शहरं
Join us  
Trending Stories
1
"बंकरमध्येच थांबा..."; पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानात भीतीचं वातावरण, सीमेवरही सैनिक वाढवले
2
"अष्टभुजा शक्तीने राक्षसांचा सर्वनाश व्हायला हवा...!"; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर नेमकं काय म्हणाले मोहन भागवत?
3
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
4
"पहलगाम दहशतवादी हल्यामागे पाक असेल तर..."; पाकिस्तानच्या उलट्या बोंबा, मंत्री इशाक डार म्हणाले...
5
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
6
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
7
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
8
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
9
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
10
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
11
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
12
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
13
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
14
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
15
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
16
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
17
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
18
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
19
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
20
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव

रोहित्राच्या खांबाची दुरवस्था

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 5, 2020 21:27 IST

वेळुंजे : त्र्यंबकेश्वर तालुक्यातील गावठा येथे वीजपुरवठा करणार्या रोहित्राच्या विद्युत खांबांची दयनीय दुरवस्था झाली आहे. हे ठिकाण अपघात प्रवण बनले आहे. यामुळे संबंधित विभागाने तत्काळ दखल घेत त्याची दुरुस्ती करण्याची मागणी ग्रामस्थांनी केली आहे.

ठळक मुद्देगावठा परिसर : महावितरण विभागाच्या अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष

लोकमत न्यूज नेटवर्कवेळुंजे : त्र्यंबकेश्वर तालुक्यातील गावठा येथे वीजपुरवठा करणार्या रोहित्राच्या विद्युत खांबांची दयनीय दुरवस्था झाली आहे. हे ठिकाण अपघात प्रवण बनले आहे. यामुळे संबंधित विभागाने तत्काळ दखल घेत त्याची दुरुस्ती करण्याची मागणी ग्रामस्थांनी केली आहे. गावठा येथे असलेल्या रोहित्राजवळच काही घरे व शेतीही आहे. या भागात अबालवृद्धांचा वावर असतो. गेल्या अनेक वर्षांपासून कार्यरत असलेल्या विद्युत खांबांची दयनीय अवस्था झाली आहे. या खांबांना छिद्र पडले आहे. या रोहित्राला वीजवाहक तारांमुळे आधार आहे. मात्र तारा बाजुला झाल्यास अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही. तसेच जोरदार वाºयाच्या झोतात पडून जाण्याचीही भीती ग्रामस्थांना वाटत आहे. याबाबत संबंधित विभागाकडे ग्रामस्थांनी अनेकदा तक्रार करुनही त्याकडे संबंधित अधिकारी व कर्मचार्यांनी दुर्लक्ष केल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे.गावाला वीजपुरवठा होत असलेल्या रोहित्राच्या खांबांची दुरवस्था झाली असून अपघात होण्याची शक्यता आहे. संबंधित विभागाने तत्काळ दुरुस्ती करायला हवी. मात्र, अनेकदा तक्रार करुनही याकडे दुर्लक्ष करण्यात येत आहे.- जगन लहारे, ग्रामस्थ गावठा या रोहित्राच्या दयनीय अवस्थेतबाबत संबंधित विभागाकडे अनेकदा तक्रारी करण्यात आल्या आहेत. मात्र, अद्यापही त्याची दखल घेण्यात आलेली नाही. अपघात घडल्यास त्यास जबाबदार कोण? तसेच खांब फक्त वीजतारांच्या भरवश्यावर आहेत. ते कधीही कोसळू शकतात.त्यामुळे तत्काळ दुरुस्ती करावी.- दिनेश लहारे,सामिजक कार्यकर्ते, गावठा

टॅग्स :gram panchayatग्राम पंचायतelectricityवीज