शहरं
Join us  
Trending Stories
1
आयकर विभागाची मोठी कारवाई! १०५० पोलिसांना नोटीस; महाराष्ट्र पोलिस दलात खळबळ
2
विखे पाटलांनी उद्धव ठाकरेंना डिवचले, आजारी संजय राऊत संतापले; म्हणाले, 'तुम्ही...'
3
Gold-Silver Rate : सोन्या-चांदीचे दर आणखी कमी होणार? जाणून घ्या पुढचा अंदाज
4
पुण्यात बिबट्याची दहशत, स्वरक्षणासाठी गळ्यात टोकदार खिळ्यांचा पट्टा घालण्याची वेळ, ग्रामस्थांची नवी शक्कल
5
बिहारमध्ये शेवटच्या क्षणी NDA चा मास्टर स्ट्रोक...! नीतीश फ्रंटफुटवर, पंतप्रधान सोबत, महिलांच्या 10 हजारी स्कीमसंदर्भात मोठी घोषणा
6
Photo: कोण होणार मिस युनिव्हर्स? मनिका विश्वकर्माचा 'अनारकली' लूक व्हायरल...
7
लहान बहिणीसोबत अनेकवेळा जबरदस्ती शरीरसंबंध, कुटुंबीयांना सांगायला गेली, तर म्हणाला, 'मी जीव देईन'
8
रशिया शांतपणे कशाची तयारी करतंय? पाश्चात्य देशांनी इशारा दिला; जगासाठी धोक्याची घंटा
9
बिहार निवडणुकीचा प्रचार संपला; दुसऱ्या टप्प्यासाठी ३.७ कोटी मतदार, मतदान, मतमोजणी कधी?
10
Mhada: ९० लाखांचा फ्लॅट २८ लाखांमध्ये, खरं की खोटं? 'म्हाडा'ने लोकांना केलं सावध, काय म्हटलं आहे?
11
Mumbai Weather: शीत वाऱ्यांमुळे पारा घसरला! मुंबईकरांना थंडीचा फील घेता येणार; आठवडाभर कसे राहणार हवामान?
12
धक्कादायक! रुग्णालयात उपचारासाठी आला, अचानक धारदार शस्त्राने डॉक्टरांची हत्या केली, नेमकं काय घडलं?
13
अक्कलकुवाजवळ शालेय बस दरीत कोसळली; अमलीबारी येथे भीषण अपघात, एका विद्यार्थ्याचा मृत्यू, १५ गंभीर
14
मामाची पोरगी पटवली! सूरज चव्हाण कधी करणार लग्न? तारीख आणि ठिकाण आलं समोर
15
बारामतीच्या नगराध्यक्षपद निवडणुकीबाबतच्या जय पवारांच्या चर्चेला अजित पवारांकडून पुर्णविराम
16
रवींद्र चव्हाणांच्या खेळीनं शिंदेसेना संतापली; "भाजपाला युती नको तर स्पष्ट सांगावे, आम्हीही..."
17
RSS मध्ये मुस्लीम सहभागी होऊ शकतात का? मोहन भागवतांनी दिलं असं उत्तर, सभागृहात टाळ्यांचा एकच कडकडाट झाला!
18
निवडणुका जवळ आल्यावर आमच्यावर आरोप होतात; आता आमची बदनामी झाली, अजित पवारांची खंत
19
Digital Gold SEBI: डिजिटल गोल्ड खरेदी असाल, तर थांबा! ऑनलाईन सोने खरेदी करणाऱ्यांना सेबीचा सावधगिरीचा इशारा
20
शशी थरूर यांनी अडवाणींचे कौतुक केले, नेहरू आणि इंदिरा गांधींबद्दल धक्कादायक विधान केले

अनुकंपाधारक १५ वर्षांपासून नोकरीच्या प्रतीक्षेत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 21, 2021 04:17 IST

महसूल विभागात सुमारे ७५० अनुकंपाधारक असून गेल्या १० ते १५ वर्षांपासून अनुकंपाधारकांना नोकरीची प्रतीक्षा आहे. कुटुंबाची संपूर्ण जबाबदारी ...

महसूल विभागात सुमारे ७५० अनुकंपाधारक असून गेल्या १० ते १५ वर्षांपासून अनुकंपाधारकांना नोकरीची प्रतीक्षा आहे. कुटुंबाची संपूर्ण जबाबदारी आलेली असतानाही त्यांच्या नोकरीचा प्रश्न सोडविण्यात आलेला नाही. जिल्हा प्रशासनाकडून प्रशासकीय कामकाज म्हणून अनुकंपाधारकांचा आढावा घेतला जातो. मात्र नोकरीच्या दृष्टीने अंमलबजावणी करण्याच्या हालचाली होत नसल्याने अनेकांचे वयोमानदेखील वाढलेले आहे.

अनुकंपाधारकांकडून सातत्यावे विचारणा होत असल्याने भरतीबाबत प्राधान्य यादी तयार करण्याचे काम सुरू असल्याचे सांगण्यात आले होते. पात्र उमेदवार, वाढीव शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा आदी माहितीची सांगड घालून प्राधान्यक्रम यादी तयार करण्यात येणार असून त्यानुसार भरतीला प्राधान्य देण्यात येईल, असे सांगितले जात होते. नंतर पुढे काय झाले याची माहिती समेार आलेली नाही. वास्तविक शासनाने अनुकंपा भरतीचे धोरण शासनाने जाहीर केलेले असतानाही जिल्हा प्रशासनाकडून भरती प्रक्रियेची चालढकल केली असून भरतीची फाईल तयार असल्याचे सांगणारे विलंब का होत आहे, याचे उत्तर मात्र देत नसल्याचा आरोप अनुकंपाधारकांनी केला आहे.

--कोट--

महसूल विभागात मोठ्या प्रमाणात जागा रिक्त आहेत. शासनाने जागा भरताना अनुकंपाधारकांना प्राधान्य देणे अपेक्षित आहे. मात्र स्थानिक पातळीवर निर्णय घेतला जात नसल्याने मुख्यमंत्र्यांनीच न्याय द्यावा.

- तेचस शेरताटे, अनुकंपाधारक, महसूल विभाग.

--इन्फो--

अधिकार शासनाला की प्रशासनाला?

मिळालेल्या माहितीनुसार अनुकंपाधारकांनी याबाबतची विचारणा केली तर त्यांना शासनाकडे अहवाल पाठविण्यात आला असल्याचे सांगितले जाते. तर जिल्हा पातळीवर अनुकंपाभरतीसाठी जिल्हाधिकारी निर्णय घेऊ शकतात, असा दावा अनुकंपाधारकांनी केलेला आहे. त्यामुळे अधिकार नेमका कुणाला, असा प्रश्न निर्माण झालेला आहे. शासनाला जरी अधिकार असले तरी नाशिक जिल्हा परिषदेने अनुकंपाधारकांची दोनदा भरती करून आपले कर्तव्य पार पाडलेले आहे. मात्र जिल्हा प्रशासनाकडून भरतीबाबतची कोणताही हालचाल नसल्याने अनुकंपाधारकांमध्ये संताप आहे. याबाबतची विचारणा केली असता त्याबाबतची उत्तरे दिली जात नसल्याचा आरोपदेखील अनुकंपाधारकांनी केला आहे.