शहरं
Join us  
Trending Stories
1
दोस्तीत कुस्ती! भारताला २५% टॅरिफचा धक्का देत डोनाल्ड ट्रम्प यांची पाकिस्तानशी हातमिळवणी; केली मोठी डील 
2
ट्रम्प यांचा भारतावर २५ टक्के टॅरिफ बॉम्ब; १ ऑगस्टपासून लागू होणार आयात शुल्क, दंडही आकारणार
3
धक्कादायक! ४००० देऊन भीक मागणाऱ्यांचे स्पर्म गोळा केले, टेस्ट ट्यूब बेबीसाठी लाखो रुपये आकारून लोकांना फसवले! 
4
आजचे राशीभविष्य ३१ जुलै २०२५ : या राशीला धनलाभाचा दिवस, या राशीला काहीसा प्रतिकूल
5
भारत-पाक युद्ध तिसऱ्या देशाने थांबवले नाहीच; परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी खोडला दावा
6
‘लाडकी बहीण’च्या लाभार्थी महिला कर्मचाऱ्यांवर कारवाई; राज्य सरकारने जारी केले आदेश
7
मालेगाव खटल्याचा निकाल आज; १७ वर्षांनी विशेष NIA कोर्ट निर्णय देणार, संपूर्ण देशाचे लक्ष
8
संघर्षाचा शेवट गोड! तिसऱ्या मजल्यावरून ३९ व्या मजल्यावर; बीडीडीवासीयांचा आनंद गगनात मावेना
9
सर्वांत महाग-शक्तिशाली निसार उपग्रहाचे यशस्वी प्रक्षेपण; पृथ्वीची प्रत्येक इंच जमीन मॅप करणार
10
“मोदी यांच्या आचारसंहिता भंगप्रकरणी कोर्टात जाणार, निवडणूक आयोगाची कारवाईस टाळाटाळ”: चव्हाण
11
कृषी खात्यातील कथित भ्रष्टाचाराची चौकशी करा!; सुरेश धस यांचे मुख्यमंत्र्यांना पुन्हा पत्र
12
डिझेल दर सवलतीमुळे एसटीचे ११.८ कोटी वाचणार; स्पर्धात्मक निविदेमुळे महामंडळाला फायदा
13
देशातील विमानांमध्ये सुरक्षेच्या २६३ त्रुटी! सर्वाधिक एअर इंडिया, तिसऱ्या क्रमांकावर इंडिगो
14
मुंडेंचे नाव आले अन् माझा छळवाद सुरू झाला: अण्णा डांगे; भाजपात फेरप्रवेश, मन केले मोकळे
15
अनिलकुमार पवार हे दादा भुसे यांचे नातेवाईक, शिफारशीने नियुक्ती; संजय राऊत यांचा आरोप
16
अतिक्रमित जमिनींचा मिळणार मालकी हक्क, ३० लाख कुटुंबांना लाभ; चंद्रशेखर बावनकुळेंची माहिती
17
रशियात ८.८ तीव्रतेचा भूकंप; जपान, अमेरिकेत त्सुनामीसारख्या लाटांचे थैमान; जगात भीतीचे ‘हादरे’
18
एकनाथ शिंदे दिल्लीत, देवेंद्र फडणवीस राज्यपालांच्या भेटीला; महायुतीत काहीतरी मोठं घडतंय? 
19
Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींना जुलै महिन्याचे १५०० रुपये कधी मिळणार? जाणून घ्या
20
'ईश्वराची कृपा आहे' असं म्हणणाऱ्या मोदींना…; राज्यसभेत संजय राऊत काय बोलून गेले?

श्रीनगरात राहुल गांधींना बॉम्बस्फोटात संपविण्याचा कट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 12, 2021 04:19 IST

आपल्या भाषणात पटाेले यांनी केंद्रातील भाजप सरकारवर टीका केली. चीनने भारतात घुसखोरी सुरू केली असून, देश पुन्हा पारतंत्र्यात जातो ...

आपल्या भाषणात पटाेले यांनी केंद्रातील भाजप सरकारवर टीका केली. चीनने भारतात घुसखोरी सुरू केली असून, देश पुन्हा पारतंत्र्यात जातो की काय अशी परिस्थिती निर्माण होऊ घातली आहे. अशा वेळी सरकारने सर्व विरोधी पक्षांना एकत्र बोलवून वस्तुस्थिती मांडण्याची गरज असताना पंतप्रधान मात्र संसदेच्या अधिवेशनातही उपस्थित राहत नाही असे सांगून पटोले यांनी, घुसखोरी, फोन टॅपिंगमध्येच सरकार गुंग असून, त्यांनी सर्वसामान्य जनतेच्या खासगी आयुष्यातही आता घुसत असल्याचा आरोप केला. देशाला पुन्हा पारतंत्र्याकडे नेणारे सरकार उलथवून टाकण्यासाठी देशस्वातंत्र्यासाठी उभारलेल्या लढ्यासारखा पुन्हा लढा उभारावा लागेल असे सांगून, देश वाचला तर लोकशाही व संविधान वाचेल आणि ती वाचविण्याची जबाबदारी सर्व भारतीयांची आहे, असेही शेवटी पटोले यांनी सांगितले.

यावेळी बोलताना महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनीही आपल्या भाषणात स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव साजरा करीत असताना २०१४ पासून देशात जे काही चालले आहे ते पाहता, येणाऱ्या काळात देशात लोकशाही व संविधान जिवंत राहील की नाही याविषयी भीती वाटू लागल्याचे सांगितले. देशाच्या स्वातंत्र्यात काँग्रेसचे मोठे योगदान राहिले आहे त्यावेळी भाजप व जनसंघ कोठे होते? असा सवाल करून देशाला अधोगतीकडे नेण्याचे काम अलीकडच्या काळात सुरू झाले असून, या साऱ्या गोष्टीस भाजपच जबाबदार असल्याने त्यांना नैतिकता असेल तर सत्ता सोडावी, असे आवाहनही त्यांनी केले. यावेळी विनायक देशमुख, अभय छाजेड, जिल्हाध्यक्ष तुषार शेवाळे यांनीही मार्गदर्शन केले. प्रास्ताविक शहराध्यक्ष शरद आहेर यांनी केले. कार्यक्रमास ज्येष्ठ नेते भाई नगराळे, प्रमोद मोरे, आमदार हिरामण खोसकर, डॉ. सुधीर तांबे, राजाराम पानगव्हाणे, शोभा बच्छाव, कुणाल पाटील, शिरीष कोतवाल, अनिल आहेर, डॉ. हेमलता पाटील, संपत सकाळे, स्वप्नील पाटील, अश्विनी बाेरस्ते, बबलू खैरे आदी उपस्थित होते.

चौकट====

यांचा झाला सत्कार

या कार्यक्रमाच्या निमित्ताने स्वातंत्र्य चळवळीत योगदान दिलेल्या स्वातंत्र्य सैनिकांच्या विधवा पत्नी व कुटुंबीयातील सदस्यांचा प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. त्यात सरस्वती मोरे, सुमन मनियार, सत्यभामा मोजाड, लीलाबाई विटाळ, चंद्रभागा येलमामे, राजेंद्र इंगळे, मंदार हुदलीकर, मालिनी कन्सारा, राजेंद्र भाेरे, तुकाराम आटवणे, सुरेश इंगळे.

---------

महिला काँग्रेसला डावलले

काँग्रेसच्या या कार्यक्रमात महिला पदाधिकारी व कार्यकर्त्यांना डावलण्यात आले. महिला शहराध्यक्ष वत्सला खैरे यांना व्यासपीठावर स्थान देण्यात आले नाही शिवाय प्रदेशाध्यक्ष पहिल्यांदाच नाशिक भेटीवर आलेेले असताना त्यांचा महिला काँग्रेसच्या वतीने सत्कारदेखील करू दिला जात नसल्याचे पाहून अखेर महिला पदाधिकारी व नगरसेविकांनी कार्यक्रम आटोपल्यानंतर थेट व्यासपीठावरच धाव घेत शहराध्यक्ष शरद आहेर यांना जाब विचारला व तीव्र नाराजीही व्यक्त केली. अखेर घाईघाईतच खैरे यांनी पटोले, थोरात यांचा सत्कार करून वादावर पडदा टाकला.

(फोटो आहे)