शहरं
Join us  
Trending Stories
1
ऑपरेशन सिंदूर: मोदींनी अमेरिकेच्या न झालेल्या ५१ व्या राज्यात जाऊन सुनावले, ट्रम्प वठणीवर आले...
2
'तुम्ही सुरुवात केली, मी अंत करेन...', लालू प्रसाद यादवांचा फोटो पाहत तेज प्रताप यांनी केली मोठी घोषणा
3
Anderson-Tendulkar Trophy : दोन दिग्गजांच्या खास फ्रेमसह दिसली नव्या ट्रॉफीची पहिली झलक (See Pics)
4
डोंगराच्या ३०० फूट खाली इराणचं अण्वस्त्र ठिकाण, अमेरिका इस्रायलला 'ब्रह्मास्त्र' देणार? ताकद जाणून थक्क व्हाल!
5
'ही' आहेत भारतातील टॉप १० हिट गाणी, नंबर १ वाचून थक्क व्हाल!
6
“‘अ‍ॅक्ट ऑफ गॉड’ घटना, जगाला जागे करणारे संकेत”; एअर इंडिया अपघातावर पीयूष गोयल यांचे विधान
7
कोण आहे मिस्ट्री गर्ल?; सोनमशी होते कनेक्शन; राजा रघुवंशी हत्या प्रकरणाला नवं वळण
8
'खमेनी यांना काही झाले तर...', शियांच्या सर्वात मोठ्या धार्मिक नेत्याचा इराकमधून ट्रम्प यांना इशारा
9
बायको बॉयफ्रेंडसोबत पळाली, नवऱ्याने खाणं-पिणं केलं बंद, झाला मृत्यू; दीड महिन्यांपूर्वी झालेलं लग्न
10
परभणीचे पुण्यात राहणारे पाच मित्र, पानशेतला सिगारेटचा धूर काढत गेले अन्...; आता आहेत तुरुंगाच्या हवेत...
11
'विदर्भ कन्या' दिव्या देशमुखची कमाल; चीनच्या नंबर वन खेळाडूला दिला शह! PM मोदींनीही दिली 'शाब्बासकी'
12
रशियाने इराणला एअर डिफेन्स सिस्टीम देऊ केली होती...; पुतीन यांचा गौप्यस्फोट, आजही इराण...
13
'माझे पक्षनेतृत्वाशी मतभेद, पण...', काँग्रेस नेते शशी थरुर यांचे मोठे विधान
14
'या' आजारांची नावं ऐकाल तर साखर खाणंच आपोआप सोडून द्याल अन् निरोगी आयुष्य जगाल
15
Maharashtra: आधी अल्पवयीन मुलीवर अत्याचार; नंतर ते अश्लील व्हिडिओ आणि फोटो केले व्हायरल
16
मोजून थकाल, पण गाडी संपणारच नाही! भारतातील 'वासुकी' ट्रेनबद्दल 'या' गोष्टी माहीत आहेत का?
17
...मग हिंदी भाषेचा जीआर निघाला कसा?; फडणवीस-राज भेटीवरून नाना पटोलेंचा गंभीर दावा
18
“होय मान्य करतो, बाळासाहेबांमुळेच मोठा झालो, तेच माझे गुरु अन् सर्वस्व”; नारायण राणेंची कबुली
19
Pataudi Trophy Row: 'पतौडी ट्रॉफी'चं नाव बदलण्याच्या वादावर अखेर सचिन तेंडुलकरने सोडलं मौन, म्हणाला- "हा निर्णय"
20
जमिनीवर असलेल्या त्या वस्तूमुळे भीषण विमान अपघातात वाचले विश्वास कुमारचे प्राण, काय होतं ते?

कॉँग्रेस-राष्ट्रवादीचा मोर्चा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 15, 2018 23:56 IST

दिंडोरी : वीज मंडळाचा कारभार सुधारावा, भारनियमन कमी करण्यात यावे व पेट्रोल, डिझेल दरवाढ, शेतमालाच्या कोसळलेला भाव, दुष्काळी स्थिती, बेरोजगारी, शेतकरी आत्महत्या आदी प्रश्नांसंबंधी दिंडोरी तालुका राष्ट्रवादी काँग्रेस व काँग्रेस पार्टीच्या वतीने शासनाचा निषेध नोंदवण्यासाठी दिंडोरी तहसील कार्यालयावर सोमवारी सकाळी जनआंदोलन मोर्चा काढण्यात आला.

ठळक मुद्देजनआंदोलन : भारनियमन कमी करण्याची मागणी; इंधन दरवाढीचा निषेध

दिंडोरी : वीज मंडळाचा कारभार सुधारावा, भारनियमन कमी करण्यात यावे व पेट्रोल, डिझेल दरवाढ, शेतमालाच्या कोसळलेला भाव, दुष्काळी स्थिती, बेरोजगारी, शेतकरी आत्महत्या आदी प्रश्नांसंबंधी दिंडोरी तालुका राष्ट्रवादी काँग्रेसकाँग्रेस पार्टीच्या वतीने शासनाचा निषेध नोंदवण्यासाठी दिंडोरी तहसील कार्यालयावर सोमवारी सकाळी जनआंदोलन मोर्चा काढण्यात आला.आमदार नरहरी झिरवाळ, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते श्रीराम शेटे, जिल्हा बँक संचालक गणपतराव पाटील, बाजार समिती सभापती दत्तात्रेय पाटील, काँग्रेस तालुकाध्यक्ष सुनील आव्हाड आदींच्या नेतृत्वाखाली काढण्यात आलेल्या मोर्चोत झिरवाळ यांनी राज्यातील युती शासनाच्या कारभारावर जोरदार टीका करत हल्लाबोल केला. केवळ नियोजन नसल्याने विजेचे संकट निर्माण झाले असून, शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होत आहे, असे त्यांनी सांगितले.कादवाचे अध्यक्ष श्रीराम शेटे यांनी, पाणी कपातीचे मोठे संकट उभे राहिले असून, शेतकºयांनी पाणी मागणी अर्ज भरून आपले हक्काचे पाणी आरक्षित करावे, असे आवाहन केले. सरकारने पेट्रोल, डिझेल गॅस, खते, औषधे, कृषी अवजारे यांच्या किमती कमी करण्याची मागणी करण्यात आली.यावेळी भास्कर भगरे, सुनील आव्हाड, प्रकाश वडजे, अनिल देशमुख, पंडितराव गायकवाड, स्वप्नील गायकवाड, नरेश देशमुख, सचिन देशमुख, विलास कड, राजेंद्र ढगे, गोपीनाथ पाटील, शेखर देशमुख, रामदास धात्रक, शंकर काठे, संपत भरसट, आनंदराव चौधरी, डॉ. योगेश गोसावी उपस्थित होते.हक्काच्या पाण्यासाठी एकत्र यादुष्काळी स्थिती पाहता जायकवाडी धरणात कमी पाणीसाठा झाल्याने शासनदरबारी दिंडोरी तालुक्यातील शेतकºयांचे सिंचनाचे पाणी कपात करून ते पिण्यासाठी जायकवाडीत सोडण्याचा घाट घातला जात आहे. यास आपला तीव्र विरोध राहणार असून, कागदावर दिंडोरीत पाऊस जास्त दिसत असला तरी कुठे अत्यल्प तर कुठे जास्त पाऊस झाला आहे. धरणक्षेत्रात पाऊस झाला तसा वळण योजनांमुळे पाणीसाठा पूर्ण झाला. तालुक्यात दुष्काळाच्या झळा दिसत आहेत. कोणत्याही परिस्थितीत या धरणावर अवलंबून असलेल्या पिण्याच्या व शेतीसिंचनाच्या पाण्यात कपात करू नये व जयकवाडीला पाणी सोडू नये, अशी मागणी करत वेळप्रसंगी कुंदेवाडी येथून रेल्वेने पिण्यासाठी पाणी देता येईल. तरी या व वीज प्रश्नावर सर्वांनी पक्षभेद विसरून एकत्र यावे, असे आवाहन आमदार नरहरी झिरवाळ यांनी केले.