शहरं
Join us  
Trending Stories
1
नागपुरात भाजपमध्ये उमेदवारीसाठी तोबा गर्दी, मुलाखतीच्या वेळापत्रकात करावा लागला बदल
2
पृथ्वीचं 'ग्रहण' सुटलं! दोन वेळा 'अनसोल्ड' राहिल्यावर शेवटी जुन्या मालकानेच दाखवला भरवसा
3
Aadhaar New Rules : आधार फेस ऑथेंटिकेशन म्हणजे काय? केंद्र सरकार नवीन नियम लागू करणार
4
स्मृतिभ्रंशाने त्रस्त असलेल्या महिलेचा क्रिकेटपटू सलीम दुराणी यांची पत्नी असल्याचा दावा
5
"पंतप्रधान मोदींना दोन गोष्टींचा अत्यंत तिरस्कार, एक गांधींचे विचार अन् दुसरे...!"; राहुल गांधींचा हल्लाबोल
6
पतसंस्था अध्यक्षाला ग्राहक आयोगाने सुनावली दोन वर्षांच्या कारावास, दंडाची शिक्षा
7
विरार हत्याकांड प्रकरण: कुख्यात गुंड सुभाषसिंह ठाकूर याला ७ दिवसांची पोलीस कोठडी
8
मुंबईकर सरफराज खानला मोठा दिलासा! IPL च्या आगामी हंगामात पगारवाढीसह चेन्नईकडून उतरणार मैदानात
9
रोजगार क्षेत्रातून दिलासादायक बातमी; बेरोजगारी 9 महिन्यांच्या नीचांकी पातळीवर
10
IPL Auction 2026 : काव्या मारन vs आकाश अंबानी यांच्यात जुगलबंदी; त्यात अनकॅप्ड खेळाडू झाला 'करोडपती'
11
धक्कादायक! विमानतळावर भुताटकी, प्रवाशांना त्रास देते एक रहस्यमय सावली, प्रवाशांचा दावा
12
IPL 2026 Auction: 'त्या' खेळाडूविषयी मनात आदरच..; आकाश अंबानींनी सांगितली पडद्यामागची गोष्ट
13
Harsimrat Kaur Badal : "सरकार गरिबांच्या पोटावर लाथा मारतंय...", मनरेगावरून हरसिमरत कौर यांचा जोरदार हल्लाबोल
14
पीएम मोदींना दोन गोष्टींची खूप चीड; 'जी राम जी' विधेयकावरुन राहुल गांधींची टीका
15
कोण आहे Prashant Veer? MS धोनीसोबत खेळण्याचं स्वप्न पाहणाऱ्या खेळाडूवर CSK नं लावली विक्रमी बोली
16
VIDEO: पाहावं ते नवलंच... मुलीने चक्क केली ख्रिसमस ट्री हेअरस्टाईल, नेटकऱ्यांना हसू आवरेना
17
बेस प्राईस अवघी ३० लाख, पण लिलावात या ५ खेळाडूंवर पडला पैशांचा पाऊस, बनले करोडपती
18
गीझर-हीटरमुळे तुमचे वीज बिल जास्त येतंय? या स्मार्ट टिप्स वापरून पैसे वाचवा
19
IPL 2026: ऑक्शनमध्ये चेन्नईचा मोठा डाव! १४ कोटी खर्च केले, पण परफेक्ट खेळाडू निवडला, धोनीची जागा घेणार?
Daily Top 2Weekly Top 5

भूमि अधिग्रहण विधेयकास काँग्रेसचा विरोध

By admin | Updated: May 16, 2015 01:13 IST

भूमि अधिग्रहण विधेयकास काँग्रेसचा विरोध

  नाशिक : भूमि अधिग्रहण विधेयकास विरोधकांकडून विशेषत: काँग्रेसकडून होत असलेला विरोध पूर्णपणे निरर्थक असून, केवळ उद्योगपतींचे हित जोपासण्याचा हा प्रयत्न आहे, असा आरोप केंद्रीय ग्राम विकास राज्यमंत्री सुदर्शन भगत यांनी केला. नाशिकमध्ये एका कार्यक्रमासाठी आले असताना ते पत्रकारांशी बोलत होते. भगत पुढे म्हणाले की, भूमी अधिग्रहण विधेयक हे पूर्णत: शेतकरी हिताचे आहे. ग्रामीण भागाचा विकास करताना त्याठिकाणी, रस्ते, वीज, पाणी, शिक्षण, आरोग्य, दळण-वळण या सुविधा उपलब्ध करण्यासाठी भूमि अधिग्रहण करावेच लागेल. याचा अर्थ शेतकऱ्यांकडून कवडीमोल भावाने या जमिनी घेतल्या जाणार नसून त्याकरिता मापदंड ठरविण्यात आला आहे. शेतकऱ्यांना चारपटीने याचा मोबदला दिला जाणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पहिल्या दिवसापासून शेतकरी हिताचे निर्णय घेतले आहेत. देशातील शेतकरी जगला तरच विकास साध्य होईल, याकरिता शेतकऱ्यांचे हात बळकट करण्याचा सरकारचा पहिल्यापासून अजेंडा आहे. त्यादृष्टीनेच हे विधेयक तयार करण्यात आले असून, शेतकऱ्यांना याचा फायदाच होईल. मात्र काँग्रेस या विधेयकावरून राजकारण करीत असून, उद्योगपतींना एकप्रकारे मदत करीत आहे. काँग्रेस शेतकऱ्यांमध्ये भ्रम निर्माण करीत असून, विधेयक मंजूर करण्यासाठी सरकार प्रयत्नशील असेल, असेही भगत यांनी स्पष्ट केले. (प्रतिनिधी)