शहरं
Join us  
Trending Stories
1
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
2
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
3
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
4
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
5
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
6
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
7
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
8
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
9
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
10
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
11
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
12
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
13
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
14
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
15
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
16
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
17
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
18
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
19
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
20
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय

नामांतरावर काँग्रेस-सेनेची मिलीजुली कुस्ती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 14, 2021 04:13 IST

नाशिक दौऱ्यावर आलेल्या फडणवीस यांनी शंकराचार्य संकुल येथे पत्रकारांशी बोलताना राज्यातील शिवसेना सरकार डुप्लिकेट काम करीत आहे. ट्विट मध्ये ...

नाशिक दौऱ्यावर आलेल्या फडणवीस यांनी शंकराचार्य संकुल येथे पत्रकारांशी बोलताना राज्यातील शिवसेना सरकार डुप्लिकेट काम करीत आहे. ट्विट मध्ये औरंगाबादचा संभाजीनगर असा उल्लेख करायचा आणि मंत्रिमंडळाचा अधिकार असूनदेखील या विषयावर निर्णय घ्यायचा नाही असा हा प्रकार आहे. त्यामुळे ही शिवसेना काँग्रेसची मिलीजुली कुस्ती आहे. हे सर्व ठरवून सुरू आहे. आम्ही नामांतर करू असे एकाने म्हणायचे, मग दुसऱ्याने काय बोलयाचे हे सर्व ठरवून सुरू आहे, असेही ते म्हणाले.

लैंंगिक शिक्षणाचे आरोप होत असले तरी मुंडे यांनी स्वत:च काही आरोपांबाबत त्यांच्या सोशल मीडियावर कबुली दिली आहे. त्यामुळे नैतिकतेच्या आधारे त्याबाबत त्यांच्या पक्षाने दखल घेतली पाहिजे. मुंडे यांच्यावर आरोप करणाऱ्यांचे महिलेचे एक म्हणणे आहे, तर मुंडे यांचे वेगळे म्हणणे असून, त्यांनी या प्रकरणी न्यायालयात स्थगिती मिळविली असल्याचे म्हटले आहे. त्यामुळे आधी या प्रकरणाबाबत पोलिसांनी सत्य बाहेर आणले पाहिजे. त्यानंतर भाजप आपली भूमिका ठरवेल असेही फडणवीस म्हणाले. केंद्र शासनाच्या कृषी कायद्याबाबत बोलताना त्यांनी सर्वोच्च न्यायालयाने या कायद्याला स्थगिती दिली आहे. आता न्यायालयाने नियुक्त केलेली समितीच आंदोलक शेतकऱ्यांच्या शंकांचे निरसन करून योग्य तो निर्णय घेईल, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.

इन्फो...

माजी आमदार वसंत गीते आणि सुनील बागूल हे भाजपातून शिवसेनेत दाखल झाले. त्यावर बोलताना फडणवीस यांनी ते आता पक्षातून गेले म्हणून मी वाईट बोलणार नाही. परंतु, अन्य पक्षातून अनेकजण भाजपात येणार आहे. शिवाय २०१४ मध्ये असे अनेक नेते नव्हते, शिवसेनाही विरोधात होती तरी नाशिकमधील विधानसभेच्या तीन जागा निवडून आल्याच ना, असा टोलाही त्यांनी लगावला. ज्यांना सत्ताच जवळची वाटते त्यांना काय बोलणार असा प्रश्न नाही.

इन्फो...

लसीबाबत प्रोटोकाॅल ठरलेला

आगामी विधानसभा निवडणुका डोळ्यांसमेार ठेवून पश्चिम बंगालला जास्त राज्य लस पुरविल्या जात असल्याचा आरोप होत असून, त्याचे फडणवीस यांनी खंडन केले. लस एकदम मेाठ्या प्रमाणात उपलब्ध होणार नसल्याने राज्यांना लस कशा प्रकारे पुरवायची याचा प्रोटोकॉल ठरला आहे, असे सांगून फडणवीस यांनी देशात काहीही झाले की केंद्र सरकारवर टीका करायची अशी महाराष्ट्रात सवय आहे, हे राज्यातील सरकारच्या नाकर्तेपणाचे लक्षण आहे, असेही ते म्हणाले.