शहरं
Join us  
Trending Stories
1
'परिवार का साथ, परिवार का विकास...', बिहारमधून पीएम मोदींची काँग्रेस-रादजवर खोचक टीका
2
Two-Wheeler New Rules : नवीन सर्व दुचाकींना 'एबीएस आणि दोन हेल्मेट' सक्तीचे; केंद्रीय परिवहन मंत्रालयाचा मोठा निर्णय
3
कुणी फुकट खाऊ घालत नाही...! आसिम मुनीर-डोनाल्ड ट्रम्प 'लन्च पॉलिटिक्स'नं पाकिस्तानचंच टेन्शन वाढवलं
4
Air India Plane Crash: अहमदाबाद विमान दुर्घटनेवेळी एका टिफिनवाल्याने वाचवला ८० डॉक्टरांचा जीव
5
एअर इंडियानं रद्द केली ८ उड्डाणं, आता काय घडलं? पुणे, मुंबई, दिल्लीसह अनेक मोठ्या शहरांतील प्रवाशांची अडचण
6
Pandharpur Wari 2025: आता स्वस्तात करा विठ्ठलाचे दर्शन; एसटी महामंडळाची खास ऑफर!
7
१ जुलैपासून बदलणार बँकिंगचे नियम, क्रेडिट कार्ड बिल पेमेंटमध्येही होणार बदल; जाणून घ्या माहिती
8
क्रुझर प्रेमींची पहिली पसंत; नवीन अवतारात येणार Bajaj ची Avenger, किंमत फक्त...
9
Debt on US: ट्रम्प अडकले... संकटात अमेरिका; कर्ज ३७ ट्रिलियन डॉलर्सच्या पार, भारताचं किती देणं लागतो US
10
आधी स्वत:च पत्नीचं कुंकू पुसलं, नंतर बॉयफ्रेंडसोबत लग्न लावलं; पती म्हणतो, “मला विष देऊन...”
11
इराण-इस्त्रायल युद्ध आता ट्रम्प विरुद्ध पुतिन; चीन, नॉर्थ कोरियाचा हुकुमशाह उघडपणे पुढे आले
12
पंढरपुरात मोठी घटना! मित्रासोबत विठू माऊलीच्या दर्शनाला आलेल्या तरुणाचा चंद्रभागा नदीत बुडून मृत्यू
13
'वर्षभरापूर्वीच एअर इंडियाच्या बोईंगमधील खराबीची माहिती दिलेली'; अहमदाबाद विमान अपघातावर खळबळजनक दावा
14
“पप्पा, आम्हाला भारतात बोलवा अन् फोन कट”; इराणमध्ये अडकली लेक, वडिलांना सतावतेय भीती
15
अभिषेक-करिश्मा कपूरचा झालेला साखरपुडा, पण लग्न का मोडलं? बिग बींनी केलेला खुलासा
16
बँकेत जाताय? थांबा! जुलैमध्ये १३ दिवस बँका बंद राहणार; पहा तुमच्या शहरातील सुट्ट्यांची यादी
17
मुंबई महापालिकेची निवडणूक मविआ एकत्र लढणार की नाही? शरद पवार म्हणाले, "उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेची..."
18
Ashadhi Wari 2025: वारी म्हणजे केवळ पंढरपूरला चालत जाणं नव्हे, तर वारी म्हणजे सदेह वैकुंठाची वाट चालणं!
19
प्रियकरासोबत मिळून पतीची केली हत्या, लग्नाआधीपासून सुरू होते अफेअर; हत्येनंतर रचला बनाव
20
Corona Virus : बापरे! कोरोनाने वाढवलं टेन्शन, अवघ्या ४ दिवसांच्या बाळाला आणि एका महिन्यांच्या मुलीला लागण

अनुकंपाधारक अजूनही प्रतीक्षेत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 29, 2021 04:15 IST

नाशिक: जिल्हा उपनिबंधक कार्यालयात होणाऱ्या दस्त नोंदणीला प्रतिसाद असला तरी या कार्यालयात निर्बंधांकडे दुर्लक्ष होत आहे. गर्दी वाढत असताना ...

नाशिक: जिल्हा उपनिबंधक कार्यालयात होणाऱ्या दस्त नोंदणीला प्रतिसाद असला तरी या कार्यालयात निर्बंधांकडे दुर्लक्ष होत आहे. गर्दी वाढत असताना कुठेही सुरक्षित अंतराच्या नियमांचे पालन होताना दिसत नाही. याकडे अधिकाऱ्यांचे सोयीस्कर दुर्लक्ष झाल्याचे दिसते.

तीन महिन्यांपासून दाखले पडून

नाशिक: जातीचे तसेच अन्य शैक्षणिक दाखल्यांसाठी अर्ज केलेल्या अनेकांना तीन महिन्यांपेक्षा अधिक काळ होऊनही दाखले उपलब्ध होऊ शकलेले नाहीत. शासकीय कामे जलद होत असल्याचे जिल्हाधिकारी सांगत असताना विद्यार्थी दाखले मात्र अजूनही प्रलंबित असल्याची तक्रार आहे.

पॅसेंजर सुरू होण्याची प्रतीक्षा

नाशिक: निर्बंधांसह रेल्वे प्रवास सुरू झाला असला तरी अजूनही पॅसेंजर रेल्वे सेवा सुरू झाली नसल्याने प्रवाशांची गैरसोय होत आहे. रेल्वेच्या पॅसेंजर गाड्या सुरू करण्याची मागणी होत आहे. पुणे-नाशिक प्रवाशांकडून रेल्वेची विचारणा होत आहे.

मागासवर्गीय कर्मचारी पदोन्नतीपासून वंचित

नाशिक: आरोग्य विभागातील मागासवर्गीय कर्मचारी पदोन्नतीपासून वंचित आहेत. सन २०१३ पासून वरिष्ठ लिपिक संवर्गातील मागासवर्गीय कर्मचारी हे पदोन्नतीपासून वंचित असून पदे रिक्त होत असतानाही कर्मचाऱ्यांना पदोन्नती दिली जात नसल्याचा आरोप कास्ट्राईब कर्मचारी महासंघाने केला आहे. याबाबत आरोग्य व कास्ट्राइबचे विभागीय अध्यक्ष दीपक पाळंदे यांनी निवेदन दिले आहे.

मुक्त विद्यापीठात प्रवेशप्रक्रिया सुरू

नाशिक: मुक्त विद्यापीठाच्या बी.ए., बी.कॉम., बी.एस्सी., बी.लिब., एम.कॉम., एम.लिब. आदी पदव्युत्तर अभ्यासक्रमासाठी ऑनलाइन प्रवेशप्रक्रिया राबविली जाणार आहे. यासाठीची मुदत ३१ ऑगस्टपर्यंत देण्यात आली आहे. आठ विभागीय केंद्रांवर विद्यार्थ्यांना याबाबतची माहितीही मिळणार आहे.

गोदावरी पात्रात वाढले पाणी

नाशिक: शहर परिसरात तसेच गंगापूर धरण क्षेत्रात सुरू असलेल्या पावसामुळे नदी-नाल्यांचे पाणी गोदावरीला येऊन मिळत असल्याने गोदावरी नदीच्या पाणीपातळीत काहीशी वाढ झाली आहे. या वाढलेल्या पाण्यात तरुण पोहण्याचा आनंद घेऊ लागले आहेत.

दुबार पेरणीचे संकट टळले

नाशिक : जिल्ह्याच्या सर्वच भागांत पावसाला पुन्हा सुरुवात झाल्याने रखडलेल्या खरिपाच्या पेरण्यांना वेग आला असून दोन दिवसांत १५ बऱ्यापैकी पेरण्या पूर्ण झाल्या आहेत. यापूर्वी पेरणी झालेल्या पिकांनाही पावसाने जीवदान मिळाले असून शेतशिवारात पिके बहरली आहेत. दुबार पेरणीचे संकट टळल्याने समाधान व्यक्त केले जात आहे.