प्रमुख नेत्याचा मृत्यू झाल्याने केली निदर्शने
2
१५ बैठका, ९२ तास काम; १० विधेयके सादर, ८ मंजूर; लोकसभेतील कामकाज, संसदेच्या हिवाळी अधिवेशनाची सांगता
3
६ किलो सोने, ३१३ किलो चांदी अन् ४.६२ कोटी रोख; दिल्लीतील ट्रॅव्हल एजंटवर ईडीची कारवाई, १२ छापे
4
एकतर मैत्रिपूर्ण लढा किंवा समसमान जागावाटप करा; भाजपमधील युती नकोच म्हणणाऱ्यांची नवी भूमिका
5
'सर तन से जुदा' घोषणा देणे देशद्रोह : हायकोर्ट; प्रेषित मोहम्मदांच्या आदर्शाचा केलेला अवमान
6
IND vs SA :गोलंदाजीत बुमराह-चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
7
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
8
"मी माझ्या पार्टनरलाही सांगितले होते की,..." मॅचनंतर पांड्यानं शेअर केली आक्रमक खेळीमागची गोष्ट
9
अमरावतीत १९ वर्षीय तरुणाच्या हत्येनंतर तणाव, २०-२५ जणांच्या टोळक्याचा धुडगूस, १० जण ताब्यात
10
टीम इंडियाची 'वाघीण' परत आलीये... Smriti Mandhana चा 'किलर' लूक, पाहा लेटेस्ट PHOTOS
11
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
12
VIDEO : पांड्याची भर मैदानातून गर्लफ्रेंडवर प्रेमाची 'बरसात'; फ्लाइंग किस अन् तिची रिअ‍ॅक्शन चर्चेत
13
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
14
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
15
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
16
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
17
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
18
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
19
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
20
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
Daily Top 2Weekly Top 5

अभियंत्याच्या पाठराखणीसाठी सरसावले बांधकाम खाते

By admin | Updated: February 17, 2015 00:55 IST

वर्गणीची वसुली : निलंबनासाठी खात्याकडून चालढकल

नाशिक : अधीक्षक अभियंत्याच्या सेवानिवृत्तीनिमित्त मद्यपार्टीचे आयोजन करणाऱ्या बांधकाम ठेकेदाराला ओझर विमानतळ आवाराची मुभा देणारे सार्वजनिक बांधकाम खात्याचे उपअभियंता व कार्यकारी अभियंत्यांना पोलिसी जाचातून वाचविण्यासाठी सार्वजनिक बांधकाम खात्यातील नाशिक विभागातील कनिष्ठ अभियंता वगळता अन्य अधिकाऱ्यांनी मोठ्या प्रमाणावर ‘वर्गणी’ गोळा करून त्या माध्यमातून पोलीस व न्यायालयीन लढ्यासाठी ‘बळ’ उभे केले आहे, तर दुसरीकडे इतक्या गंभीर प्रकरणात पोलिसांत गुन्हे दाखल होऊनही बांधकाम खात्याने निलंबनासाठी चालढकल चालविली आहे.ओझर येथील मद्यपार्टीची घटना घडून दोन आठवड्यांचा कालावधी उलटूनही पोलीस व सार्वजनिक बांधकाम खात्याने या घटनेकडे दुर्लक्ष करून त्याचे गांभीर्य नष्ट करण्याचा प्रयत्न चालविल्याची चर्चा दोन्ही खात्यांमध्ये होऊ लागली आहे. त्यातही ओझर विमानतळाच्या बांधकामापासून ते मद्यपार्टीची अनुमती देणाऱ्या अधिकाऱ्यांच्या कारभाराची सुरस कथा बाहेर पडू लागली आहे. ओझरची हद्द असल्याने निफाडच्या उपअभियंत्यांकडे या विस्तारीकरणाचे काम देण्यात आले होते. त्यावेळी उपअभियंता म्हणून सोनवणे यांच्या अखत्यारित हे काम होते, मात्र निविदाप्रक्रिया सुरू असतानाच सोनवणे यांची नाशिकला बदली झाल्याने त्यांनी विमानतळाच्या कामासकट नाशिकला नियमांचे उल्लंघन करून पदभार स्वीकारला होता. विमानतळ कामातील त्यांचा ‘रस’ आता मद्यपार्टीच्या निमित्ताने उघड झाला आहे. बांधकाम ठेकेदाराला मद्यपार्टीसाठी अनुमती देणारे कार्यकारी अभियंता राजेंद्र पाटील व उपअभियंता सोनवणे यांना या संकटातून वाचविण्यासाठी बांधकाम खात्यातील अधिकारी सरसावले आहेत. त्यासाठी नाशिक विभागातून जवळपास तीन कोटींच्या आसपास रक्कम जमा करण्यात आली असून, या संकटातून दोघांना बाहेर काढता येईल, असा त्यांचा ऱ्होरा आहे. या वर्गणीत कनिष्ठ अभियंत्यांना सहभागी होण्यास नकार दिल्याचे वृत्त असून, त्यामागे कनिष्ठ अभियंत्यांवर ज्या ज्या वेळी बालंट कोसळले त्यावेळी कार्यकारी अभियंता व उपअभियंत्यांनी हात झटकण्याचीच भूमिका आजवर घेतली. त्यामुळे कनिष्ठ अभियंत्यांनी वर्गणी देण्यास स्पष्ट नकार दिला. या वर्गणीतही काही ठेकेदार व उपअभियंत्यांनी पुढाकार घेतल्याची चर्चा होत असून, पोलीस खाते व सार्वजनिक बांधकाम खात्याने दोषी अधिकाऱ्यांकडे कारवाई करण्यासाठी पाठ फिरविल्यामुळे गोळा केलेली ‘वर्गणी’ कामी आल्याचे खात्याच्याच काही अधिकाऱ्यांनी छातीठोकपणे सांगितले आहे. म्हणून की काय, फौजदारी गुन्हा दाखल होऊन दीर्घ कालावधी लोटल्याने ना दोषींना अटक झाली ना खात्यानेही त्यांच्यावर निलंबनाची कार्यवाही केली.