शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईची 'लाइफ'लाइन पाण्यात; रायगड, पुणे परिसराला आजही 'रेड अलर्ट', नांदेड जिल्ह्यात आठ बळी
2
पावसाची दहशत! ८००हून जास्त लोकल रद्द; २५०+ विमानांना फटका, भुयारी मेट्रो स्थानकांवर पाणीगळती
3
काच फोडून मोनोचे प्रवासी बाहेर! 'एवढेच व्हायचे बाकी होते', प्रवाशांच्या संतप्त प्रतिक्रिया
4
वाहतूक बंद, साचले पाणी; परिस्थितीचा गैरफायदा घेत ॲप आधारित खासगी वाहनांची मनमानी भाडेवाढ
5
मिठी नदी धोका पातळीपर्यंत; रहिवाशांचा गोंधळ; गर्दी नियंत्रित करताना यंत्रणेच्या नाकीनऊ
6
४२,८९२ कोटींची गुंतवणूक, २५,८९२ रोजगाराची निर्मिती; १० गुंतवणूक सामंजस्य करारांवर स्वाक्षरी
7
ऑनलाइन गेमिंगला बसणार चाप! विधेयकाला केंद्राची मंजुरी; पैसे ट्रान्सफर करण्यास बँकांना मनाई
8
‘लोकमत’कडून नमामी गंगे प्रकल्पासाठी ५७.५० लाखांचा निधी; देवेंद्र दर्डा यांनी दिला धनादेश
9
ज्याला दिलं हृदय त्यानेच घेतला जीव! प्रेमविवाह करणाऱ्या अंजलीचा शेवट कसा झाला?; आरोपी पतीला अटक
10
खासदार श्रीकांत शिंदेंच्या बंगल्यातही शिरलं पाणी; विकासकामांवर बोलायचं नाही, मनसेचा खोचक टोला
11
Mumbai Rain Updates Live: शाळा-कॉलेजला २० ऑगस्टला सुट्टी जाहीर केल्याचा मेसेज खोटा - BMC
12
जग पाहण्याआधीच बाळाचा जीव गेला, आईनं गमावलं लेकरू; महाराष्ट्रात आरोग्य सेवेचे धिंडवडे निघाले
13
School Holiday: मुसळधार पावसाचा इशारा, प्रशासन सतर्क; २० ऑगस्टला कोणकोणत्या जिल्ह्यात शाळांना सुट्टी? वाचा
14
उपराष्ट्रपती निवडणूक: सी.पी राधाकृष्णन विरुद्ध सुदर्शन रेड्डी लढतीत कुणाचं पारडं मजबूत?
15
४० तोळं सोने अन् २० लाख खर्च करून लग्न लावलं; २ वर्षात पोरीनं स्वत:ला कायमचं संपवलं
16
मोनो रेल्वे बंद का पडली? CM देवेंद्र फडणवीसांनी दिले चौकशीचे आदेश, प्रवाशांना न घाबरण्याचं आवाहन
17
भारतातील श्रीमंत कुटुंबे रशियन तेलाचा फायदा घेत आहेत, डोनाल्ड ट्रम्प यांच्या मंत्र्यांचे मोठे विधान
18
Asia Cup 2025 : गिल वर्षभरानंतर संघात आला अन् उप-कर्णधार झाला! सूर्यकुमार यादवनं सांगितली आतली गोष्ट
19
पावसामुळे लोकल ठप्प, स्टेशनवर प्रवाशांची गर्दी; मुंबईकरांचे प्रचंड हाल, घरी परतण्यासाठी तारांबळ
20
भारताकडे शक्तिशाली क्षेपणास्त्रे, आमचे अनेक हवाई तळ उडवले; शरीफ यांच्या सहकाऱ्याने पाकिस्तानची पोलखोल केली

गडावरील व्यावसायिक कर्जबाजारी !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 8, 2020 00:30 IST

देशभरातील सर्व धार्मिक तीर्थक्षेत्रे बंद करण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे उत्तर महाराष्ट्राचे कुलदैवत असलेल्या श्रीक्षेत्र सप्तशृंगगडावरील देवी दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांना ब्रेक लागला तसेच चैत्रोत्सवनिमित्त होणारी यात्राही रद्द झाल्याने गडावरील व्यावसायिकांवर कर्जबाजारी होण्याची वेळ आली आहे.

ठळक मुद्देदेवी दर्शनाची आस : फुले-हार, दूध, भाजी विक्रेत्यांसह पुरोहितवर्ग हतबल

सप्तशृंगगड : कोरोनाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी प्रशासनाने खबरदारीचा उपाय म्हणून लॉकडाऊनच्या पहिल्याच टप्प्यात देशभरातील सर्व धार्मिक तीर्थक्षेत्रे बंद करण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे उत्तर महाराष्ट्राचे कुलदैवत असलेल्या श्रीक्षेत्र सप्तशृंगगडावरील देवी दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांना ब्रेक लागला तसेच चैत्रोत्सवनिमित्त होणारी यात्राही रद्द झाल्याने गडावरील व्यावसायिकांवर कर्जबाजारी होण्याची वेळ आली आहे.मार्च महिन्यात कळवण तालुक्यातील २९ ग्रामपंचायतींच्या निवडणुका जाहीर करण्यात आल्या होत्या, त्यामध्ये सप्तशृंगगड ग्रामपंचायतीचाही समावेश होता. या निवडणुकांचे ३१ मार्च रोजी मतदान व त्याच सुमारास अर्थात दि. २ ते ८ एप्रिल या कालावधीत गडावर पारंपरिक चैत्रोत्सव पार पडणार होता. योगायोगाने दोन्ही गोष्टी लगोलग आल्याने व्यावसायिकांची द्विधा अवस्था झाली होती.त्यामुळे लॉकडाऊन होण्याआगोदरच मार्च महिन्यात व्यावसायिकांनी पूजेचे साहित्य, प्रसाद, खेळणी, हॉटेल व्यवसायासाठी लागणारा किराणा माल, देवीचे फोटो, जनरल साहित्य असा अनेक प्रकारचा लाखो रुपयांचा माल विक्रीसाठी भरून ठेवला होता.त्यासाठी विविध बॅँकांकडून व बचतगटांकडून लाखो रुपयांचे कर्ज घेतले होते, परंतु कोरोनाचे संकट पाहता चैत्रोत्सव यात्रा रद्द करण्याचा निर्णय प्रशासनाने घेतल्यामुळे येथील व्यावसायिकांमध्ये नाराजी पसरली होती. घेतलेल्या मालाचे करायचे काय व लाखो रुपयांच्या कर्जाचे काय असे प्रश्न व्यावसायिकात उपस्थित होत होते.त्यानंतरही लॉकडाऊन शिथिल होईल या आशेवर व्यावसायिक जगत होते, परंतु लॉकडाऊन कमी न होता वाढतच गेल्याने जवळ असलेले पैसे खर्च होऊन गेले व कर्जाचा डोंगर वाढतच गेला. त्यामुळे गेल्या दोन अडीच महिन्यांपासून सप्तशृंगगड तीर्थक्षेत्र बंद असल्याकारणाने येथील अर्थव्यवस्था पूर्णपणे सप्तशृंगी देवी मंदिरावर अवलंबून आहे. येथे व्यवसायाव्यतिरिक्त कुठलाही शेती व्यवसाय नसल्याने हातावर पोट असलेल्यांची व येथील व्यावसायिकांची चिंता वाढल्याने उपासमारीची वेळ आली आहे.व्यवसाय ठप्प झाल्याने येथील पुरोहितांचे अभिषेक, पूजा, देवीची महापूजा, बंद असल्यामुळे घर प्रपंच चालवायचा कसा असा मोठा प्रश्न पुरोहित वर्गासमोर उभा राहिला आहे. सप्तशृंगगडाच्या भरवशावर जगणारे पंचक्रोेशीतील फुले-हार, दूध, भाजी विक्रेते मंदिर बंद असल्याने हातबल झाले आहेत. दि. ८ जूननंतर अटीशर्तींसह धार्मिक स्थळे सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आल्याच्या पार्श्वभूमीवर सप्तशृंगगड मंदिर खुले होण्याची आस भाविकांना व व्यावसायिकांना लागली आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याbusinessव्यवसाय