शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्यानंतर अचानक गायब झाली पाकिस्तानी महिला; UP मध्ये केली ९ वर्ष सरकारी नोकरी
2
“‘सुसंस्कृत राज्य’ म्हणून महाराष्ट्राची ओळख अबाधित ठेवण्याचा दृढनिश्चय करूया”: अजित पवार
3
जातनिहाय जनगणनेचे स्वागत, पण कधी पूर्ण करणार ते सांगा; राहुल गांधी यांनी केंद्र सरकारच्या निर्णयाला दिला पाठिंबा
4
LPG Price 1 May 2025: एलपीजी सिलिंडर झाला स्वस्त, पाहा दिल्ली ते चेन्नईपर्यंतचे नवे दर
5
धक्कादायक! Instagram वरचे फॉलोअर्स कमी झाल्यानं सोशल मीडिया इन्फ्लुएंसरनं संपवलं आयुष्य
6
यावेळी तीन तुकडेच करा! पीएम मोदींनी काल पाच उच्चस्तरीय बैठका घेतल्या
7
आजचे राशीभविष्य, १ मे २०२५: व्यापारात फायदा अन् नोकरीत बढतीची शक्यता
8
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आता वर्षा बंगल्यामध्ये; अक्षय्य तृतीयेचा मुहूर्त साधून केली विधीवत पूजा
9
ग्रामीण भागात रोजगार वाढले; तरुणांपुढे आव्हाने, तरुणांपुढे गुणवत्तापूर्ण उपजीविकेशी संबंधित आव्हाने कायम
10
दहशतवाद्याने विचारले, आप काश्मिरी हो क्या? जालन्यातील युवकाचा दावा : रेखाचित्र पाहताच ‘एनआयए’ला ई-मेल
11
एफआयआर नोंदविण्यास नकार हे दुर्दैव; अक्षय शिंदे एन्काऊंटरप्रकरणात क्राइम ब्रँचच्या ‘एसआयटी’वर उच्च न्यायालयाची नाराजी
12
एमएमआरटीएकडून बेस्ट भाडेवाढ मंजूर; अधिकृत घोषणेची प्रतीक्षा
13
रेल्वेच्या बैठकीला पाच खासदारांची दांडी; प्रवाशांना चांगल्या सुविधा पुरविण्याचे आश्वासन
14
पुढील जनगणनेची तारीख लवकरच जाहीर; काेराेनामुळे झाला नव्हता निर्णय
15
भारतासोबतच्या टॅरिफ वाटाघाटी प्रगतिपथावर; अमेरिकी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे प्रतिपादन
16
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
17
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
18
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
19
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
20
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!

सेना-भाजपा वादावर आयुक्तांनी टाकला पडदा

By admin | Updated: July 11, 2017 00:37 IST

कालिदास नूतनीकरण : ई-शुभारंभाचा कार्यक्रम अन्यत्र घेणार

लोकमत न्यूज नेटवर्कनाशिक : महापालिकेने नूतनीकरणासाठी महाकवी कालिदास कलामंदिर येत्या १५ जुलैपासून वर्षभराकरिता बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. सेना-भाजपाच्या कार्यक्रमावरून वाक्युद्ध सुरू झाले असताना आयुक्तांनी नूतनीकरणाच्या ई-शुभारंभाचा कार्यक्रमही कालिदासऐवजी अन्यत्र आयोजित करण्याचा निर्णय घेत सेना-भाजपातील वादावरही पडदा टाकला आहे. स्मार्ट सिटीअंतर्गत महाकवी कालिदास कलामंदिराच्या नूतनीकरणाचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यासाठी नाशिक म्युनिसिपल स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट कार्पोरेशन या कंपनीने नऊ कोटी रुपये मंजूर केले आहेत. त्यानुसार, येत्या १६ जुलैपासून महाकवी कालिदास कलामंदिर बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला होता. मात्र, दि. १६ रोजी शिवसेनेच्या वाहतूक सेनेने कालिदास कलामंदिरची मागणी केल्याने पेच निर्माण झाला होता. शिवाय, १५ जुलै रोजी शहरातील रंगकर्मी नूतनीकरणापूर्वी अखेरच्या दिवशी कालिदासला अभिवादन करणार असल्याने नंतर पुन्हा दुसरा कोणताही कार्यक्रम घेण्यात येऊ नये, अशी भावना रंगकर्मींमधून व्यक्त केली जात होती. रंगकर्मींच्या या भावनांचा आदर राखत नंतर शिवसेनेचे महानगरप्रमुख अजय बोरस्ते यांनी माघार घेत वाहतूक सेनेचा कार्यक्रम अन्यत्र घेण्याची तयारी दर्शविली. शिवसेना बॅकफूटवर आली असताना सत्ताधारी भाजपा मात्र, दि. १७ जुलै रोजी नूतनीकरणाचा ई-शुभारंभ मुख्यमंत्र्यांच्या हस्ते करण्याच्या तयारीत गुंतली आहे. त्यामुळे कालिदासमध्ये भाजपाचा कार्यक्रम घेण्यास शिवसेनेने हरकत घेतली. या साऱ्या वादामुळे कालिदासचे नूतनीकरण लांबण्याची शक्यता निर्माण झाली. दरम्यान, आयुक्त अभिषेक कृष्ण यांनीच आता या वादावर पडदा टाकला असून, कालिदास कलामंदिर येत्या १६ जुलैपासून बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. कालिदास नूतनीकरणाच्या कामाचा ई-शुभारंभ मुख्यमंत्र्यांच्या हस्ते करण्याचे नियोजन असून, सदर कार्यक्रमाची तारीख निश्चित नाही. मात्र, आता ई-शुभारंभाचा कार्यक्रम मनपाच्या अभिलेख कक्षात अथवा मविप्रच्या थोरात सभागृहात आयोजित करण्यात येईल, असेही आयुक्तांनी स्पष्ट केले आहे. आयुक्तांच्या या भूमिकेमुळे सेना-भाजपाच नव्हे तर अन्य कुणालाही कालिदास १६ जुलैपासून वर्षभरासाठी बंद राहणार आहे.शनिवारी अखेरचा नाट्यप्रयोगमहाकवी कालिदास कलामंदिराचे नूतनीकरण तब्बल २९ वर्षांनंतर होत आहे. या नूतनीकरणानंतर कालिदासचे रूपडे बदलणार आहे. त्यामुळे स्थानिक रंगकर्मींनी कालिदासला अभिवादन करण्यासाठी रात्री ‘तीन पैशांचा तमाशा’ या नाटकाचा प्रयोग आयोजित केला आहे. त्यानंतर वर्षभरासाठी कालिदासचा पडदा पडणार आहे.