शहरं
Join us  
Trending Stories
1
तुळजापुरातील मंदिरात जिंतेंद्र आव्हाड समर्थक आणि सुरक्षारक्षकांमध्ये धक्काबुक्की, नेमकं काय घडलं?
2
काँग्रेसने ३००० मते खरेदी केली, भाजप निवडणूक आयोगात पोहोचला; २०१८ मध्ये CM सिद्धरामय्या १६९६ मतांनी विजयी झाले
3
पगार येताच, ५ मिनिटांनी कर्मचाऱ्याने राजीनामा दिला! एचआरची पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल
4
पुन्हा आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या! सात अधिकाऱ्यांचे खाते बदलले; कोणते खाते कोणाकडे?
5
India-China Flight: भारत - चीन दरम्यान लवकरच थेट विमानसेवा सुरू होणार; सरकारने विमान कंपन्यांना दिल्या या सूचना
6
जगदीप धनखड अचानक पंतप्रधान मोदींना का भेटले? काँग्रेसचा नवा दावा आणखी एक प्रश्न
7
केंद्र सरकारचा मोठा निर्णय; ४ सेमीकंडक्टर प्रकल्पांना मंजुरी, 'या' राज्यांमध्ये हजारो कोटींची गुंतवणूक
8
Aaditya Thackeray: "आम्ही काय खायचं, हे सांगणारे तुम्ही कोण?" आदित्य ठाकरे केडीएमसीवर भडकले!
9
आधी पत्नीचे नग्न फोटो काढले, मग बळजबरी बाप आणि मेहुण्यासोबत ठेवायला लावले संबंध; कारण...
10
"...त्यानंतरच होणार राज ठाकरेंना मविआत घेण्याचा निर्णय", काँग्रेसचे प्रभारी रमेश चेन्निथला स्पष्टच सांगितलं
11
महाराष्ट्राच्या पैठणीला लंडनमध्ये मोठा मान, व्हिक्टोरिया अल्बर्ट संग्रहालयामध्ये दिसणार!
12
आधारबाबत सुप्रीम कोर्टाचं सूचक विधान, बिहारमधील SIRवरून निवडणूक आयोगाला दिलासा 
13
कोण आहेत 'बेडरूम जिहादी', जे सुरक्षा यंत्रणेसाठी बनले डोकेदुखी?; भारतात दहशत पसरवण्याचा नवा डाव
14
बिहारपासून दिल्लीपर्यंत गोंधळ, अखेर १२४ वर्षांची महिला मतदार आली समोर, वयाबाबत म्हणाली...  
15
"शोना, मला मार" फक्त एवढेच ऐकताच प्रेयसीने प्रियकराचं डोकं भिंतीवर आपटलं, त्यानंतर जे घडले...
16
पाकिस्तानी दहशतवादी दक्षिण कोरियात पोहोचला, ओळख बदलून कंपनीत काम करत होता; दहशतवाद्याला अटक
17
"देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री आहेत की निवडणूक आयुक्त? प्रश्न आयोगाला विचारले तर तुम्ही उत्तर का देता?", रमेश चेन्निथला यांचा सवाल   
18
RCB मुळं वर्ल्ड कप स्पर्धेवर संकट! एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर बंदी; BCCI सह ICC चं टेन्शन वाढलं
19
९ महिने पाठपुरावा केला तरीही ऊसाचे बिल थकवले; चिठ्ठी लिहून तरुण शेतकऱ्यानं आयुष्य संपवले
20
भारतासाठी धोक्याची घंटा; चीन LAC जवळ उभारतोय नवीन रेल्वे प्रकल्प, तणाव वाढणार..?

कर्मचाºयांची सामुदायिक रजा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 9, 2017 00:16 IST

नवनिर्मित नगर परिषद, नगरपंचायतींमध्ये तत्कालीन ग्रामपंचायतींचे कर्मचारी कार्यरत आहेत, त्यांच्या समावेशनाची प्रक्रि या शासन स्तरावर सुरू आहे. सरळसेवा भरतीच्या निकषांनुसार वेगवेगळ्या त्रुटी दाखवत शासनाने नाशिक जिल्ह्यातील ७ नगरपंचायतींच्या २९० कर्मचाºयांना अपात्र ठरवले आहे.

कळवण : नवनिर्मित नगर परिषद, नगरपंचायतींमध्ये तत्कालीन ग्रामपंचायतींचे कर्मचारी कार्यरत आहेत, त्यांच्या समावेशनाची प्रक्रि या शासन स्तरावर सुरू आहे. सरळसेवा भरतीच्या निकषांनुसार वेगवेगळ्या त्रुटी दाखवत शासनाने नाशिक जिल्ह्यातील ७ नगरपंचायतींच्या २९० कर्मचाºयांना अपात्र ठरवले आहे. या कर्मचाºयांच्या समावेशन प्रक्रियेत कोणतीही अट न लावता त्यांना कायम करावे या प्रमुख मागणीसाठी कळवणसह जिल्ह्यातील नवनिर्मित सात नगरपरिषदा, नगरपंचायतींचे कर्मचारी बुधवारी (दि.९) सामुदायिक रजा आंदोलन करणार आहेत. कळवण नगरपंचायतीच्या अपात्र कर्मचाºयांनी नगराध्यक्ष सुनीता पगार व मुख्याधिकारी डॉ. सचिन पटेल यांना याबाबतचे निवेदन दिले असून, शासनस्तरावर पाठपुरावा करण्याची मागणी केली आहे. यावेळी सर्व कर्मचारी उपस्थित होते.अपात्र ठरविण्यात आलेल्या तत्कालीन ग्रामपंचायत कर्मचाºयांनी नगरपरिषद, नगरपंचायतीमध्ये समावेशन होण्याबाबत मागणी केली आहे. जिल्ह्यातील नवनिर्मित नगरपरिषद, नगरपंचायत अध्यक्ष व मुख्याधिकाºयांना सामुदायिक रजा आंदोलन करणार असल्याचे निवेदन देण्यात आले आहे. मागणी मान्य न झाल्यास २१ आॅगस्टपासून पुन्हा संपावर जाऊन बेमुदत कामबंद आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला आहे. महाराष्ट्र नगरपरिषद व नगरपंचायत औद्योगिकनगरी अधिनियम १९६५ पैकी ३४० खंड ९ प्रमाणे तत्कालीन ग्रामपंचायतींमध्ये कार्यरत असणारे सर्व कर्मचाºयांचे नगरपरिषद व नगरपंचायतींमध्ये समावेशन होणे आवश्यक होते; परंतु शासन स्तरावरून तसा निर्णय न झाल्याने या कर्मचाºयांमध्ये भाजपा शासनाच्या धोरणाविषयी नाराजी पसरली आहे. प्रमुख मागण्या तत्कालीन ग्रामपंचायत कर्मचाºयांचे नगरपरिषद व नगरपंचायतींमध्ये समावेशन करावे, समावेशनासाठी विहित केलेली अर्हता ही सरळसेवा भरतीच्या समकक्ष न ठेवता ज्या पदावर कर्मचारी कार्यरत आहे, त्याच पदावर त्याचे समावेशन करावे. कर्मचारी यांची शैक्षणिक पात्रता असलेल्या कर्मचाºयांचे पदधारण अधिकार कायम ठेवून इतर पात्रता पूर्ण करण्यासाठी शासन निर्णयानुसार दोन वर्षांचा कालावधी देण्यात यावा. गुहागर नगरपंचायतीप्रमाणे जिल्ह्यातील कर्मचाºयांचे समावेशन करावे, समावेश करताना नगरपंचायत संवर्ग पदाव्यतिरिक्त पदे रिक्त असल्यास अशा पदांवर तत्कालीन ग्रामपंचायत कर्मचाºयांचे समावेशन करावे व शैक्षणिक पात्रता पूर्ण केल्यानंतर वेतनश्रेणी लागू करावी, कर्मचाºयांना सेवेपासून वंचित ठेऊ नये, त्यांना सेवेतून कमी करु नये आदी प्रमुख मागण्यांसाठी नवनिर्मित नगरपरिषद व नगरपंचायत कर्मचारी सामुदायिक रजा आंदोलन करणार आहेत. मागण्या मान्य न झाल्यास २१ आॅगस्टपासून पुन्हा बेमुदत संपावर जाणार असल्याचा इशाराही निवेदनाद्वारे दिला आहे.