शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांच्या 50 टक्के टॅरिफला भारतानं का दिलं नाही उत्तर? राजनाथ सिंह यांचा परदेशातून मोठा खुलासा!
2
"ED, EVM, भौकने वाले..., फौज तेरी भारी है; जंजीरों में जकड़ा हुआ जयंत पाटील..." पडळकरांच्या वक्तव्यावरून अमोल कोल्हेंचा हल्लाबोल
3
'सुप्रीम कोर्ट आता बेल कोर्ट बनलं आहे'; जामीन अर्जांची संख्या पाहून न्यायमूर्ती नागरत्ना यांनी व्यक्त केली चिंता
4
"२० ओव्हर्स टिकणार त्या दिवशी २०० धावा ठोकणार"; अभिषेक शर्मासंदर्भात मोठी भविष्यवाणी
5
"सनातनी हज यात्रेला जात नाहीत, त्यांच्या लोकांनीही...; गरबा मंडपाच्या दरवाजावर गोमूत्र ठेवा!"; धीरेंद्र शास्त्री यांचा सल्ला
6
बाई, काय हा प्रकार! पाकिस्तान बेक्कार हरला, तरीही हॅरिस रौफच्या बायकोने केली 'तशी' पोस्ट
7
उद्धवसेनेच्या दसऱ्या मेळाव्याला राज ठाकरे जाणार? टिझरने वेधले लक्ष, मिळाले सूचक संकेत!
8
'Before आणि After चा बोर्ड पाहून आनंद झाला', GST 2.0 बाबत PM मोदींचे देशाच्या नावे पत्र
9
India vs West Indies Test Series: गिलच्या संघातून रिषभ पंत 'आउट'; कोण घेणार त्याची जागा?
10
IND vs PAK: "तुम्ही जर पातळी सोडून वागायला लागलात तर बॅटने..."; इरफानने पाकिस्तानला सुनावलं
11
'पोलीस बाजूला ठेवा, दम असेल तर एकदा रणांगणात या'; निलेश लंकेंचा गोपीचंद पडळकरांना जाहीर इशारा
12
‘मला रिकामे ठेवू नका’, मुंडेंच्या विधानावर जरांगेची प्रतिक्रिया; म्हणाले, “रोजगार हमीवर जा”
13
'बेनिफिट ऑफ डाउट' मिळाला असता तर आम्ही जिंकलो असतो; 'त्या' निर्णयावर अख्तरची 'बोलंदाजी'
14
नेपाळमध्ये ‘Gen Z’चे आंदोलन, RSS नेत्यांचे विधान; म्हणाले, “जगात षड्‍यंत्र, हिंदू समाज...”
15
१५ दिवसात भाजपच्या दुसऱ्या नगरसेवकाला अटक; टोळीला हाताशी धरुन केला गोळीबार, पैसेही पुरवले
16
मुक्या जीवाचे हाल! गायीच्या डोळ्यांवर पट्टी बांधली, फेकलं नाल्यात; काळजात चर्र करणारी घटना
17
भारताकडून हरल्यावर पाकिस्तानचा रडीचा डाव, या गोष्टीवरून पुन्हा ICCकडे केली तक्रार  
18
शेअर असावा तर असा...! सरकारची एक घोषणा अन् थेट ₹4000 नं वाढला; एकाच दिवसात केली कमाल, गुंतवणूकदारांना केलं मालामाल!
19
Video: रस्त्यात खड्डे की, खड्ड्यात रस्ते..? 5 प्रवाशांना घेऊन Scorpio-N अख्खी बुडाली...
20
गौतम अदानींची 'पॉवर'फुल कामगिरी; अवघ्या 2 दिवसांत केली 1.7 लाख कोटींची कमाई

मानधनासाठी संगणक परिचालकांचे आंदोलन सुरू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 24, 2019 00:52 IST

ग्रामपंचायत पातळीवर सरकारच्या योजना जनतेपर्यंत पोहोचविण्याचे काम करणाऱ्या संगणक परिचालकांना गेल्या सहा महिन्यांपासून मानधन मिळालेले नसून, त्यांना त्वरित मानधन देण्यात यावे, त्याचबरोबर मानधनात वाढ करावी या मागणीसाठी जिल्ह्यातील संगणक परिचालकांनी काम बंद आंदोलन सुरू केले आहे.

एकलहरे : ग्रामपंचायत पातळीवर सरकारच्या योजना जनतेपर्यंत पोहोचविण्याचे काम करणाऱ्या संगणक परिचालकांना गेल्या सहा महिन्यांपासून मानधन मिळालेले नसून, त्यांना त्वरित मानधन देण्यात यावे, त्याचबरोबर मानधनात वाढ करावी या मागणीसाठी जिल्ह्यातील संगणक परिचालकांनी काम बंद आंदोलन सुरू केले आहे. त्यामुळे ग्रामपंचायतींच्या कामकाजावर परिणाम होत आहे.शासनाने डिजिटल इंडियाच्या माध्यमातून प्रत्येक गावात आॅनलाइन दाखले व सुविधा देण्यासाठी राज्यातील २५ हजार ग्रामपंचायतींंमध्ये गेल्या अनेक वर्षांपासून संगणक परिचालक प्रामाणिकपणे काम करत आहेत. यासाठी प्रत्येक ग्रामपंचायतीमध्ये आपले सरकार सेवा केंद्रामार्फत संगणक परिचालकांची नेमणूक केली आहे. केवळ सहा हजार रुपये इतकाच तुटपुंजा मासिक पगार या परिचालकांना दिला जातो. मात्र तोही चक्क सहा सहा महिने दिलाच जात नाही. सध्या संगणक परिचालकांचे गेल्या सहा महिन्यांपासून पगार दिलेले नाहीत. यासंदर्भात संगणक परिचालकांनी मुंबई येथे आंदोलन केले असता मुख्यमंत्र्यांनी १० ते १२ दिवसांत निर्णय घेण्याचे आश्वासन दिले, परंतु त्याची पूर्तता होऊ शकली नाही. त्यामुळे राज्यातील सर्व संगणक परिचालकांनी कामबंद आंदोलन सुरू केले आहे. यासंदर्भात संगणक परिचालकांनी पंचायत समितीचे गटविकास अधिकारी पी. एस. कोल्हे यांना मागण्यांचे निवेदन दिले असून, त्यात राज्यातील सर्व ग्रामपंचायत संगणक परिचालकांना महाराष्ट्र आय.टी. महामंडळाकडून संगणक परिचालक म्हणून कायमस्वरूपी नियुक्ती देणे, प्रतिमहिना किमान वेतन १५००० रुपये द्यावे, संगणक परिचालकांचे मागील एप्रिल २०१७ ते जुलै २०१९ पर्यंतचे सर्व थकीत मानधन देणे आदि मागण्या करण्यात आल्या आहेत. यावेळी संघटनेचे तालुका अध्यक्ष शांताराम बेंडकुळे, हिरामण बेंडकुळे, निशांत डंबाळे, विनायक सूर्यवंशी, कैलास मोंढे, लहानू कचरे, राहुल पारधी, अनिल अवचट उपस्थित होते.छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान (शेतकरी कर्जमाफी) योजनेचे मानधन देणे, प्रधानमंत्री आवास योजना-ग्रामीणचे आॅनलाइन सर्व्हे केलेले मानधन मिळावे, नोटीस न देता कामावरून कमी केलेल्या संगणक परिचालकांना परत कामावर घ्यावे आदी मागण्या करण्यात आल्या आहेत.

टॅग्स :Governmentसरकारgram panchayatग्राम पंचायत