येवला : या तालुक्यातील पूर्वोत्तर भागातील १३ ते १५ खेड्यांचा परिसर अद्यापही जलस्रोत कोरडेच असल्याने आता परतीचा पाऊस तरी आमचे जलस्रोत भरेल अशी अपेक्षा धरून आहे.सध्या या भागातील पिके हलक्या पावसावर तग धरून आहेत. या परिसरात दोन मोठे पाऊस वगळता पावसाच्या रिमझिम सारीच चालू आहे. परंतु पालखेड लाभक्षेत्रातील शेतकरी मात्र ओव्हरफ्लोचे पाणी आल्याने आनंदित आहे. पालखेडच्या लाभक्षेत्रातील सारे शिवार अन् शेताच्या आसपास असलेले सारे खड्डे पाण्याने भरले आहे.राजापूर, खिर्डीसाठे, नगरसूल, लिहत, पिंपळखुटे तिसरे, जायदरे, आहेरवाडी, ममदापूर, कोळगाव, वाईबोथी, भारम, न्याहारखेडे, रेंडाळे या गावातील जलस्रोत अद्याप कोरडे आहेत. डोंगरगावचा धरणात जलसाठा अद्यापही केवळ ५ ते १० टक्के जलसाठा आहे. त्यामुळे या परिसरातील ८ ते १० गावांतील विहिरीच्या भविष्यातील पाणीस्रोत अधांतरी आहे. नैर्ऋत्य मोसमी पावसाच्या पतीच्या कालावधीत सध्या तालुक्यात पोषक असे वातावरण तयार झाले आहे. राजस्थानपासून पावसाच्या परतीचा प्रवास सुरू झाला असून, पंजाब, हरयाणा, गुजरात, राज्यातून बाहेर पडण्यास सुरुवात झाली आहे. राज्याच्या काही भागांत मान्सूनचा पाऊस अति समाधानकारक झाला असून, बहुतांशी ठिकाणी पाणीटंचाईचे संकट निवळले आहे.पण येवल्याच्या पूर्वोत्तर भागात मात्र पावसाची प्रतीक्षा आहे. (वार्ताहर)
जलस्रोत कोरडे असल्याने चिंता कमी
By admin | Updated: September 30, 2014 22:16 IST