शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! भारतात दहशतवादी हल्ल्याचा कट उधळला; गुजरातमधून ३ संशयित दहशतवाद्यांना अटक
2
भारतात राहणारे सर्वच हिंदू; मुस्लीम आणि ख्रिश्चन आपल्याच पूर्वजांचे वंशज, काय म्हणाले सरसंघचालक मोहन भागवत
3
एकनाथ शिंदे अन् उद्धव ठाकरेंना भाजपाचा मोठा धक्का; २ मोठ्या नेत्यांचा लवकरच पक्षप्रवेश होणार
4
सोनं की रिअल इस्टेट? गुंतवणुकीसाठी कोणता पर्याय ठरेल जास्त फायदेशीर? तज्ज्ञांनी दिला महत्त्वाचा सल्ला
5
जेल की रिसॉर्ट? ISIS रिक्रूटर आणि सीरियल किलरकडे मोबाईल; अधिकाऱ्यांच्या मदतीने कैद्यांची मजा
6
बांगलादेशात रस्त्यांना छावणीचं स्वरूप, मोहम्मद युनूस यांच्या घराबाहेर मोठा फौज फाटा; जाणून घ्या संपूर्ण प्रकरण
7
प्रदूषणकारी रसायनांचे उत्पादन करणारा कारखाना रत्नागिरीच्या लोटे वसाहतीत
8
हत्येनंतर शीर अन् धड वेगळे केले, सुटकेसमध्ये मृतदेह लपवून फरार; अखेर १६ वर्षांनी आरोपीला अटक
9
महाराष्ट्राच्या १५ हजार एकर महसूल जमिनीसह सीमेवरील १४ गावांवर तेलंगण राज्याचा ताबा !
10
भारताकडे 'रेअर अर्थ'चा ५वा सर्वात मोठा खजिना; तरीही आयातीसाठी चीनवर का अवलंबून? 'ही' आहे खरी अडचण
11
'मी पुन्हा येईन! १४ नोव्हेंबरला विजय निश्चित'; बिहारच्या शेवटच्या सभेतून पंतप्रधान मोदींचा ठाम दावा
12
बँका, पतपेढ्यांमधून निघणारा पैसा निवडणूक आयोगाच्या रडारवर, स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीसाठी तयारी
13
शून्य रुपयांच्या विश्वासावर ३०० कोटींचा व्यवहार, रक्कम कशी केव्हा मिळेल याचा खरेदीखतात उल्लेखच नाही; एसआयटी करणार तपास
14
"मला पुढच्या जन्मी गोविंदा पती म्हणून नकोय...", सुनीता अहुजाचं वक्तव्य चर्चेत, म्हणाली- "हा एकच जन्म..."
15
लोक प्रवाशांच्या जीवावर कोण उठले? सँडहर्स्ट रोड अपघाताची चौकशी जीआरपीकडे
16
ट्रॉलरसह आठ मच्छीमारांचे पाकिस्तानकडून अपहरण?
17
विकृत इसमाने मांजरावर केला अतिप्रसंग; मुंबईतील धक्कादायक घटना
18
आजचे राशीभविष्य,०९ नोव्हेंबर २०२५: कुटुंबीयांशी मतभेद होतील; शक्यतो नवीन कार्याची सुरुवात करु नये
19
केवळ पत्नी रडायची, म्हणून पतीला क्रूरतेसाठी दोषी ठरवू शकत नाही: उच्च न्यायालय
20
आज 'कोंडीवार'; सेंट्रल लोकलने जाणाऱ्यांनो सावधान!

सत्तेच्या राजकारणात कॉँग्रेस नेते भूमिका विसरले : विखे पाटील

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 31, 2020 00:43 IST

इंदिरा गांधी यांच्या नावाने जो पक्ष उभा राहिला. त्यांच्या नावाने मते मागितली जातात आणि त्यांच्याविषयी आलेल्या वक्तव्यानंतर कॉँग्रेस मंत्र्यांनी सत्तेतून बाहेर पडले पाहिजे. परंतु सत्तेच्या राजकारणात कॉँग्रेस नेते पक्षाची भूमिका विसरले, असा आरोप माजी मंत्री आणि भाजपा नेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी पत्रकार परिषदेत केला.

नाशिक : इंदिरा गांधी यांच्या नावाने जो पक्ष उभा राहिला. त्यांच्या नावाने मते मागितली जातात आणि त्यांच्याविषयी आलेल्या वक्तव्यानंतर कॉँग्रेस मंत्र्यांनी सत्तेतून बाहेर पडले पाहिजे. परंतु सत्तेच्या राजकारणात कॉँग्रेस नेते पक्षाची भूमिका विसरले, असा आरोप माजी मंत्री आणि भाजपा नेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी पत्रकार परिषदेत केला.नाशिकमध्ये विभागीय आाढावा बैठकीप्रसंगी आलेल्या विखे पाटील यांनी राज्य सरकारच्या धोरणांवरदेखील टीका केली. इंदिरा गांधी यांच्याविषयी राष्ट्रवादीचे मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी केलेल्या वक्तव्याबद्दल विखे पाटील यांना विचारले असता त्यांनी कॉँग्रेस नेत्यांच्या भूमिकेविषयी आपणाला आश्चर्य वाटते अशी प्रतिक्रिया देतानाच सत्तेच्या राजकारणात आपल्या नेत्याविषयी केलेल्या वक्तव्यावर सौम्य भूमिका घेणाऱ्या कॉँग्रेस नेत्यांवर त्यांनी टीका केली.विभागीय आढावा बैठक हा राज्यातील नव्या सरकारचा प्रयोग आहे. नव्या पक्षांबरोबरचा प्रयोग हा असाच नवीन प्रकार आहे. कृतीमध्ये आणि प्रत्यक्षात काम करणे यात फरक आहे. आगामी काळात प्रत्यक्षातील कामकाजावरून ते कळेलच, असेही विखे पाटील म्हणाले. शिवसेना आणि भाजप अजूनही एकत्र येऊ शकतील असे मुनगंटीवर म्हणाले, याविषयी विखे पाटील यांना विचारले असता त्यांनी प्रत्यक्षात मुनगंटीवारांबरोबर काय चर्चा झाली मला माहीत नाही, परंतु सेना-भाजप हे नैसर्गिक मित्र आहेत ते एकत्र येण्यात काहीच वावगे नसल्याचेही त्यांनी सांगितले.पक्षविरोधी कामकाज केल्याचा आरोप भाजपाच्या नेत्यांकडून होत असल्याबद्दल विखे पाटील यांनी आपली भूमिका मांडली. पक्षाने चौकशी समिती नियुक्तकेली आहे. समितीसमोर आपण आपली बाजू मांडली आहे. समिती आपणाला न्याय देईल, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.त्यावेळी विरोधकांचाच संशयकोरेगाव-भीमा प्रकरणाचा तपास राष्टÑीय तपास यंत्रणेकडे (एनआयए) दिल्याप्रकरणी राज्य सरकारने केंद्रावर पक्षपाती पणाचा आरोप केला आहे याविषयी विखे पाटील यांना विचारले असता त्यांनी यापूर्वी विरोधात असताना कोरेगाव-भीमा तपासाबाबत पोलिसांच्या भूमिकेवर संशय व्यक्त केला होता, आता सरकारमध्ये असताना त्यांची भूमिका कशी बदलली, असा सवाल त्यांनी उपस्थित केला.

टॅग्स :Politicsराजकारण