शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Rain : हवामान विभागाकडून मुंबईला अतिसतर्कतेचा इशारा; मंगळवारी शाळांना सुट्टी जाहीर
2
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी बोलावली महत्त्वाची बैठक; ७ केंद्रीय मंत्री राहणार उपस्थित
3
अ‍ॅप्पलने मोठी डील केली...! २.७ लाख स्के. फुटांचे ऑफिस भाडेतत्वावर घेतले, १०१८ कोटी मोजणार... 
4
Amreen Kaur Vikramaditya Singh: कोण आहेत अमरीन कौर ज्यांच्यासोबत मंत्री विक्रमादित्य सिंह करणार लग्न?
5
राष्ट्राध्यक्ष पुतिन यांचा PM मोदींना फोन; अलास्कामध्ये ट्रम्प यांच्याशी झालेल्या चर्चेची दिली माहिती
6
दुसरीमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्याचा शाळेच्या वसतिगृहात सापडला मृतदेह, पोलिसांनी काय सांगितले?
7
मेट्रोमधून सामान नेण्यासाठी पैसे लागणार; एका बॅगेसाठी ३० रुपये...; तिकीट नाही काढले तर...
8
बंगाली स्थलांतरितांनी घरी परतावं, दरमहिना ५ हजार देऊ; CM ममता बॅनर्जी यांची मोठी घोषणा
9
Thane Rain Alert: ठाण्याला अतिवृष्टीचा इशारा; महापालिकेने शाळा-महाविद्यालयांबद्दल घेतला निर्णय
10
वाल्मीक कराडच्या वकिलाने १ तास ४५ मिनिटे युक्तीवाद केला; उज्ज्वल निकम म्हणतात...
11
Airtel Down! कॉल आणि इंटरनेटवर परिणाम; हजारो युजर्सनी नोंदवल्या तक्रारी
12
आता Zepto वर १० मिनिटांत मिळणार प्लॉट? 'या' रिअल इस्टेट कंपनीसोबत केला मोठा करार
13
'वरण भात म्हणजे गरिबांचं जेवण', विवेक अग्निहोत्रींच्या वक्तव्यावर मराठी अभिनेत्रीचा संताप
14
प्रीमियम लक्झरीमध्ये 'स्पोर्टी' टच! टोयोटा कॅमरीची नवीन 'स्प्रिंट एडिशन' भारतात लॉन्च
15
Sarfaraz Khan Century : ज्याला टीम इंडियातून बाहेर काढलं; त्या पठ्ठ्यानं संधी मिळताच शतक ठोकलं
16
Vladimir Putin High-Level Security : पुतिन यांची 'विष्ठा'ही परत नेली रशियात, अलास्काच्या दौऱ्यात लघवीसाठी होती खास सुटकेस; कारण...
17
'त्यांचा दीर्घ अनुभव देशाच्या कामी येणार', सीपी राधाकृष्णन यांच्या भेटीनंतर PM मोदींची प्रतिक्रिया
18
Maharashtra Rain: अचानक इतका पाऊस का पडतोय? अजून किती दिवस पावसाचा जोर कायम राहणार?
19
पोलीस कॉन्स्टेबलचा पत्नी-मुलावर तलवारीनं हल्ला; मग स्वत: धावत्या ट्रेनसमोर घेतली उडी, त्यानंतर...
20
CCTV देणं प्रायव्हेसी उल्लंघन कसं?; दिल्लीत पत्रकार परिषद घेत विरोधकांचा ECI वर हल्लाबोल

ग्रामविकासाच्या पंचसुत्रीसाठी सुसंवाद महत्त्वाचा : भास्करराव पेरे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 28, 2019 17:46 IST

जळगाव नेऊर : गावातील प्रत्येकाला पिण्याचे शुद्ध पाणी मिळाले पाहिजे. गावात उपलब्ध असलेल्या पाण्याचे योग्य नियोजन करुन पाण्याचा पुनर्वापर केला पाहिजे, प्रत्येकाने वृक्ष लागवड केलीच पाहिजे, वैयक्तिक स्वच्छता या सर्व बाबी ग्रामविकासाची पंचसुत्री असून जर यात पती-पत्नीमध्ये असणाऱ्या सुसंवादासारखी भर पडली तर गाव सुखी आणि समाधानी होण्यास वेळ लागत नाही, असे प्रतिपादन राष्टÑपती पुरस्कारप्राप्त ग्रामपंचायतीचे सरपंच भास्करराव पेरे पाटील यांनी केले.

बाळापूर येथे नुकत्याच झालेल्या ग्रामपंचायतीच्या निवडणुकीमध्ये निवडून आलेल्या सदस्यांच्या मार्गदर्शनासाठी उपसरपंच अंकुश शिरसाठ यांनी आयोजित केलेल्या व्याख्यानप्रसंगी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी समता प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष अर्जुन कोकाटे होते. यावेळी पेरे यांनी आपल्या खास बोलीभाषेतून सरपंचपदाच्या २५ वर्षाच्या काळात आलेले वेगवेगळे अनुभव कथन केले. ग्रामस्थ बदल स्विकारायला तयार असतात पण त्यांना पर्याय उपलब्ध करु न दिले पाहिजेत. हे समजावून सांगतांना इथे थुंकू नका, असे फलक लावण्यापेक्षा कुठे थुंकायचे याचे फलक लावले पाहिजेत. त्या ठिकाणी वॉश बेसिन व पाण्याची सोय केली पाहिजे. तर लोक इथे-तिथे थुंकणार नाही. झाडे तोडू नका, असे अनेकांनी सांगितले, मात्र चुलीत काय घालायचे हे कुणीही सांगितले नाही. चुलीत घालायला काहीतरी पर्याय द्या. नुसत्या उपदेशांनी गाव सुधारणार नाही, तर आपल्या कृतीतुन प्रत्येकाने आपला गाव पुढे कसा जाईल, याचा विचार केला पाहिजे. पाण्याचा योग्य वापर करावा, ते वाचवण्याचा प्रयत्न करा. अखंड हरिनाम सप्ताह केल्याने पाऊस पडत नाही. त्यासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न करावे लागतात, असेही पेरे पाटील म्हणाले. यावेळी अण्णासाहेब पाटील, संभाजीे पवार, जनता सहकार बँकेचे संचालक माधवराव बनकर, नगरसेवक प्रवीण बनकर, पंचायत समिती सदस्य प्रवीण गायकवाड, प्राचार्य डॉ. भाऊसाहेब गमे, जल हक्क संघर्ष समितीचे भागवतराव सोनवणे, डॉ. सुरेश कांबळे, बचत गटाच्या जिल्हाध्यक्ष शालिनी गायकवाड, सचिन पाटील, सदाभाऊ शेळके, विजय कोटमे, मच्छिंद्र पवार, सरपंच श्रावण खुरसणे, सोपान शिरसाठ, वत्सला पवार, अनिता शिरसाठ, विमल शिरसाठ, नारायण पवार, संगीता गायकवाड आदी सदस्यांसह मान्यवर व नागरिक ऊपस्थित होते. सूत्रसंचालन डी. पी. गायकवाड यांनी तर आभार अरु ण शिरसाठ यांनी मानले. 

टॅग्स :gram panchayatग्राम पंचायत