शहरं
Join us  
Trending Stories
1
Siraj, IND vs ENG: 'तो' एक शब्द अन् सिराजने फिरवला अख्खा सामना... टीम इंडियाच्या विजयानंतर उघड केलं गुपित
2
राज ठाकरेंच्या 'मराठी'नंतर नितीश कुमारांची 'बिहारी' घोषणा; शिक्षक भरतीत नोकरी बिहारींनाच मिळणार
3
क्रिस वोक्स स्ट्राइकवर आला असता तर...? इंग्लंडच्या लढवय्याबद्दल काय म्हणाला मॅच विनर सिराज?
4
'तिचे ओठ असे हलतात जणू मशीनगनच'; डोनाल्ड ट्रम्प कॅरोलिन लेविट यांच्याबद्दल काय बोलून गेले?
5
प्रत्यक्षात घडली Jolly LLB 2 सारखी घटना, ३० वर्षे साधूच्या वेशात लपून होता बांगलादेशमधील गुन्हेगार, अखेर…
6
१ तास सीबीआयला चकवा दिला, पैशांनी भरलेली बॅग कचराकुंडीत फेकली; नवी मुंबईत फिल्मी स्टाईल 'थरार'
7
IND vs ENG: भारताच्या विजयानंतर आशा भोसलेंची नात जनाईची मोहम्मद सिराजसाठी खास पोस्ट, म्हणाली...
8
Container Fire In Thane: पातलीपाडा उड्डाणपुलावर कंटेनरला आग, थरारक घटनेचा व्हिडीओ समोर!
9
Video - बिल भरायला नको म्हणून व्हेज बिर्याणीत टाकलं हाड, घातला गोंधळ; CCTV मुळे पोलखोल
10
"केंद्रातील मोदी सरकार व्हेंटिलेटवर…’’, सबळ कारणं देत इंडिया आघाडीच्या नेत्याचा मोठा दावा
11
IND vs ENG : सिराज-प्रसिद्ध कृष्णाचा जलवा! टीम इंडियानं रचला इतिहास; पहिल्यांदाच असं घडलं
12
मंत्रिपद जाऊनही धनंजय मुंडेंनी सरकारी बंगला का सोडला नाही? भरावा लागणार दंड
13
MSRTC Recruitment: एसटी महामंडळात नोकरीची संधी, जाणून घ्या पात्रता आणि अर्ज करण्याची पद्धत!
14
IND vs ENG 5th Test : टीम इंडियानं हातून निसटलेली मॅच जिंकून दाखवली! मालिकेत बरोबरी
15
'बिग बॉस १९'साठी 'तारक मेहता'लाच ऑफर? मेकर्सने केली विचारणा; अभिनेत्याच्या होकाराची प्रतीक्षा
16
Mangalagauri 2025: पूजा होईपर्यंत बोलायचे नाही, असा मंगळागौरीच्या पूजेचा नियम का?
17
"हे बंद करा"; परिणय फुकेंच्या विधानावर बोलताना CM फडणवीसांनी माध्यमांचे टोचले कान, काय म्हणाले?
18
मुंबई घडवण्यात हिंदी भाषिकांचं मोठं योगदान, मराठी केवळ ३० टक्के...: निशिकांत दुबेंनी पुन्हा डिवचलं
19
बाजारात जोरदार 'कमबॅक'! सेन्सेक्स-निफ्टीमध्ये मोठी वाढ, हिरो मोटर्ससह 'या' शेअर्सचा बंपर परतावा
20
एका शेअरवर १५६ रुपयांचा डिविडंड देणार ही कंपनी, रेकॉर्ड डेट १५ ऑगस्टपूर्वीच, तुमच्याकडे आहे का?

सत्तेच्या राजकारणात कॉँग्रेस नेते भूमिका विसरले : विखे पाटील

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 31, 2020 00:43 IST

इंदिरा गांधी यांच्या नावाने जो पक्ष उभा राहिला. त्यांच्या नावाने मते मागितली जातात आणि त्यांच्याविषयी आलेल्या वक्तव्यानंतर कॉँग्रेस मंत्र्यांनी सत्तेतून बाहेर पडले पाहिजे. परंतु सत्तेच्या राजकारणात कॉँग्रेस नेते पक्षाची भूमिका विसरले, असा आरोप माजी मंत्री आणि भाजपा नेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी पत्रकार परिषदेत केला.

नाशिक : इंदिरा गांधी यांच्या नावाने जो पक्ष उभा राहिला. त्यांच्या नावाने मते मागितली जातात आणि त्यांच्याविषयी आलेल्या वक्तव्यानंतर कॉँग्रेस मंत्र्यांनी सत्तेतून बाहेर पडले पाहिजे. परंतु सत्तेच्या राजकारणात कॉँग्रेस नेते पक्षाची भूमिका विसरले, असा आरोप माजी मंत्री आणि भाजपा नेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी पत्रकार परिषदेत केला.नाशिकमध्ये विभागीय आाढावा बैठकीप्रसंगी आलेल्या विखे पाटील यांनी राज्य सरकारच्या धोरणांवरदेखील टीका केली. इंदिरा गांधी यांच्याविषयी राष्ट्रवादीचे मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी केलेल्या वक्तव्याबद्दल विखे पाटील यांना विचारले असता त्यांनी कॉँग्रेस नेत्यांच्या भूमिकेविषयी आपणाला आश्चर्य वाटते अशी प्रतिक्रिया देतानाच सत्तेच्या राजकारणात आपल्या नेत्याविषयी केलेल्या वक्तव्यावर सौम्य भूमिका घेणाऱ्या कॉँग्रेस नेत्यांवर त्यांनी टीका केली.विभागीय आढावा बैठक हा राज्यातील नव्या सरकारचा प्रयोग आहे. नव्या पक्षांबरोबरचा प्रयोग हा असाच नवीन प्रकार आहे. कृतीमध्ये आणि प्रत्यक्षात काम करणे यात फरक आहे. आगामी काळात प्रत्यक्षातील कामकाजावरून ते कळेलच, असेही विखे पाटील म्हणाले. शिवसेना आणि भाजप अजूनही एकत्र येऊ शकतील असे मुनगंटीवर म्हणाले, याविषयी विखे पाटील यांना विचारले असता त्यांनी प्रत्यक्षात मुनगंटीवारांबरोबर काय चर्चा झाली मला माहीत नाही, परंतु सेना-भाजप हे नैसर्गिक मित्र आहेत ते एकत्र येण्यात काहीच वावगे नसल्याचेही त्यांनी सांगितले.पक्षविरोधी कामकाज केल्याचा आरोप भाजपाच्या नेत्यांकडून होत असल्याबद्दल विखे पाटील यांनी आपली भूमिका मांडली. पक्षाने चौकशी समिती नियुक्तकेली आहे. समितीसमोर आपण आपली बाजू मांडली आहे. समिती आपणाला न्याय देईल, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.त्यावेळी विरोधकांचाच संशयकोरेगाव-भीमा प्रकरणाचा तपास राष्टÑीय तपास यंत्रणेकडे (एनआयए) दिल्याप्रकरणी राज्य सरकारने केंद्रावर पक्षपाती पणाचा आरोप केला आहे याविषयी विखे पाटील यांना विचारले असता त्यांनी यापूर्वी विरोधात असताना कोरेगाव-भीमा तपासाबाबत पोलिसांच्या भूमिकेवर संशय व्यक्त केला होता, आता सरकारमध्ये असताना त्यांची भूमिका कशी बदलली, असा सवाल त्यांनी उपस्थित केला.

टॅग्स :Politicsराजकारण