शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईकरांनो काळजी घ्या! पुढील २४ तासांसाठी पावसाचा रेडअलर्ट, हवामान खात्याचा इशारा
2
आता खामेनेईचा खात्मा करणारच..: हॉस्पिटलवरील हल्ल्यानंतर इस्त्रायलचे खुले चॅलेंज
3
इराणच्या हल्ल्यात इस्त्रायली एअर डिफेन्स फेल; मित्राची झाली आठवण, भारताला आला कॉल, आता...
4
जगाला हादरवणारी बातमी! इराणने इस्रायलचा शेअर बाजार उडवला; तुमच्या गुंतवणुकीवर काय परिणाम होणार?
5
Rain Update: रायगडमधील तीन नद्यांनी ओलांडली धोक्याची पातळी, तीन पर्यटन ठिकाणी जाण्यास बंदी
6
...तर अमेरिका किम जोंग उन यांच्या देशावर अणुबॉम्ब टाकेल; यांनी केला मोठा दावा
7
₹८,००० कोटींची गुंतवणूक... अंबानींनी केली Coca-Cola आणि Pepsi ला टक्कर देण्याची तयारी; काय आहे प्लान?
8
मुंबई, रायगड, रत्नागिरी जिल्ह्यासह पुणे घाट, सातारा घाट परिसरात 24 तासांसाठी ऑरेंज अलर्ट
9
धक्कादायक! "लग्न ठरल्यानंतर सोनम दिवसातून फक्त..."; राजा रघुवंशीच्या मित्राचा मोठा खुलासा
10
बसच्या तिकिटामुळे हत्या उघडकीस आली! पाच वर्षाचे रिलेशन, लग्नाची इच्छा, घडलं वेगळंच
11
६ ग्रहांचे जुलैमध्ये गोचर: १० राशी मालामाल, इच्छापूर्ती काळ; अचानक पैसे मिळतील, चांगले घडेल!
12
Video: इलॉन मस्क यांना मोठा धक्का; प्रक्षेपणादरम्यान SpaceX च्या स्टारशिप रॉकेटमध्ये स्फोट
13
Air India Plane Crash: 'असं वाटलं पाकिस्ताननेच मिसाईल हल्ला केला, चार मित्र गमावले'; अपघातातून वाचलेल्या केशवने सांगितला थरार
14
ठाकरेंसोबत रात्रीतून खेळ झाला! काल मातोश्रीवर आलेले 'ते' दोन नेते आज शिंदेंच्या शिवसेनेत
15
लीड्स टेस्टपूर्वीच टीम इंडियाला मोठा झटका, 259 धावा करणाऱ्या 'या' क्रिकेटरला दुखापत! नेमकं काय घडलं? आता कशी असेल प्लेइंग 11?
16
Ashadhi Ekadashi 2025: संत नामदेवांनी पांडुरंगाच्या आरतीत उल्लेखलेली 'राही' नेमकी कोण?
17
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी राहुल गांधी यांना वाढदिवसानिमित्त दिल्या खास शुभेच्छा, म्हणाले...
18
Shree Swami Samarth: एक पैशाचा खर्च नाही, ‘हा’ उपाय एकदा करून पाहा; स्वामी कायम पाठीशी असतील, अशक्यही शक्य होईल!
19
चालत्या रिक्षात अचानक झाला स्फोट; आगीत महिला प्रवासी जिवंत जळाली, ५ जण जखमी
20
Air India Plane Crash Insurance Claim : अहमदाबाद विमान अपघात: Air India ४,०८० कोटी रुपयांचा 'इन्श्युरन्स क्लेम' करणार, इतिहासातील सर्वाधिक आकडा ठरणार?

ग्रामविकासाच्या पंचसुत्रीसाठी सुसंवाद महत्त्वाचा : भास्करराव पेरे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 28, 2019 17:46 IST

जळगाव नेऊर : गावातील प्रत्येकाला पिण्याचे शुद्ध पाणी मिळाले पाहिजे. गावात उपलब्ध असलेल्या पाण्याचे योग्य नियोजन करुन पाण्याचा पुनर्वापर केला पाहिजे, प्रत्येकाने वृक्ष लागवड केलीच पाहिजे, वैयक्तिक स्वच्छता या सर्व बाबी ग्रामविकासाची पंचसुत्री असून जर यात पती-पत्नीमध्ये असणाऱ्या सुसंवादासारखी भर पडली तर गाव सुखी आणि समाधानी होण्यास वेळ लागत नाही, असे प्रतिपादन राष्टÑपती पुरस्कारप्राप्त ग्रामपंचायतीचे सरपंच भास्करराव पेरे पाटील यांनी केले.

बाळापूर येथे नुकत्याच झालेल्या ग्रामपंचायतीच्या निवडणुकीमध्ये निवडून आलेल्या सदस्यांच्या मार्गदर्शनासाठी उपसरपंच अंकुश शिरसाठ यांनी आयोजित केलेल्या व्याख्यानप्रसंगी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी समता प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष अर्जुन कोकाटे होते. यावेळी पेरे यांनी आपल्या खास बोलीभाषेतून सरपंचपदाच्या २५ वर्षाच्या काळात आलेले वेगवेगळे अनुभव कथन केले. ग्रामस्थ बदल स्विकारायला तयार असतात पण त्यांना पर्याय उपलब्ध करु न दिले पाहिजेत. हे समजावून सांगतांना इथे थुंकू नका, असे फलक लावण्यापेक्षा कुठे थुंकायचे याचे फलक लावले पाहिजेत. त्या ठिकाणी वॉश बेसिन व पाण्याची सोय केली पाहिजे. तर लोक इथे-तिथे थुंकणार नाही. झाडे तोडू नका, असे अनेकांनी सांगितले, मात्र चुलीत काय घालायचे हे कुणीही सांगितले नाही. चुलीत घालायला काहीतरी पर्याय द्या. नुसत्या उपदेशांनी गाव सुधारणार नाही, तर आपल्या कृतीतुन प्रत्येकाने आपला गाव पुढे कसा जाईल, याचा विचार केला पाहिजे. पाण्याचा योग्य वापर करावा, ते वाचवण्याचा प्रयत्न करा. अखंड हरिनाम सप्ताह केल्याने पाऊस पडत नाही. त्यासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न करावे लागतात, असेही पेरे पाटील म्हणाले. यावेळी अण्णासाहेब पाटील, संभाजीे पवार, जनता सहकार बँकेचे संचालक माधवराव बनकर, नगरसेवक प्रवीण बनकर, पंचायत समिती सदस्य प्रवीण गायकवाड, प्राचार्य डॉ. भाऊसाहेब गमे, जल हक्क संघर्ष समितीचे भागवतराव सोनवणे, डॉ. सुरेश कांबळे, बचत गटाच्या जिल्हाध्यक्ष शालिनी गायकवाड, सचिन पाटील, सदाभाऊ शेळके, विजय कोटमे, मच्छिंद्र पवार, सरपंच श्रावण खुरसणे, सोपान शिरसाठ, वत्सला पवार, अनिता शिरसाठ, विमल शिरसाठ, नारायण पवार, संगीता गायकवाड आदी सदस्यांसह मान्यवर व नागरिक ऊपस्थित होते. सूत्रसंचालन डी. पी. गायकवाड यांनी तर आभार अरु ण शिरसाठ यांनी मानले. 

टॅग्स :gram panchayatग्राम पंचायत