शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

आयुक्तांच्याही अंदाजपत्रकाला लागणार कात्री

By admin | Updated: September 8, 2016 01:23 IST

आयुक्तांच्याही अंदाजपत्रकाला लागणार कात्री

 नाशिक : घरपट्टी-पाणीपट्टीत वाढ करण्यास लोकप्रतिनिधींकडून सातत्याने होणारा विरोध, शासनाने एलबीटी रद्द केल्यानंतर ठरावीक उत्पन्नासाठी वाढलेले परावलंबित्व, वाढता आस्थापना खर्च त्यात सातव्या वेतन आयोगाची टांगती तलवार या साऱ्या पार्श्वभूमीवर यंदा आयुक्तांनी सादर केलेल्या अंदाजपत्रकालाही कात्री लागण्याची शक्यता निर्माण झाली आहे. आयुक्तांनी सन २०१६-१७ या आर्थिक वर्षाकरिता १३५७.९६ कोटी रुपयांचे अंदाजपत्रक सादर केले होते. परंतु जेमतेम सुमारे ११०० कोटी रुपयांपर्यंतच उत्पन्नाचा पल्ला गाठण्याची शक्यता असल्याने अनेक प्रस्तावित विकासकामांच्या अंमलबजावणीबाबत प्रशासन पेचात सापडले आहे.सन २०१६-१७ या आर्थिक वर्षासाठी तत्कालीन आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम यांनी दि. २६ फेब्रुवारी रोजी स्थायी समितीला १३५७.९६ कोटी रुपयांचे अंदाजपत्रक सादर केले होते. त्यावर स्थायी समितीने ३८० कोटींची वाढ सुचविल्याने अंदाजपत्रक १७३७.९६ कोटी रुपयांवर जाऊन पोहोचले आहे. स्थायी समितीने अंदाजपत्रकात नगरसेवक निधी ६० लाख रुपये तसेच महापौर निधी म्हणून तीन कोटी, उपमहापौर व स्थायी समिती सभापतीसाठी दोन कोटी, प्रभाग सभापतीसाठी ५० लाख रुपयांच्या विकासनिधीची तरतूद केलेली आहे. याशिवाय, स्मशानभूमी सुधारण्यासाठी ५० लाखांची तरतूद करण्यात आलेली आहे. सातपूर विभागात चुंचाळे शिवारात १०० खाटांचे रुग्णालय बांधण्यासाठी सव्वा कोटींची तरतूद करण्यात आलेली आहे. स्थायीने अंदाजपत्रक सादर केल्यानंतर महासभेचा ठराव अद्याप प्रशासनाला प्राप्त झालेला नाही. त्यामुळे अंदाजपत्रकातील तरतुदींनुसार अंमलबजावणी करण्यात प्रशासनाला अडथळे उत्पन्न होत आहेत. दरम्यान, एलबीटीच्या मोबदल्यात महापालिकेला शासनाकडून दरमहा सुमारे ३१ कोटी रुपये दिले जात असले तरी केवळ आठ टक्के वाढ धरूनच अनुदान अदा केले जात असल्याने सर्वात मोठा उत्पन्नाचा स्त्रोत अडचणीचा बनला आहे. याशिवाय, लोकप्रतिनिधींकडून घरपट्टी व पाणीपट्टीत वाढ करण्यास विरोध केला जात असल्याने या कर वसुलीतही वाढ होताना दिसून येत नाही. महापालिकेला गेल्या पाच महिन्यांत केवळ ३७ कोटी घरपट्टी, तर सात कोटी पाणीपट्टीतून उत्पन्न प्राप्त झाले आहे. वसुलीचे प्रमाण समाधानकारक नसल्याने अडचणीत आणखी भर पडली आहे. त्याचबरोबर नव्याने येणाऱ्या ठेक्यांचे प्रस्ताव हे राज्य शासनाच्या सुधारित किमान वेतन दरानुसार येत असल्याने त्याचाही भार पडतो आहे. महापालिकेत ५५४० कर्मचारी कार्यरत असून त्यांच्या वेतनापोटी ३१२ कोटी रुपये खर्च होतो. तसेच आस्थापना खर्चही ४३ टक्क्यांच्या पुढे जाऊन पोहोचला आहे. याशिवाय, रस्ते, मलनिस्सारण केंद्रासह अन्य प्रकल्पांच्या देखभाल-दुरुस्तीवरही मोठ्या प्रमाणावर खर्च वाढत चालला आहे. तसेच सातव्या वेतन आयोगाचीही टांगती तलवार असून तो लागू करायचा निर्णय झाल्यास महापालिकेवर त्याचा सुमारे ७१ कोटींचा बोजा पडणार आहे. त्यामुळे यंदा आयुक्तांनी सादर केलेल्या १३५७ कोटी रुपयांच्या अंदाजपत्रकाचीही अंमलबजावणी होणे अवघड होऊन बसणार आहे. सुमारे ११०० कोटी रुपयांपर्यंतच उत्पन्न प्राप्त होण्याचे गणित मांडले जात असल्याने येत्या काळात नवीन विकासकामे हाती घेण्याबाबत प्रशासनाकडून हात आखडता घेतला जाण्याची शक्यता आहे. (प्रतिनिधी)