शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
3
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
4
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
5
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
6
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
7
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
8
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
9
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
10
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
11
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
12
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
13
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
14
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
15
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
16
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
17
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
18
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
19
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
20
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
Daily Top 2Weekly Top 5

नामांतरावर काँग्रेस-सेनेची मिलीजुली कुस्ती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 14, 2021 04:13 IST

नाशिक दौऱ्यावर आलेल्या फडणवीस यांनी शंकराचार्य संकुल येथे पत्रकारांशी बोलताना राज्यातील शिवसेना सरकार डुप्लिकेट काम करीत आहे. ट्विट मध्ये ...

नाशिक दौऱ्यावर आलेल्या फडणवीस यांनी शंकराचार्य संकुल येथे पत्रकारांशी बोलताना राज्यातील शिवसेना सरकार डुप्लिकेट काम करीत आहे. ट्विट मध्ये औरंगाबादचा संभाजीनगर असा उल्लेख करायचा आणि मंत्रिमंडळाचा अधिकार असूनदेखील या विषयावर निर्णय घ्यायचा नाही असा हा प्रकार आहे. त्यामुळे ही शिवसेना काँग्रेसची मिलीजुली कुस्ती आहे. हे सर्व ठरवून सुरू आहे. आम्ही नामांतर करू असे एकाने म्हणायचे, मग दुसऱ्याने काय बोलयाचे हे सर्व ठरवून सुरू आहे, असेही ते म्हणाले.

लैंंगिक शिक्षणाचे आरोप होत असले तरी मुंडे यांनी स्वत:च काही आरोपांबाबत त्यांच्या सोशल मीडियावर कबुली दिली आहे. त्यामुळे नैतिकतेच्या आधारे त्याबाबत त्यांच्या पक्षाने दखल घेतली पाहिजे. मुंडे यांच्यावर आरोप करणाऱ्यांचे महिलेचे एक म्हणणे आहे, तर मुंडे यांचे वेगळे म्हणणे असून, त्यांनी या प्रकरणी न्यायालयात स्थगिती मिळविली असल्याचे म्हटले आहे. त्यामुळे आधी या प्रकरणाबाबत पोलिसांनी सत्य बाहेर आणले पाहिजे. त्यानंतर भाजप आपली भूमिका ठरवेल असेही फडणवीस म्हणाले. केंद्र शासनाच्या कृषी कायद्याबाबत बोलताना त्यांनी सर्वोच्च न्यायालयाने या कायद्याला स्थगिती दिली आहे. आता न्यायालयाने नियुक्त केलेली समितीच आंदोलक शेतकऱ्यांच्या शंकांचे निरसन करून योग्य तो निर्णय घेईल, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.

इन्फो...

माजी आमदार वसंत गीते आणि सुनील बागूल हे भाजपातून शिवसेनेत दाखल झाले. त्यावर बोलताना फडणवीस यांनी ते आता पक्षातून गेले म्हणून मी वाईट बोलणार नाही. परंतु, अन्य पक्षातून अनेकजण भाजपात येणार आहे. शिवाय २०१४ मध्ये असे अनेक नेते नव्हते, शिवसेनाही विरोधात होती तरी नाशिकमधील विधानसभेच्या तीन जागा निवडून आल्याच ना, असा टोलाही त्यांनी लगावला. ज्यांना सत्ताच जवळची वाटते त्यांना काय बोलणार असा प्रश्न नाही.

इन्फो...

लसीबाबत प्रोटोकाॅल ठरलेला

आगामी विधानसभा निवडणुका डोळ्यांसमेार ठेवून पश्चिम बंगालला जास्त राज्य लस पुरविल्या जात असल्याचा आरोप होत असून, त्याचे फडणवीस यांनी खंडन केले. लस एकदम मेाठ्या प्रमाणात उपलब्ध होणार नसल्याने राज्यांना लस कशा प्रकारे पुरवायची याचा प्रोटोकॉल ठरला आहे, असे सांगून फडणवीस यांनी देशात काहीही झाले की केंद्र सरकारवर टीका करायची अशी महाराष्ट्रात सवय आहे, हे राज्यातील सरकारच्या नाकर्तेपणाचे लक्षण आहे, असेही ते म्हणाले.