शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
7
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
8
बेकरीत काम करणाऱ्या २५ वर्षीय तरुणाची आत्महत्या, ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
9
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
10
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
11
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
12
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
13
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
14
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
15
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
16
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
17
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
18
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
19
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
20
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!

अनुकंपाधारक १५ वर्षांपासून नोकरीच्या प्रतीक्षेत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 21, 2021 04:17 IST

महसूल विभागात सुमारे ७५० अनुकंपाधारक असून गेल्या १० ते १५ वर्षांपासून अनुकंपाधारकांना नोकरीची प्रतीक्षा आहे. कुटुंबाची संपूर्ण जबाबदारी ...

महसूल विभागात सुमारे ७५० अनुकंपाधारक असून गेल्या १० ते १५ वर्षांपासून अनुकंपाधारकांना नोकरीची प्रतीक्षा आहे. कुटुंबाची संपूर्ण जबाबदारी आलेली असतानाही त्यांच्या नोकरीचा प्रश्न सोडविण्यात आलेला नाही. जिल्हा प्रशासनाकडून प्रशासकीय कामकाज म्हणून अनुकंपाधारकांचा आढावा घेतला जातो. मात्र नोकरीच्या दृष्टीने अंमलबजावणी करण्याच्या हालचाली होत नसल्याने अनेकांचे वयोमानदेखील वाढलेले आहे.

अनुकंपाधारकांकडून सातत्यावे विचारणा होत असल्याने भरतीबाबत प्राधान्य यादी तयार करण्याचे काम सुरू असल्याचे सांगण्यात आले होते. पात्र उमेदवार, वाढीव शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा आदी माहितीची सांगड घालून प्राधान्यक्रम यादी तयार करण्यात येणार असून त्यानुसार भरतीला प्राधान्य देण्यात येईल, असे सांगितले जात होते. नंतर पुढे काय झाले याची माहिती समेार आलेली नाही. वास्तविक शासनाने अनुकंपा भरतीचे धोरण शासनाने जाहीर केलेले असतानाही जिल्हा प्रशासनाकडून भरती प्रक्रियेची चालढकल केली असून भरतीची फाईल तयार असल्याचे सांगणारे विलंब का होत आहे, याचे उत्तर मात्र देत नसल्याचा आरोप अनुकंपाधारकांनी केला आहे.

--कोट--

महसूल विभागात मोठ्या प्रमाणात जागा रिक्त आहेत. शासनाने जागा भरताना अनुकंपाधारकांना प्राधान्य देणे अपेक्षित आहे. मात्र स्थानिक पातळीवर निर्णय घेतला जात नसल्याने मुख्यमंत्र्यांनीच न्याय द्यावा.

- तेचस शेरताटे, अनुकंपाधारक, महसूल विभाग.

--इन्फो--

अधिकार शासनाला की प्रशासनाला?

मिळालेल्या माहितीनुसार अनुकंपाधारकांनी याबाबतची विचारणा केली तर त्यांना शासनाकडे अहवाल पाठविण्यात आला असल्याचे सांगितले जाते. तर जिल्हा पातळीवर अनुकंपाभरतीसाठी जिल्हाधिकारी निर्णय घेऊ शकतात, असा दावा अनुकंपाधारकांनी केलेला आहे. त्यामुळे अधिकार नेमका कुणाला, असा प्रश्न निर्माण झालेला आहे. शासनाला जरी अधिकार असले तरी नाशिक जिल्हा परिषदेने अनुकंपाधारकांची दोनदा भरती करून आपले कर्तव्य पार पाडलेले आहे. मात्र जिल्हा प्रशासनाकडून भरतीबाबतची कोणताही हालचाल नसल्याने अनुकंपाधारकांमध्ये संताप आहे. याबाबतची विचारणा केली असता त्याबाबतची उत्तरे दिली जात नसल्याचा आरोपदेखील अनुकंपाधारकांनी केला आहे.