शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2025 : रजतच्या नेतृत्वाखाली RCB संघाला 'सुवर्ण' संधी! पंजाबला शह देत थेट फायनलमध्ये एन्ट्री
2
युद्धविराममध्ये कधीही व्यापाराचा उल्लेख नव्हता; भारताने ट्रम्प यांच्या टॅरिफ दाव्यांना पुन्हा एकदा नाकारले
3
RCB vs PBKS : कोहलीचं सेलिब्रेशन बघून अनुष्का शर्माला आलं हसू; तो व्हिडिओ होतोय व्हायरल
4
'डिजिटल अरेस्ट'च्या नावाखाली महिलेची १ कोटी ८१ लाखांची फसवणूक; गुन्हे शाखेच्या कारवाईत टोळीचा पर्दाफाश
5
Covid-19 च्या डेल्टा व्हेरिएंटमुळे सायलेंट हॉर्ट अटॅक वाढले, आयआयटी इंदूरच्या अहवालात खुलासा
6
Ola Electric Q4 results: 'ओला'चे डोळे ओले! तोटा वाढून ₹८६० कोटींवर, महसुलातही ५९% ची घसरण
7
पाकिस्तानात गेलेल्या महिलेने हेरगिरी केल्याचा संशय, नागपुरात गुन्हा दाखल
8
राज्यसभेच्या ८ जागांसाठी १९ जूनला मतदान; मतांचे गणित जुळवणं सत्ताधाऱ्यांसमोर आव्हान
9
RCB समोर पंजाबी शेर ढेर! रडत खडत शंभरी गाठली; पण PBKS च्या नावे झाला हा लाजिरवाणा विक्रम
10
"पाकिस्तानच्या गोळीबारामुळे बाधित पूंछ आणि इतर भागांसाठी मदत पॅकेज...", राहुल गांधींनी पंतप्रधान मोदींना लिहिले पत्र
11
IPL 2025 PBKS vs RCB Qualifier 1 : "आप आये बहार आयी"; जोश हेजलवूडनं ७ चेंडूत अय्यरह-इंग्लिसचा खेळ केला खल्लास! अन्...
12
प्राची पिसाटला 'तो' मेसेज माझ्याच अकाउंटवरून गेला, पण...; सुदेश म्हशिलकरांचा अभिनेत्रीलाच उलट प्रश्न
13
आधी यादीतले कुख्यात दहशतवादी भारताकडे सोपवा, तरच...; भारताने पाकिस्तानला पुन्हा खडसावले!
14
RCB vs PBKS: आरसीबीचा मास्टरस्ट्रोक! प्लेईंग इलेव्हनमध्ये घातक गोलंदाजाचं नाव, पंजाबचं टेन्शन वाढलं
15
अफगाणिस्तान-पाकिस्तान सीमेवर गोळीबार, युद्धजन्य परिस्थिती; शरीफ सरकारवर नवं संकट
16
IPL 2025 Qualifier 1 : पावरप्लेमध्ये RCB कडून यश दयालसह भुवीचा जलवा! PBKS ची हिट जोडी ठरली फ्लॉप
17
सीबीआयची पासपोर्ट कार्यालयात धाड; लाच घेताना अधिकाऱ्यासह दलालास अटक
18
Video : "टॉयलेट वापरायचाय पण विमानतळावर पाणीच नाही"; पाकिस्तानी महिलेने केली स्वतःच्या देशाची पोलखोल
19
विम्याचा लाभ, वैद्यकीय सुविधेसह टोलमाफी; वारकऱ्यांसाठी राज्य सरकारने घेतले निर्णय
20
महापालिकेच्या कचरा उचलणाऱ्या वाहनाच्या धडकेत डिलिव्हरी बॉय ठार, अंधेरीतील घटना

ंएटीकेटी विद्यार्थ्यांना प्रवेशाची चिंता

By admin | Updated: July 3, 2017 01:00 IST

नाशिक : दहावी उत्तीर्ण विद्यार्थ्यांनी अकरावी प्रवेशाची प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर प्रवेश मिळतो याकडे लक्ष आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कनाशिक : दहावी उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांनी अकरावी प्रवेशाची प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर त्यांना कोणत्या महाविद्यालयात प्रवेश मिळतो याकडे लक्ष असताना जे विद्यार्थी एटीकेटीमध्ये प्रवेशास पात्र आहेत त्यांना मात्र अजूनही प्रवेशाची चिंता आहे. या विद्यार्थ्यांचे आॅनलाइन अर्ज स्वीकारले गेले नसल्याने त्यांच्यासाठी स्वतंत्रपणे प्रवेशप्रक्रिया राबविली जाणार आहे. मात्र अशा विद्यार्थ्यांना त्यांना अपेक्षित अशा महाविद्यालयात प्रवेश मिळण्याची शक्यता कमीच आहे. याशिवाय जेथे आॅफलाइन प्रवेश आहेत अशा महाविद्यालयांनीदेखील प्रवेश नाकारल्याने या विद्यार्थ्यांची चिंता वाढली आहे. शहरातील नामांकित महाविद्यालयात अकरावीसाठी प्रवेश मिळावा यासाठी विद्यार्थ्यांमध्ये प्रचंड चुरस आहे. शहरातील नामांकित महाविद्यालयात मंजूर विद्यार्थी संख्येपेक्षा दहा पटीने अधिक अर्ज प्राप्त झाल्याने अशा ठिकाणी प्रवेशाची मोठी स्पर्धा असणार आहे. ८० ते ९० टक्के गुण मिळविणाऱ्या या विद्यार्थ्यांनी ठराविक महाविद्यालयांनाच प्राधान्य दिल्यामुळे ठराविक महाविद्यालयांमध्येच मोठी गर्दी असणार आहे. अशावेळी एटीकेटी पात्र उमेदवारांकडे कुणाचेही लक्ष नसल्याने विद्यार्थ्यांना सवलत मिळूनही त्यांना प्रवेश मिळेलच याची फारशी शाश्वती नसल्याने या विद्यार्थ्यांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. अकरावीसाठी उत्तीर्ण विद्यार्थ्यांची आॅनलाइन अर्ज दाखल केले आहेत. मात्र एटीकेटी म्हणजे अकरावी प्रवेशासाठी पात्र असलेल्या विद्यार्थ्यांचे आॅनलाइन अर्ज दाखल करण्याची व्यवस्था नसल्याने या विद्यार्थ्यांना गृहीत न धरता अकरावीची प्रवेशप्रक्रिया पूर्ण केली जाणार आहे. याचाच अर्थ प्रवेशाच्या चार फेऱ्या पूर्ण होईपर्यंत महाविद्यालयांचे सर्व प्रवेश पूर्ण झालेले असतील शिवाय काही विनाअनुदानित तुकड्यांना देखील विद्यार्थ्यांना प्रवेश दिला जाईल. विद्यार्थ्यांची संख्या लक्षात घेता तातडीने अतिरिक्त तुकडीदेखील मंजूर होऊ शकते. परंतु हा सारा खटाटोप गुणवत्ता यादीतील विद्यार्थ्यांसाठीच राहणार आहे. त्यानंतर उर्वरित विद्यार्थ्यांना कोटा पद्धतीनेही प्रवेश दिला जाऊ शकतो.