शहरं
Join us  
Trending Stories
1
यावेळी बिहारमध्ये चार-चार दिवाळी उत्सव, किती जागा जिंकणार NDA? अमित शाह यांनी सेट केलं टार्गेट; राहुल-तेजस्वी यांच्यावरही बरसले
2
“भाजपाला प्रशासन चालवता येत नाही, CM सहायता फंडाबाबत फडणवीसांनी बोलू नये”; ठाकरेंचा पलटवार
3
महाराष्ट्रावर प्रचंड मोठे संकट असताना पंतप्रधान का फिरकले नाहीत? काँग्रेसचा सवाल
4
“पूरग्रस्तांचे संसार पुन्हा उभे करण्यासाठी सर्वस्व पणाला लावू”; अजित पवारांचा VCद्वारे संवाद
5
नवरात्रात सोनं खरेदी करणं झालं अवघड! सर्वकालीन उच्चांकी पातळीच्या अगदी जवळ जाऊन पोहोचलं; चेक करा 'लेटेस्ट रेट'
6
Dombivli Video: हात सोडला अन् ११व्या मजल्यावरून तरुण कोसळला; डोंबिवलीतील घटनेचा व्हिडीओ
7
दुहेरी हत्येच्या प्रयत्नाने दिल्ली हादरली, पतीने पत्नी आणि मुलावर झाडल्या गोळ्या 
8
'सोनम वांगचुकच्या संपर्कात पाकिस्तानी नागरिक, बांगलादेशातही गेले'; पोलिसांचा धक्कादायक खुलासा
9
संविधान रक्षणासाठी काँग्रेस काढणार दीक्षाभूमी ते सेवाग्राम ‘संविधान सत्याग्रह पदयात्रा’
10
"आम्ही जगायचं की नाही, मुख्यमंत्र्यांनी सांगावं"; लक्ष्मण हाकेंचा संतप्त सवाल, हल्ल्याचा सगळा घटनाक्रम सांगितला
11
सुंदर वहिनीला नणंदेने पळवून नेले, घरदार सोडून दोघे झाले गायब, असं फुटलं बिंग   
12
लिव्हिंग रुम, किचन अन् बेडरुम! 'महाराष्ट्राची हास्यजत्रा'मधील 'सावत्या'ने खूपच सुंदर सजवलंय मुंबईतील आलिशान घर
13
Laxman Hake: दहा-बारा पोलीस असताना लक्ष्मण हाकेंची गाडी फोडली; बांबूने हल्ला, काय घडलं?
14
“PM केअर फंडात महाराष्ट्राचाही पैसा, ५० हजार कोटींची मदत जाहीर करावी”; उद्धव ठाकरेंची मागणी
15
“संकट आले तेव्हा आम्ही पंचांग काढून बसलो नाही, सरकारने सरसकट कर्जमाफी द्यावी”: उद्धव ठाकरे
16
'आज आपण संघाची सुरुवात करत आहोत', ना कुठली घोषणा, ना कुठले अतिथी; शंभर वर्षांअगोदर अशी झाली संघाची सुरवात
17
३० फेब्रुवारीला काढलं बिल, सिमेंटच्या दुकानातून कॉस्मेटिक्सची खरेदी, सरकारी भ्रष्टाचाराची हद्द  
18
३० टक्क्यांनी घसरलाय हा मल्टीबॅगर स्टॉक, अजून घसरण होणार का? काय म्हणताहेत एक्सपर्ट
19
Himanshi Tokas : लय भारी! हिमांशी टोकस ठरली जगातील नंबर १ ज्युडो खेळाडू; आजीच्या झाडूने बनवलं चॅम्पियन
20
बरेली हिंसाचार प्रकरण; मौलाना तौकीर रजाला अटक, 14 दिवसांची पोलीस कोठडी, 10 FIR दाखल

गंगापूरमधून पाणी देण्याबाबत संभ्रम

By admin | Updated: December 2, 2015 22:46 IST

प्रशासन अनभिज्ञ : पाटबंधारे खात्याकडून मागविली माहिती

 नाशिक : गंगापूर व दारणा या धरणांतून जायकवाडीसाठी पाणी सोडल्यानंतर निर्माण झालेला जनक्षोभ रोखण्यासाठी गंगापूर धरणाच्या डाव्या तट कालव्यातून नाशिक व निफाडच्या द्राक्षबागांसाठी तीन आवर्तने सोडण्याच्या पालकमंत्री तथा जलसंपदामंत्र्यांनी केलेल्या घोषणेबाबत खुद्द प्रशासनातच संभ्रम व्यक्त केला जात आहे. धरणातील पाण्यावर असलेले आरक्षण व प्रत्यक्ष साठा याचा कोणताही ताळमेळ बसत नसताना सिंचनासाठी तीन आवर्तने कसे सोडणार, अशी विचारणा प्रशासनाने पाटबंधारे खात्याकडे केली आहे. २१ नोव्हेंबर रोजी झालेल्या जिल्ह्यातील पाणी आरक्षण बैठकीवर शेतकऱ्यांनी हल्लाबोल करून पालकमंत्री तथा जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांना धारेवर धरल्यानंतर पाणी आरक्षणाचे फेरविचार करण्याचे ठरविण्यात आले व त्यानंतर दोन दिवसांनी मुंबईत झालेल्या बैठकीत गिरीश महाजन यांनी गंगापूर धरण समूहातून डाव्या तट कालव्यातून तीन आवर्तने द्राक्षबागांसाठी सोडण्याचे जाहीर केले, त्याच्या मोबदल्यात नाशिककरांसाठी दारणा धरणातून ५०० दशलक्ष घनफूट पाणी आरक्षित ठेवण्याचे आदेश पाटबंधारे खात्याला दिले होते. प्रत्यक्षात गंगापूर धरण समूहात ४१४१ दशलक्ष घनफूट पाणी शिल्लक असून, महापालिका, एकलहरे, औद्योगिक वसाहत, मेरीसह पाणीपुरवठा योजनांसाठी ४९४६ दशलक्ष घनफूट पाण्याची मागणी आहे. म्हणजेच शिल्लक पाण्यापेक्षा मागणीच अधिक असून, त्यात पाटबंधारे खात्याने कपात सुचविलेली आहे. त्याचाच परिणाम म्हणून नाशिक महापालिकेला मागणीपेक्षाही कमी पाणी देण्यात आल्याने पाणीपुरवठ्यात कपात करावी लागली आहे. त्यामुळे पालकमंत्र्यांच्या द्राक्षबागांसाठी तीन आवर्तने सोडण्याच्या घोषणेची पूर्तता कशी होणार, असा प्रश्न प्रशासनातील अधिकारी विचारू लागले आहेत. विशेष म्हणजे पालकमंत्र्यांनी केलेल्या घोषणेला दोन आठवडे उलटून गेले असून, मुंबईत लोकप्रतिनिधींच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत घेण्यात आलेल्या निर्णयाची कोणतीही माहिती जिल्हा प्रशासनाला प्राप्त झालेली नाही. त्यामुळे अखेर पाटबंधारे खात्यालाच प्रशासनाने पत्र पाठवून धरणातील पाण्याची परिस्थिती व सिंचनासाठी सोडण्यात येणाऱ्या पाण्याबाबतची माहिती सादर करण्याची सूचना केली आहे. (प्रतिनिधी)