शहरं
Join us  
Trending Stories
1
Video - अग्निकल्लोळ! गुजरातच्या संघवी ऑर्गेनिक्स फॅक्ट्रीमध्ये भीषण आग, धुराचं साम्राज्य
2
टीम इंडियाला धक्का! पाकिस्तानविरूद्धच्या सामन्याआधी शुबमन गिलच्या हाताला दुखापत, अपडेट काय?
3
निष्काळजीपणाचा कळस! सरकारी शाळेत मध्यान्ह भोजन खाल्ल्यानंतर ९० मुलं पडली आजारी
4
अलर्ट मोड ऑन! फेस्टिव्ह सेलच्या स्वस्ताईला भुलू नका; एक चूक अन् गमवाल आयुष्यभराची कमाई
5
शेतकऱ्यांनो, दिवाळीआधी PM किसानचा २१वा हप्ता येणार का? वाचा कधी जमा होणार पैसे?
6
Mumbai: विरार- दादर लोकलच्या दरवाज्यात मनोरूग्णाचा धुडगूस, महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्‍न ऐरणीवर
7
GST कपातीनंतर ५, १०, २० रुपयांच्या बिस्किट, चिप्सची किंमतही घटणार की…?, कंपन्यांनी दिली अशी माहिती  
8
लोकप्रिय 'दामिनी' मालिका पुन्हा येतेय प्रेक्षकांच्या भेटीला, ही अभिनेत्री मुख्य भूमिकेत, या चॅनेलवर होणार प्रसारण
9
चालकाचं नियंत्रण सुटलं अन् कार थेट उड्डाणपुलावरून खाली रेल्वे रुळावर पडली!
10
निम्न तेरणा प्रकल्पातून ७६३६ क्युसेक पाण्याचा विसर्ग, नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा
11
'चुल्लूभर पानी में डूब मरो...' भारत-पाकिस्तान क्रिकेट सामन्यावरून ओवैसी भाजपवर संतापले!
12
नफा वाढूनही फ्लिपकार्टला ५,१८९ कोटी रुपयांचा तोटा! एक निर्णय कंपनीच्या अंगलट?
13
खूशखबर! Instagram ची मोठी घोषणा; आता पटापट वाढेल रीच, पोस्ट करा अनलिमिटेड स्टोरी
14
‘सॉरी... आम्ही हे जग सोडतोय’, CA च्या पत्नीनं मुलासह १३ व्या मजल्यावरून मारली उडी, समोर आलं धक्कादायक कारण
15
पंजाब की शेरनी! चालत्या ऑटोमध्ये चोरांशी लढली, जीव धोक्यात घालून मदत मागितली अन्...
16
Pakistan: पाकिस्तानात दहशतवाद्यांच्या हल्ल्यात १९ सैनिकांचा मृत्यू; ४५ दहशतवाद्यांचा खात्मा
17
सूर्या, पांड्या की आफ्रिदी... IND vs PAK सामन्यात 'हे' १० खेळाडू ठरू शकतात 'गेमचेंजर'
18
'दशावतार' सिनेमासाठी रजनीकांतचा झालेला विचार? दिग्दर्शक म्हणाले- "दिलीप प्रभावळकरांनी नकार दिला असता तर..."
19
युपीआय व्यवहारांच्या नियमांत मोठे बदल; विमा, गुंतवणूक, क्रेडिट कार्ड पेमेंटसाठी मर्यादा वाढली
20
Dashavtar: दिलीप प्रभावळकरांच्या 'दशावतार'ने मनं जिंकली; दुसऱ्या दिवशी कमावले तब्बल 'इतके' कोटी

भूमि अधिग्रहण विधेयकास काँग्रेसचा विरोध

By admin | Updated: May 16, 2015 01:13 IST

भूमि अधिग्रहण विधेयकास काँग्रेसचा विरोध

  नाशिक : भूमि अधिग्रहण विधेयकास विरोधकांकडून विशेषत: काँग्रेसकडून होत असलेला विरोध पूर्णपणे निरर्थक असून, केवळ उद्योगपतींचे हित जोपासण्याचा हा प्रयत्न आहे, असा आरोप केंद्रीय ग्राम विकास राज्यमंत्री सुदर्शन भगत यांनी केला. नाशिकमध्ये एका कार्यक्रमासाठी आले असताना ते पत्रकारांशी बोलत होते. भगत पुढे म्हणाले की, भूमी अधिग्रहण विधेयक हे पूर्णत: शेतकरी हिताचे आहे. ग्रामीण भागाचा विकास करताना त्याठिकाणी, रस्ते, वीज, पाणी, शिक्षण, आरोग्य, दळण-वळण या सुविधा उपलब्ध करण्यासाठी भूमि अधिग्रहण करावेच लागेल. याचा अर्थ शेतकऱ्यांकडून कवडीमोल भावाने या जमिनी घेतल्या जाणार नसून त्याकरिता मापदंड ठरविण्यात आला आहे. शेतकऱ्यांना चारपटीने याचा मोबदला दिला जाणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पहिल्या दिवसापासून शेतकरी हिताचे निर्णय घेतले आहेत. देशातील शेतकरी जगला तरच विकास साध्य होईल, याकरिता शेतकऱ्यांचे हात बळकट करण्याचा सरकारचा पहिल्यापासून अजेंडा आहे. त्यादृष्टीनेच हे विधेयक तयार करण्यात आले असून, शेतकऱ्यांना याचा फायदाच होईल. मात्र काँग्रेस या विधेयकावरून राजकारण करीत असून, उद्योगपतींना एकप्रकारे मदत करीत आहे. काँग्रेस शेतकऱ्यांमध्ये भ्रम निर्माण करीत असून, विधेयक मंजूर करण्यासाठी सरकार प्रयत्नशील असेल, असेही भगत यांनी स्पष्ट केले. (प्रतिनिधी)