शहरं
Join us  
Trending Stories
1
शशी थरूर भाजपात जाणार? काँग्रेस २३ जूनला मोठा निर्णय घेणार
2
Tejasvi Ghosalkar: "उद्धव ठाकरे माझे कुटुंबप्रमुख, मी अजूनही...", बँकेचं संचालकपद मिळाल्यानंतर तेजस्वी घोसाळकरांचं स्पष्टीकरण
3
ICICI ला HDFC चं अधिग्रहण करायचं होतं, चंदा कोचर यांच्यासमोर दीपक पारेखांनी उघडलं गुपित
4
विमान अपघातानंतर ९ दिवसांनी दीपक पठक यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार
5
तेरी दिवानी...! शुबमन गिलच्या सेंच्युरीनंतर फॅन गर्लचा तो खास व्हिडिओ व्हायरल
6
पत्नीची हत्या करून मृतदेह घराबाहेर पुरला, पोलीस आणि नातेवाईकांना असा दिला चकवा, दोन महिने सांगायचा...  
7
Air India Plane Crash: नव्या पाहुण्याचं स्वागत करण्याआधीच सगळं संपलं; ७ महिन्याची गर्भवती होती जिनल
8
Iran Israel युद्घात अजब चोरी; इस्रायली हॅकर्सनं ८०० कोटींची क्रिप्टोकरन्सी केली नष्ट, प्रकरण काय?
9
Yogini Ekadashi 2025: एखाद्या व्यक्तीने दिलेला शाप योगिनी एकादशी व्रताचरणामुळे होतो दूर!
10
खळबळ उडाली! जीन्स अन् टॉपमध्ये दिसू लागल्या हायफाय भिकारी, लोक १००-२०० रुपये देऊ लागले... 
11
Beed Crime News : बीडमध्ये पैशांसाठी अपहरण, मुलासाठी ५० हजार रुपयांची मागणी; नेमकं प्रकरण काय?
12
चीन-पाकिस्तानचं वाढणार टेन्शन; भारताला लवकरच मिळणार हायटेक्निक मिसाईल, कसं करणार काम?
13
हास्यास्पद! पाऊस पडतोय म्हणून नाही आणले...; एअर इंडियाची दोन विमाने लगेज न घेताच आली
14
"इराण भारताचा जुना मित्र, दुसरीकडे इस्त्रायल..."; मध्य पूर्वेतील युद्धावर सोनिया गांधी स्पष्ट बोलल्या
15
Air India :'या' तीन कर्मचाऱ्यांना तात्काळ बडतर्फ करा'; अहमदाबाद विमान अपघातानंतर एअर इंडियाला डीजीसीएचे आदेश
16
"संपूर्ण युक्रेन आमचा..."; पुतिन यांनी झेलेन्स्की यांच्या संपूर्ण देशावरच ठोकला दावा! मिळालं असं उत्तर
17
ऑफिसला न जाताच कर्मचाऱ्याला मिळाले २६ लाख रुपये; कोर्टाने दिला मोठा निर्णय
18
"मी इनसाइडर असते तर बरं झालं असतं", इंडस्ट्रीतील स्ट्रगलवर लोकप्रिय अभिनेत्रीची क्रिप्टिक पोस्ट
19
"गोयंकाजी पाहताय ना?’’, इंग्लंडमध्ये पंतच्या फटकेबाजीनंतर फॅन्सनी घेतली लखनौच्या मालकांची शाळा  
20
हनीमुनचा प्लॅन, रसगुल्लामध्ये विष भरले अन्...; बेवफा सोनमपेक्षाही खतरनाक आहे खूनी 'मुस्कान'

उशिरापर्यंत दुकाने सुरू राहत असल्याची तक्रार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 4, 2021 04:15 IST

नाशिक : वाढत्या उष्णतेमुळे भाजीपाल्याची आवक कमी झाल्याने पालेभाज्यांच्या दरात मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. उन्हामुळे भाजीपाला उत्पादनावर परिणाम ...

नाशिक : वाढत्या उष्णतेमुळे भाजीपाल्याची आवक कमी झाल्याने पालेभाज्यांच्या दरात मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. उन्हामुळे भाजीपाला उत्पादनावर परिणाम झाला आहे. याशिवाय यापूर्वी झालेल्या पावसानेही काही प्रमाणात पालेभाज्यांचे नुकसान झाले असल्याने, आवकेवर त्याचा परिणाम झाला आहे. मागणी कायम असल्याने सध्या कोथिंबिरीला चांगला दर मिळत आहे. सर्वसामान्यांना मात्र आर्थिक भुर्दंड सहन करावा लागत आहे.

वाढत्या रुग्णसंख्येमुळे नागरिकांत चिंता

नाशिक : कोरोना रुग्णांच्या संख्येत दिवसागणिक झपाट्याने वाढ होत असल्याने सर्वसामान्यांमध्ये चिंता व्यक्त केली जात आहे. बाजारपेठांमध्ये होणारी गर्दी कमी करण्यासाठी शासनाने कडक निर्बंध घालावेत. मात्र, लॉकडाऊन करू नये, अशी मागणी करण्यात येत आहे. विशिष्ट वेळेतच बाजारपेठ सुरू ठेवल्यास त्याचा परिणाम होऊ शकतो. यासाठी उपाययोजना कराव्यात, अशी मागणी करण्यात येत आहे.

बाजार समित्या बंद असल्याने उलाढाल मंदावली

नाशिक : मार्च अखेरमुळे जिल्ह्यातील बाजार समित्यांचे कामकाज मागील चार-पाच दिवसांपासून बंद असल्यामुळे या बाजारपेठांमध्ये दररोज होणारी लाखो रुपयांची उलाढाल ठप्प झाली आहे. यामुळे शेतकऱ्यांना आर्थिक समस्यांना सामोरे जावे लागत आहे. अनेकांचे लेट खरिपातील कांदे काढून पडले आहेत. मात्र, बाजार बंद असल्याने त्यांना ते विकता येत नाहीत. यासाठी त्यांना बाजार समित्या सुरू होण्याची वाट पाहावी लागणार आहे.

खंडित वीजपुरवठ्यामुळे नाराजी

नाशिक : ऐन उन्हाळ्यात वीजपुरवठा खंडित होण्याचे प्रमाण वाढल्याने नागरिकांमध्ये नाराजी व्यक्त केली जात आहे. उकाड्याने त्रस्त नागरिकांना वीजपुरवठा खंडित झाल्यानंतर अनेक गैरसोयींचा सामना करावा लागतो. राज्य वीज वितरण कंपनीने वीजपुरवठा सुरळीत करावा, अशी मागणी त्रस्त ग्राहकांनी केली आहे.

भुरट्या चोऱ्यांच्या घटना वाढल्याने चिंता

नाशिक : शहरात भुरट्या चोऱ्यांच्या संख्येत मोठ्या प्रमाणात वाढ झाली असून, यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. महिलांना पायी चालने मुश्कील झाले आहे. सोनसाखळी चोरीच्या अनेक घटना घडूनही, त्याकडे पोलिसांकडून दुर्लक्ष केले जात असल्याने नाराजी व्यक्त होत असून, पोलिसांनी भुरट्या चोरांचा बंदोबस्त करावा, अशी मागणी करण्यात येत आहे.

परीक्षांबाबत पालक चिंतित

नाशिक : चालू शैक्षणिक वर्षात शाळा काही दिवस सुरू झाल्याने, आता शासन विद्यार्थ्यांची परीक्षा कशी घेणार, याबाबत पालकांमध्ये तर्कवतर्क केले जात आहेत. शिक्षण विभागाने याबाबत अद्याप भूमिका स्पष्ट केलेली नसल्याने नाराजी व्यक्त केली जात आहे. परीक्षांबाबत काय निर्णय होतो, याकडे विद्यार्थ्यांसह पालकांचे लक्ष लागले आहे.

काही दुकानदारांकडून नियमांचे पालन

नाशिक : कोरोनाचा प्रादुर्भाव वाढल्याने, अनेक दुकानदारांकडून नियमांचे पालन करण्यावर भर दिला जात असून, मास न लावता दुकानात शिरलेल्या ग्राहकाला प्रथम मास्क लावण्यास सांगितले जात असल्याचे दिसून येत आहे. महापालिकेकडून करण्यात येणाऱ्या दंडवसुलीचा हा परिणाम असून, दुकानदारांना दंड केला असल्याने अनेकांनी या बाबीचा धसका घेतला आहे.

बाजार बंद असल्याने अर्थकारणाला खीळ

नाशिक : गावोगावचे आठवडेबाजार बंद असल्यामुळे अनेक गावांमधील अर्थकारणाला खीळ बसली आहे. आठवडे बाजाराच्या निमित्ताने होणारी उलाढाल मंदावली आहे. यामुळे ग्रामीण भागातील नागरिकांना आर्थिक समस्यांचा सामना करावा लागत आहे. अनेक गावांमध्ये मोठ्या प्रमाणात आठवडेबाजार भरत असतो.

रस्त्यांची कामे पूर्ण करण्याची मागणी

नाशिक : महापालिकेच्या वतीने शहरातील विविध भागांत रस्त्यांची कामे हाती घेण्यात आली आहेत. यामुळे रस्ते खोदले आहेत, ही कामे अनेक दिवस रेंगाळत असल्याने, नागरिकांना त्याचा त्रास सहन करावा लागतो. रस्त्यांची कामे लवकरात लवकर पूर्ण करावीत, अशी मागणी परिसरातील नागरिकांकडून करण्यात येत आहे.