शहरं
Join us  
Trending Stories
1
जिद्दीला सलाम! आई नोट्स बनवून वाचून दाखवायची; अंध मुलाने क्रॅक केली UPSC...
2
Cricket VIDEO: 'शायनिंग' नडली..!! हेल्मेट न घालता खेळायला गेला, तोंडावर चेंडू आदळला अन्...
3
आता ते दया-माया दाखवणार नाहीत! शास्त्रींनी युवा शतकवीर वैभव सूर्यंवशीला केलं सावध
4
काश्मीरच्या बडगाममध्ये CRPF च्या वाहनाचा अपघात; अनेक जवान जखमी
5
पहलगाम हल्ल्यानंतर घेतलेल्या भूमिकेवरून काँग्रेसनं मोदींना घेरलं, हे चार प्रश्न उपस्थित करून केली कोंडी
6
रेल्वे कर्मचाऱ्यांनी निवृत्त सहकाऱ्याला दिला 'असा' निरोप; ये- जा करणारे बघतंच राहिले!
7
INDW vs RSAW : प्रतिकाच्या विक्रमी खेळीनंतर स्नेह राणाचा 'पंजा'; टीम इंडियाचा सलग दुसरा विजय
8
बाबूरावला कंटाळले परेश रावल, म्हणाले- "हेरा फेरी म्हणजे गळ्याला लागलेला फास..."
9
१८ वर्षांची तरुणी पडली ५५ वर्षीय व्यक्तीच्या प्रेमात, पुढं घडलं भयंकर, ऐकून पायाखालची जमीन सरकेल
10
गुगलचे सीईओ सुंदर पिचाई यांचा पगार किती? कंपनीने फक्त सुरक्षेवरच खर्च केले ७१ कोटी रुपये
11
बंगळुरूत 'पाकिस्तान जिंदाबाद' म्हणणाऱ्या व्यक्तीला बेदम मारहाण, जागीच मृत्यू; गृहमंत्री म्हणाले...
12
झिपलाईन ऑपरेटर अल्लाहू अकबर का म्हणत होता? पीडीपी, नॅशनल कॉन्फरन्सच्या नेत्यांचा वेगळाच दावा...
13
तणावपूर्ण परिस्थितीदरम्यान पाकिस्तानकडून सायबर ‘वार’, भारतीय लष्कराची वेबसाईट हॅक करण्याचा प्रयत्न 
14
१ लाखांपेक्षा अधिक गुंतवणूकदार कंगाल झाले; ९२% आपटला हा शेअर, आता विकणंही झालं कठीण
15
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबीयांना ५० लाखांची मदत; राज्य सरकारचा निर्णय
16
बाजार सपाट पातळीवर बंद; रिलायन्सचा शेअर पुन्हा आला धावून, 'या' सेक्टरवर दबाव
17
ATM मधून वारंवार पैसे काढायची सवय असेल तर ती बदला, नाहीतर १ मे पासून होईल नुकसान
18
अण्वस्त्रांची धमकी देणाऱ्या पाकिस्तानच्या संरक्षण मंत्र्यांचे तोंड भारताने केले बंद; एक्स अकाउंटवर घातली बंदी
19
Viral Video: बिबट्या थेट पोलीस ठाण्यातच आला! पोलिसाने पाहिलं, पण नंतर काय घडलं?
20
इलेक्ट्रिक व्हेईकल घेणाऱ्यांसाठी CM फडणवीसांची मोठी घोषणा; टोलमाफी देण्याचा मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय

ग्रामविकासाच्या पंचसुत्रीसाठी सुसंवाद महत्त्वाचा : भास्करराव पेरे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 28, 2019 17:46 IST

जळगाव नेऊर : गावातील प्रत्येकाला पिण्याचे शुद्ध पाणी मिळाले पाहिजे. गावात उपलब्ध असलेल्या पाण्याचे योग्य नियोजन करुन पाण्याचा पुनर्वापर केला पाहिजे, प्रत्येकाने वृक्ष लागवड केलीच पाहिजे, वैयक्तिक स्वच्छता या सर्व बाबी ग्रामविकासाची पंचसुत्री असून जर यात पती-पत्नीमध्ये असणाऱ्या सुसंवादासारखी भर पडली तर गाव सुखी आणि समाधानी होण्यास वेळ लागत नाही, असे प्रतिपादन राष्टÑपती पुरस्कारप्राप्त ग्रामपंचायतीचे सरपंच भास्करराव पेरे पाटील यांनी केले.

बाळापूर येथे नुकत्याच झालेल्या ग्रामपंचायतीच्या निवडणुकीमध्ये निवडून आलेल्या सदस्यांच्या मार्गदर्शनासाठी उपसरपंच अंकुश शिरसाठ यांनी आयोजित केलेल्या व्याख्यानप्रसंगी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी समता प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष अर्जुन कोकाटे होते. यावेळी पेरे यांनी आपल्या खास बोलीभाषेतून सरपंचपदाच्या २५ वर्षाच्या काळात आलेले वेगवेगळे अनुभव कथन केले. ग्रामस्थ बदल स्विकारायला तयार असतात पण त्यांना पर्याय उपलब्ध करु न दिले पाहिजेत. हे समजावून सांगतांना इथे थुंकू नका, असे फलक लावण्यापेक्षा कुठे थुंकायचे याचे फलक लावले पाहिजेत. त्या ठिकाणी वॉश बेसिन व पाण्याची सोय केली पाहिजे. तर लोक इथे-तिथे थुंकणार नाही. झाडे तोडू नका, असे अनेकांनी सांगितले, मात्र चुलीत काय घालायचे हे कुणीही सांगितले नाही. चुलीत घालायला काहीतरी पर्याय द्या. नुसत्या उपदेशांनी गाव सुधारणार नाही, तर आपल्या कृतीतुन प्रत्येकाने आपला गाव पुढे कसा जाईल, याचा विचार केला पाहिजे. पाण्याचा योग्य वापर करावा, ते वाचवण्याचा प्रयत्न करा. अखंड हरिनाम सप्ताह केल्याने पाऊस पडत नाही. त्यासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न करावे लागतात, असेही पेरे पाटील म्हणाले. यावेळी अण्णासाहेब पाटील, संभाजीे पवार, जनता सहकार बँकेचे संचालक माधवराव बनकर, नगरसेवक प्रवीण बनकर, पंचायत समिती सदस्य प्रवीण गायकवाड, प्राचार्य डॉ. भाऊसाहेब गमे, जल हक्क संघर्ष समितीचे भागवतराव सोनवणे, डॉ. सुरेश कांबळे, बचत गटाच्या जिल्हाध्यक्ष शालिनी गायकवाड, सचिन पाटील, सदाभाऊ शेळके, विजय कोटमे, मच्छिंद्र पवार, सरपंच श्रावण खुरसणे, सोपान शिरसाठ, वत्सला पवार, अनिता शिरसाठ, विमल शिरसाठ, नारायण पवार, संगीता गायकवाड आदी सदस्यांसह मान्यवर व नागरिक ऊपस्थित होते. सूत्रसंचालन डी. पी. गायकवाड यांनी तर आभार अरु ण शिरसाठ यांनी मानले. 

टॅग्स :gram panchayatग्राम पंचायत