शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताकडून हल्ल्याची पाकिस्तानला धास्ती; पेशावर, एबाटाबादसह २९ जिल्ह्यात एअर सायरन लावले
2
अमेरिकेचे नौदल भारताच्या साथीला! 12 कोटी डॉलर्सचे तंत्रज्ञान देणार, नौदल समुद्रात आरपार लक्ष ठेवू शकणार...
3
मनोज जरांगे पाटील यांची प्रकृती खालावली, बीड दौरा अर्धवट सोडला; उपचारांसाठी रुग्णालयात दाखल
4
दहशतवाद विरोधी लढाईत भारताला पूर्ण पाठिंबा; अमेरिकेची घोषणा, ट्रम्प-मोदींमध्ये चर्चा
5
मे महिन्यात ६ ग्रहांचे गोचर: ६ राशींना बंपर लाभ, बक्कळ पैसा; भरघोस नफा, लक्ष्मी कृपा-भरभराट!
6
पाकिस्तानचं जितकं आहे संरक्षण बजेट, त्यापेक्षा तिप्पट आहे भारताचं एप्रिलचं GST कलेक्शन; जाणून घ्या
7
जुई गडकरीने केलंय बोटॉक्स? चाहतीच्या प्रश्नावर अभिनेत्रीने दिलं उत्तर; म्हणाली, "रोज त्वचेला..."
8
...तर बांगलादेशने ईशान्येकडील सातही राज्ये ताब्यात घ्यावीत; भारताविरोधात बांगलादेशने ओकली गरळ
9
'भारताने दहशतवाद्यांविरोधात कारवाई करावी, पण युद्धाची परिस्थिती...'; पहलगाम हल्ल्यावर जेडी व्हान्स यांनी सोडलं मौन
10
PPF मध्ये काय असतो ५ तारखेचा फंडा, एक दिवस उशिर आणि होऊ शकतं १० हजारांपर्यंतचं नुकसान; समजून घ्या गणित
11
'आम्हाला युद्ध नकोय, पण...'; पंतप्रधान मोदींचं नाव घेत बिलावल भुत्तो आता काय बोलले?
12
जातनिहाय जनगणनेसाठी कालमर्यादा हवी; काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगेंची केंद्राकडे मागणी
13
पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानी कलाकारांवर बंदी घातल्यावर सुनील शेट्टी म्हणाला, "क्रिकेट..."
14
सर्व दहशतवाद्यांचा शोध घेऊ, पहलगाम हल्ल्यानंतर अमित शहांचा मोठा इशारा; दहशतवादाविरोधात कठोर कारवाई
15
मुख्यमंत्र्यांनी दिला निकाल, तटकरे पहिल्या तर राणे पाचव्या क्रमांकावर; राज्यात ठाणे जिपचे सीईओ अव्वल
16
वैदिक मंत्रोच्चाराने उघडले केदारनाथ मंदिराचे दार; सर्वत्र 'बम बम भोले'चा जयजयकार
17
आजचे राशीभविष्य,२ मे २०२५: समोरून आलेल्या संधीचा फायदा उठवता येणार नाही
18
देशाची आर्थिक राजधानी, डिजिटल शर्यतीत मागे; मुंबईत फायबर टाकणे सर्वात महाग
19
सकाळी उद्घाटन केल्यास त्रास कमी होतो; उपमुख्यमंत्री अजित पवार यांची मिश्कील टिप्पणी
20
काय म्हणावं.. प्रेम एकीशी; लग्न मात्र तिच्या मैत्रिणीशी; लग्नाचे आमिष दाखवून त्याने तिच्याशी शरीरसंबंध ठेवले

द्राक्षांच्या नुकसानीसाठी कंपनीला धरले जबाबदार

By admin | Updated: December 23, 2016 00:18 IST

गुन्हा दाखल : आगामी हंगामासाठी कृषी विभागाचा सावध पवित्रा

नाशिक : आगामी रब्बी हंगामाच्या पार्श्वभूमीवर कृषी विभागाने खबरदारीचा उपाय म्हणून विविध खते व बियाण्यांच्या कंपन्याबाबत तपासणी सुरू केली आहे. मागील हंगामात बंगरूळूस्थित कॅमसन बायोटेक्नोलॉजीच्या कॅलनोव्हा या जैविक कीटकनाशकामुळे नुकसान झाल्याच्या तक्रारी आल्या होत्या. त्यामुळे या कंपनीविरोधात कृषी विभागाने रीतसर गुन्हाही दाखल केला आहे.बंगरूळूस्थित कॅमसन बायोटेक्नोलॉजीच्या कॅलनोव्हा या जैविक कीटकनाशकाची द्राक्ष पिकावरील फुलकिडे व माइट्स या किडीच्या नियंत्रणासाठी फवारणी केल्यामुळे द्राक्ष मण्यांवर काळे ठिपके-डाग पडून द्राक्ष पिकाचे नुकसान झाल्याबाबत निफाड तालुक्यात २५६, दिंडोरी तालुक्यात २८, चांदवड तालुक्यात २६ व त्र्यंबकेश्वर तालुक्यात १ अशा एकूण ३११ तक्रारी तालुकास्तरावर पंचायत समिती कृषी अधिकाऱ्यांकडे प्राप्त झाल्या होत्या. ३११ तक्रारींपैकी ८० तक्रारींबाबत शेतकऱ्यांनी तक्रार अर्ज मागे घेतले आहेत. उर्वरित २३१ तक्रारींची उपविभागीय कृषी अधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली तालुकास्तरीय तक्रार निवारण समितीने पाहणी केली आहे. समितीने पाहणी अहवालाची प्रत २३१ तक्रारदार शेतकऱ्यांना दिली आहे. त्यांना नुकसानभरपाई मिळण्यासाठी ग्राहक पंचायत जाण्याबाबत मार्गदर्शन केले आहे. याबाबत तक्रार निवारण समितीच्या अहवालातील निष्कर्ष द्राक्ष घडांवर काळे ठिपके मोठ्या प्रमाणावर आढळून आले. द्राक्षमण्यावरील काळ्या ठिपक्यांमुळे व द्राक्षामधील फुलकिडे, तुडतुडे नियंत्रण न झाल्याने द्राक्षांची गुणवत्ता ढासळल्याने द्राक्षांची निर्यात होऊ शकली नाही. तसेच उत्पादित द्राक्ष स्थानिक बाजारपेठेतसुद्धा ग्राहकांच्या पसंतीस उतरणार नाहीत. त्यामुळे शेतकऱ्यांच्या एकूण उत्पन्नात ३० ते १०० टक्के घट येण्याची शक्यता वर्तविण्यात आली होती. या तक्रारींच्या अनुषंगाने ८६ कीटकनाशक परवान्यांच्या सुनावण्या घेण्यात आल्या. ४८ कीटकनाशक परवाने निलंबनाची कारवाई करण्यात आली. तसेच कॅमसन कंपनीच्या उत्पादक कॅलनोव्हा कीटकनाशकाचा अंश आढळल्याने विभागीय कृषी सहसंचालक यांच्याकडून या कंपनीवर न्यायालयीन दावा दाखल करण्यात आला आहे. (प्रतिनिधी)