शहरं
Join us  
Trending Stories
1
मतदार याद्यांचा घोळ कायम, बिहारच्या उपमुख्यमंत्र्यांच्याच नावे २ व्होटर कार्ड; तेजस्वी यादव यांनी केली पोलखोल
2
ना अमेरिकन F-35, ना रशियन Su-57...; या मित्र देशाकडून लढाऊ विमाने खरेदी करून आणखी ताकद वाढवणार भारत! IAF ची मोठी मागणी
3
FD-RD सर्व विसराल; हा आहे LIC चा ‘तरुण’ प्लान; आयुष्यभर पडेल पैशांचा पाऊस, टेन्शचा होईल The End
4
आजचे राशीभविष्य, ११ ऑगस्ट २०२५: विविध लाभ, मान-सन्मानाचा दिवस; संयम राखा, शांत राहा
5
नेत्यांना घेऊन जाणाऱ्या एअर इंडियाच्या विमानाचे आपत्कालीन लँडिंग; खासदार म्हणाले - आम्ही थोडक्यात बचावलो!
6
मंगळवारी श्रावण अंगारक संकष्ट चतुर्थी: ६ राशींना कल्याण काळ, अनपेक्षित लाभ; आर्थिक भरभराट!
7
१८७७ गावांमध्ये पूर, घराघरांत शिरलं पाणी, ६ लाख बाधित; 'या' राज्यात पावसाचा कहर सुरूच!
8
श्रावण संकष्ट चतुर्थी: यशोदामातेने केले होते व्रत, इच्छा होतील पूर्ण; यंदा विशेष अंगारक योग
9
भारत जगात सर्वांत वेगाने वाढणारी अर्थव्यवस्था; ट्रम्प यांच्या 'डेड इकॉनॉमी'ला अप्रत्यक्ष उत्तर
10
शरद पवारांनी निवडणूक आयोग-पोलिसांकडे तक्रार का केली नाही? : फडणवीस
11
गरज पडल्यास कबुतरखान्यासाठी शस्त्र उचलणार; जैन मुनी नीलेशचंद्र विजय यांच्या वक्तव्याने नवा वाद
12
लोकसभेच्या ४८ जागा, ५० हजारांपेक्षा कमी फरक; २०१९ च्या सार्वत्रिक निवडणुकीवर काँग्रेसचा मोठा दावा
13
'ओबीसी समाज श्रीमंत मराठ्यांविरोधात जाऊ नये, हाच शरद पवारांच्या मंडळ यात्रेचा हेतू'; प्रकाश आंबेडकरांचा टोला
14
'मतचोरी' विरोधात इंडिया आघाडीचे उद्या शक्तिप्रदर्शन, राहुल गांधींच्या नेतृत्वाखाली खासदार संसदेपासून निवडणूक आयोगाच्या कार्यालयापर्यंत मोर्चा काढणार
15
Rahul Gandhi : राहुल गांधींसमोरील अडचणी वाढणार? शकुन राणीला 'डबल व्होटर' म्हणून फसले; आयोगाने बजावली नोटीस
16
'बुडायला लागलो तर अर्धे जग सोबत घेऊन जाणार'; पाकिस्तानची भारताला पुन्हा अणु हल्ल्याची धमकी!
17
रामदास आठवले महाराष्ट्र भाजपवर नाराज; थेट पीएम मोदींकडे केली तक्रार, कारण काय?
18
ब्रिटनच्या F-35B विमानामागचं शुक्लकाष्ठ सुटेना, आता या देशात करावं लागलं आपातकालीन लँडिंग
19
मनी लॉंड्रिंगप्रकरणी रॉबर्ट वाड्रांच्या अडचणीत वाढ; दोन कंपन्यांद्वारे ५८ कोटी रुपये कमावल्याचा आरोप
20
"जेव्हा देशासाठी निवड होते, तेव्हा..."; मराठमोळ्या 'वर्ल्ड चॅम्पियन'ने जसप्रीत बुमराहला सुनावलं

साहित्य संमेलन अध्यक्ष निवड निर्णयाचे संमिश्र स्वागत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 3, 2018 00:57 IST

अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षाची निवड निवडणूक न घेता समितीच्या चर्चेतूनच एकमताने करण्याचा निर्णय घेण्यात आला असून, त्याचे साहित्य वर्तुळातून स्वागत केले जात आहे.

नाशिक : अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षाची निवड निवडणूक न घेता समितीच्या चर्चेतूनच एकमताने करण्याचा निर्णय घेण्यात आला असून, त्याचे साहित्य वर्तुळातून स्वागत केले जात आहे. मात्र ही प्रक्रिया कशी राबविली जाईल, ती दोषमुक्त असेल का? तिचे परिणाम सकारात्मक असतील का? याबाबत साशंकता व्यक्त केली जात आहे. साहित्य संमेलनासारख्या मोठ्या सोहळ्याला तितक्याच ताकदीचा अध्यक्ष लाभणे महत्त्वाचे आहे, अशी अपेक्षाही व्यक्त केली जात आहे.अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदासाठी निवडणूक घेण्याऐवजी तो सन्मानाने निवडला जावा असा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आल्यानंतर राज्यभरात यासंबंधी उलटसुलट चर्चा सुरू झाली. या पार्श्वभूमीवरसाहित्यक्षेत्रातील मान्यवरांनी मतेमतांतरे व्यक्त केली.घटनात्मक बदलाचे काय?महामंडळाने हा निर्णय घेतला असला तरी त्याला अंतिम स्वरूप देण्यासाठी घटक संस्था, मुख्य संस्था यांची मान्यता व पाठिंबा लागणार आहे. त्यानंतर साहित्य संमेलन अध्यक्षपद निवडीबाबत घटना दुरुस्ती करावी लागेल. त्याला धर्मदाय संस्थेकडून अंतिम मान्यता मिळवावी लागेल. ही सारी प्रक्रिया पार पडण्यासाठी किती कालावधी लागेल हेदेखील महत्त्वाचे आहे. पण ही पद्धत लागू झाल्यास साहित्य संमेलनाची लांबलचक प्रक्रिया सुलभ होऊ शकेल.‘या’ आहेत साहित्य संमेलनातील सहभागी घटक संस्थाअखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन पार पाडण्यात देशभरातील अनेक संस्थांची महत्त्वाची भूमिका असते. त्यांचे योगदान परिणामकारक असते. यात महाराष्टÑ साहित्य परिषद पुणे; मराठवाडा साहित्य परिषद, औरंगाबाद; मुंबई मराठी साहित्य संघ, मुंबई; विदर्भ मराठी साहित्य परिषद, विदर्भ या मुख्य संस्था व गुजरात, गुलबर्ग, गोवा, छत्तीसगड अशा दहाच्या वर संलग्न संस्था या प्रक्रियेत सहभागी असतात. या सर्व संस्थांच्या प्रतिनिधींना एकमताने आता अध्यक्ष जाहीर करावा लागणार आहे.

टॅग्स :literatureसाहित्य