शहरं
Join us  
Trending Stories
1
निलेश घायवळचा पाय खोलात;बनावट पासपोर्ट प्रकरणासह आतापर्यंत ४ गुन्हे दाखल
2
Dharashiv: मोठी बातमी! तातडीने मदत द्या, मागणी करणाऱ्या आंदोलक शेतकऱ्यांवर गुन्हे!
3
धक्कादायक!! विरारमध्ये दोन तरूणांनी एकत्र संपवलं जीवन, १८व्या मजल्यावरून मारली उडी
4
मार्कशीटवर दिसले स्वीमीजी... विद्यार्थ्याने ऑनलाइन केला अर्ज, विद्यापीठाने घातला वेगळाच घोळ
5
सरन्यायाधीश भूषण गवई यांच्यावर झालेल्या हल्ल्याच्या प्रकरणाचा ठाण्यात निषेध, मूक निदर्शने
6
६८ कोटींचा रस्ता ३ वर्षांपासून पूर्ण होईना; कल्याण-अंबरनाथ रस्त्याच्या कामाला अखेर मुहूर्त
7
सांगलीत शरद पवारांच्या राष्ट्रवादीला मोठा धक्का; आमदार पुत्राचा थेट भाजपमध्ये प्रवेश
8
पुणे अपघात प्रकरण: गौतमी पाटीलला अश्रू अनावर, म्हणाली- "सगळे मला ट्रोल करत सुटलेत..."
9
Navi Mumbai Airport: भव्य, दिव्य अन् नजर खिळवून ठेवणारं, पण नवी मुंबई विमानतळाबद्दल 'या' गोष्टी माहिती आहे का?
10
स्मृती मानधना फ्लॉप ठरली तरी टॉपला; आता चुका सुधारून हिट शो द्यावाच लागेल, नाहीतर...
11
ICU मध्ये असलेल्या भाजप खासदाराची ममता बॅनर्जींनी घेतली भेट; म्हणाल्या, "जास्त सीरियस नाहीये."
12
अहो आश्चर्यम! महिलेने कुत्र्याच्या नावाने केलं मतदान; पोलखोल होताच पोलीसही झाले हैराण
13
₹450 कोटींचा बंगला अन् ₹639 कोटींचा डुप्लेक्स..; धनकुबेरांना आकर्षित करतेय वरळी 'सी फेस'
14
फक्त १० वर्षांत १ कोटीचा फंड कसा तयार करायचा? SIP मध्ये दरमहा किती गुंतवणूक करावी लागेल?
15
कंडोम बनवणाऱ्या कंपनीची कमाल...! गुंतवणूकदारांना केलं मालामाल; गेल्या महिन्यातच बाजारात उतरली, दिला बंपर परतावा
16
"मी सर्वात पहिले पलायन करणाऱ्या बॅचमधील...!"; मैथिली ठाकूरच्या निवडणूक लढण्यासंदर्भात वडिलांची पहिली प्रतिक्रिया, तुम्हीही भावूक व्हाल
17
पूरग्रस्त शेतकऱ्यांसाठी ३१ हजार ६२८ कोटींचं पॅकेज जाहीर; राज्य सरकारने केली मोठी घोषणा
18
माझी पत्नी रात्रीच्या वेळी बनते नागीण आणि..., भयभीत पतीने थेट DM यांनां केली अशी विनंती, प्रकरण काय  
19
"सगळेच लोक अत्यंत...!"; विरोधकांच्या 'मत चोरी'च्या आरोपांवर मैथिली ठाकुरचं मोठं विधान, स्पष्टच बोलली
20
जॉन क्लार्क, मिशेल एच. डेवोरेट आणि जॉन एम. मार्टिनिस यांना भौतिकशास्त्राचा नोबेल जाहीर

मतदारांना गृहीत धरल्याने शिंदे, पळसेत सत्तांतर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 20, 2021 04:16 IST

नाशिकरोड : नाशिक तालुक्याच्या पूर्व भागातील मोठ्या समजल्या जाणाऱ्या पळसे व शिंदे ग्रामपंचायतीच्या निकालाने गेल्या २० ते २५ वर्षांपासून ...

नाशिकरोड : नाशिक तालुक्याच्या पूर्व भागातील मोठ्या समजल्या जाणाऱ्या पळसे व शिंदे ग्रामपंचायतीच्या निकालाने गेल्या २० ते २५ वर्षांपासून एकछत्री अंमल असलेल्या पळसेचे जगन आगळे व शिंदेगावचे संजय तुंगार यांना जोरदार झटका दिला आहे. निवडणुकीत केलेली युती, उड्डाण पुलाचे काम, विधानसभा निवडणुकीत केलेले काम, मतदारांना गृहीत धरणे व अती आत्मविश्वासामुळे दोघांच्या राजकीय घोडदौडीला लगाम बसला आहे.

पळसे व शिंदेगाव ग्रामपंचायत ही नाशिक तालुक्याच्या पूर्व भागातील मोठी ग्रामपंचायत असून या दोन्ही गावात कुठल्या पक्षाचे वर्चस्व आहे त्यावरून तालुक्याच्या पूर्व भागात इतर राजकीय समीकरणे व गणिते ठरली जात होती. शिंदे - पळसे दोन्ही गावांमध्ये गेल्या २० ते २५ वर्षांपासून शिवसेनेचा एकछत्री अंमल आगळे व तुंगार यांच्या नेतृत्वाखाली सुरू होता. दोन्ही गावातून काँग्रेस जवळपास संपुष्टात आली होती. तर राष्ट्रवादी काँग्रेसची ताकद असून सुद्धा ते गेल्या २० वर्षात शिवसेनेला मागे टाकण्यात कधीच यशस्वी झाले नाही. ग्रामीण भागामध्ये भाजपला अद्याप म्हणावे तसे आपली पाळेमुळे रुजवता आलेली नाही. तर मनसे पाय रुजविण्यासाठी प्रयत्न करीत आहे. गेल्या दहा वर्षात लोकसभा व विधानसभा निवडणुकीत राजकीय पक्षांशी त्यांच्याच लोकांनी स्वतःचे राजकीय व आर्थिक हित संभाळून केलेल्या कामाची परतफेड ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत झाल्याचे अदृश्य स्वरूपात दिसत आहे. पळसे ग्रामपंचायतीमध्ये गेल्या पंचवीस वर्षापासून जगन आगळे यांचे वर्चस्व होते. मात्र या निवडणुकीत गेल्या पंचवीस वर्षापासून एकमेकांचे कट्टर विरोधक असलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे तानाजीराव गायधनी यांच्याशी आगळे यांनी जमवून घेत युती केली. निवडणुकीत झालेली ही राजकीय युती अनेकांच्या पचनी पडली नाही. त्यामुळे आगळे यांच्या राजकीय घोडदौडीला लगाम बसला आहे. तोच प्रकार शिंदेगाव ग्रामपंचायतीच्याबाबत घडला. शिवसेनेच्या संजय तुंगार यांची गेल्या २० वर्षापासून सत्ता होती. मात्र गेल्या काही निवडणुकीत गावाच्या विकासाचे नाव पुढे करून तुंगार यांनी घेतलेली राजकीय भूमिका अनेकांना खटकली होती. गेल्या दोन वर्षापासून सत्तारूढ गटात वैचारिक वाद वाढीस लागले. त्यामुळे यंदाची निवडणूक चुरशीचे ठरणार असल्याचे पहिल्यापासूनच स्पष्ट होते. दोन्ही गावांमध्ये शिवसेनेत सरळ सरळ गट पडल्याने मूळ गटाला शह द्यायचा असेल तर दुसऱ्या गटाशी हात मिळवणी करणे हे सूत्र पारंपरिक इतर पक्षाच्या विरोधकांनी लक्षात घेऊन तशी पावले टाकली. नाशिक-पुणे चौपदरी महामार्गावरील शिंदे गावातील उड्डाणपुलाने गावाचे अर्थकारण बिघडून गेले. सत्ताधाऱ्यांनी कंत्राटदार व टोलनाका ठेकेदार यांचे हित बघितल्याचा राग ग्रामस्थांच्या मनात दडलेला होता. त्याचा फटका तुंगार यांना बसला. दोन्ही गावांमध्ये युवकांनी घेतलेल्या पुढाकारामुळे सत्तांतर होऊन दोन्हीही ग्रामपंचायतीच्या चाव्या युवकांच्या हाती आल्या आहेत. यामुळे आगळे व तुंगार यांच्या राजकीय वाटचालीला खिळ बसली आहे. या निवडणुकीत स्थानिक राजकारण, प्रश्न व नातेसंबंधावर लढविली गेली.