शहरं
Join us  
Trending Stories
1
"आमचं हिंदुत्व अस्सल, फक्त मतांसाठी भगवी शाल घालणारे आम्ही नाहीत"; मुख्यमंत्र्यांचे राज ठाकरेंना सडेतोड उत्तर
2
'या' वाक्यापासून आम्ही एकत्र येण्याची सुरुवात झाली; राज ठाकरेंनी सांगितली 'मनोमिलना'ची कथा
3
“१०० टक्के माझ्या वॉर्डातून लढणार, ठाकरे बंधू १३० पेक्षा जास्त जागा जिंकणार”: किशोरी पेडणेकर
4
Shiv Sena UBT MNS Alliance: सध्या मुंबईपुरती उद्धवसेना-मनसे युतीची घोषणा, जागावाटपावर सस्पेन्स; इतर महापालिकांचे काय?
5
बापरे! करोडपती सरकारी अधिकारी, ६२ कोटींची मालमत्ता, आलिशान फ्लॅट्स अन् रोख रक्कम; तेलंगणा उपपरिवहन आयुक्तांच्या साम्राज्याचे गुपिते उघड
6
"तेव्हा बडव्यांनी घेरलं होतं, मग आता हातमिळवणी कशी?" शेलारांचा राज ठाकरेंना रोखठोक सवाल!
7
Travel : कुठे आहे सांता क्लॉजचे खरेखुरे गाव, जिथे रोजच साजरा होतो ख्रिसमस? तुम्हीही जाऊ शकता फिरायला!
8
३१ डिसेंबरला उघडणार या वर्षाचा अखेरचा आयपीओ; प्राईज बँड ₹९०, पाहा GMP सह अनेक डिटेल्स
9
ठाकरे बंधूंची युती घोषित; पाहा, राज-उद्धव यांच्या ऐतिहासिक पत्रकार परिषदेतील १० ठळक मुद्दे
10
Tata Nexon EV खरेदी करायची आहे? किती करावं लागेल डाऊनपेमेंट, पाहा EMI चं संपूर्ण गणित
11
'धुरंधर'नंतर 'दृश्यम ३'मध्ये दिसणार होता अक्षय खन्ना, पण अचानक सोडला सिनेमा? कारण...
12
“मुंबईचे लचके तोडले जातायत, गुजरातच्या दावणीला मुंबईला बांधले जातेय”: विजय वडेट्टीवार
13
Vijay Hazare Trophy : हिटमॅनचा हिट शो जारी! मुंबईच्या संघाकडून खेळण्यासाठी मैदानात उतरला अन्...
14
BMC Election: "ते रंग बदलणाऱ्या सरड्यासारखे..." ठाकरे बंधूंच्या युतीच्या घोषणेनंतर बावनकुळेंचा प्रहार!
15
काँग्रेस-उद्धवसेनेचे फाटले! उद्धव ठाकरेंनी 'मविआ'च्या शक्यतांना दिला पूर्ण विराम, पवारांच्या राष्ट्रवादीबद्दल काय बोलले?
16
Video: जम्मू-कश्मीरच्या अनंतनागमध्ये बिबट्याचा धुमाकूळ; CRPF कॅम्पमध्ये घुसून जवानावर हल्ला
17
ढासू परतावा...! : या SME स्टॉकनं ३ महिन्यांत दिला 225% हून अधिक परतावा, लोकांना केलं मालामाल; केडियालांकडे तब्बल 393100 शेअर
18
बंडखोरीच्या भीतीनं पक्षांची गुपित रणनीती, जागावाटपाचा तिढा सुटेना; भाजपात इच्छुकांची गर्दी
19
आता जर चुकाल तर संपाल, मराठी माणसांना आवाहन; उद्धवसेना-मनसे युतीची अधिकृत घोषणा
20
४ दिवसांपासून बुलेट ट्रेनच्या स्पीडनं पळतोय 'हा' शेअर; सरकारच्या घोषणेचा परिणाम, तुमच्याकडे आहे का?
Daily Top 2Weekly Top 5

वर्चस्व काँग्रेसचे; समीकरणे वेगळीच

By admin | Updated: January 28, 2017 00:54 IST

ठाणापाडा गण : तिकीट वाटपाकडे लक्ष

 वसंत तिवडे  त्र्यंबकेश्वरत्र्यंबकेश्वर पंचायत समितीवर आतापर्यंत कॉँग्रेसचे वर्चस्व असले तरी गट आणि गणातील राजकीय समीकरणे वेगळीच असल्याचे चित्र सातत्याने दिसून आले आहे. त्यामुळे यंदाच्या वर्षी तिकीट कोणाला मिळते अन् कोणाचे तिकीट कापले जाते, याकडे तालुक्याचे लक्ष लागून राहिले आहे.ठाणापाडा गण अगदी गुजरात सीमेवर असून, त्र्यंबकेश्वर तालुक्याचे शेवटचे टोक म्हणजे गुजरातला सुजलाम् सुफलाम् करणारी दमणगंगा नदी याच गावातून वाहते. दमणगंगेची वाळू या भागातून नेतात. या भागाला डोंगर, दऱ्यांचे सौंदर्य लाभले आहे. अशा या गणाने सन २००२ मध्ये (पूर्वीचा खरशेत गण) जिल्हा परिषदेमध्ये समाजकल्याण सभापतिपद भूषविलेले राष्ट्रवादीचे पुंडलिक साबळे, तर मोतीराम पागी हे पूर्वीच्या खरशेत गणातून निवडलेले गणातील उमेदवार उपसभापती होते. सन २००७ मध्ये ठाणापाडा गट-गणावर माकपने वर्चस्व मिळवून अवघ्या दोन सदस्यांवर सभापतिपद राखले होते. त्यावेळेस काँग्रेस व राष्ट्रवादी यांचे बहुमत असूनही ते काहीच करू शकले नाही. अंजना राऊत या ठाणापाडा गणातून, तर रमेश बरफ हे मूळवड गणातून माकपच्या तिकिटावर निवडून आले होते. यावेळेस दोघांनाही सभापतिपदाची संधी मिळाली होती. ठाणापाडा गणात कागदपत्रे पाहता अनेक कामे ‘कागदावर’ झालेली दिसून येतात.सन २०१२मध्ये काँग्रेसने हा गट जिंकला. ठाणापाडा गट ओबीसी (महिला) राखीव होता. या गटातून याच भागात सेवा झालेले वन विभागातचे पुंडलिक गिते यांच्या पत्नी निर्मला गिते यांना काँग्रेसतर्फे उमेदवारी मिळून त्या गटातून निवडून आल्या, तर मूळवड गणातून योगीता मौले व ठाणापाडा गणातून मंगळू निंबारे हे काँग्रेसचे उमेदवार निवडून आले. विशेष म्हणजे तीन पंचवार्षिकमध्ये प्रथम सभापतिपदाचा मान फक्त महिलांना मिळालेला आहे. त्र्यंबक तालुका अनुसूचित क्षेत्रातील असून, या जमातीची लोकसंख्या सर्वाधिक आहे. या गणात गेल्या तीन पंचवार्षिकमध्ये तीन वेगवेगळ्या पक्षांचे वर्चस्व राहिले असून, पूर्वी हा गण मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचा बालेकिल्ला होता. तथापि, नंतरच्या काळात पक्षाने अनेकवेळा शासकीय योजना आमच्यापर्यंत पोहचत नाहीत, आधार कार्ड, रेशन कार्ड (पिवळे) वनहक्क जमिनी नावावर होणे आदि प्रश्नांवर आंदोलने केली. मागील वर्षी केलेले आंदोलन चिघळून दंगल उसळली होती. मात्र तीन पंचवार्षिकपैकी फक्त २००७ च्या निवडणुकीत ठाणापाडा गटावर १ गट व २ गणावर वर्चस्व मिळविल्या खेरीज माकपला मतदारांनी नाकारले होते. यावेळेस काय चित्र असेल ते लवकरच समजेल.