शहरं
Join us  
Trending Stories
1
औषधी बनवणाऱ्या कंपनीत स्फोट! 10 कामगार ठार, स्फोट झाला तेव्हा १५० लोक करत होते काम
2
धक्कादायक! चहाच्या टपरीमागे नेत अल्पवयीन मुलीवर अत्याचाराचा प्रयत्न; गळ्याला चाकू लावला अन्...
3
भाजपच्या फायरब्रँड नेत्याने सोडला पक्ष; टी राजा सिंह यांचा राजीनामा, नाराजीचे कारण समोर
4
“सरकारचे आर्थिक संतुलन ढासळले, गरीब समाजावर अन्याय”; पुरवणी मागण्यांवरुन जयंत पाटलांची टीका
5
पाकिस्तानविरुद्ध भारताच्या 'ऑपरेशन सिंदूर'ने राफेलची क्रेझ वाढवली; आता 'हा' देशही राफेल खरेदी करणार!
6
बाजार गडगडला! 'या' दिग्गज शेअर्सचे सर्वाधिक नुकसान; तज्ज्ञ म्हणतात अजूनही संधी फक्त..
7
Food Recipe: प्यायला चविष्ट, करायला सोपं आणि पचायला हलकं, मुगाचं पौष्टिक कढण! 
8
'अटी लागू होतील...', भारत-अमेरिका व्यापार करारावर केंद्र सरकारची पहिली प्रतिक्रिया
9
बँक बॅलन्स झिरो असला तरी मिळेल 2 लाखांचा विमा, १० हजारांचं कर्ज; 'या' सरकारी योजनेत करा अर्ज
10
चीननं ठेंगा दाखवला तर एकत्र आले भारत आणि जपान, मुकेश अंबानीही संधीचं सोनं करण्याच्या तयारीत
11
STने प्रवास करणाऱ्यांसाठी गुड न्यूज! आगाऊ आरक्षणात मिळणार १५ टक्के सवलत, कधीपासून सुरू?
12
‘ऐसा ठाव नाही कोठे, देव उभा उभी भेटे'; धर्मपुरीत दिसला भक्तीचा सोहळा
13
'हा तर मुल्ला मौलवीचा नमाजवाद...', वक्फ कायद्यावरुन सुधांशू त्रिवेदींचा INDIA आघाडीवर निशाणा
14
Viral Video : टेक्नोलॉजिया! एक पंखा अन् तीन खोल्यांमध्ये गारेगार वारा; देशी जुगाड पाहून तुम्हीही कराल कौतुक
15
तुकोबांच्या अभंगातून उत्तर देत धनंजय पोवारनं मटण खाण्यावरुन ट्रोल करणाऱ्यांचं केलं प्रबोधन, म्हणाला "सज्जन कसायाबरोबर मांस विकु लागला..."
16
धावपट्टीला स्पर्श करताच एका बाजूला झुकले, नंतर...; बोईंग विमानाचा मोठा अपघात थोडक्यात टळला
17
जुलैची सुरुवात ठरणार खास, ९ राशींना भरघोस लाभ; पद-पैसा-प्रतिष्ठा वाढ, शुभ-कल्याणकारक काळ!
18
टीम इंडियाच्या ' या ' स्टार क्रिकेटरसोबत केलेला 'वन नाईट स्टँड'; बॉबी डार्लिंगचा खुलासा
19
शेअर बाजारात घसरण, सबस्क्रायबर्सही होताहेत कमी; तरीही वाढतोय Vodafone Idea चा शेअर, कारण काय? 
20
J-K: भारतीय सैन्याने हाणून पाडला घुसखोरीचा डाव; सीमेजवळ पाकिस्तानी गाईड ताब्यात

दहावी- बारावीच्या विद्यार्थ्यांमध्ये परीक्षांबाबत संभ्रम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 9, 2021 04:14 IST

जळगाव निंबायती (अमोल अहिरे) : माध्यमिक परीक्षा मंडळाने जाहीर केलेल्या वेळापत्रकानुसार २३ एप्रिल ते १५ मे दरम्यान बारावीची परीक्षा ...

जळगाव निंबायती (अमोल अहिरे) : माध्यमिक परीक्षा मंडळाने जाहीर केलेल्या वेळापत्रकानुसार २३ एप्रिल ते १५ मे दरम्यान बारावीची परीक्षा व २९ एप्रिल ते २० मे दरम्यान दहावीची ऑफलाइन पध्दतीने लेखी परीक्षा होणार की पुढे ढकलली जाणार याबाबत शिक्षक, पालक व विद्यार्थ्यांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे.

कोरोना संसर्गाची स्थिती राज्यात दिवसेंदिवस गंभीर होत आहे. त्यामुळे आपत्कालीन उपाययोजनेचा भाग म्हणून ‘ब्रेक द चेन’ मोहिमेंतर्गत शासनाने ३० एप्रिलपर्यंत मिनी लाॅकडाऊन लावून कडक निर्बंध लावले आहेत. त्यामुळे नववी आणि अकरावीच्या विद्यार्थ्यांची परीक्षा होणार नाही, असा निर्णय शिक्षण विभागाने घेतला आहे. यापूर्वी पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांना सरसकट उत्तीर्ण करण्याचा निर्णय झालेला आहे. विद्यार्थ्यांची कोणतीही परीक्षा न घेता पुढच्या वर्गात प्रवेश दिला जाणार आहे, अशी घोषणा शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी केली आहे. त्यामुळे परीक्षा मंडळाने दिलेल्या वेळापत्रकानुसार दहावी व बारावीच्या परीक्षा होणार की, पुढे ढकलण्यात येणार, ऑनलाइन होणार की, ऑफलाइन. अन्यथा रद्द होणार याबाबत सोशल मीडियावर तर्क-वितर्क व अनेक अफवांना उधाण आले आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये संभ्रम निर्माण होत आहे. त्याचा अभ्यासावर विपरित परिणाम होत आहे.

------------------

परीक्षा ऑफलाइन घेण्याची मागणी

महाराष्ट्रातील अनेक शाळांमध्ये व खेड्या-पाड्यात संगणक सुविधा व इंटरनेट सुविधा उपलब्ध नाही. यामुळे अनेक तांत्रिक अडचणी उद्भवू शकतात. यासाठी शहरातील विद्यार्थ्यांबरोबर राज्यातील ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांची तुलना न करता परीक्षा ऑफलाइन घ्यावी, अशी मागणी अनेक लोकप्रतिनिधी, विद्यार्थी संघटना, पालक संघटना यांच्या प्रतिनिधींनी शिक्षणमंत्री गायकवाड यांच्याकडे केली आहे. (०८ मालेगाव १/२)

---------------------

गेले वर्षभर प्रत्यक्ष काॅलेजला न येता, घरूनच ऑनलाइन पध्दतीने शिक्षण मिळत असल्याने, लिखाणाचा फारसा सराव झाला नव्हता. त्यामुळे लेखनाची गती कमी झाली होती. मात्र बोर्डाच्या परीक्षेसाठी अर्धा तास अधिक वेळ मिळणार असल्याने व परीक्षा आपल्याच महाविद्यालयात होणार असल्याने आनंद झाला होता. परीक्षेचा अभ्यास जोमाने सुरू होता. मात्र पहिली ते नववी व अकरावीच्या परीक्षा रद्द झाल्याने, दिलेल्या वेळापत्रकानुसार बारावीची परीक्षा होणार की, रद्द होणार याबाबत काहीच स्पष्टता नाही. त्यामुळे मन विचलित झाल्याने, अभ्यासात फारसे लक्ष लागत नाही.

कोमल कोरे, विद्यार्थिनी जळगाव निंबायती. (०८ कोमल कोरे)