शहरं
Join us  
Trending Stories
1
RSS सरसंघचालक मोहन भागवत यांची पंतप्रधान मोदींशी महत्त्वाची भेट; सुमारे दीड तास चर्चा - रिपोर्ट्स
2
IPL 2025 DC vs KKR : सुनील नरेन मॅजिक! ७ चेंडूत फिरवली मॅच; फाफची फिफ्टी ठरली व्यर्थ
3
धक्कादायक! वडिलांनी आठ वर्षांच्या मुलाचा गळा आवळून खून केला, मृतदेह पोत्यात भरला अन्...
4
VIDEO: रत्नागिरीजवळ रनपार खाडीत मासेमारी पाहण्यासाठी गेलेल्या १६ जणांना वाचविण्यात यश
5
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
6
गंभीर गुन्हा होण्यापूर्वीच पोलिसांनी डाव हाणून पाडला; परभणीत घरझडतीत घातक शस्त्र जप्त
7
IPL 2025 : 'चमत्कारी' चमीरा! 'सुपरमॅन' होऊन सीमारेषेवर टिपला IPL मधील एक सर्वोत्तम कॅच (VIDEO)
8
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
9
लातूरच्या लेकींचा आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत बोलबाला! ज्योती पवारमुळे भारताला उपविजेतेपद
10
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
11
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
12
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
13
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
14
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
15
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
16
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
17
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
18
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
19
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा
20
जळगावात मालवाहू वाहनाची दुचाकीला धडक; बाप-लेक जागीच ठार; माय- लेक गंभीर जखमी!

गंगापूरमधून पाणी देण्याबाबत संभ्रम

By admin | Updated: December 2, 2015 22:46 IST

प्रशासन अनभिज्ञ : पाटबंधारे खात्याकडून मागविली माहिती

 नाशिक : गंगापूर व दारणा या धरणांतून जायकवाडीसाठी पाणी सोडल्यानंतर निर्माण झालेला जनक्षोभ रोखण्यासाठी गंगापूर धरणाच्या डाव्या तट कालव्यातून नाशिक व निफाडच्या द्राक्षबागांसाठी तीन आवर्तने सोडण्याच्या पालकमंत्री तथा जलसंपदामंत्र्यांनी केलेल्या घोषणेबाबत खुद्द प्रशासनातच संभ्रम व्यक्त केला जात आहे. धरणातील पाण्यावर असलेले आरक्षण व प्रत्यक्ष साठा याचा कोणताही ताळमेळ बसत नसताना सिंचनासाठी तीन आवर्तने कसे सोडणार, अशी विचारणा प्रशासनाने पाटबंधारे खात्याकडे केली आहे. २१ नोव्हेंबर रोजी झालेल्या जिल्ह्यातील पाणी आरक्षण बैठकीवर शेतकऱ्यांनी हल्लाबोल करून पालकमंत्री तथा जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांना धारेवर धरल्यानंतर पाणी आरक्षणाचे फेरविचार करण्याचे ठरविण्यात आले व त्यानंतर दोन दिवसांनी मुंबईत झालेल्या बैठकीत गिरीश महाजन यांनी गंगापूर धरण समूहातून डाव्या तट कालव्यातून तीन आवर्तने द्राक्षबागांसाठी सोडण्याचे जाहीर केले, त्याच्या मोबदल्यात नाशिककरांसाठी दारणा धरणातून ५०० दशलक्ष घनफूट पाणी आरक्षित ठेवण्याचे आदेश पाटबंधारे खात्याला दिले होते. प्रत्यक्षात गंगापूर धरण समूहात ४१४१ दशलक्ष घनफूट पाणी शिल्लक असून, महापालिका, एकलहरे, औद्योगिक वसाहत, मेरीसह पाणीपुरवठा योजनांसाठी ४९४६ दशलक्ष घनफूट पाण्याची मागणी आहे. म्हणजेच शिल्लक पाण्यापेक्षा मागणीच अधिक असून, त्यात पाटबंधारे खात्याने कपात सुचविलेली आहे. त्याचाच परिणाम म्हणून नाशिक महापालिकेला मागणीपेक्षाही कमी पाणी देण्यात आल्याने पाणीपुरवठ्यात कपात करावी लागली आहे. त्यामुळे पालकमंत्र्यांच्या द्राक्षबागांसाठी तीन आवर्तने सोडण्याच्या घोषणेची पूर्तता कशी होणार, असा प्रश्न प्रशासनातील अधिकारी विचारू लागले आहेत. विशेष म्हणजे पालकमंत्र्यांनी केलेल्या घोषणेला दोन आठवडे उलटून गेले असून, मुंबईत लोकप्रतिनिधींच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत घेण्यात आलेल्या निर्णयाची कोणतीही माहिती जिल्हा प्रशासनाला प्राप्त झालेली नाही. त्यामुळे अखेर पाटबंधारे खात्यालाच प्रशासनाने पत्र पाठवून धरणातील पाण्याची परिस्थिती व सिंचनासाठी सोडण्यात येणाऱ्या पाण्याबाबतची माहिती सादर करण्याची सूचना केली आहे. (प्रतिनिधी)