शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्यावरून राज ठाकरे संतप्त, केंद्राला म्हणाले, "दहशतवाद्यांच्या पुढच्या १० पिढ्यांचा थरकाप उडेल असा...’’,   
2
काश्मिरात अतिरेकी हल्ला, २८ ठार; 'टार्गेट किलिंग'मध्ये महाराष्ट्रातील पर्यटकांचाही समावेश
3
UPSC Result : वडिलांचे छत्र हरपले तरी साेडली नाही जिद्द; पुण्यात राहून घेतली ‘यूपीएससी’त झेप
4
भाजपाच्या केंद्रीय नेतृत्वानं टाकला नवा बॉम्ब; आजी-माजी आमदार, खासदारांना दणका
5
UPSC Result : निरक्षर आईने दाखविला यूपीएससीचा मार्ग;डाॅ. अक्षय मुंडे याची यशाला गवसणी
6
अहिल्यानगरमधील चोंडीतील मंत्रिमंडळ बैठक पुढे ढकलली; नवी तारीख कोणती?
7
Todays Horoscope : आज आर्थिक गुंतवणूक विचारपूर्वक करा; जाणून घ्या तुमचे राशीभविष्य
8
वाह रे पठ्ठया...! २२ व्या वर्षीच झाला आयएएस; पुण्याच्या शिवांशचं पहिल्याच प्रयत्नात यश
9
रुपचंदानी कुटुंबीय पहलगाममध्ये सुखरूप; काळजीनं नातेवाईकांचा जीव लागला होता टांगणीला
10
जम्मू- काश्मीरच्या पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यात पुण्यातील दोघे जखमी
11
'यूपीएससी'त पुण्याचा अर्चित डोंगरे तिसरा; राज्यातील ९५ विद्यार्थ्यांनी घातली यशाला गवसणी
12
पोप फ्रान्सिस यांच्या निधनामुळे कर्मयोगी जवाहरलाल दर्डा यांच्या पुतळ्याचे अनावरण स्थगित
13
KL राहुलचं एकदम कूल सेलिब्रेशन! मग संजीव गोयंका यांच्या हातात हात दिला; पण... (VIDEO)
14
मत्स्य व्यवसायाला कृषी समकक्ष दर्जा, मंत्रिमंडळाचा निर्णय; मच्छीमारांना ६ हजाराचा लाभ मिळणार
15
भिसेंवर उपचार करणाऱ्या डॉक्टरांची होणार चौकशी; महाराष्ट्र मेडिकल कौन्सिलचा निर्णय
16
एक मंदिर, एक विहीर, एक स्मशान...डॉ. भागवतांच्या संप्रदायाला ही एकता समजली तरी खूप बरे होईल
17
गुलफिशा फातिमाने तुरुंगात खितपत का पडावे?; २ वर्ष उलटली तरी जामीन नाही  
18
महानगरांमध्ये अघोषित पाणीबाणी लागू; तहान भागत नाही?, निमूट पैसे मोजा, टँकर मागवा!
19
अवघ्या ७७ चौरस फुटाच्या घरात राहते युवती; इवल्याशा खोलीनं संपवला जीवनातील संघर्ष
20
आदिवासी भागातून UPSC परीक्षेत यश मिळवणारे पहिलेच युवक; इंटरनेटवरील व्हिडीओद्वारे केला अभ्यास

बॅँक विलीनीकरणाबाबत संमिश्र प्रतिक्रिया

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 31, 2019 00:56 IST

केंद्र सरकारने जाहीर केलेले १० बॅँकांचे विलीनीकरण हे फायद्याचे आहे, असे मत काहींनी व्यक्त केले तर ही कृती म्हणजे भांडवलशाही आणण्याचा घाट असल्याचीही प्रतिक्रिया व्यक्त झाली आहे.

नाशिक : केंद्र सरकारने जाहीर केलेले १० बॅँकांचे विलीनीकरण हे फायद्याचे आहे, असे मत काहींनी व्यक्त केले तर ही कृती म्हणजे भांडवलशाही आणण्याचा घाट असल्याचीही प्रतिक्रिया व्यक्त झाली आहे.केंद्र सरकारने सार्वजनिक क्षेत्रातील १० बॅँकांचे विलीनीकरण करून चार बॅँका निर्माण करण्याच्या जाहीर केलेल्या निर्णयावर बॅँकिंग क्षेत्रामध्ये याची संमिश्र प्रतिक्रिया उमटली असली तरी यामधून उद्योगांना अधिक फायदा होण्याची शक्यताही व्यक्त झाली आहे.देशामधील बॅँकिंग क्षेत्र उद्ध्वस्त करणारा हा निर्णय आहे. बॅँकांमधील वाढता एनपीए झाकण्याचा सरकारचा हा प्रयत्न आहे. यामुळे ग्रामीण भागातील नागरिकांना बॅँकेच्या सेवा मिळण्यामध्ये अडचणी निर्माण होतील. कर्मचारी संघटनांनी या निर्णयाला यापूर्वीही विरोध केला आहे. यामुळे कर्मचारी कपात होण्याचा धोकाही आहे. याआधी आरबीआयचा निधी घेतला आणि बॅँकांवर आता गंडांतर येत आहे.- डॉ. डी. एल. कराड, कामगार नेतेसन २००८-०९ मध्ये आलेल्या जागतिक मंदीची झळ भारताला फारशी बसली नव्हती याचे श्रेय सार्वजनिक क्षेत्रातील बॅँकांना आहे; मात्र आता सरकार सार्वजनिक क्षेत्रातील बॅँकांनाच मोडीत काढण्याचा प्रयत्न करीत आहे. यासाठी सरकारने बॅँकांचे व्यवस्थापन, कर्मचारी संघटना यांना विश्वासात घेतलेले नाही. परिणामी कर्मचारी कपातीचे संकट उभे ठाकणार आहे. या निर्णयाविरोधात शनिवारी सार्वजनिक क्षेत्रातील बॅँकांचे सर्व कर्मचारी काळ्या फिती लावून आपला निषेध व्यक्त करणार आहेत.- शिवा भामरे, उपमहासचिव,स्टेट बॅँक कर्मचारी युनियनदहा बँकांच्या विलीनीकरणाच्या या निर्णयामुळे कमकुवत बॅँकांना मजबूत बॅँकांचा आधार मिळणार आहे. यामुळे या बॅँकांकडून होणारा पतपुरवठा हा सुरळीत होऊ शकेल. तसेच त्यांचा एनपीए कमी होऊ शकेल. याआधी झालेल्या विलीनीकरणाचे सकारात्मक परिणाम दिसलेले नाहीत. सरकारच्या या प्रयत्नांना व्यवस्थापन आणि कर्मचारी यांनी साथ देऊन व्यवस्थित अंमलबजावणी करावी.- संतोष मंडलेचा, अध्यक्ष, महाराष्ट चेंबर आॅफ कॉमर्स

टॅग्स :Central Governmentकेंद्र सरकारBanking Sectorबँकिंग क्षेत्र