शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs PAK : नाद करायचा नाय! अभिषेक-गिलची विक्रमी भागीदारी; पाकसमोर पुन्हा टीम इंडियाची 'दादागिरी'
2
IND vs PAK : दोघांनी ठरवून पाकची जिरवली! मैदानात नेमकं काय घडलं? मॅचनंतर अभिषेकनं सगळं सांगितलं
3
'जीएसटी कपातीमुळे अर्थव्यवस्थेला मोठी चालना'; पंतप्रधान मोदींच्या भाषणानंतर CM फडणवीसांनी मानले आभार
4
IND vs PAK : "खूप मजा आली..." अभिषेकच्या आईसह बहीण कोमलनं उडवली शाहीन आफ्रिदीची खिल्ली (VIDEO)
5
'हवाई तळ सोडा, अफगाणिस्ताची एक मीटरही जमीन देणार नाही'; ट्रम्प यांच्या धमकीनंतर तालिबानने थोपटले दंड
6
IND vs PAK : ... अन् अभिषेक शर्मा पाकिस्तानी गोलंदाजाला भिडला! पंचांनी सोडवलं भांडण (VIDEO)
7
'पॅलेस्टाईनला मान्यता देऊन दहशतवादासाठी भेट दिलीत'; ब्रिटनच्या निर्णयावर भडकले नेतन्याहू
8
Sahibzada Farhan Celebration : पाक सलामीवीराचं 'नापाक' सेलिब्रेशन! सोशल मीडियावर उमटल्या संतप्त प्रतिक्रिया
9
कुणाचे लग्न थांबलं, कुणाच्या आईला अश्रू अनावर; ट्रम्प यांच्या H-1B व्हिसाच्या निर्णयाने भारतीय संकटात
10
टोळीयुद्धाच्या पार्श्वभूमीवर पुणे पोलिसांची मोठी कारवाई; एका दिवसात ४३ गुंडांना पाठवले तुरुंगात
11
IND vs PAK मॅचमध्ये Fakhar Zaman च्या विकेटवरुन नवा वाद; नेमकं काय घडलं? (VIDEO)
12
'आमच्यातल्या टॅलेंटला घाबरतात म्हणून...'; ट्रम्प यांच्या एच१-बी व्हिसाच्या निर्णयावर पियुष गोयल यांची रोखठोक प्रतिक्रिया
13
IND vs PAK : हार्दिक पांड्यानं सलामीवीराचं काम केलं होतं तमाम, पण अभिषेक शर्मानं कॅच सोडला अन्...(VIDEO)
14
'उद्यापासून सर्वांचे तोंड गोड होणार'; GST रिफॉर्मची पंतप्रधान मोदींकडून घोषणा, म्हणाले, 'नागरिक देवो भव'
15
IND vs PAK: सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला अन् ती चिंताही मिटली! बुमराहसह वरुण चक्रवर्तीचंही कमबॅक
16
इस्रायलला मोठा धक्का; ब्रिटनसह ३ देशांची पॅलेस्टाईनला स्वतंत्र देश म्हणून मान्यता
17
यूपी एटीएसने तीन संशयितांना भिवंडीतून पकडलं; पैसे गोळा करुन पॅलेस्टाइनला पाठवल्याचा आरोप
18
जीएसटी कपातीच्या पूर्वसंध्येलाच घोषणा; MG Hector १.४९ लाख, Gloster  ३.०४ लाख तर Astor एवढ्या हजारांनी कमी झाली...
19
'भारतीयांनी घाम गाळून तयार केलेल्याच गोष्टी घ्या'; ट्रम्प टॅरिफवरुन PM मोदींचे देशवासियांना आवाहन
20
'९९% वस्तू ५% GST स्लॅबमध्ये येणार', PM मोदींनी सांगितले नवीन जीएसटी सुधारणांचे फायदे...

अनुकंपाधारक १५ वर्षांपासून नोकरीच्या प्रतीक्षेत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 21, 2021 04:17 IST

महसूल विभागात सुमारे ७५० अनुकंपाधारक असून गेल्या १० ते १५ वर्षांपासून अनुकंपाधारकांना नोकरीची प्रतीक्षा आहे. कुटुंबाची संपूर्ण जबाबदारी ...

महसूल विभागात सुमारे ७५० अनुकंपाधारक असून गेल्या १० ते १५ वर्षांपासून अनुकंपाधारकांना नोकरीची प्रतीक्षा आहे. कुटुंबाची संपूर्ण जबाबदारी आलेली असतानाही त्यांच्या नोकरीचा प्रश्न सोडविण्यात आलेला नाही. जिल्हा प्रशासनाकडून प्रशासकीय कामकाज म्हणून अनुकंपाधारकांचा आढावा घेतला जातो. मात्र नोकरीच्या दृष्टीने अंमलबजावणी करण्याच्या हालचाली होत नसल्याने अनेकांचे वयोमानदेखील वाढलेले आहे.

अनुकंपाधारकांकडून सातत्यावे विचारणा होत असल्याने भरतीबाबत प्राधान्य यादी तयार करण्याचे काम सुरू असल्याचे सांगण्यात आले होते. पात्र उमेदवार, वाढीव शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा आदी माहितीची सांगड घालून प्राधान्यक्रम यादी तयार करण्यात येणार असून त्यानुसार भरतीला प्राधान्य देण्यात येईल, असे सांगितले जात होते. नंतर पुढे काय झाले याची माहिती समेार आलेली नाही. वास्तविक शासनाने अनुकंपा भरतीचे धोरण शासनाने जाहीर केलेले असतानाही जिल्हा प्रशासनाकडून भरती प्रक्रियेची चालढकल केली असून भरतीची फाईल तयार असल्याचे सांगणारे विलंब का होत आहे, याचे उत्तर मात्र देत नसल्याचा आरोप अनुकंपाधारकांनी केला आहे.

--कोट--

महसूल विभागात मोठ्या प्रमाणात जागा रिक्त आहेत. शासनाने जागा भरताना अनुकंपाधारकांना प्राधान्य देणे अपेक्षित आहे. मात्र स्थानिक पातळीवर निर्णय घेतला जात नसल्याने मुख्यमंत्र्यांनीच न्याय द्यावा.

- तेचस शेरताटे, अनुकंपाधारक, महसूल विभाग.

--इन्फो--

अधिकार शासनाला की प्रशासनाला?

मिळालेल्या माहितीनुसार अनुकंपाधारकांनी याबाबतची विचारणा केली तर त्यांना शासनाकडे अहवाल पाठविण्यात आला असल्याचे सांगितले जाते. तर जिल्हा पातळीवर अनुकंपाभरतीसाठी जिल्हाधिकारी निर्णय घेऊ शकतात, असा दावा अनुकंपाधारकांनी केलेला आहे. त्यामुळे अधिकार नेमका कुणाला, असा प्रश्न निर्माण झालेला आहे. शासनाला जरी अधिकार असले तरी नाशिक जिल्हा परिषदेने अनुकंपाधारकांची दोनदा भरती करून आपले कर्तव्य पार पाडलेले आहे. मात्र जिल्हा प्रशासनाकडून भरतीबाबतची कोणताही हालचाल नसल्याने अनुकंपाधारकांमध्ये संताप आहे. याबाबतची विचारणा केली असता त्याबाबतची उत्तरे दिली जात नसल्याचा आरोपदेखील अनुकंपाधारकांनी केला आहे.