शहरं
Join us  
Trending Stories
1
DC vs RCB : भर मैदानात कोहली-केएल राहुल यांच्यात वाजलं? नेमकं काय घडलं? (VIDEO)
2
पाकिस्तानी नागरिकांनी दिलेल्या वेळेत भारत सोडला नाही तर बसणार मोठा दणका, काय होणार शिक्षा?
3
"देशाच्या सुरक्षेसाठी शिवसैनिक जवानांसारखा लढेल, ही लढाई..."; DCM एकनाथ शिंदे यांचे वक्तव्य
4
भुवीनं साधला मोठा डाव! IPL च्या इतिहासात सर्वाधिक विकेट्स घेणारा ठरला दुसरा गोलंदाज
5
पाकिस्तानात मोठी कारवाई! खैबर पख्तूनख्वा प्रांतात घुसखोरी करणारे ५४ TTP समर्थक ठार
6
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित एक ओव्हर नाही टिकला; पण दोन चेंडूत विराटची बरोबरी करून परतला
7
मध्य प्रदेशात भीषण अपघात; भरधाव कार विहिरीत कोसळली, 12 जणांचा मृत्यू
8
"शरद पवारांनी जाणीवपूर्वक 'ते' वक्तव्य केले"; पहलगामबाबतच्या 'त्या' विधानावरुन भुजबळांचे स्पष्टीकरण
9
पाकिस्तानात भीतीचे वातावरण; लष्कर प्रमुखानंतर बिलावल भुट्टोचे कुटुंबीय देश सोडून पळाले
10
जसप्रीत बुमराहची रेकॉर्ड ब्रेक स्पेल; मुंबई इंडियन्सकडून 'अशी' कामगिरी करणारा पहिलाच!
11
सीमेवर तणाव वाढताच पाकिस्तानने चीनकडे मागितले १.४ बिलियन डॉलर
12
"लाडक्या बहि‍णी १५०० मध्ये खूष, २१०० रुपये देऊ असं कुणीच म्हटलं नाही"; नरहरी झिरवाळांचे विधान
13
MI vs LSG : बॅटिंग-बॉलिंग सगळ्यात भारी! पुन्हा दिसतोय MI चा चॅम्पियनवाला तोरा
14
IPL 2025: गगनचुंबी षटकार तोही बुमराहला; बिश्नोईचा आनंद गगनात मावेना! पंतची रिॲक्शनही व्हायरल (VIDEO)
15
Suryakumar Yadav : ...अन् सूर्या भाऊ ठरला IPL मध्ये सर्वात कमी चेंडूत ४००० धावा करणारा भारतीय
16
व्हाईट बॉल क्रिकेटमध्ये स्मृती मानधनाची ऐतिहासिक कामगिरी, मेग लॅनिंगचाही विक्रम मोडला!
17
"पहलगाममधील मृतांच्या कुटुंबीयांना नागरी शौर्य पुरस्कार द्या"; सुप्रिया सुळेंचे CM फडणवीसांना पत्र
18
सूर्यकुमार अन् रायनचा झंझावात, नमन धिरनेही चोपले; लखनौसमोर 216 धावांचे आव्हान...
19
दहशतवादी हल्ल्यानंतर अतुल कुलकर्णी पोहोचले काश्मीरला, म्हणाले- "इथे सध्या सुरक्षित असून..."
20
"हिंमत असेल बोलून दाखवा की भारतीय सैन्यात..."; शहीद सैनिकाला निरोप देताना भावाचे अंगावर काटा आणणारे भाषण

भाजपाशी मुकाबला कॉँग्रेसच करू शकते

By admin | Updated: May 21, 2017 00:46 IST

अशोक चव्हाण : मालेगावी प्रचार सभा

लोकमत न्यूज नेटवर्कमालेगाव : राज्यात सत्तेवर असलेल्या भाजपचा केवळ काँग्रेसच मुकाबला करू शकते. इतर पक्ष करू शकत नाहीत, असे प्रतिपादन काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष, माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी केले.येथील अमन चौकात मनपा निवडणुकीतील काँग्रेस उमेदवारांच्या प्रचारसभेत चव्हाण बोलत होते. अध्यक्षस्थानी काँग्रेस शहराध्यक्ष माजी आमदार शेख रशीद होते.व्यासपीठावर आमदार आसीफ शेख, डॉ. शोभा बच्छाव, हेमलता पाटील, डॉ. तुषार शेवाळे, लकी हसन, शरद आहेर, डॉ. राजेंद्र ठाकरे, साबीर गोहर, गाझी अमानुल्ला आदि उपस्थित होते.अशोक चव्हाण म्हणाले, शहराने काँग्रेसला मजबुतीने साथ दिली ही खूप मोठी निवडणूक आहे असे मी मानत नाही; परंतु एक आदर्श निर्माण करण्याची संधी आहे. सर्वात जास्त पेट्रोल महाराष्ट्रात महाग आहे, असे सांगून चव्हाण म्हणाले, दुष्काळात शेतकऱ्यांना काय मिळाले? शेतकऱ्यांच्या आत्महत्या वाढत राहिल्या.हे सरकार नसून सावकार आहे. गरीबांना लुटण्याचे काम या सरकारने केले आहे. आज यंत्रमाग व्यवसायाची स्थिती अत्यंत खराब झाली आहे की कापड बाहेरून येत आहे. संसदेत हा प्रश्न आम्ही उपस्थित केला. युपीए सरकारने यंत्रमाग व्यवसायास नेहमी मदत करण्याची भूमिका घेतली आहे. यंत्रमाग व्यवसायाची अवस्था बिकट असून यंत्रमाग व्यवसाय धोक्यात आला आहे. देशाची इतकी बिकट अवस्था आम्ही पाहिली नव्हती.महाराष्ट्रात एमआयएम म्हणजे बीजेपीची ‘बी’ पार्टी आहे. भाजपला फायदा करण्यासाठी एमआयएम महाराष्ट्रात आला असून लोकांनी त्यापासून सावध रहावे. भाजपच्या लढाईसाठी आम्ही तुमच्या बरोबर आहोत. मी मुख्यमंत्री असताना मालेगावकरांनी जे मागितले ते आम्ही दिले. मेहनत करणारे नेते येथे आहेत. त्यामुळे तुम्हाला इतरांकडे जाण्याची आवश्यकता काय? असे त्यांनी शेवटी सांगितले. उद्या रविवारी टेन्शन चौकात काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांची प्रचारसभा होणार आहे.भाजपाचा लोकांशी संवादच राहिला नाहीच्भाजप आता ‘संवादयात्रा’ काढणार आहे. कारण त्यांचा लोकांशी संवादच राहिलेला नाही. जनता सरकारला खाली बसविण्याचे काम करेल. त्याची सुरूवात मालेगावातून होईल. जो शेतकऱ्याला ‘साला’ म्हणतो तो रावसाहेब दानवे शेतकऱ्यांशी ‘संवाद’ साधणार असल्याचे चव्हाण यांनी सांगितले.