शहरं
Join us  
Trending Stories
1
“राज ठाकरे यांना जवळ करणे राजकीय सोय, ठाकरे गटाचे ७५ नगरसेवक शिंदेंकडे गेले”: चंद्रकांत पाटील
2
पाऊस थांबला! लगेच आकाश दीपचा 'हमला'! बॅक टू बॅक ओव्हरमध्ये दोन विकेट्स अन् इंग्लंडचा अर्धा संघ तंबूत (VIDEO)
3
मतदारयाद्यांतील गैरप्रकार रोखण्यास काँग्रेसची समिती; अध्यक्ष पृथ्वीराज चव्हाण अहवाल देणार
4
अंत्यसंस्कारासाठी मृतदेह घेऊन निघाले अन् घरी जिवंत सापडली 'ती' व्यक्ती; जळगावातील प्रकार
5
“जीवनात ही घडी अशीच राहू दे”; फोटो शेअर करत बाळा नांदगावकरांची पांडुरंगाकडे प्रार्थना
6
मनातलं सगळंच सांगितलं; प्रताप सरनाईकांचं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना ३ पानी खुलं पत्र
7
बर्मिंगहॅमच्या मैदानात पावसाची बॅटिंग! इंग्लंडच्या ७ विकेट्स घेण्यासाठी टीम इंडियाला किती षटके मिळणार?
8
“एकाचं भाषण अपूर्ण अन् दुसऱ्याचं अप्रासंगिक, तर पूर्ण कार्यक्रम अवास्तव”; भाजपाची टीका
9
१६ वर्षे अत्याचार झालेल्या मुलींच्या मृतदेहाची लावत होता विल्हेवाट; एका घटनेमुळे केला खुलासा
10
आधी कॅब चालकांची करायचे हत्या, दऱ्यांमध्ये फेकायचे मृतदेह; सीरियल किलरला अखेर अटक
11
शेतकऱ्यांसाठी खुशखबर! पीएम किसानचा २०वा हप्ता 'या' दिवशी खात्यात येणार? आत्ताच यादी तपासा!
12
राज्यात सुरू असलेल्या भाषा वादावर बाबा रामदेव यांची पहिली प्रतिक्रिया, स्पष्टच बोलले; दिला असा सल्ला
13
सोलापूर : 'तुझ्यामुळेच माझी बायको...'; सावत्र दिराने भावजयीच्या मानेवर कुऱ्हाडीने केला वार, जागेवरच गेला जीव
14
“विठ्ठला...! सरकारला कर्जमाफी देण्याची सद्बुद्धी दे...”; आषाढी एकादशीला बच्चू कडूंची पोस्ट
15
ऐकवं ते नवलंच! पोलिसात भरती झाला, पण १२ वर्षे ड्युटीवरच गेला नाही; तरीही मिळाली ₹२८ लाख पगार
16
हाफिज सईद आणि मसूद अजहर भारताकडे सोपवू, पण...; बिलावल भुट्टो यांची 'ती' मागणी काय?
17
ENG vs IND : इंग्लंड टेस्ट मॅच ड्रॉ करण्यासाठी खेळणार? कोच म्हणाला, आम्ही एवढेही मूर्ख नाही की,...
18
'देशात गरीब वाढत चाललेत आणि काही श्रीमंताच्या हातात संपत्ती चाललीये'; नितीन गडकरींनी व्यक्त केली चिंता
19
"२० कोटी दिले तरी ...", बिग बॉस १९ मध्ये सहभागी होण्याच्या चर्चांवर राम कपूरने सोडलं मौन
20
ज्या घटनेमुळे बापाने केली हत्या, त्यात आईचा होता सहभाग; कोल्हापुरातील प्रकरणात काय आले समोर?

गंगापूरमधून पाणी देण्याबाबत संभ्रम

By admin | Updated: December 2, 2015 22:46 IST

प्रशासन अनभिज्ञ : पाटबंधारे खात्याकडून मागविली माहिती

 नाशिक : गंगापूर व दारणा या धरणांतून जायकवाडीसाठी पाणी सोडल्यानंतर निर्माण झालेला जनक्षोभ रोखण्यासाठी गंगापूर धरणाच्या डाव्या तट कालव्यातून नाशिक व निफाडच्या द्राक्षबागांसाठी तीन आवर्तने सोडण्याच्या पालकमंत्री तथा जलसंपदामंत्र्यांनी केलेल्या घोषणेबाबत खुद्द प्रशासनातच संभ्रम व्यक्त केला जात आहे. धरणातील पाण्यावर असलेले आरक्षण व प्रत्यक्ष साठा याचा कोणताही ताळमेळ बसत नसताना सिंचनासाठी तीन आवर्तने कसे सोडणार, अशी विचारणा प्रशासनाने पाटबंधारे खात्याकडे केली आहे. २१ नोव्हेंबर रोजी झालेल्या जिल्ह्यातील पाणी आरक्षण बैठकीवर शेतकऱ्यांनी हल्लाबोल करून पालकमंत्री तथा जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांना धारेवर धरल्यानंतर पाणी आरक्षणाचे फेरविचार करण्याचे ठरविण्यात आले व त्यानंतर दोन दिवसांनी मुंबईत झालेल्या बैठकीत गिरीश महाजन यांनी गंगापूर धरण समूहातून डाव्या तट कालव्यातून तीन आवर्तने द्राक्षबागांसाठी सोडण्याचे जाहीर केले, त्याच्या मोबदल्यात नाशिककरांसाठी दारणा धरणातून ५०० दशलक्ष घनफूट पाणी आरक्षित ठेवण्याचे आदेश पाटबंधारे खात्याला दिले होते. प्रत्यक्षात गंगापूर धरण समूहात ४१४१ दशलक्ष घनफूट पाणी शिल्लक असून, महापालिका, एकलहरे, औद्योगिक वसाहत, मेरीसह पाणीपुरवठा योजनांसाठी ४९४६ दशलक्ष घनफूट पाण्याची मागणी आहे. म्हणजेच शिल्लक पाण्यापेक्षा मागणीच अधिक असून, त्यात पाटबंधारे खात्याने कपात सुचविलेली आहे. त्याचाच परिणाम म्हणून नाशिक महापालिकेला मागणीपेक्षाही कमी पाणी देण्यात आल्याने पाणीपुरवठ्यात कपात करावी लागली आहे. त्यामुळे पालकमंत्र्यांच्या द्राक्षबागांसाठी तीन आवर्तने सोडण्याच्या घोषणेची पूर्तता कशी होणार, असा प्रश्न प्रशासनातील अधिकारी विचारू लागले आहेत. विशेष म्हणजे पालकमंत्र्यांनी केलेल्या घोषणेला दोन आठवडे उलटून गेले असून, मुंबईत लोकप्रतिनिधींच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत घेण्यात आलेल्या निर्णयाची कोणतीही माहिती जिल्हा प्रशासनाला प्राप्त झालेली नाही. त्यामुळे अखेर पाटबंधारे खात्यालाच प्रशासनाने पत्र पाठवून धरणातील पाण्याची परिस्थिती व सिंचनासाठी सोडण्यात येणाऱ्या पाण्याबाबतची माहिती सादर करण्याची सूचना केली आहे. (प्रतिनिधी)