शहरं
Join us  
Trending Stories
1
कॉकपिटमध्ये घुसण्याचा प्रयत्न; 9 प्रवासी ताब्यात, एअर इंडियाच्या विमानाला नेमकं काय घडलं?
2
“युद्धाची गरजच भासणार नाही, एक दिवस POKतील जनता म्हणेल की आम्ही भारतवासी आहोत”: राजनाथ सिंह
3
टाटा-महिंद्राच्या कंपनीचे शेअर आपटले! पण अदानींचा 'हा' स्टॉक ठरला टॉप गेनर; IT क्षेत्राला सर्वाधिक फटका
4
“आता रिकामे ठेवू नका, काहीतरी जबाबदारी द्या, चुकलो असेन तर...”; धनंजय मुंडेंची भरसभेत विनंती
5
Air India Plane Crash : अहमदाबाद विमान अपघातावर मोठी अपडेट; सुप्रीम कोर्टाने केंद्र सरकारला नोटीस पाठवली, AAIB अहवालाबाबत सांगितली ही बाब
6
VIDEO: आईची माया! सिंहीणने रेडकूवर घातली झडप, म्हशीने शिंगाने लावलं उडवून अन् पुढे...
7
बगरम हवाई तळावर अमेरिकेचा 'डोळा'; ट्रम्प यांना आता का हवंय अफगाणिस्तानचं 'एअरफील्ड'?
8
ज्या सुटकेसवर बसून रील बनवलं, त्यातच तिला भरून नदीत फेकलं; लव्हस्टोरीचा भयंकर शेवट
9
कहो ना कहो...! इमरान हाश्मीसमोर गाताना राघव जुयालच्या डोळ्यात आलेलं पाणी, म्हणाला...
10
आजपासून स्वस्त झालं Rail Neer; जीएसटी रिव्हिजननंतर रेल्वेनं कमी केली MRP
11
नेपाळ, फ्रान्सनंतर आता फिलिपिन्समध्येही भडका! लोक रस्त्यावर; धुमश्चक्रीत ९५ पोलीस जखमी, २१६ जणांना अटक
12
स्टार क्रिकेटपटूने निवृत्ती घेतली मागे, आता आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये करणार पुनरागमन  
13
५ कपन्यांमधील हिस्सा विकण्याच्या विचारात मोदी सरकार! लिस्ट मध्ये आहेत या सरकारी कंपन्यांची नावं
14
"५० हजार देतो, शरीरसंबंध ठेव", मुलाच्या वयाच्या निर्मात्याने अभिनेत्रीकडे केलेली धक्कादायक मागणी
15
इस्रायल-अमेरिकेचं टेन्शन वाढलं; इराणने १० हजार किमीपर्यंत मारा करणाऱ्या ICB मिसाईलची केली चाचणी
16
अशी धुलाई कधीच पाहिली नव्हती...; अभिषेक शर्माच्या फटकेबाजीनंतर पाकिस्तानी पत्रकाराची कबुली
17
परदेशी उपग्रहाच्या हालचालींवर भारताची करडी नजर; ५० बॉडीगार्ड उपग्रहांची तयारी
18
'मला बायको हवीय, माझं लग्न लावून द्या,कारण…’, तरुणाने थेट पंचायत समितीला दिलं पत्र, त्यानंतर...
19
Navratri 2025: नवरात्रीत अनवाणी चालण्याची प्रथा कशी सुरू झाली? खरंच लाभ होतो का?
20
भारतीय सैन्याने पाडलेले...श्रीनगरमधील डल सरोवरात सापडले पाकिस्तानचे 'फुसकी' क्षेपणास्त्र

सत्तेच्या राजकारणात कॉँग्रेस नेते भूमिका विसरले : विखे पाटील

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 31, 2020 00:43 IST

इंदिरा गांधी यांच्या नावाने जो पक्ष उभा राहिला. त्यांच्या नावाने मते मागितली जातात आणि त्यांच्याविषयी आलेल्या वक्तव्यानंतर कॉँग्रेस मंत्र्यांनी सत्तेतून बाहेर पडले पाहिजे. परंतु सत्तेच्या राजकारणात कॉँग्रेस नेते पक्षाची भूमिका विसरले, असा आरोप माजी मंत्री आणि भाजपा नेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी पत्रकार परिषदेत केला.

नाशिक : इंदिरा गांधी यांच्या नावाने जो पक्ष उभा राहिला. त्यांच्या नावाने मते मागितली जातात आणि त्यांच्याविषयी आलेल्या वक्तव्यानंतर कॉँग्रेस मंत्र्यांनी सत्तेतून बाहेर पडले पाहिजे. परंतु सत्तेच्या राजकारणात कॉँग्रेस नेते पक्षाची भूमिका विसरले, असा आरोप माजी मंत्री आणि भाजपा नेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी पत्रकार परिषदेत केला.नाशिकमध्ये विभागीय आाढावा बैठकीप्रसंगी आलेल्या विखे पाटील यांनी राज्य सरकारच्या धोरणांवरदेखील टीका केली. इंदिरा गांधी यांच्याविषयी राष्ट्रवादीचे मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी केलेल्या वक्तव्याबद्दल विखे पाटील यांना विचारले असता त्यांनी कॉँग्रेस नेत्यांच्या भूमिकेविषयी आपणाला आश्चर्य वाटते अशी प्रतिक्रिया देतानाच सत्तेच्या राजकारणात आपल्या नेत्याविषयी केलेल्या वक्तव्यावर सौम्य भूमिका घेणाऱ्या कॉँग्रेस नेत्यांवर त्यांनी टीका केली.विभागीय आढावा बैठक हा राज्यातील नव्या सरकारचा प्रयोग आहे. नव्या पक्षांबरोबरचा प्रयोग हा असाच नवीन प्रकार आहे. कृतीमध्ये आणि प्रत्यक्षात काम करणे यात फरक आहे. आगामी काळात प्रत्यक्षातील कामकाजावरून ते कळेलच, असेही विखे पाटील म्हणाले. शिवसेना आणि भाजप अजूनही एकत्र येऊ शकतील असे मुनगंटीवर म्हणाले, याविषयी विखे पाटील यांना विचारले असता त्यांनी प्रत्यक्षात मुनगंटीवारांबरोबर काय चर्चा झाली मला माहीत नाही, परंतु सेना-भाजप हे नैसर्गिक मित्र आहेत ते एकत्र येण्यात काहीच वावगे नसल्याचेही त्यांनी सांगितले.पक्षविरोधी कामकाज केल्याचा आरोप भाजपाच्या नेत्यांकडून होत असल्याबद्दल विखे पाटील यांनी आपली भूमिका मांडली. पक्षाने चौकशी समिती नियुक्तकेली आहे. समितीसमोर आपण आपली बाजू मांडली आहे. समिती आपणाला न्याय देईल, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.त्यावेळी विरोधकांचाच संशयकोरेगाव-भीमा प्रकरणाचा तपास राष्टÑीय तपास यंत्रणेकडे (एनआयए) दिल्याप्रकरणी राज्य सरकारने केंद्रावर पक्षपाती पणाचा आरोप केला आहे याविषयी विखे पाटील यांना विचारले असता त्यांनी यापूर्वी विरोधात असताना कोरेगाव-भीमा तपासाबाबत पोलिसांच्या भूमिकेवर संशय व्यक्त केला होता, आता सरकारमध्ये असताना त्यांची भूमिका कशी बदलली, असा सवाल त्यांनी उपस्थित केला.

टॅग्स :Politicsराजकारण