शहरं
Join us  
Trending Stories
1
'उद्यापासून सर्वांचे तोंड गोड होणार'; GST रिफॉर्मची पंतप्रधान मोदींकडून घोषणा, म्हणाले, 'नागरिक देवो भव'
2
जीएसटी कपातीच्या पूर्वसंध्येलाच घोषणा; MG Hector १.४९ लाख, Gloster  ३.०४ लाख तर Astor एवढ्या हजारांनी कमी झाली...
3
'९९% वस्तू ५% GST स्लॅबमध्ये येणार', PM मोदींनी सांगितले नवीन जीएसटी सुधारणांचे फायदे...
4
खोटी वचनं देऊन नर्सला प्रेमाच्या जाळ्यात ओढलं, लग्नाचा तगादा लावताच खरं रूप दाखवलं! ऐकून होईल संताप
5
२२ सप्टेंबरपासून 'या' वस्तूंच्या किमतीत कोणताही बदल नाही; तुमच्या यादीत आहे का?
6
जातीऐवजी आर्थिक निकषावरील आरक्षणाला सुप्रिया सुळेंचा पाठिंबा? नेमकं काय म्हणाल्या वाचा...
7
उद्यापासून अनेक वस्तू होणार स्वस्त! पाहा तुमच्या घरातील कोणत्या गोष्टींवर किती जीएसटी लागणार...
8
AUS vs IND : वैभव सूर्यवंशीचा ऑस्ट्रेलियात धमाका; हा फक्त ट्रेलर; पिक्चर अजून बाकी!
9
'महानायक' मोहनलाल; एका वर्षात दिले २५ ब्लॉकबस्टर चित्रपट, ५ वेळा मिळाला राष्ट्रीय पुरस्कार
10
भारताच्या शेजारील देश भूकंपाने हादरला; म्यानमारमध्ये ४.० तीव्रतेचा भूकंप, भारतावरही परिणाम?
11
शेअर्स आहे की पैशांचा पाऊस? 'या' ५ स्टॉक्सनी एकाच आठवड्यात दिले तब्बल ५५% रिटर्न!
12
१६ कोटींचा बंगला, चॉपर, दुबईच्या कंपनीत ३८ कोटी... ईडीच्या कारवाईत मोठं घबाड हाती, पोलिसांना कल्पनाच नाही
13
कोरोनापासून जगाला सावध करणाऱ्या चिनी पत्रकाराला पुन्हा तुरुंगवास; आधीच चार वर्षे भोगली शिक्षा..., आता पुन्हा
14
गुणरत्न सदावर्ते यांच्या गाडीवर हल्ला, आंदोलकांनी ताफा अडवल्याने उडाला गोंधळ; पोलिसांची धावपळ
15
YouTube वरून पैसे कमवायचे आहेत? मग ‘या’ महत्त्वाच्या अटी पूर्ण करा, लगेच सुरू होईल कमाई!
16
शुबमन गिल प्लेईंग ११ बाहेर बसणार, संजू सॅमसनला संधी? भारत-पाकिस्तान सामन्यापूर्वी मोठा बदल होण्याची शक्यता...
17
भारत-पाकिस्तान सामन्याच्या दिवशीच एकनाथ शिंदेंचे X अकाऊंट हॅक; राजकीय वर्तुळात खळबळ
18
आधार कार्डबाबतची 'ही' चूक केल्यास १० वर्षांचा तुरुंगवास! यूआयडीएआयने जारी केले कठोर नियम
19
Viral Video : चीनला पोहोचलेल्या भारतीय व्यक्तीने दाखवलं असं काही की पाहणारेही झाले थक्क! तुम्हीही कमाल बघाच
20
चिंता वाढली! एलियन्स, AI आणि तिसरे महायुद्ध; बाबा वेंगाची 2026 वर्षाबद्दल भविष्यवाणी काय?

मोबदला पूर्ण, सेवा मात्र अपूर्णच

By admin | Updated: July 21, 2016 21:44 IST

मनपा सिडको विभाग : प्रभागात घंटागाड्या फिरकतच नसल्याने नागरिकांमध्ये संताप

नरेंद्र दंडगव्हाळ सिडकोमहापालिकेच्या वतीने दैनंदिन कचरा गोळा करण्यासाठी नागरिकांच्या घरापर्यंत घंटागाडीची व्यवस्था करण्यात आली आहे. परंतु गेल्या काही महिन्यांपासून सिडको भागात घंटागाड्या एक दिवसाआड तर प्रभागात चार दिवसांनी फिरत आहेत. यातच आहे त्या घंटागाड्या धक्कास्टार्ट आहेत, तर काहींचे ब्रेक फेल असल्याने त्यांची दयनीय अवस्था झाली आहे. घंटागाड्यांची अशी परिस्थिती असल्याने ठेकेदारांना (न) केलेल्या कामांचा मोबदला पूर्ण दिला जात असला तरी त्यांच्याकडून सेवा मात्र अपूर्णच दिली जात असल्याचे दिसून येत आहे.सिडको प्रभागात ११ प्रभागांसाठी नागरिकांच्या घरोघरी जाऊन कचरा गोळा करण्यासाठी २२ घंटागाड्या असल्या तरी यातील बहुतांशी घंटागाड्यांची अवस्था बिकट झाली आहे. काही घंटागाड्यांचे ब्रेकच फेल आहेत, तर काहींचे टायरच खराब झालेले असून काही नादुरुस्त असल्याचे कारण देत प्रभागात फिरतच नाही. नादुरुस्त घंटागाड्यांचे ब्रेक व्यवस्थित करावे, नवीन बॅटऱ्या टाकून आरटीओ पासिंग करावी, याबाबत मनपाकडून संबंधित ठेकेदारास सांगण्यात येत असले तरी मात्र परिस्थिती ‘जैसे थे’च असल्याचे चित्र बघावयास मिळत आहे. काही महिन्यांपूर्वी घंटागाडीच्या चाकाखाली सापडून एका शाळकरी विद्यार्थ्याचा मृत्यू झाला. मात्र मनपाला जाग येत नसल्याने महिला व नागरिकांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे. अनेकदा घरातील शाळकरी मुलेदेखील कचरा टाकण्यासाठी जात असून, बे्रक फेल घंटागाडीमुळे एखादी दुर्घटना होण्याची शक्यता नाकारता येत नाही. स्वच्छ नाशिक, सुंदर नाशिक अशी संकल्पना मनपाकडून मांडण्यात येत असली तरी मनपाच्या सिडको भागातील आरोग्य विभागाचे कामकाज अत्यंत ढिसाळ व नियोजनशून्य असल्याचे दिसून येत आहे. सिडको भागात मुख्य रस्त्याबरोबरच ठिकठिकाणी कचरा साचलेला असतो. मनपा कर्मचारी हेदेखील वरवर कामकाज करीत असतानाही याकडे अधिकारी लक्ष देत नसल्याचे चित्र बघावयास मिळत आहे. गेल्या काही दिवसांपासून सिडको भागात अनियमित घंटागाड्यांमुळे नागरिक त्रस्त झाले आहेत. काही भागात घंटागाड्या फिरकतच नसून यामुळे नागरिकांना नाइलाजास्तव रस्त्यालगत कचरा फेकून द्यावा लागत आहे. तसेच झाडांचा पालापाचोळा हा घंटागाडीत टाकून घ्यावा, असे मनपाचे तत्कालीन आयुक्तांनी सांगितल्यानंतरही घंटागाडीवरंील चालक पालापाचोळा घेत नाही. मनपाने दैनंदिन कामकाजाव्यतिरिक्त आठवड्यातून एक दिवस पालापाचोळा उचलण्याची गरज असल्याचेही नागरिकांकडून बोलले जात आहे.