शहरं
Join us  
Trending Stories
1
८० वर्षांपूर्वी उत्खननात सापडलेले शिवमंदिर; आता पुन्हा धराली दुर्घटनेत जमिनीखाली गाडले गेले
2
एकनाथ शिंदे-उद्धव ठाकरेंची एकाचवेळी दिल्लीवारी; टायमिंगची चर्चा, नवे समीकरण दिसणार?
3
वडिलांना सांगितलं कॉल सेंटरमध्ये नोकरी मिळाली; रोज ८-१० ग्राहकांना खूष...
4
देशातील विमानतळांवर दहशतवादी हल्ल्याचा धोका; बीसीएएसकडून सुरक्षा वाढवण्याच्या सूचना
5
Photo : डोळ्यांदेखत अख्खं गाव वाहून गेलं, क्षणार्धात होत्याचं नव्हतं झालं; उत्तरकाशीत दिसलं निसर्गाचं रौद्र रूप
6
Afghanistan Squad For Asia Cup 2025 : संघ ठरला! गिलच्या नेतृत्वाखाली खेळणारा पठ्ठ्या झाला कॅप्टन
7
३५ हजारात गोरेगाव इथं १ बीएचके भाड्याने घ्यायला गेला; ब्रोकरने सांगितलेला दर ऐकून 'तो' थक्क झाला
8
ते शिट्ट्या वाजवून मजा घेत होते का? उत्तरकाशीच्या धरालीमधील ढगफुटीवेळच्या व्हिडीओवर अनेक प्रश्न...
9
IND vs ENG: इंग्लंडविरूद्ध कसोटी विजयानंतर WTC मध्ये टीम इंडिया कितव्या नंबरवर? जाणून घ्या
10
'महादेवी' परतणार! नांदणी मठाजवळच हत्तीणीसाठी पुनर्वसन केंद्र उभारण्यास 'वनतारा' मदत करणार
11
लक्ष्मीकांत बेर्डेंनी का नाकारला 'नवरा माझा नवसाचा' सिनेमा?, सचिन पिळगावकर म्हणाले...
12
NSDL IPO Listing: पहिल्याच दिवशी ९०० पार गेला NSDL चा शेअर; IPO झालेला ४१ पट सबस्क्राईब
13
Video: चीन आता 'लांडग्याला' युद्धावर पाठविणार, मिनिटाला ६० गोळ्या झाडणारा रोबो; सैन्यासोबत सरावाचा व्हिडीओ... 
14
टी-२० अन् वनडेत फर्स्ट क्लास; पण टेस्टमध्ये ATKT; असं आहे हेडमास्टर गंभीरचं 'प्रगती पुस्तक'
15
IPLमधील या क्रिकेटपटूने ॲडल्ट साईटवर केली एंट्री, क्रिकेटप्रेमी अवाक्, आपल्या निर्णयाबाबत म्हणाला...
16
कशी सुरु झाली मृणाल ठाकूर अन् धनुषची लव्हस्टोरी?, 'तो' सेल्फी पुन्हा होतोय व्हायरल
17
एकदा करून बघाच! वजन कमी होईल अन् केस गळणंही थांबेल... इवल्याशा वेलचीचे मोठे फायदे
18
रेल्वे कंत्राटावरून वाद, ३ मराठी भावंडांवर परप्रांतीयांचा प्राणघातक हल्ला; रॉडने डोके फोडले अन् रचला बनाव
19
तुमचा iPhone धोक्यात? ॲपल युजर्ससाठी भारत सरकारचा 'रेड अलर्ट', लगेच 'हे' काम करा!
20
रक्षाबंधन २०२५: गजलक्ष्मी योगात श्रावण पौर्णिमा; लक्ष्मीकृपेने 'या' राशींच्या आनंदाला येणार भरती

कॉँग्रेस-राष्ट्रवादीचा मोर्चा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 15, 2018 23:56 IST

दिंडोरी : वीज मंडळाचा कारभार सुधारावा, भारनियमन कमी करण्यात यावे व पेट्रोल, डिझेल दरवाढ, शेतमालाच्या कोसळलेला भाव, दुष्काळी स्थिती, बेरोजगारी, शेतकरी आत्महत्या आदी प्रश्नांसंबंधी दिंडोरी तालुका राष्ट्रवादी काँग्रेस व काँग्रेस पार्टीच्या वतीने शासनाचा निषेध नोंदवण्यासाठी दिंडोरी तहसील कार्यालयावर सोमवारी सकाळी जनआंदोलन मोर्चा काढण्यात आला.

ठळक मुद्देजनआंदोलन : भारनियमन कमी करण्याची मागणी; इंधन दरवाढीचा निषेध

दिंडोरी : वीज मंडळाचा कारभार सुधारावा, भारनियमन कमी करण्यात यावे व पेट्रोल, डिझेल दरवाढ, शेतमालाच्या कोसळलेला भाव, दुष्काळी स्थिती, बेरोजगारी, शेतकरी आत्महत्या आदी प्रश्नांसंबंधी दिंडोरी तालुका राष्ट्रवादी काँग्रेसकाँग्रेस पार्टीच्या वतीने शासनाचा निषेध नोंदवण्यासाठी दिंडोरी तहसील कार्यालयावर सोमवारी सकाळी जनआंदोलन मोर्चा काढण्यात आला.आमदार नरहरी झिरवाळ, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते श्रीराम शेटे, जिल्हा बँक संचालक गणपतराव पाटील, बाजार समिती सभापती दत्तात्रेय पाटील, काँग्रेस तालुकाध्यक्ष सुनील आव्हाड आदींच्या नेतृत्वाखाली काढण्यात आलेल्या मोर्चोत झिरवाळ यांनी राज्यातील युती शासनाच्या कारभारावर जोरदार टीका करत हल्लाबोल केला. केवळ नियोजन नसल्याने विजेचे संकट निर्माण झाले असून, शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होत आहे, असे त्यांनी सांगितले.कादवाचे अध्यक्ष श्रीराम शेटे यांनी, पाणी कपातीचे मोठे संकट उभे राहिले असून, शेतकºयांनी पाणी मागणी अर्ज भरून आपले हक्काचे पाणी आरक्षित करावे, असे आवाहन केले. सरकारने पेट्रोल, डिझेल गॅस, खते, औषधे, कृषी अवजारे यांच्या किमती कमी करण्याची मागणी करण्यात आली.यावेळी भास्कर भगरे, सुनील आव्हाड, प्रकाश वडजे, अनिल देशमुख, पंडितराव गायकवाड, स्वप्नील गायकवाड, नरेश देशमुख, सचिन देशमुख, विलास कड, राजेंद्र ढगे, गोपीनाथ पाटील, शेखर देशमुख, रामदास धात्रक, शंकर काठे, संपत भरसट, आनंदराव चौधरी, डॉ. योगेश गोसावी उपस्थित होते.हक्काच्या पाण्यासाठी एकत्र यादुष्काळी स्थिती पाहता जायकवाडी धरणात कमी पाणीसाठा झाल्याने शासनदरबारी दिंडोरी तालुक्यातील शेतकºयांचे सिंचनाचे पाणी कपात करून ते पिण्यासाठी जायकवाडीत सोडण्याचा घाट घातला जात आहे. यास आपला तीव्र विरोध राहणार असून, कागदावर दिंडोरीत पाऊस जास्त दिसत असला तरी कुठे अत्यल्प तर कुठे जास्त पाऊस झाला आहे. धरणक्षेत्रात पाऊस झाला तसा वळण योजनांमुळे पाणीसाठा पूर्ण झाला. तालुक्यात दुष्काळाच्या झळा दिसत आहेत. कोणत्याही परिस्थितीत या धरणावर अवलंबून असलेल्या पिण्याच्या व शेतीसिंचनाच्या पाण्यात कपात करू नये व जयकवाडीला पाणी सोडू नये, अशी मागणी करत वेळप्रसंगी कुंदेवाडी येथून रेल्वेने पिण्यासाठी पाणी देता येईल. तरी या व वीज प्रश्नावर सर्वांनी पक्षभेद विसरून एकत्र यावे, असे आवाहन आमदार नरहरी झिरवाळ यांनी केले.