शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! लाल किल्ला स्फोटाची जबाबदारी टीआरएफने स्वीकारली; 'पहलगाम' हल्ल्याशी जोडले स्फोटाचे धागेदोरे
2
'विशेष मतदार यादी सुधारणा' प्रक्रियेच्या कामाच्या ताणामुळे बीएलओ अधिकाऱ्याने आयुष्य संपविले; कर्मचारी वर्गात संताप
3
नितीश कुमार उद्या राजीनामा देणार! 'मिशन कॅबिनेट'ची तयारी पूर्ण; मुख्यमंत्री कोणाचा होणार यावर मात्र...
4
तेजस्वी यांनी पराभवासाठी बहीण रोहिणीला ठरवलं जबाबदार; फेकली होती चप्पल? अशी आहे संपूर्ण इनसाइड स्टोरी!
5
पाकिस्तानच्या गोळीबार गमावला पाय; आता 'गौरी'ला मिळाले नवीन आयुष्य
6
दिल्ली ब्लास्टचे बांग्लादेश कनेक्शन उघड; मुर्शिदाबाद मार्गे भारतात आणली स्फोटके
7
युरोपने केलेली 'ही' मोठी चूक अमेरिकेला ३० वर्षांत गरीब करेल; जे पी मॉर्गनचा इशारा
8
तेजस्वी यादवांच्या अन्य तिन्ही बहिणींनी पाटणाचे घर सोडले; मोठ्या बहिणीनंतर...
9
मी दिलेला '२५ जागांचा शाप' खरा ठरला!; तेजस्वी यादवांनी तिकीट नाकारले तेव्हा रडणाऱ्या नेत्याचा दावा 
10
तेजप्रताप यादवांचा राज्यातील NDA सरकारला पाठिंबा; रोहिणी आचार्य यांना मोठी जबाबदारी देणार
11
रशिया आणि युक्रेनमध्ये मोठा करार होणार, राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्कींनी केली घोषणा; म्हणाले...
12
“जो जीता वही सिकंदर, पण सिकंदर बनायचे राज समजू शकले नाही”; बिहार निकालावर उद्धव ठाकरे बोलले
13
"सुन लो जयचंदों...! माझ्या वडिलांनी एक इशारा दिला तर...!", रोहिणी आचार्य वादावरून तेजप्रताप भडकले
14
राहुल गांधींमुळे काँग्रेसच्या तरुण खासदारांचे भविष्य धोक्यात; PM मोदींचा घणाघात...
15
लालूप्रसाद यादवांना निकामी किडनी दिली; तेजस्वी यादव अन् बहीण रोहिणी आचार्य यांच्यात तू तू मै मै, चप्पलफेक...
16
ICC WTC Points Table : टीम इंडियापेक्षा लंका भारी! दक्षिण आफ्रिकेची दुसऱ्या स्थानावर झेप
17
सावधान! डिजिटल गोल्डमध्ये गुंतवणूक करताय? 'या' ३ मोठ्या जोखमींमुळे पैसे बुडण्याची शक्यता
18
प्रेमासाठी ओलांडल्या देशासह धर्माच्या सीमा; पाकिस्तानी तरुणावर जडला भारतीय महिलेचा जीव
19
बिहारमध्ये सत्ता स्थापनेच्या हालचालींना वेग; मंत्रिमंडळ वाटपाचा फॉर्म्युला ठरला?
20
पत्नीच्या नावाने म्युच्युअल फंडात SIP करताय? टॅक्स स्लॅब आणि 'कॅपिटल गेन्स'चे नियम स्पष्ट समजून घ्या!
Daily Top 2Weekly Top 5

मानधनासाठी संगणक परिचालकांचे आंदोलन सुरू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 24, 2019 00:52 IST

ग्रामपंचायत पातळीवर सरकारच्या योजना जनतेपर्यंत पोहोचविण्याचे काम करणाऱ्या संगणक परिचालकांना गेल्या सहा महिन्यांपासून मानधन मिळालेले नसून, त्यांना त्वरित मानधन देण्यात यावे, त्याचबरोबर मानधनात वाढ करावी या मागणीसाठी जिल्ह्यातील संगणक परिचालकांनी काम बंद आंदोलन सुरू केले आहे.

एकलहरे : ग्रामपंचायत पातळीवर सरकारच्या योजना जनतेपर्यंत पोहोचविण्याचे काम करणाऱ्या संगणक परिचालकांना गेल्या सहा महिन्यांपासून मानधन मिळालेले नसून, त्यांना त्वरित मानधन देण्यात यावे, त्याचबरोबर मानधनात वाढ करावी या मागणीसाठी जिल्ह्यातील संगणक परिचालकांनी काम बंद आंदोलन सुरू केले आहे. त्यामुळे ग्रामपंचायतींच्या कामकाजावर परिणाम होत आहे.शासनाने डिजिटल इंडियाच्या माध्यमातून प्रत्येक गावात आॅनलाइन दाखले व सुविधा देण्यासाठी राज्यातील २५ हजार ग्रामपंचायतींंमध्ये गेल्या अनेक वर्षांपासून संगणक परिचालक प्रामाणिकपणे काम करत आहेत. यासाठी प्रत्येक ग्रामपंचायतीमध्ये आपले सरकार सेवा केंद्रामार्फत संगणक परिचालकांची नेमणूक केली आहे. केवळ सहा हजार रुपये इतकाच तुटपुंजा मासिक पगार या परिचालकांना दिला जातो. मात्र तोही चक्क सहा सहा महिने दिलाच जात नाही. सध्या संगणक परिचालकांचे गेल्या सहा महिन्यांपासून पगार दिलेले नाहीत. यासंदर्भात संगणक परिचालकांनी मुंबई येथे आंदोलन केले असता मुख्यमंत्र्यांनी १० ते १२ दिवसांत निर्णय घेण्याचे आश्वासन दिले, परंतु त्याची पूर्तता होऊ शकली नाही. त्यामुळे राज्यातील सर्व संगणक परिचालकांनी कामबंद आंदोलन सुरू केले आहे. यासंदर्भात संगणक परिचालकांनी पंचायत समितीचे गटविकास अधिकारी पी. एस. कोल्हे यांना मागण्यांचे निवेदन दिले असून, त्यात राज्यातील सर्व ग्रामपंचायत संगणक परिचालकांना महाराष्ट्र आय.टी. महामंडळाकडून संगणक परिचालक म्हणून कायमस्वरूपी नियुक्ती देणे, प्रतिमहिना किमान वेतन १५००० रुपये द्यावे, संगणक परिचालकांचे मागील एप्रिल २०१७ ते जुलै २०१९ पर्यंतचे सर्व थकीत मानधन देणे आदि मागण्या करण्यात आल्या आहेत. यावेळी संघटनेचे तालुका अध्यक्ष शांताराम बेंडकुळे, हिरामण बेंडकुळे, निशांत डंबाळे, विनायक सूर्यवंशी, कैलास मोंढे, लहानू कचरे, राहुल पारधी, अनिल अवचट उपस्थित होते.छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान (शेतकरी कर्जमाफी) योजनेचे मानधन देणे, प्रधानमंत्री आवास योजना-ग्रामीणचे आॅनलाइन सर्व्हे केलेले मानधन मिळावे, नोटीस न देता कामावरून कमी केलेल्या संगणक परिचालकांना परत कामावर घ्यावे आदी मागण्या करण्यात आल्या आहेत.

टॅग्स :Governmentसरकारgram panchayatग्राम पंचायत