शहरं
Join us  
Trending Stories
1
'या' माशांना वाचवण्यासाठी बांगलादेशनं उतरवलं सैन्य दल; बंगालच्या खाडीत पाठवल्या १७ युद्धनौका
2
‘कोस्टल’वर थेट १४० चा हायस्पीड: ...तर मग गुन्हाच होईल दाखल; वाहतूक पोलिसांकडून दिवसाला ५०० ई-चालानची कारवाई
3
FD करुन तुम्ही कधीही श्रीमंत होणार नाही? CA ने दिला इशारा, म्हणाले खऱ्या कमाईसाठी गुंतवणूक धोरण बदला
4
Video - अरे बापरे! ऑर्डर केला iPhone 16; बॉक्स उघडताच...; ऑनलाईन खरेदीत अजब भानगड
5
Tata Capital IPO: प्रतीक्षा संपली! तुमच्या खिशात आहेत का १४,९९६ रुपये? तर बनू शकता टाटांच्या कंपनीचे प्रॉफिट पार्टनर
6
इवलीशी मुंबई झाली महाकाय ! त्या त्या भागानुसार प्रति स्क्वेअर फुटाचा दर काय... पहाल तर...
7
"प्यार मे सौदेबाजी...", अरबाज खान दुसऱ्यांदा बाबा झाल्यानंतर मलायका अरोराची क्रिप्टिक पोस्ट
8
सोनम वांगचुक यांच्या अटकेवर आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी, पत्नीने दाखल केली याचिका
9
Kantara Chapter 1: साऊथने पुन्हा एकदा करून दाखवलं! फक्त ४ दिवसांत 'कांतारा'ने कमावले ३०० कोटी
10
पतीच्या मृत्यूनंतर पुन्हा जोडीदाराची इच्छा पडली महागात; मॅट्रिमोनियल साइटवरून शिक्षिकेला कोट्यवधींचा गंडा!
11
Post Office Scheme: दर महिन्याला होईल ₹६१,००० ची कमाई; जबरदस्त आहे ही सरकारी स्कीम, कोट्यधीशही बनवेल
12
Jaipur Hospital Fire: जयपूरच्या एसएमएस रुग्णालयात भीषण अग्नितांडव: आयसीयूमध्ये ६ रुग्णांचा दुर्दैवी अंत, ५ जणांची प्रकृती चिंताजनक
13
Share Market Today: शेअर बाजाराची तेजीसह सुरुवात, Nifty २४,९१० च्या वर; सरकारी बँकांच्या शेअर्समध्ये मोठी तेजी
14
Jaipur Hospital Fire: '२० मिनिटांपूर्वी आगीची माहिती दिली, पण डॉक्टर पळून गेले'; SMS रुग्णालयातील प्रत्यक्षदर्शींचा धक्कादायक दावा
15
Video:...तर भारताच्या 'या' खेळाडूला मारायचंय; पाकिस्तानी स्पिनर अबरार अहमदचं विधान चर्चेत
16
पती अन् दोन मुलांना सोडून शेजाऱ्यासोबत सुरू होतं अफेअर; 'ओयो'मध्ये प्रियकर गर्लफ्रेंडसोबत दिसला अन्...
17
या राज्यात ५० किमी वेगाने वारे वाहतील, मुसळधार पाऊस आणि गारपिटीचा इशारा
18
देशातील राष्ट्रीय चलनातून चार शून्य हटवले जाणार; इराणचा ऐतिहासिक निर्णय, काय होणार बदल?
19
उत्खनन क्षेत्रात छत्तीसगडची ऐतिहासिक झेप; खनिज महसूल २५ वर्षांत ३४ पटीने वाढला!
20
त्यानं स्वतःच कापला प्रायव्हेट पार्ट अन् रचला हल्ल्याचा बनाव! पोलिसांना गोंधळात टाकणारा प्रकरणाचा 'असा' झाला खुलासा

सेना-भाजपा वादावर आयुक्तांनी टाकला पडदा

By admin | Updated: July 11, 2017 00:37 IST

कालिदास नूतनीकरण : ई-शुभारंभाचा कार्यक्रम अन्यत्र घेणार

लोकमत न्यूज नेटवर्कनाशिक : महापालिकेने नूतनीकरणासाठी महाकवी कालिदास कलामंदिर येत्या १५ जुलैपासून वर्षभराकरिता बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. सेना-भाजपाच्या कार्यक्रमावरून वाक्युद्ध सुरू झाले असताना आयुक्तांनी नूतनीकरणाच्या ई-शुभारंभाचा कार्यक्रमही कालिदासऐवजी अन्यत्र आयोजित करण्याचा निर्णय घेत सेना-भाजपातील वादावरही पडदा टाकला आहे. स्मार्ट सिटीअंतर्गत महाकवी कालिदास कलामंदिराच्या नूतनीकरणाचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यासाठी नाशिक म्युनिसिपल स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट कार्पोरेशन या कंपनीने नऊ कोटी रुपये मंजूर केले आहेत. त्यानुसार, येत्या १६ जुलैपासून महाकवी कालिदास कलामंदिर बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला होता. मात्र, दि. १६ रोजी शिवसेनेच्या वाहतूक सेनेने कालिदास कलामंदिरची मागणी केल्याने पेच निर्माण झाला होता. शिवाय, १५ जुलै रोजी शहरातील रंगकर्मी नूतनीकरणापूर्वी अखेरच्या दिवशी कालिदासला अभिवादन करणार असल्याने नंतर पुन्हा दुसरा कोणताही कार्यक्रम घेण्यात येऊ नये, अशी भावना रंगकर्मींमधून व्यक्त केली जात होती. रंगकर्मींच्या या भावनांचा आदर राखत नंतर शिवसेनेचे महानगरप्रमुख अजय बोरस्ते यांनी माघार घेत वाहतूक सेनेचा कार्यक्रम अन्यत्र घेण्याची तयारी दर्शविली. शिवसेना बॅकफूटवर आली असताना सत्ताधारी भाजपा मात्र, दि. १७ जुलै रोजी नूतनीकरणाचा ई-शुभारंभ मुख्यमंत्र्यांच्या हस्ते करण्याच्या तयारीत गुंतली आहे. त्यामुळे कालिदासमध्ये भाजपाचा कार्यक्रम घेण्यास शिवसेनेने हरकत घेतली. या साऱ्या वादामुळे कालिदासचे नूतनीकरण लांबण्याची शक्यता निर्माण झाली. दरम्यान, आयुक्त अभिषेक कृष्ण यांनीच आता या वादावर पडदा टाकला असून, कालिदास कलामंदिर येत्या १६ जुलैपासून बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. कालिदास नूतनीकरणाच्या कामाचा ई-शुभारंभ मुख्यमंत्र्यांच्या हस्ते करण्याचे नियोजन असून, सदर कार्यक्रमाची तारीख निश्चित नाही. मात्र, आता ई-शुभारंभाचा कार्यक्रम मनपाच्या अभिलेख कक्षात अथवा मविप्रच्या थोरात सभागृहात आयोजित करण्यात येईल, असेही आयुक्तांनी स्पष्ट केले आहे. आयुक्तांच्या या भूमिकेमुळे सेना-भाजपाच नव्हे तर अन्य कुणालाही कालिदास १६ जुलैपासून वर्षभरासाठी बंद राहणार आहे.शनिवारी अखेरचा नाट्यप्रयोगमहाकवी कालिदास कलामंदिराचे नूतनीकरण तब्बल २९ वर्षांनंतर होत आहे. या नूतनीकरणानंतर कालिदासचे रूपडे बदलणार आहे. त्यामुळे स्थानिक रंगकर्मींनी कालिदासला अभिवादन करण्यासाठी रात्री ‘तीन पैशांचा तमाशा’ या नाटकाचा प्रयोग आयोजित केला आहे. त्यानंतर वर्षभरासाठी कालिदासचा पडदा पडणार आहे.