शहरं
Join us  
Trending Stories
1
नीरव मोदीच्या भारतातील प्रत्यार्पणाचा मार्ग मोकळा? लंडन हायकोर्टाने जामीन याचिका फेटाळली
2
अफगाणिस्तानने नोंदवला पहलगाम हल्ल्याचा निषेध; परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांच्याशी चर्चा
3
IPL 2025: लखनौच्या अडचणीत वाढ, दुखापतीमुळं मयांक यादव आयपीएलमधून बाहेर!
4
Shiv Sena: पहलगाम दहशतवादी हल्ल्यातील संशयितांची माहिती देणाऱ्याला १० लाख रुपयांचे बक्षीस
5
भारताचा तुर्कीला दणका, विमानतळांवर सेवा देणाऱ्या सेलेबी कंपनीची सुरक्षा मंजुरी केली रद्द!
6
बिहार दौऱ्यात राहुल गांधी यांच्याविरोधात दोन गुन्हे दाखल, पोलिसांनी शंभराहून अधिक जणांना केलं आरोपी
7
India Pakistan Ceasefire: "भारत-पाकिस्तान यांच्यात १८ मेपर्यंत शस्त्रसंधी"; पाकिस्तानचे परराष्ट्र मंत्री डार यांचे विधान
8
आधी ट्रम्प यांच्यावर भडकली, नंतर पोस्ट डिलीट; कंगना म्हणाली, "जेपी नड्डांनी डिलीट करायला सांगितली"
9
ED Raid: 23 कोटींचं सोनं, 8 कोटी रोख; वसई विरार मनपाचे नगररचना उपसंचालक रेड्डीकडे सापडली कोट्यवधींची माया
10
Donald Trump : "मी असं म्हणत नाही की..."; भारत-पाकिस्तान युद्धविरामावर मोठे दावे करणाऱ्या डोनाल्ड ट्रम्प यांची पलटी
11
सुटी रद्द झाल्याने कामावर परतणाऱ्या मेजरवर काळाचा घाला; डोळ्यादेखत पत्नीचा मृत्यू, लेक गंभीर जखमी
12
'पाकिस्तानशी फक्त दहशतवाद अन् PoK वर चर्चा होईल; तिसऱ्याचा हस्तक्षेप खपवून घेणार नाही'
13
'गदर'मधला दरम्यान सिंग आठवतोय का? एका आजारामुळे झालं होत्याचं नव्हतं, अभिनेत्याचा झाला दुर्देवी शेवट
14
व्यापाऱ्यांनी कोणाच्या धमकीला भीक घालू नये; आम्ही तुमच्या पाठीशी आहोत - देवेंद्र फडणवीस
15
इंग्लंड दौऱ्यासाठी टीम इंडियाची घोषणा; 'लेडी सेहवाग'ला मिळाली कमबॅकची संधी
16
अटक करण्याची धमकी देत मागितली खंडणी: उल्हासनगर पोलीस ठाण्यातील दोन पोलीस निलंबित
17
Crime: निवृत्त न्यायाधीशाच्या दोन मुले आणि सुनेला जन्मठेपेची शिक्षा; 2007 मधील प्रकरण काय?
18
Motivational Story: वडिलांचं सायकल दुरूस्तीचं दुकान, कष्टाची जाणीव ठेवून मुलानं दहावीत मिळवले घवघवीत यश
19
आश्चर्यकारक! आरोपीने बलात्कार पिडितेला भरकोर्टात केलं 'प्रपोज'; सर्वोच्च न्यायालयातील प्रसंग
20
"बेटा, सरेंडर कर", दहशतवाद्याने चकमकीआधी आईला केलेला Video कॉल; तिने समजावलं पण...

मोबदला पूर्ण, सेवा मात्र अपूर्णच

By admin | Updated: July 21, 2016 21:44 IST

मनपा सिडको विभाग : प्रभागात घंटागाड्या फिरकतच नसल्याने नागरिकांमध्ये संताप

नरेंद्र दंडगव्हाळ सिडकोमहापालिकेच्या वतीने दैनंदिन कचरा गोळा करण्यासाठी नागरिकांच्या घरापर्यंत घंटागाडीची व्यवस्था करण्यात आली आहे. परंतु गेल्या काही महिन्यांपासून सिडको भागात घंटागाड्या एक दिवसाआड तर प्रभागात चार दिवसांनी फिरत आहेत. यातच आहे त्या घंटागाड्या धक्कास्टार्ट आहेत, तर काहींचे ब्रेक फेल असल्याने त्यांची दयनीय अवस्था झाली आहे. घंटागाड्यांची अशी परिस्थिती असल्याने ठेकेदारांना (न) केलेल्या कामांचा मोबदला पूर्ण दिला जात असला तरी त्यांच्याकडून सेवा मात्र अपूर्णच दिली जात असल्याचे दिसून येत आहे.सिडको प्रभागात ११ प्रभागांसाठी नागरिकांच्या घरोघरी जाऊन कचरा गोळा करण्यासाठी २२ घंटागाड्या असल्या तरी यातील बहुतांशी घंटागाड्यांची अवस्था बिकट झाली आहे. काही घंटागाड्यांचे ब्रेकच फेल आहेत, तर काहींचे टायरच खराब झालेले असून काही नादुरुस्त असल्याचे कारण देत प्रभागात फिरतच नाही. नादुरुस्त घंटागाड्यांचे ब्रेक व्यवस्थित करावे, नवीन बॅटऱ्या टाकून आरटीओ पासिंग करावी, याबाबत मनपाकडून संबंधित ठेकेदारास सांगण्यात येत असले तरी मात्र परिस्थिती ‘जैसे थे’च असल्याचे चित्र बघावयास मिळत आहे. काही महिन्यांपूर्वी घंटागाडीच्या चाकाखाली सापडून एका शाळकरी विद्यार्थ्याचा मृत्यू झाला. मात्र मनपाला जाग येत नसल्याने महिला व नागरिकांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे. अनेकदा घरातील शाळकरी मुलेदेखील कचरा टाकण्यासाठी जात असून, बे्रक फेल घंटागाडीमुळे एखादी दुर्घटना होण्याची शक्यता नाकारता येत नाही. स्वच्छ नाशिक, सुंदर नाशिक अशी संकल्पना मनपाकडून मांडण्यात येत असली तरी मनपाच्या सिडको भागातील आरोग्य विभागाचे कामकाज अत्यंत ढिसाळ व नियोजनशून्य असल्याचे दिसून येत आहे. सिडको भागात मुख्य रस्त्याबरोबरच ठिकठिकाणी कचरा साचलेला असतो. मनपा कर्मचारी हेदेखील वरवर कामकाज करीत असतानाही याकडे अधिकारी लक्ष देत नसल्याचे चित्र बघावयास मिळत आहे. गेल्या काही दिवसांपासून सिडको भागात अनियमित घंटागाड्यांमुळे नागरिक त्रस्त झाले आहेत. काही भागात घंटागाड्या फिरकतच नसून यामुळे नागरिकांना नाइलाजास्तव रस्त्यालगत कचरा फेकून द्यावा लागत आहे. तसेच झाडांचा पालापाचोळा हा घंटागाडीत टाकून घ्यावा, असे मनपाचे तत्कालीन आयुक्तांनी सांगितल्यानंतरही घंटागाडीवरंील चालक पालापाचोळा घेत नाही. मनपाने दैनंदिन कामकाजाव्यतिरिक्त आठवड्यातून एक दिवस पालापाचोळा उचलण्याची गरज असल्याचेही नागरिकांकडून बोलले जात आहे.