शहरं
Join us  
Trending Stories
1
"अमेरिकेच्या हल्ल्यानंतरही आमचे अणुऊर्जा प्रकल्प सुरक्षित"; इराणने दिली माहिती, ट्रम्प यांचा दावा फेटाळला
2
अमेरिकेने अणुकेंद्रांवर केलेल्या हल्ल्याचा इराण कसा घेणार बदला, केवळ इस्राइललाच लक्ष्य करणार की...
3
भगवे झेंडे घेऊन रस्त्यावर उतरणे म्हणजे हिंदुत्व नव्हे; नितीन गडकरींची भूमिका
4
अमेरिकेच्या हल्ल्यानंतर इराण संतापला; इस्रायलवर डागली 30 क्षेपणास्त्रे, अनेक शहरांमध्ये भीतीचे वातावरण
5
VIDEO: इराणवर हल्ले सुरुच; अमेरिकेने दिलेली लढाऊ विमाने इस्रायलने केली नष्ट
6
"जंगल का कानून..."; अणुकेंद्रांवरीर हल्ल्यानंतर, इराणचा भारतमार्गे अमेरिकेला 'मेसेज'; घेतली मोठी शपथ!
7
इस्रायल सोडा अमेरिका-युरोपलाही घाबरत नाही; पण 'या' गटासमोर इराणला झुकावेच लागते!
8
‘त्या’ बेकायदा कृत्यांमध्ये कायद्याचे रक्षकच सहभागी; वसई-विरारमधील बांधकामप्रकरणी उच्च न्यायालयाने राज्य सरकारला झापले
9
इराणच्या अणुकेंद्रांवर अमेरिकेने टाकलेले बंकर बस्टर बॉम्ब एवढे आहेत विध्वंसक, अशी आहेत त्यांची वैशिष्ट्ये
10
तीन भाषा शिकण्यासाठी खेळाच्या तासात कपात; हिंदी शिकवण्यावरुन सुप्रिया सुळेंची CM फडणवीसांकडे मागणी
11
पुढच्या आठवड्यात बाजारात १२ कंपन्यांचे IPO, १५,८०० कोटींची उलाढाल! तुमच्यासाठी 'ही' सुवर्णसंधी!
12
Maharashtra Rainfall: पश्चिम महाराष्ट्रात जोरदार पाऊस, विदर्भात अजून प्रतीक्षा
13
"इराणने आता शांततेच्या मार्गावर यावे, अन्यथा...", अणुकेंद्रांवरील हल्ल्यानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा सक्त इशारा  
14
नोकऱ्या आल्या धोक्यात! सरकार शिक्षकांना म्हणते, ‘देता आधार, का करू अंधार’
15
अलिबाग: खांदेरीवर ‘मंकला’, ‘वाघबकरी’ खेळांचे अवशेष; शोधमोहिमेत सापडले मंकलाचे १० पट
16
बुलेट ट्रेनसाठी ४० मीटरचा बॉक्स गर्डर; महाराष्ट्रात प्रथमच बसवला पूर्ण लांबीचा गर्डर 
17
अमेरिकेचा प्रत्येक नागरिक आणि सैनिक आमच्या निशाण्यावर, अणुकेंद्रावर हल्ल्यानंतर इराणचा थेट इशारा  
18
मी अजूनही ठाकरेंसोबत; तेजस्वी घोसाळकरांचे स्पष्टीकरण, राजकीय वळण न देण्याचे केले आवाहन 
19
US Airstrikes Iran: तीन अणुऊर्जा केंद्रावर बॉम्बचा वर्षाव, अमेरिकेने इराणवर हवाई हल्ला कसा केला?
20
मुंबई, चेन्नईत सीबीआयचे छापे; ८०० कोटींच्या भ्रष्टाचार, जेएनपीएच्या माजी मुख्य व्यवस्थापकासह चौघांवर गुन्हा

नामांतरावर काँग्रेस-सेनेची मिलीजुली कुस्ती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 14, 2021 04:13 IST

नाशिक दौऱ्यावर आलेल्या फडणवीस यांनी शंकराचार्य संकुल येथे पत्रकारांशी बोलताना राज्यातील शिवसेना सरकार डुप्लिकेट काम करीत आहे. ट्विट मध्ये ...

नाशिक दौऱ्यावर आलेल्या फडणवीस यांनी शंकराचार्य संकुल येथे पत्रकारांशी बोलताना राज्यातील शिवसेना सरकार डुप्लिकेट काम करीत आहे. ट्विट मध्ये औरंगाबादचा संभाजीनगर असा उल्लेख करायचा आणि मंत्रिमंडळाचा अधिकार असूनदेखील या विषयावर निर्णय घ्यायचा नाही असा हा प्रकार आहे. त्यामुळे ही शिवसेना काँग्रेसची मिलीजुली कुस्ती आहे. हे सर्व ठरवून सुरू आहे. आम्ही नामांतर करू असे एकाने म्हणायचे, मग दुसऱ्याने काय बोलयाचे हे सर्व ठरवून सुरू आहे, असेही ते म्हणाले.

लैंंगिक शिक्षणाचे आरोप होत असले तरी मुंडे यांनी स्वत:च काही आरोपांबाबत त्यांच्या सोशल मीडियावर कबुली दिली आहे. त्यामुळे नैतिकतेच्या आधारे त्याबाबत त्यांच्या पक्षाने दखल घेतली पाहिजे. मुंडे यांच्यावर आरोप करणाऱ्यांचे महिलेचे एक म्हणणे आहे, तर मुंडे यांचे वेगळे म्हणणे असून, त्यांनी या प्रकरणी न्यायालयात स्थगिती मिळविली असल्याचे म्हटले आहे. त्यामुळे आधी या प्रकरणाबाबत पोलिसांनी सत्य बाहेर आणले पाहिजे. त्यानंतर भाजप आपली भूमिका ठरवेल असेही फडणवीस म्हणाले. केंद्र शासनाच्या कृषी कायद्याबाबत बोलताना त्यांनी सर्वोच्च न्यायालयाने या कायद्याला स्थगिती दिली आहे. आता न्यायालयाने नियुक्त केलेली समितीच आंदोलक शेतकऱ्यांच्या शंकांचे निरसन करून योग्य तो निर्णय घेईल, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.

इन्फो...

माजी आमदार वसंत गीते आणि सुनील बागूल हे भाजपातून शिवसेनेत दाखल झाले. त्यावर बोलताना फडणवीस यांनी ते आता पक्षातून गेले म्हणून मी वाईट बोलणार नाही. परंतु, अन्य पक्षातून अनेकजण भाजपात येणार आहे. शिवाय २०१४ मध्ये असे अनेक नेते नव्हते, शिवसेनाही विरोधात होती तरी नाशिकमधील विधानसभेच्या तीन जागा निवडून आल्याच ना, असा टोलाही त्यांनी लगावला. ज्यांना सत्ताच जवळची वाटते त्यांना काय बोलणार असा प्रश्न नाही.

इन्फो...

लसीबाबत प्रोटोकाॅल ठरलेला

आगामी विधानसभा निवडणुका डोळ्यांसमेार ठेवून पश्चिम बंगालला जास्त राज्य लस पुरविल्या जात असल्याचा आरोप होत असून, त्याचे फडणवीस यांनी खंडन केले. लस एकदम मेाठ्या प्रमाणात उपलब्ध होणार नसल्याने राज्यांना लस कशा प्रकारे पुरवायची याचा प्रोटोकॉल ठरला आहे, असे सांगून फडणवीस यांनी देशात काहीही झाले की केंद्र सरकारवर टीका करायची अशी महाराष्ट्रात सवय आहे, हे राज्यातील सरकारच्या नाकर्तेपणाचे लक्षण आहे, असेही ते म्हणाले.