शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "उद्या रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
4
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
5
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
6
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
7
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
8
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
9
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
10
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
11
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
12
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
13
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
14
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
15
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
16
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
17
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
18
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
19
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
20
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
Daily Top 2Weekly Top 5

सेना-भाजपा वादावर आयुक्तांनी टाकला पडदा

By admin | Updated: July 11, 2017 00:37 IST

कालिदास नूतनीकरण : ई-शुभारंभाचा कार्यक्रम अन्यत्र घेणार

लोकमत न्यूज नेटवर्कनाशिक : महापालिकेने नूतनीकरणासाठी महाकवी कालिदास कलामंदिर येत्या १५ जुलैपासून वर्षभराकरिता बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. सेना-भाजपाच्या कार्यक्रमावरून वाक्युद्ध सुरू झाले असताना आयुक्तांनी नूतनीकरणाच्या ई-शुभारंभाचा कार्यक्रमही कालिदासऐवजी अन्यत्र आयोजित करण्याचा निर्णय घेत सेना-भाजपातील वादावरही पडदा टाकला आहे. स्मार्ट सिटीअंतर्गत महाकवी कालिदास कलामंदिराच्या नूतनीकरणाचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यासाठी नाशिक म्युनिसिपल स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट कार्पोरेशन या कंपनीने नऊ कोटी रुपये मंजूर केले आहेत. त्यानुसार, येत्या १६ जुलैपासून महाकवी कालिदास कलामंदिर बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला होता. मात्र, दि. १६ रोजी शिवसेनेच्या वाहतूक सेनेने कालिदास कलामंदिरची मागणी केल्याने पेच निर्माण झाला होता. शिवाय, १५ जुलै रोजी शहरातील रंगकर्मी नूतनीकरणापूर्वी अखेरच्या दिवशी कालिदासला अभिवादन करणार असल्याने नंतर पुन्हा दुसरा कोणताही कार्यक्रम घेण्यात येऊ नये, अशी भावना रंगकर्मींमधून व्यक्त केली जात होती. रंगकर्मींच्या या भावनांचा आदर राखत नंतर शिवसेनेचे महानगरप्रमुख अजय बोरस्ते यांनी माघार घेत वाहतूक सेनेचा कार्यक्रम अन्यत्र घेण्याची तयारी दर्शविली. शिवसेना बॅकफूटवर आली असताना सत्ताधारी भाजपा मात्र, दि. १७ जुलै रोजी नूतनीकरणाचा ई-शुभारंभ मुख्यमंत्र्यांच्या हस्ते करण्याच्या तयारीत गुंतली आहे. त्यामुळे कालिदासमध्ये भाजपाचा कार्यक्रम घेण्यास शिवसेनेने हरकत घेतली. या साऱ्या वादामुळे कालिदासचे नूतनीकरण लांबण्याची शक्यता निर्माण झाली. दरम्यान, आयुक्त अभिषेक कृष्ण यांनीच आता या वादावर पडदा टाकला असून, कालिदास कलामंदिर येत्या १६ जुलैपासून बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. कालिदास नूतनीकरणाच्या कामाचा ई-शुभारंभ मुख्यमंत्र्यांच्या हस्ते करण्याचे नियोजन असून, सदर कार्यक्रमाची तारीख निश्चित नाही. मात्र, आता ई-शुभारंभाचा कार्यक्रम मनपाच्या अभिलेख कक्षात अथवा मविप्रच्या थोरात सभागृहात आयोजित करण्यात येईल, असेही आयुक्तांनी स्पष्ट केले आहे. आयुक्तांच्या या भूमिकेमुळे सेना-भाजपाच नव्हे तर अन्य कुणालाही कालिदास १६ जुलैपासून वर्षभरासाठी बंद राहणार आहे.शनिवारी अखेरचा नाट्यप्रयोगमहाकवी कालिदास कलामंदिराचे नूतनीकरण तब्बल २९ वर्षांनंतर होत आहे. या नूतनीकरणानंतर कालिदासचे रूपडे बदलणार आहे. त्यामुळे स्थानिक रंगकर्मींनी कालिदासला अभिवादन करण्यासाठी रात्री ‘तीन पैशांचा तमाशा’ या नाटकाचा प्रयोग आयोजित केला आहे. त्यानंतर वर्षभरासाठी कालिदासचा पडदा पडणार आहे.