शहरं
Join us  
Trending Stories
1
केंद्र सरकारने अचानक जातीय जनगणनेचा निर्णय का घेतला? काँग्रेसचा सवाल...
2
“शेतकऱ्यांना विमा कवच आवश्यक, नवा पॅटर्न अन्यायकारक, योजना पहिल्यासारखी सुरु ठेवा”: सपकाळ
3
केवळ अजित पवारच नव्हे, शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडूनही मोदी सरकारच्या निर्णयाचं स्वागत
4
'फक्त एकाला मारणार, जो लाखांच्या...!'; लॉरेंस बिश्नोई गँगची पाकला धमकी, कुणावर निशाणा?
5
गुरुवारी विनायक चतुर्थी: ५ मिनिटे लागतील, स्वामी-बाप्पा कृपा करतील; ‘हे’ मंत्र-श्लोक म्हणाच
6
BREAKING: देशात जातिनिहाय जनगणना होणार; केंद्रातील मोदी सरकारचा मोठा निर्णय
7
'या' स्फूर्तिदायी काव्यरचनांमधून द्या महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा आणि शेअर करा आकर्षक शुभेच्छा पत्रं!
8
"CSKला धोनीची गरज नाही, संघाच्या भविष्यासाठी..."; MSD ज्याला आदर्श मानतो, त्यानेच मांडलं रोखठोक मत
9
विनायक चतुर्थी: गणपती पूजनात ‘या’ गोष्टी हव्यातच, कसे कराल व्रत? पाहा, सोपी पद्धत अन् मान्यता
10
विनायक चतुर्थी: ६ राशींना अनुकूल, अडकलेले पैसे मिळतील; नोकरीत पदोन्नती, बाप्पा चांगलेच करेल!
11
"PM मोदींना लष्कराला फ्री हॅन्ड देण्याचा अधिकारच नाही, तो तर..."; प्रकाश आंबेडकरांचं थेट कायद्यावर बोट
12
IPL 2025 : कुलदीप-रिंकू यांच्यात नेमकं काय घडलं? खरी गोष्ट आली समोर (VIDEO)
13
मैत्रिणीचे लग्न आटोपून घरी येताना अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार, ९ जणांना अटक
14
जातिनिहाय जनगणना होणार, मोदींनी राहुल गांधींच्या हातून मोठा मुद्दा हिसकावला, असे आहेत फायदे तोटे  
15
"सुप्रीम कोर्टाच्या आदेशाने गुन्हा दाखल झालेल्या मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचा राजीनामा कधी घेणार?’’ काँग्रेसचा सवाल 
16
IPL 2025: रोबोट कुत्र्यामुळे BCCI अडचणीत, उच्च न्यायालयाकडून मिळाली नोटीस, पण कशासाठी?
17
देवेंद्र फडणवीसांच्या लेकीला दहावीत 92 टक्के; 'वर्षा'मध्ये गृहप्रवेश केल्यावर अमृता फडणवीसांनी दिली आनंदाची बातमी
18
'अब तो नाम पूछना ही पडेगा...'; भोपाळमध्ये विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलानं लावले पोस्टर!
19
काय सांगता? 'असं' चालाल तर नक्कीच लवकर वजन कमी कराल; होतील फायदेच फायदे

संगणक परिचालक संघटना आक्र मक पंचायत समिती समोर धरणे आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 28, 2019 18:00 IST

पेठ : संग्राम व आपले सरकार सेवा या प्रकल्पाचा माध्यमातून मागील ८ वर्षापासून महाराष्ट्रातील ग्रामीण जनतेला भरपूर सेवा देऊन डिजिटल महाराष्ट्र साकार करण्याचे काम संगणक परिचालक प्रामाणिकपणे करत आहेत. तरी डिजिटल महाराष्ट्र करणाऱ्या संगणक परिचालक यांना वाºयावर सोडले असून प्रत्येक ग्रामपंचायत, पंचायत समिती व जिल्हा परिषद निर्णयाकडे वारंवार दुर्लक्ष केले आहे. यामूळे बेमुदत कामबंद आंदोलन छेडूनही शासन दखल घेत नसल्याने राज्यातील सर्व पंचायत समिती समोर एक दिवशीय धरणे आंदोलन करण्यात आले.

ठळक मुद्दे राज्यातील सर्व पंचायत समिती समोर एक दिवशीय धरणे आंदोलन

पेठ : संग्राम व आपले सरकार सेवा या प्रकल्पाचा माध्यमातून मागील ८ वर्षापासून महाराष्ट्रातील ग्रामीण जनतेला भरपूर सेवा देऊन डिजिटल महाराष्ट्र साकार करण्याचे काम संगणक परिचालक प्रामाणिकपणे करत आहेत. तरी डिजिटल महाराष्ट्र करणाऱ्या संगणक परिचालक यांना वाºयावर सोडले असून प्रत्येक ग्रामपंचायत, पंचायत समिती व जिल्हा परिषद निर्णयाकडे वारंवार दुर्लक्ष केले आहे. यामूळे बेमुदत कामबंद आंदोलन छेडूनही शासन दखल घेत नसल्याने राज्यातील सर्व पंचायत समिती समोर एक दिवशीय धरणे आंदोलन करण्यात आले.संगणक परिचालक यांनी पंचायत समिती आवारात ठाण मांडत घोषणाबाजी केली. ग्रामसेवक युनियनचे अध्यक्ष बाळू खंबाईत, उपसभापती तुळशीराम वाघमारे, माजी उपसभापती महेश टोपले, अखिल भारतीय आदिवासी विकास परिषद राज्य कार्याध्यक्ष गणेश गवळी आदिंनी आंदोलन स्थळी भेट देऊन चर्चा केली. गटविकास अधिकारी अनिल नागणे यांनी संगणक परिचालक यांच्याशी चर्चा करून समस्या जाणून घेतल्या. याप्रसंगी अध्यक्ष प्रकाश महाले, सचिव मंगेश गवळी, शैलेश राऊत यांचे सह संगणक परिचालक उपस्थित होते.आम्ही २०११ पासून संगणक परिचालक म्हणून काम करत आहोत. आणि डिजिटल इंडिया साकार करणारे आम्ही खरे शिलेदार आहोत. म्हणून शासनाने आश्वासन न देता निर्णय घेऊन आम्हाला लवकर आयटी महामंडळात घ्यावे. अन्यथा आंदोलनाची तीव्रता वाढवण्यात येईल.- मंगेश गवळी, सचिव,संगणक परिचालक संघटना, पेठ.संगणक परिचालक यांचा प्रमुख मागण्या - राज्यातील सर्व ग्रामपंचायत, पंचायत समिती, जिल्हा परिषद परिचालक यांना आय. टी महामंडळाकडून संगणक परिचालक म्हणून कायम नियुक्ती देणे.सर्व संगणक परिचालक यांचे मानधन १४ वित्त आयोगातून न देता राज्य शासनाचा निधीतून प्रती महिना किमान १५००० वेतन देण्यात यावे. सर्व संगणक परीचालकांचे २०१७ ते जुलै २०१९ पर्यंतचे सर्व थकीत मानधन देणे. रिम व टोनर प्रत्येक महिन्याला मिळणे.