शहरं
Join us  
Trending Stories
1
'मला आवडतो पाकिस्तान, पण मोदी महान'; मुनीर भेटीदरम्यान काय म्हणाले डोनाल्ड ट्रम्प?
2
Maruti Chitampalli Death: 'अरण्यऋषी' मारुती चितमपल्ली यांचे निधन; वयाच्या ९३व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
3
कोण होते मारुती चितमपल्ली? जाणून घ्या त्यांचा जीवनप्रवास व दिनचर्या
4
मराठी साहित्य संपदा समृद्ध करणारा अरण्यऋषी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ज्येष्ठ साहित्यिक मारूती चितमपल्ली यांना श्रद्धांजली
5
Pune Crime News: लिपस्टिकने चिठ्ठी लिहिली अन् विवाहितेने चिमूरड्यासह पाचव्या मजल्यावरून स्वतःला झोकून दिलं
6
Viral Video : कशासाठी तो हट्ट? चिमुकल्याला सिंहाच्या पाठीवर बसवत होता बाबा, पुढे जे झालं ते बघाच... 
7
अमेरिका शेवटी विश्वासघातकीच! सोबत लढता लढता मध्येच या सैन्याला त्यांच्या नशिबावर सोडले 
8
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
9
Jejuri Accident : जेजुरी मोरगाव रोडवर भीषण अपघात;आठ ठार, पाच गंभीर जखमी
10
"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!
11
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
12
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
13
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
14
“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?
15
Sonam Raghuvanshi : "आम्ही कोणतंही पाप केलेलं नाही..."; नार्को टेस्टच्या मागणीवर सोनम रघुवंशीचा भाऊ संतापला
16
“काँग्रेस दिशाहीन पक्ष”; CM फडणवीसांच्या उपस्थितीत जयश्रीताई पाटील यांचा भाजपा प्रवेश
17
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
18
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
19
"राजा भाई तुम तो गए...!" ...अन् अँकर गमतीत बोलला, ते खरं ठरलं; बघा संपूर्ण VIDEO 
20
जेव्हा James Bond चित्रपट सत्यात उतरतो; पहिल्यांदाच MI6 चे नेतृत्व एका महिलेकडे...

साहित्य संमेलन अध्यक्ष निवड निर्णयाचे संमिश्र स्वागत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 3, 2018 00:57 IST

अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षाची निवड निवडणूक न घेता समितीच्या चर्चेतूनच एकमताने करण्याचा निर्णय घेण्यात आला असून, त्याचे साहित्य वर्तुळातून स्वागत केले जात आहे.

नाशिक : अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षाची निवड निवडणूक न घेता समितीच्या चर्चेतूनच एकमताने करण्याचा निर्णय घेण्यात आला असून, त्याचे साहित्य वर्तुळातून स्वागत केले जात आहे. मात्र ही प्रक्रिया कशी राबविली जाईल, ती दोषमुक्त असेल का? तिचे परिणाम सकारात्मक असतील का? याबाबत साशंकता व्यक्त केली जात आहे. साहित्य संमेलनासारख्या मोठ्या सोहळ्याला तितक्याच ताकदीचा अध्यक्ष लाभणे महत्त्वाचे आहे, अशी अपेक्षाही व्यक्त केली जात आहे.अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदासाठी निवडणूक घेण्याऐवजी तो सन्मानाने निवडला जावा असा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आल्यानंतर राज्यभरात यासंबंधी उलटसुलट चर्चा सुरू झाली. या पार्श्वभूमीवरसाहित्यक्षेत्रातील मान्यवरांनी मतेमतांतरे व्यक्त केली.घटनात्मक बदलाचे काय?महामंडळाने हा निर्णय घेतला असला तरी त्याला अंतिम स्वरूप देण्यासाठी घटक संस्था, मुख्य संस्था यांची मान्यता व पाठिंबा लागणार आहे. त्यानंतर साहित्य संमेलन अध्यक्षपद निवडीबाबत घटना दुरुस्ती करावी लागेल. त्याला धर्मदाय संस्थेकडून अंतिम मान्यता मिळवावी लागेल. ही सारी प्रक्रिया पार पडण्यासाठी किती कालावधी लागेल हेदेखील महत्त्वाचे आहे. पण ही पद्धत लागू झाल्यास साहित्य संमेलनाची लांबलचक प्रक्रिया सुलभ होऊ शकेल.‘या’ आहेत साहित्य संमेलनातील सहभागी घटक संस्थाअखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन पार पाडण्यात देशभरातील अनेक संस्थांची महत्त्वाची भूमिका असते. त्यांचे योगदान परिणामकारक असते. यात महाराष्टÑ साहित्य परिषद पुणे; मराठवाडा साहित्य परिषद, औरंगाबाद; मुंबई मराठी साहित्य संघ, मुंबई; विदर्भ मराठी साहित्य परिषद, विदर्भ या मुख्य संस्था व गुजरात, गुलबर्ग, गोवा, छत्तीसगड अशा दहाच्या वर संलग्न संस्था या प्रक्रियेत सहभागी असतात. या सर्व संस्थांच्या प्रतिनिधींना एकमताने आता अध्यक्ष जाहीर करावा लागणार आहे.

टॅग्स :literatureसाहित्य