शहरं
Join us  
Trending Stories
1
'मला आवडतो पाकिस्तान, पण मोदी महान'; मुनीर भेटीदरम्यान काय म्हणाले डोनाल्ड ट्रम्प?
2
Maruti Chitampalli Death: 'अरण्यऋषी' मारुती चितमपल्ली यांचे निधन; वयाच्या ९३व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
3
कोण होते मारुती चितमपल्ली? जाणून घ्या त्यांचा जीवनप्रवास व दिनचर्या
4
मराठी साहित्य संपदा समृद्ध करणारा अरण्यऋषी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ज्येष्ठ साहित्यिक मारूती चितमपल्ली यांना श्रद्धांजली
5
Pune Crime News: लिपस्टिकने चिठ्ठी लिहिली अन् विवाहितेने चिमूरड्यासह पाचव्या मजल्यावरून स्वतःला झोकून दिलं
6
Viral Video : कशासाठी तो हट्ट? चिमुकल्याला सिंहाच्या पाठीवर बसवत होता बाबा, पुढे जे झालं ते बघाच... 
7
अमेरिका शेवटी विश्वासघातकीच! सोबत लढता लढता मध्येच या सैन्याला त्यांच्या नशिबावर सोडले 
8
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
9
Jejuri Accident : जेजुरी मोरगाव रोडवर भीषण अपघात;आठ ठार, पाच गंभीर जखमी
10
"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!
11
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
12
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
13
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
14
“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?
15
Sonam Raghuvanshi : "आम्ही कोणतंही पाप केलेलं नाही..."; नार्को टेस्टच्या मागणीवर सोनम रघुवंशीचा भाऊ संतापला
16
“काँग्रेस दिशाहीन पक्ष”; CM फडणवीसांच्या उपस्थितीत जयश्रीताई पाटील यांचा भाजपा प्रवेश
17
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
18
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
19
"राजा भाई तुम तो गए...!" ...अन् अँकर गमतीत बोलला, ते खरं ठरलं; बघा संपूर्ण VIDEO 
20
जेव्हा James Bond चित्रपट सत्यात उतरतो; पहिल्यांदाच MI6 चे नेतृत्व एका महिलेकडे...

आत्महत्त्या करू; पण जागा देणार नाही

By admin | Updated: August 3, 2014 02:00 IST

आत्महत्त्या करू; पण जागा देणार नाही

 

नाशिक : आगामी कुंभमेळ्यासाठी शेतकऱ्यांच्या बागायती जमिनी घेऊ दिल्या जाणार नाही अगदी भाड्यानेदेखील देणार नाही, असे सांगतानाच तपोवन परिसरातील शेतकऱ्यांनी आत्महत्त्या करू; पण जागा देणार नाही असा इशाराच दिला. शनिवारी दौऱ्यावर आलेल्या महंत ग्यानदासजी यांना त्यांनी साकडे घातले. त्यांनीही शेतकऱ्यांच्या बाजूनेच असल्याचे सांगत जमिनीची गरज भासली तर शेतकऱ्यांच्या संमतीनेच ती मिळवू असे सांगितले.कुंभमेळ्यासाठी ३२५ एकर जागा उपलब्ध केली जाणार आहे. त्यापैकी ५७ एकर जागा महापालिकेच्या ताब्यात असून, उर्वरित जागेसाठी भूसंपादनाची तयारी सुरू झाली आहे. तथापि, शेतकऱ्यांचा त्यास विरोध आहे. शनिवारी साधू-महंत आणि जिल्हाधिकाऱ्यांच्या दौऱ्यापूर्वीपासून उभ्या असलेल्या शेतकऱ्यांनी संतप्त भावना व्यक्तकेल्या. यापूर्वी रामवाडी येथे साधुग्राम वसवले जात होते; परंतु ते आता तपोवनापर्यंत आले आहे. गेल्या कुंभमेळ्याच्या वेळी शेतकऱ्यांच्या जागा आरक्षित करण्यात आल्या आणि त्यावर आता इमारती उभ्या राहिल्याने अन्य शेतकऱ्यांच्या जागा ताब्यात घेण्याच्या हालचाली सुरू आहेत, असे मधुकर जेजूरकर यांनी सांगितले. साधुग्रामसाठी आरक्षण टाकताना माजी खासदार तसेच काही परप्रांतीय साधुंच्या आश्रमाच्या जागा वगळून शेतकऱ्यांच्या पिकाऊ जमिनींवर आरक्षण टाकण्यात आले आहे. उदरनिर्वाहाचे साधन हटविण्याचा प्रयत्न कोणी सहन करणार नाही, असे सांगताना जेजूरकर यांनी आत्महत्त्या करू; परंतु जमिनी देणार नाही असे सांगितले. कुंभमेळ्यात तीन महिन्यांसाठी तात्पुरत्या स्वरूपात येणाऱ्या साधू-महंतांसाठी जागा आरक्षित केल्या जातात. साधुग्राम वसवताना त्यात गटारी, रस्ते, पाइपलाइन टाकण्यात येते. शौचालयांचे बांधकाम करण्यात येते. त्यामुळे कुंभमेळा संपल्यानंतरही शेतकऱ्यांच्या शेतात खडी, सीमेंट असल्याने तीन महिने पीक घेता येत नाही, त्यामुळे एक वर्ष शेतीचे भाडे राज्य शासनाने दिले तरी त्याचा उपयोग होत नाही असे त्यांनी सांगितले. शिवाजी गवळी यांनीही शेतकऱ्यांना दहापट टीडीआर देऊ असे सांगता सांगता प्रत्यक्षात मात्र कोणत्याही प्रकारे मोबदला दिलेला नाही, असे सांगून जागा देण्यास विरोध केला. यावेळी महंत ग्यानदास यांना निवेदन देण्यात आले. त्यांनी शेतजमिनी नकोच आहेत, गरज भासल्यास शेतकऱ्यांना विनंती करून त्यांच्या संमतीनेच जमिनी घेतल्या जातील असे त्यांनी सांगितले. यावेळी एकनाथ गिते, प्रकाश शिंदे, रामभाऊ सूर्यवंशी, दामोदर जेजूरकर, रामदास जेजूरकर यांच्यासह अन्य शेतकरी उपस्थित होते. (प्रतिनिधी)