शहरं
Join us  
Trending Stories
1
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
‘ऑपरेशन सिंदूरदरम्यान, अल्लाहच्या मदतीने आम्हाला वाचवले,’ आसिम मुनीरचं मोठं विधान  
3
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
4
"काँग्रेसचे ४१ नगराध्यक्ष आणि १,००६ नगरसेवक निवडून येणे हा केवळ निकाल नाही, तर..." हर्षवर्धन सपकाळ यांचं मोठं विधान
5
एक फोन कॉल आणि शुभमन गिल झाला वर्ल्डकपच्या संघातून ‘आऊट’, धक्कादायक माहिती समोर
6
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
7
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
8
Smriti Mandhana Record : स्मृती मानधनाचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय बॅटर
9
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
10
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
11
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
12
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
13
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
14
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
15
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
16
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
17
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
18
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
19
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

कर्मचाºयांची सामुदायिक रजा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 9, 2017 00:16 IST

नवनिर्मित नगर परिषद, नगरपंचायतींमध्ये तत्कालीन ग्रामपंचायतींचे कर्मचारी कार्यरत आहेत, त्यांच्या समावेशनाची प्रक्रि या शासन स्तरावर सुरू आहे. सरळसेवा भरतीच्या निकषांनुसार वेगवेगळ्या त्रुटी दाखवत शासनाने नाशिक जिल्ह्यातील ७ नगरपंचायतींच्या २९० कर्मचाºयांना अपात्र ठरवले आहे.

कळवण : नवनिर्मित नगर परिषद, नगरपंचायतींमध्ये तत्कालीन ग्रामपंचायतींचे कर्मचारी कार्यरत आहेत, त्यांच्या समावेशनाची प्रक्रि या शासन स्तरावर सुरू आहे. सरळसेवा भरतीच्या निकषांनुसार वेगवेगळ्या त्रुटी दाखवत शासनाने नाशिक जिल्ह्यातील ७ नगरपंचायतींच्या २९० कर्मचाºयांना अपात्र ठरवले आहे. या कर्मचाºयांच्या समावेशन प्रक्रियेत कोणतीही अट न लावता त्यांना कायम करावे या प्रमुख मागणीसाठी कळवणसह जिल्ह्यातील नवनिर्मित सात नगरपरिषदा, नगरपंचायतींचे कर्मचारी बुधवारी (दि.९) सामुदायिक रजा आंदोलन करणार आहेत. कळवण नगरपंचायतीच्या अपात्र कर्मचाºयांनी नगराध्यक्ष सुनीता पगार व मुख्याधिकारी डॉ. सचिन पटेल यांना याबाबतचे निवेदन दिले असून, शासनस्तरावर पाठपुरावा करण्याची मागणी केली आहे. यावेळी सर्व कर्मचारी उपस्थित होते.अपात्र ठरविण्यात आलेल्या तत्कालीन ग्रामपंचायत कर्मचाºयांनी नगरपरिषद, नगरपंचायतीमध्ये समावेशन होण्याबाबत मागणी केली आहे. जिल्ह्यातील नवनिर्मित नगरपरिषद, नगरपंचायत अध्यक्ष व मुख्याधिकाºयांना सामुदायिक रजा आंदोलन करणार असल्याचे निवेदन देण्यात आले आहे. मागणी मान्य न झाल्यास २१ आॅगस्टपासून पुन्हा संपावर जाऊन बेमुदत कामबंद आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला आहे. महाराष्ट्र नगरपरिषद व नगरपंचायत औद्योगिकनगरी अधिनियम १९६५ पैकी ३४० खंड ९ प्रमाणे तत्कालीन ग्रामपंचायतींमध्ये कार्यरत असणारे सर्व कर्मचाºयांचे नगरपरिषद व नगरपंचायतींमध्ये समावेशन होणे आवश्यक होते; परंतु शासन स्तरावरून तसा निर्णय न झाल्याने या कर्मचाºयांमध्ये भाजपा शासनाच्या धोरणाविषयी नाराजी पसरली आहे. प्रमुख मागण्या तत्कालीन ग्रामपंचायत कर्मचाºयांचे नगरपरिषद व नगरपंचायतींमध्ये समावेशन करावे, समावेशनासाठी विहित केलेली अर्हता ही सरळसेवा भरतीच्या समकक्ष न ठेवता ज्या पदावर कर्मचारी कार्यरत आहे, त्याच पदावर त्याचे समावेशन करावे. कर्मचारी यांची शैक्षणिक पात्रता असलेल्या कर्मचाºयांचे पदधारण अधिकार कायम ठेवून इतर पात्रता पूर्ण करण्यासाठी शासन निर्णयानुसार दोन वर्षांचा कालावधी देण्यात यावा. गुहागर नगरपंचायतीप्रमाणे जिल्ह्यातील कर्मचाºयांचे समावेशन करावे, समावेश करताना नगरपंचायत संवर्ग पदाव्यतिरिक्त पदे रिक्त असल्यास अशा पदांवर तत्कालीन ग्रामपंचायत कर्मचाºयांचे समावेशन करावे व शैक्षणिक पात्रता पूर्ण केल्यानंतर वेतनश्रेणी लागू करावी, कर्मचाºयांना सेवेपासून वंचित ठेऊ नये, त्यांना सेवेतून कमी करु नये आदी प्रमुख मागण्यांसाठी नवनिर्मित नगरपरिषद व नगरपंचायत कर्मचारी सामुदायिक रजा आंदोलन करणार आहेत. मागण्या मान्य न झाल्यास २१ आॅगस्टपासून पुन्हा बेमुदत संपावर जाणार असल्याचा इशाराही निवेदनाद्वारे दिला आहे.