शहरं
Join us  
Trending Stories
1
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
2
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
3
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
4
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
5
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
6
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
7
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
8
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश
9
उन्हाचा कहर; सातारा ४०.७ अंशावर स्थिर! झळा असह्य, पूर्व भागात नागरिकांना घामाच्या धारा 
10
अवघ्या १२०० रुपयांत दिली पतीला अद्दल घडविण्याची सुपारी! पत्नीनेच रचला पतीला लुटण्याचा 'प्लॅन'
11
सामाजिक समता प्रस्थापित करण्याच्या दिशेने जातिनिहाय जनगणनेचा निर्णय महत्त्वाचा: अजित पवार
12
वेळ वाया घालवू नका, थेट कारवाई करा; पहलगाम हल्याबाबत राहुल गांधींची सरकारला मागणी
13
केवळ अजित पवारच नव्हे, शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडूनही मोदी सरकारच्या निर्णयाचं स्वागत
14
जातनिहाय जनगणना; अमित शाह म्हणाले ऐतिहासिक निर्णय, ओवेसी म्हणाले भाजपनं दलित मुस्लिमांसाठी...'
15
“सर्वच प्रश्न सुटतील, योग्य न्याय मिळेल”; जातिनिहाय जनगणना निर्णयाचे छगन भुजबळांकडून स्वागत
16
पुढच्या हंगामात खेळणार का? MS धोनीनं प्रश्न विचारणाऱ्या डॅनी मॉरिसनचीच घेतली फिरकी (VIDEO)
17
"CSKला धोनीची गरज नाही, संघाच्या भविष्यासाठी..."; MSD ज्याला आदर्श मानतो, त्यानेच मांडलं रोखठोक मत
18
दुकानदाराच्या डोळ्यात मिरची पूड टाकून ५० हजार रुपये लुटले, संपूर्ण प्रकार कॅमेऱ्यात कैद!
19
केंद्र सरकारने अचानक जातीय जनगणनेचा निर्णय का घेतला? काँग्रेसचा सवाल...
20
गुरुवारी विनायक चतुर्थी: ५ मिनिटे लागतील, स्वामी-बाप्पा कृपा करतील; ‘हे’ मंत्र-श्लोक म्हणाच

उद्योगांच्या पाठपुराव्यासाठी समिती

By admin | Updated: October 1, 2016 01:31 IST

निमात निर्णय : आमदार, उद्योजक घेणार मुख्यमंत्र्यांची भेट

सातपूर : जिल्ह्यातील बंद पडलेल्या उद्योगांची माहिती घेऊन ते बंद पडण्याची कारणे शोधून ते पूर्ववत सुरू करण्यासाठी सामूहिक प्रयत्न करणे, मोठे उद्योग आणण्यासाठी पालकमंत्र्यांच्या माध्यमातून मुख्यमंत्र्यांकडे पाठपुरावा करणे, शासन दरबारी पाठपुरावा करण्यासाठी लोकप्रतिनिधी, निमा पदाधिकारी यांची समन्वय समिती स्थापन करण्याचा निर्णय निमात झालेल्या जिल्ह्यातील आमदार आणि उद्योजकांच्या बैठकीत घेण्यात आला. जिल्ह्यात मोठे उद्योग प्रकल्प यावेत आणि रोजगार वाढावा या ठोस मुद्द्यांवर चर्चा करण्यासाठी निमाच्या सभागृहात ही बैठक घेण्यात आली. यावेळी आमदार सीमा हिरे, सुधीर तांबे, डॉ. राहुल अहेर, अपूर्व हिरे, नरहरी झिरवाळ आदि उपस्थित होते. जिल्ह्यातील अनेक कारखाने बंद आहेत, त्याची अशी अवस्था कशामुळे झाली याचा शोध घेऊन ते पूर्ववत सुरू करण्याची सूचना आमदार सीमा हिरे यांनी केली, तर उद्योगांना चालना मिळण्यासाठी शासनाकडून अपेक्षित योजना पदरात पाडून घेण्यासाठी सातत्याने पाठपुरावा केला पाहिजे. त्यासाठी सुकाणू समिती तयार करण्याची सूचना आमदार डॉ. राहुल अहेर यांनी केली. प्रारंभी निमाचे अध्यक्ष हरिशंकर बॅनर्जी यांनी जिल्ह्यात मोठे उद्योग आणण्यासाठी लोकप्रतिनिधींच्या माध्यमातून शासन दरबारी सामूहिक प्रयत्न करण्याची गरज असल्याचे स्पष्ट केले. सरचिटणीस उदय खरोटे यांनी जिल्ह्यात मोठे उद्योग प्रकल्प यावेत आणि रोजगार वाढावा या ठोस मुद्द्यांवर चर्चा करण्यासाठी या बैठकीचे आयोजन करण्यात आल्याचे स्पष्ट केले. या बैठकीत मधुकर ब्राह्मणकर, रमेश वैश्य, संजीव नारंग, मनीष रावळ, व्हीनस वाणी, संजय सोनवणे, मंगेश पाटणकर, छबू नागरे, शशिकांत जाधव, हर्षद ब्राह्मणकर आदिंनी सूचना केल्या.या बैठकीस उदय रकिबे, देवयानी महाजन, संदीप भदाणे, मोहन सुतार, मंगेश काठे, कैलास अहिरे, उत्तम दोंदे, श्रीकांत बच्छाव, सुनील बागुल, शिवाजी आव्हाड आदिंसह निमा सभासद उपस्थित होते. ज्ञानेश्वर गोपाळे यांनी आभार मानले. (वार्ताहर)