शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

द्राक्षांच्या नुकसानीसाठी कंपनीला धरले जबाबदार

By admin | Updated: December 23, 2016 00:18 IST

गुन्हा दाखल : आगामी हंगामासाठी कृषी विभागाचा सावध पवित्रा

नाशिक : आगामी रब्बी हंगामाच्या पार्श्वभूमीवर कृषी विभागाने खबरदारीचा उपाय म्हणून विविध खते व बियाण्यांच्या कंपन्याबाबत तपासणी सुरू केली आहे. मागील हंगामात बंगरूळूस्थित कॅमसन बायोटेक्नोलॉजीच्या कॅलनोव्हा या जैविक कीटकनाशकामुळे नुकसान झाल्याच्या तक्रारी आल्या होत्या. त्यामुळे या कंपनीविरोधात कृषी विभागाने रीतसर गुन्हाही दाखल केला आहे.बंगरूळूस्थित कॅमसन बायोटेक्नोलॉजीच्या कॅलनोव्हा या जैविक कीटकनाशकाची द्राक्ष पिकावरील फुलकिडे व माइट्स या किडीच्या नियंत्रणासाठी फवारणी केल्यामुळे द्राक्ष मण्यांवर काळे ठिपके-डाग पडून द्राक्ष पिकाचे नुकसान झाल्याबाबत निफाड तालुक्यात २५६, दिंडोरी तालुक्यात २८, चांदवड तालुक्यात २६ व त्र्यंबकेश्वर तालुक्यात १ अशा एकूण ३११ तक्रारी तालुकास्तरावर पंचायत समिती कृषी अधिकाऱ्यांकडे प्राप्त झाल्या होत्या. ३११ तक्रारींपैकी ८० तक्रारींबाबत शेतकऱ्यांनी तक्रार अर्ज मागे घेतले आहेत. उर्वरित २३१ तक्रारींची उपविभागीय कृषी अधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली तालुकास्तरीय तक्रार निवारण समितीने पाहणी केली आहे. समितीने पाहणी अहवालाची प्रत २३१ तक्रारदार शेतकऱ्यांना दिली आहे. त्यांना नुकसानभरपाई मिळण्यासाठी ग्राहक पंचायत जाण्याबाबत मार्गदर्शन केले आहे. याबाबत तक्रार निवारण समितीच्या अहवालातील निष्कर्ष द्राक्ष घडांवर काळे ठिपके मोठ्या प्रमाणावर आढळून आले. द्राक्षमण्यावरील काळ्या ठिपक्यांमुळे व द्राक्षामधील फुलकिडे, तुडतुडे नियंत्रण न झाल्याने द्राक्षांची गुणवत्ता ढासळल्याने द्राक्षांची निर्यात होऊ शकली नाही. तसेच उत्पादित द्राक्ष स्थानिक बाजारपेठेतसुद्धा ग्राहकांच्या पसंतीस उतरणार नाहीत. त्यामुळे शेतकऱ्यांच्या एकूण उत्पन्नात ३० ते १०० टक्के घट येण्याची शक्यता वर्तविण्यात आली होती. या तक्रारींच्या अनुषंगाने ८६ कीटकनाशक परवान्यांच्या सुनावण्या घेण्यात आल्या. ४८ कीटकनाशक परवाने निलंबनाची कारवाई करण्यात आली. तसेच कॅमसन कंपनीच्या उत्पादक कॅलनोव्हा कीटकनाशकाचा अंश आढळल्याने विभागीय कृषी सहसंचालक यांच्याकडून या कंपनीवर न्यायालयीन दावा दाखल करण्यात आला आहे. (प्रतिनिधी)