शहरं
Join us  
Trending Stories
1
Rain Update : काळजी घ्या! बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा, आज मुसळधार; विदर्भ, मराठवाड्यासह या भागात बरसणार
2
स्वामी चैतन्यानंद फसवणुकीतही माहिर! लोकांवर प्रभाव पाडण्यासाठी बनावट UN-BRICS कार्ड; धक्कादायक माहिती उघड
3
Tamilnadu Stampede : "अभिनेत्याला यायला उशीर, पाण्याची कमतरता आणि..."; चेंगराचेंगरीबद्दल काय म्हणाले पोलीस?
4
IND vs PAK Final, Asia Cup 2025: फायनलमध्ये पाकिस्तानविरोधात भारताचा रेकॉर्ड फारसा चांगला नाही; आजपर्यंत १० वेळा भिडला, पण...
5
'पीएम किसान'चा २१ वा हप्ता जाहीर! ३ राज्यांतील शेतकऱ्यांच्या खात्यात जमा, महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना कधी?
6
IND vs PAK Final, Asia Cup 2025: भारत-पाक अंतिम सामना: सूर्यकुमार पाकिस्तानी मंत्री मोहसिन नकवी यांच्या हस्ते ट्रॉफी स्वीकारणार?
7
Video - तामिळनाडूतील चेंगराचेंगरीत मृत्युमुखी पडलेल्यांचे मृतदेह पाहून शिक्षणमंत्री ढसाढसा रडले
8
LPG ते पेन्शन, UPI पासून रेल्वे तिकीटापर्यंत... १ ऑक्टोबरपासून 'हे' ५ नियम बदलणार
9
आधी मसाज करायला आले अन्..; हायकोर्टाच्या वकिलाकडून ब्लॅकमेलिंगद्वारे पैसे उकळले!
10
IND vs PAK Final, Asia Cup 2025 Marathi : आज 'ऑपरेशन पाकिस्तान'! फायनलमध्ये भारतीय संघात दोन मोठे बदल होणार; अशी असेल प्लेइंग 11 
11
वाट चुकलेले दुचाकीस्वार थेट बेलापूर खाडीत; दोन महिन्यांतील दुसरी घटना; एक जण गेला वाहून
12
लैंगिक अत्याचार प्रकरणातील आरोपी स्वामी चैतन्यानंद यांना अटक; पोलिसांनी आग्र्यातून ताब्यात घेतले
13
केंद्रीय गृह मंत्रालयाने तामिळनाडूतील चेंगराचेंगरीचा अहवाल मागितला; अभिनेता विजयचीही चौकशी होणार
14
BSNL 4G स्पीड टेस्ट 2025: किती मिळतोय स्पीड? MBPS चा आकडा पहाल तर, म्हणाल...
15
"एकेकाळी कौतुक करणारे लोक आज...", सलमान खानचा अप्रत्यक्षपणे अभिनव कश्यपवर निशाणा
16
पाकिस्तानी लष्करानेच केली होती शस्त्रसंधीसाठी विनंती; भारताने सुनावले खडेबोल!
17
स्वतःच्या पायावर धोंडा, अमेरिकेच्या व्हिसा धोरणावरून भयकंप; पुढे काय अन् निर्णयामागे काय? जाणून घ्या
18
भारत विरुद्ध इंडिया; शहरी-ग्रामीण विषमतेचा अर्थ आणि परिणाम काय?
19
मी २०२९ सालापर्यंत महाराष्ट्रातच राहणार; दिल्लीला जाण्याची शक्यता फडणवीस यांनी फेटाळली!
20
कामाचा जास्त ताण घेता? हेल्थ कोण सांभाळणार? आतापासूनच घ्या 'या' गोष्टींची काळजी

रथ मिरवणुकीने उटीच्या वारीची सांगता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 28, 2022 01:21 IST

संत निवृत्तिनाथांच्या संजीवन समाधीला आठ तास चंदनाच्या उटीचा लेप चढविल्याने देवाला शीतलता प्राप्त झाली असावी, अशी श्रध्दा भाविकांमध्ये होती. या उटीच्या वारीची बुधवारी रथ मिरवणुकीने सांगता झाली.

त्र्यंबकेश्वर : संत निवृत्तिनाथांच्या संजीवन समाधीला आठ तास चंदनाच्या उटीचा लेप चढविल्याने देवाला शीतलता प्राप्त झाली असावी, अशी श्रध्दा भाविकांमध्ये होती. या उटीच्या वारीची बुधवारी रथ मिरवणुकीने सांगता झाली.

वरुथिनी एकादशीनंतर द्वादशीला काकडा आरती होऊन महाप्रसाद करण्यात आला.अनेक भाविक वारक-यां नी महाप्रसादावर एकादशीचा उपवास द्वादशीला सोडला. सायंकाळी ७ वाजता रथ मिरवणुकीस प्रारंभ झाला. तोपर्यंत दिवे लागण झाली होती. अनेक वारकरी भाविकांनी सकाळी उपवास सोडल्यानंतर घरी जाणे पसंत केले. काल मुक्काम करून उपवास सोडून कधी घरी जाऊ असे प्रत्येकाला वाटते. त्यामुळे बरेच भाविक उपवास सोडून गेल्याने सायंकाळी रथ मिरवणूकीस फारशी गर्दी नव्हती.

रथ श्रीनिवृत्तीनाथ मंदिरापासून सुंदरलाल मठ मार्गाने तेली धर्मशाळेपासून पाटील गल्ली, पोस्ट गल्ली

 

ते श्रीत्र्यंबकेश्वर मंदिरापुढे थांबून मंदिर प्रांगणात फुगड्या आदी खेळ खेळून झाल्यावर पालखी रथ मेनरोडने कूशावर्तमार्गे संत निवृत्तिनाथ मंदिरात परतला. यावेळी प्रशासकीय समितीचे सदस्य अॅड.भाऊसाहेब गंभिरे पुजारी जयंत गोसावी सच्चिदानंद गोसावी, योगेश गोसावी व्यवस्थापक गंगाराम झोले संदीप मुळाणे आदी मिरवणुकीत सामील झाले होते.

टॅग्स :trimbakeshwarत्र्यंबकेश्वरReligious programmeधार्मिक कार्यक्रम