शहरं
Join us  
Trending Stories
1
महादेवी हत्ती परत आणण्यासाठी राजू शेट्टींची आत्मक्लेष पदयात्रा; अनेकांनी घेतला सहभाग
2
"मी माझी कबर खोदतोय, इथेच दफन..."; हमासने दाखवला इस्रायली ओलिसाचा भयानक Video
3
भारताच्या हाती खजिना लागला खजिना...! कोळशाच्या खाणीत दडलेला; लोकसभेत मोठी घोषणा...
4
Priyanka Chaturvedi : "जवानांच्या रक्तापेक्षा पैसा महत्त्वाचा..."; भारत-पाकिस्तान मॅचवरून प्रियंका चतुर्वेदींचा हल्लाबोल
5
वॉरेन बफेटही चुकले! ज्या कंपनीत हात घातला तीच बुडाली, सर्वात मोठं नुकसान! नेमकं काय घडलं?
6
वर्षभरापासून बेपत्ता होता नवरा, मोबाईलने उलगडलं गूढ; बायकोनेच रचलेला भयंकर कट
7
‘मोदी-योगी आणि इतरांची नावे घेण्यास भाग पाडले’; साध्वी प्रज्ञा ठाकूर यांचे एटीएसवर गंभीर आरोप
8
राज्यमंत्री मेघना बोर्डीकर पुन्हा वादात; भर सभेत ग्रामसेवकाला कानाखाली मारण्याची भाषा
9
ट्रम्प यांचा 'हा' निर्णय भारताला नव्हे तर अमेरिकेलाच महागात पडणार? अहवालातून मोठा खुलासा!
10
भरधाव बोलेरो कालव्यात कोसळली; ११ जणांचा गाडीतच मृत्यू, बाहेर येण्यासाठी धडपडत राहिले
11
मैदानावर विराट, व्यवसायात विकास! विराट कोहलीच्या १०५० कोटींच्या साम्राज्याचा 'हा' आहे खरा हिरो!
12
'पाकिस्तानात नाही, तर बलुचिस्तानमध्ये तेल सापडले', बलोच नेत्याचे डोनाल्ड ट्रम्प यांना पत्र
13
भारती सिंगने सर्वांसमोर जाळली महागडी 'लाबूबू डॉल'! कारणही सांगितलं, म्हणाली- "माझा छोट्या मुलाला.."
14
पायी जाणाऱ्या दोघांना भरधाव कारने उडविले, दोघांचा जागीच मृत्यू; छत्रपती संभाजीनगरमधील घटना
15
भारतासोबत वाद ओढवून घेणे मोठी चूक, मोदी...; हात पोळलेल्या कॅनडाच्या बिझनेसमनचा ट्रम्पना इशारा...
16
खुशखबर! रक्षाबंधनपूर्वी RBI देणार मोठी भेट? कर्ज घेणाऱ्यांना दिलासा, तुमचा EMI होणार स्वस्त?
17
जिभेचे चोचले पडतील महागात! अल्ट्रा-प्रोसेस्ड फूडमुळे फुफ्फुसांच्या कॅन्सरचा धोका, रिसर्चमध्ये खुलासा
18
Ankita Lokhande : "ते आमच्या घराचा..."; अंकिता लोखंडेच्या हाऊस हेल्परची मुलगी बेपत्ता, पोलिसांत केली तक्रार
19
केंद्रीय मंत्री नितीन गडकरींचे नागपुरातील घर उडविण्याची धमकी, निनावी कॉलने सुरक्षायंत्रणांची धावपळ
20
सामाजिक न्याय विभागाचे ४१० कोटी लाडक्या बहिणींसाठी वळते : खोब्रागडे

ंएटीकेटी विद्यार्थ्यांना प्रवेशाची चिंता

By admin | Updated: July 3, 2017 01:00 IST

नाशिक : दहावी उत्तीर्ण विद्यार्थ्यांनी अकरावी प्रवेशाची प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर प्रवेश मिळतो याकडे लक्ष आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कनाशिक : दहावी उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांनी अकरावी प्रवेशाची प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर त्यांना कोणत्या महाविद्यालयात प्रवेश मिळतो याकडे लक्ष असताना जे विद्यार्थी एटीकेटीमध्ये प्रवेशास पात्र आहेत त्यांना मात्र अजूनही प्रवेशाची चिंता आहे. या विद्यार्थ्यांचे आॅनलाइन अर्ज स्वीकारले गेले नसल्याने त्यांच्यासाठी स्वतंत्रपणे प्रवेशप्रक्रिया राबविली जाणार आहे. मात्र अशा विद्यार्थ्यांना त्यांना अपेक्षित अशा महाविद्यालयात प्रवेश मिळण्याची शक्यता कमीच आहे. याशिवाय जेथे आॅफलाइन प्रवेश आहेत अशा महाविद्यालयांनीदेखील प्रवेश नाकारल्याने या विद्यार्थ्यांची चिंता वाढली आहे. शहरातील नामांकित महाविद्यालयात अकरावीसाठी प्रवेश मिळावा यासाठी विद्यार्थ्यांमध्ये प्रचंड चुरस आहे. शहरातील नामांकित महाविद्यालयात मंजूर विद्यार्थी संख्येपेक्षा दहा पटीने अधिक अर्ज प्राप्त झाल्याने अशा ठिकाणी प्रवेशाची मोठी स्पर्धा असणार आहे. ८० ते ९० टक्के गुण मिळविणाऱ्या या विद्यार्थ्यांनी ठराविक महाविद्यालयांनाच प्राधान्य दिल्यामुळे ठराविक महाविद्यालयांमध्येच मोठी गर्दी असणार आहे. अशावेळी एटीकेटी पात्र उमेदवारांकडे कुणाचेही लक्ष नसल्याने विद्यार्थ्यांना सवलत मिळूनही त्यांना प्रवेश मिळेलच याची फारशी शाश्वती नसल्याने या विद्यार्थ्यांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. अकरावीसाठी उत्तीर्ण विद्यार्थ्यांची आॅनलाइन अर्ज दाखल केले आहेत. मात्र एटीकेटी म्हणजे अकरावी प्रवेशासाठी पात्र असलेल्या विद्यार्थ्यांचे आॅनलाइन अर्ज दाखल करण्याची व्यवस्था नसल्याने या विद्यार्थ्यांना गृहीत न धरता अकरावीची प्रवेशप्रक्रिया पूर्ण केली जाणार आहे. याचाच अर्थ प्रवेशाच्या चार फेऱ्या पूर्ण होईपर्यंत महाविद्यालयांचे सर्व प्रवेश पूर्ण झालेले असतील शिवाय काही विनाअनुदानित तुकड्यांना देखील विद्यार्थ्यांना प्रवेश दिला जाईल. विद्यार्थ्यांची संख्या लक्षात घेता तातडीने अतिरिक्त तुकडीदेखील मंजूर होऊ शकते. परंतु हा सारा खटाटोप गुणवत्ता यादीतील विद्यार्थ्यांसाठीच राहणार आहे. त्यानंतर उर्वरित विद्यार्थ्यांना कोटा पद्धतीनेही प्रवेश दिला जाऊ शकतो.