शहरं
Join us  
Trending Stories
1
RSS सरसंघचालक मोहन भागवत यांची पंतप्रधान मोदींशी महत्त्वाची भेट; सुमारे दीड तास चर्चा - रिपोर्ट्स
2
IPL 2025 DC vs KKR : सुनील नरेन मॅजिक! ७ चेंडूत फिरवली मॅच; फाफची फिफ्टी ठरली व्यर्थ
3
धक्कादायक! वडिलांनी आठ वर्षांच्या मुलाचा गळा आवळून खून केला, मृतदेह पोत्यात भरला अन्...
4
काळजी करण्यासारखं काही नाही! खुद्द अजिंक्य रहाणेनं दिली आपल्या दुखापतीसंदर्भातील माहिती
5
VIDEO: रत्नागिरीजवळ रनपार खाडीत मासेमारी पाहण्यासाठी गेलेल्या १६ जणांना वाचविण्यात यश
6
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
7
गंभीर गुन्हा होण्यापूर्वीच पोलिसांनी डाव हाणून पाडला; परभणीत घरझडतीत घातक शस्त्र जप्त
8
IPL 2025 : 'चमत्कारी' चमीरा! 'सुपरमॅन' होऊन सीमारेषेवर टिपला IPL मधील एक सर्वोत्तम कॅच (VIDEO)
9
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
10
लातूरच्या लेकींचा आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत बोलबाला! ज्योती पवारमुळे भारताला उपविजेतेपद
11
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
12
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
13
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
14
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
15
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
16
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
17
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
18
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
19
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
20
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा

दहावी- बारावीच्या विद्यार्थ्यांमध्ये परीक्षांबाबत संभ्रम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 9, 2021 04:14 IST

जळगाव निंबायती (अमोल अहिरे) : माध्यमिक परीक्षा मंडळाने जाहीर केलेल्या वेळापत्रकानुसार २३ एप्रिल ते १५ मे दरम्यान बारावीची परीक्षा ...

जळगाव निंबायती (अमोल अहिरे) : माध्यमिक परीक्षा मंडळाने जाहीर केलेल्या वेळापत्रकानुसार २३ एप्रिल ते १५ मे दरम्यान बारावीची परीक्षा व २९ एप्रिल ते २० मे दरम्यान दहावीची ऑफलाइन पध्दतीने लेखी परीक्षा होणार की पुढे ढकलली जाणार याबाबत शिक्षक, पालक व विद्यार्थ्यांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे.

कोरोना संसर्गाची स्थिती राज्यात दिवसेंदिवस गंभीर होत आहे. त्यामुळे आपत्कालीन उपाययोजनेचा भाग म्हणून ‘ब्रेक द चेन’ मोहिमेंतर्गत शासनाने ३० एप्रिलपर्यंत मिनी लाॅकडाऊन लावून कडक निर्बंध लावले आहेत. त्यामुळे नववी आणि अकरावीच्या विद्यार्थ्यांची परीक्षा होणार नाही, असा निर्णय शिक्षण विभागाने घेतला आहे. यापूर्वी पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांना सरसकट उत्तीर्ण करण्याचा निर्णय झालेला आहे. विद्यार्थ्यांची कोणतीही परीक्षा न घेता पुढच्या वर्गात प्रवेश दिला जाणार आहे, अशी घोषणा शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी केली आहे. त्यामुळे परीक्षा मंडळाने दिलेल्या वेळापत्रकानुसार दहावी व बारावीच्या परीक्षा होणार की, पुढे ढकलण्यात येणार, ऑनलाइन होणार की, ऑफलाइन. अन्यथा रद्द होणार याबाबत सोशल मीडियावर तर्क-वितर्क व अनेक अफवांना उधाण आले आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये संभ्रम निर्माण होत आहे. त्याचा अभ्यासावर विपरित परिणाम होत आहे.

------------------

परीक्षा ऑफलाइन घेण्याची मागणी

महाराष्ट्रातील अनेक शाळांमध्ये व खेड्या-पाड्यात संगणक सुविधा व इंटरनेट सुविधा उपलब्ध नाही. यामुळे अनेक तांत्रिक अडचणी उद्भवू शकतात. यासाठी शहरातील विद्यार्थ्यांबरोबर राज्यातील ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांची तुलना न करता परीक्षा ऑफलाइन घ्यावी, अशी मागणी अनेक लोकप्रतिनिधी, विद्यार्थी संघटना, पालक संघटना यांच्या प्रतिनिधींनी शिक्षणमंत्री गायकवाड यांच्याकडे केली आहे. (०८ मालेगाव १/२)

---------------------

गेले वर्षभर प्रत्यक्ष काॅलेजला न येता, घरूनच ऑनलाइन पध्दतीने शिक्षण मिळत असल्याने, लिखाणाचा फारसा सराव झाला नव्हता. त्यामुळे लेखनाची गती कमी झाली होती. मात्र बोर्डाच्या परीक्षेसाठी अर्धा तास अधिक वेळ मिळणार असल्याने व परीक्षा आपल्याच महाविद्यालयात होणार असल्याने आनंद झाला होता. परीक्षेचा अभ्यास जोमाने सुरू होता. मात्र पहिली ते नववी व अकरावीच्या परीक्षा रद्द झाल्याने, दिलेल्या वेळापत्रकानुसार बारावीची परीक्षा होणार की, रद्द होणार याबाबत काहीच स्पष्टता नाही. त्यामुळे मन विचलित झाल्याने, अभ्यासात फारसे लक्ष लागत नाही.

कोमल कोरे, विद्यार्थिनी जळगाव निंबायती. (०८ कोमल कोरे)