शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

तालुक्यातील ५८६८ शेतकऱ्यांसाठी १ कोटी ४३ लाख रुपयांची नुकसानभरपाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 29, 2020 01:01 IST

कळवण : तालुक्यात १२ ते १४ ऑगस्ट २०२० रोजी झालेल्या अवकाळी व अतिवृष्टीमुळे मका, बाजरी, सोयाबीन व इतर शेतीमालाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. ९० गावातील ५८६८ शेतकऱ्यांना शासनाकडून १ कोटी ४३ लाख ४६ हजार रुपयांची नुकसानभरपाई मंजूर झाली असून, पीक पंचनामे करताना शेतकऱ्यांचे बँक खाते क्रमांक घेण्यात आले असल्यामुळे भरपाईची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार असल्याची माहिती आमदार नितीन पवार यांनी दिली.

ठळक मुद्देकळवण : आमदार नितीन पवार यांची माहिती; रक्कम होणार खात्यात जमा

कळवण : तालुक्यात १२ ते १४ ऑगस्ट २०२० रोजी झालेल्या अवकाळी व अतिवृष्टीमुळे मका, बाजरी, सोयाबीन व इतर शेतीमालाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. ९० गावातील ५८६८ शेतकऱ्यांना शासनाकडून १ कोटी ४३ लाख ४६ हजार रुपयांची नुकसानभरपाई मंजूर झाली असून, पीक पंचनामे करताना शेतकऱ्यांचे बँक खाते क्रमांक घेण्यात आले असल्यामुळे भरपाईची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार असल्याची माहिती आमदार नितीन पवार यांनी दिली.अवकाळी पावसामुळे १०७७३ शेतकऱ्यांच्या २८७५ हेक्टर क्षेत्रातील मका, बाजरी, सोयाबीन व इतर पिकांचे नुकसान झाले होते. त्यासाठी १ कोटी ९५ लाख ५१ हजार ३६० रुपये नुकसानभरपाईचा निधी मागणीचा प्रस्ताव शासनस्तरावर पाठवला होता. त्यापैकी पहिल्या टप्प्यात ९० गावांतील ५८६८ शेतकऱ्यांना १ कोटी ४३ लाख ४६ हजार ३६० रुपये नुकसानभरपाई प्राप्त झाला असून, दुसऱ्या टप्प्यात ६० गावांतील शेतकऱ्यांना नुकसानभरपाई मिळणार आहे, असे पवार यांनी सांगितले.तहसीलदार बी. ए. कापसे, उपविभागीय कृषी अधिकारी कैलास खैरनार, गटविकास अधिकारी डी. एम. बहिरम, तालुका कृषी अधिकारी विजय पाटील यांच्यासमवेत आमदार पवार यांनी बाधित गावांतील पिकांची पाहणी करून जिल्हाधिकारी सुरज मांढरे यांना नुकसानीची माहिती देत भरपाई देण्याची मागणी केली होती.सरकारकडे पाठपुरावा केल्यामुळे अभोणा, अंबापूर, अंबिका ओझर, अंबुर्डी (बु), अंबुर्डी (खुर्द), आमदर, आठंबे, बगडू, बालापूर, बार्डे, जुनी बेज, बेलबारे, बेंदीपाडा, भादवण, भगुर्डी, भाकुर्डे, भांडणे (हा ), भांडणे (पि), भेंडी, भुताने(दि), बिजोरे, बिलवाडी, बोरदैवत, चाचेर, चणकापूर, चिंचोरे, दह्याने (दि), दळवट आदी ९० गावातील ५८६८ शेतकऱ्यांसाठी राज्य सरकारकडून १ कोटी ४३ लाख ४६ हजार रुपये मंजूर झाले असून, ६० गावांतील शेतकऱ्यांची नुकसानभरपाई अद्याप बाकी आहे. 

टॅग्स :agricultureशेतीGovernmentसरकार