शहरं
Join us  
Trending Stories
1
"माझ्याबद्दल बातमी आली की, माझा मोबाईल...", उमर नबीबद्दल जहूर इलाहीमुळे पोलिसांच्या हाती मोठा पुरावा
2
गँगस्टर अनमोल बिश्नोईला अमेरिकेने हाकलले, विमानातून उतरताच एनआयएने ताब्यात घेतले  
3
“राजन पाटलांच्या वाया गेलेल्या कार्ट्यांना सत्तेचा माज…”, बाळराजे पाटलांना अजितदादांच्या आमदाराने सुनावले
4
सावधान! फक्त एक फोन कॉल अन् गमावले तब्बल ३२ कोटी; महिलेसोबत नेमकं काय घडलं?
5
लग्नसराईच्या हंगामात सोन्या-चांदीच्या दरात सुरू असलेल्या घसरणीला आज ब्रेक; पाहा नवी किंमत
6
"मॅचच्या ४ दिवस आधी BCCIचे क्यूरेटर आले अन्.."; कोलकाता पिच वादावर सौरव गांगुलीचा खुलासा
7
Eye Infections: मुंबईत वाढताहेत संसर्गाचे रुग्ण; डोळ्यांत डोळे घालाल तर पस्तावाल, 'अशी' घ्या काळजी!
8
१,२,३,४... बाप रे बाप...! एका ऑटोरिक्‍शातून बाहेर पडली तब्बल 22 मुलं! व्हिडिओ बघून धक्का बसेल
9
९४% रिटर्न दिल्यावर 'ग्रोव'ला १०% लोअर सर्किट! गुंतवणूकदारांनी शेअर विकायला का लावली रांग?
10
प्रशासकीय दिरंगाईमुळे बोनस रखडला; संतप्त कामगारांचे नायर रुग्णालयासमोर 'बोंबाबोंब' आंदोलन
11
"अजित पवार नाद करायचा नाही"; मुलाच्या इशाऱ्यानंतर राजन पाटील म्हणाले, "त्याला पार्थ सारखं..."
12
Pune Crime: रात्री दीड वाजेची वेळ, हातात कोयते; पुण्यातील रेस्टॉरंटमध्ये गुंडांचा हैदोस, घटना सीसीटीव्हीमध्ये कैद
13
“आता ‘प्रो बैलगाडा लीग’ लवकरच, महाराष्ट्राचा गौरवशाली वारसा...”: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे
14
सरकारच्या 'या' स्कीममध्ये मिळवा विना गॅरेंटी व्यवसाय सुरू करण्यासाठी लोन; केवळ एका डॉक्युमेंटची लागेल गरज
15
मुलांच्या भवितव्याशी खेळ! Noge, Eare, Iey... चुकीचं इंग्रजी शिकवणाऱ्या शिक्षकाचा Video व्हायरल
16
आरक्षण मर्यादेचं उल्लंघन, राज्यातील निवडणुकांचं काय होणार? आता २५ नोव्हेंबरला पुढील सुनावणी, सुप्रिम कोर्टात आज काय घडलं
17
दुसऱ्या मुलीशी लग्न करत होता बॉयफ्रेंड, अचानक भर लग्नात धडकली गर्लफ्रेंड; मंडपात तमाशा सुरू होताच...
18
निवडणूक आयोगाला बदनाम करण्याचा प्रयत्न; देशातील 272 प्रतिष्ठित व्यक्तींचा पत्रातून काँग्रेसवर निशाणा
19
SIP सुरू करण्यापूर्वी वाचा! इंडेक्स फंडात 'कमी खर्च' तर Active फंडात 'जास्त रिटर्न'ची संधी; कोणता निवडावा?
20
“काँग्रेस-वंचित पक्षाची आघाडी व्हावी ही स्थानिक कार्यकर्त्यांची भावना”; नेते म्हणाले...
Daily Top 2Weekly Top 5

गोंधळाची स्थिती : ९५ टक्के विद्यार्थी अनुत्तीर्ण; पुन्हा परीक्षेची मागणी आयटीआयची ऐनवेळी आॅनलाइन परीक्षा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 3, 2017 00:51 IST

आयटीआयमध्ये आय.सी.टी.एस.एम. व्यवसायाच्या द्वितीय वर्षाचा थेअरी व गणित विषयांचा पेपर ऐनवेळी आॅनलाइन पद्धतीने व अभ्यासक्रमाच्या व्यतिरिक्त प्रश्न विचारून घेण्यात आल्याने ९५ टक्क्याहून अधिक विद्यार्थी नापास झाले आहेत.

ठळक मुद्देपरीक्षा गेल्या आॅगस्ट महिन्यातदोन्ही विषयांकरिता १५० गुणांचा पेपर

नाशिकरोड : आयटीआयमध्ये आय.सी.टी.एस.एम. व्यवसायाच्या द्वितीय वर्षाचा थेअरी व गणित विषयांचा पेपर ऐनवेळी आॅनलाइन पद्धतीने व अभ्यासक्रमाच्या व्यतिरिक्त प्रश्न विचारून घेण्यात आल्याने ९५ टक्क्याहून अधिक विद्यार्थी नापास झाले आहेत. त्यामुळे पुन्हा दोन्ही विषयांचे लेखी पेपर घेण्यात यावे, अशी मागणी विद्यार्थ्यांनी केली आहे. विशेष म्हणजे असा प्रकार संपूर्ण राज्यातील आयटीआयमध्ये झाल्याचे विद्यार्थ्यांचे म्हणणे आहे.सातपूर आयटीआय व सीबीएस येथील महिला आयटीआयमध्ये आय.सी.टी.एस.एम. व्यवसाय दोन वर्षांच्या अभ्यासक्रमासाठी विद्यार्थी-विद्यार्थिनींनी प्रवेश घेतला होता. द्वितीय वर्ष (फोर्थ सेमिस्टर) ची परीक्षा गेल्या आॅगस्ट महिन्यात घेण्यात आली. यामध्ये चित्रकला विषयाचा ७५ गुणाचा पेपर ‘ओएमआर’ पद्धतीने घेण्यात आला. मात्र ऐन परीक्षेच्या दिवशी थेअरी व गणित विषयाची ओएमआर पद्धतीने होणारी परीक्षा रद्द करून दोन दिवसांनी आॅनलाइन पद्धतीने घेण्यात आली. दोन्ही विषयांकरिता १५० गुणांचा पेपर होता. आॅनलाइन पद्धतीने थेअरी व गणित विषयाच्या घेण्यात आलेल्या परीक्षेत अभ्यासक्रमाच्या व्यतिरिक्त प्रश्न विचारण्यात आले. तर गणिताच्या पेपरमध्ये थेअरीच्या विषयांचे प्रश्न विचारण्यात आले. यामुळे विद्यार्थी गोंधळून गेले होते. या परीक्षेचा निकाल ७ नोव्हेंबरला आॅनलाइन जाहीर करण्यात आला. मात्र तांत्रिक अडचणीमुळे तो निकाल दोन-तीन दिवसांनी विद्यार्थ्यांना मिळाला. ऐनवेळी आॅनलाइन पद्धतीने व अभ्यासक्रमाव्यतिरिक्त थेअरी व गणिताच्या विषयात प्रश्न विचारल्याने सातपूर आयटीआयमधील २३ पैकी २ व सीबीएस महिला आयटीआयमधील १५ पैकी फक्त १ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. दिंडोरी, सिन्नर आयटीआयमध्येदेखील ९५ टक्के विद्यार्थी नापास झाले आहेत. मुळात या अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांना बाहेर नोकरीत कमी मागणी आहे. ज्या काही विद्यार्थ्यांना या अभ्यासक्रमामुळे नोकरी व शिकाऊ कामगार म्हणून नोकरी मिळाली होती ते नापास झाल्याने त्यांनासुद्धा घरी बसण्याची वेळ आली आहे. ऐनवेळी आॅनलाइन पद्धतीने पेपर घेण्यात आल्याने विद्यार्थ्यांना अपयशाला सामोरे जावे लागले असून, त्यांचे मोठे नुकसान होत आहे. गेल्या काही महिन्यांपासून नापास झालेले विद्यार्थी थेअरी व गणित विषयाचा पेपर ओएमआर पद्धतीने पुन्हा घेण्यात यावा, अशी मागणी आयटीआयच्या प्राचार्यांकडे करत आहे. मात्र त्या विद्यार्थ्यांना तेराशे रुपये भरून पुनर्परीक्षा अर्ज भरण्यास सांगण्यात येत आहे. विद्यार्थ्यांनी मानसिक व आर्थिक परिस्थितीचा विचार करून नाशिक विभागाच्या उपसंचालक संचालनालय व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालय यांनी लक्ष घालावे, अशी मागणी स्वाती पगारे, दर्शना चव्हाण, दिव्या गवई, वैशाली संधानशिव, क्षितिजा जवखेडकर, प्रज्ञा जाधव, भाग्यश्री एळींजे, शुभांगी डुक्की, प्रणाली सोनवणे, तरन्नुम बागवान, वैशाली अहिरे, वैभव वाघ, मोहित कोथमिरे आदी विद्यार्थ्यांनी केली आहे. विशेष म्हणजे असा निकाल राज्यातील सर्व आयटीआयमध्ये लागल्याचे विद्यार्थ्यांचे म्हणणे आहे.