शहरं
Join us  
Trending Stories
1
माणिकराव कोकाटेंना आजच रात्री अटक होणार? नाशिक पोलिसांची टीम लिलावती रुग्णालयात दाखल
2
Shilpa Shetty: बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टीला दणका! मुंबईतील घरावर आयकर विभागाचा छापा
3
SMAT 2025 Final : नवा गडी नव राज्य! ईशानच्या कॅप्टन्सीत झारखंडच्या संघानं पहिल्यांदा उंचावली ट्रॉफी
4
ठाकरेंचा शिलेदार भाजपामध्ये... संजोग वाघेरेंचा राजीनामा, पिंपरी-चिंचवडच्या राजकारणात भूकंप
5
'लाडक्या बहिणी' निवडणूक लढवण्यासाठी तुफान उत्साही; शिवसेनेत मुलाखतींसाठी इच्छुकांची गर्दी
6
“ही त्यांची शेवटची निवडणूक, भविष्यात तर...”; ठाकरे बंधूंच्या युतीवर भाजपा नेत्यांनी डिवचले
7
एकीकडे भाजप-शिवसेनेची युती, दुसरीकडे राष्ट्रवादी प्रदेशाध्यक्षांचे महायुतीबाबत मोठे विधान
8
काँग्रेसमध्ये 'इनकमिंग' जोरात, भाजपाच्या भुलथापांना बळी पडू नका; प्रदेशाध्यक्षांचा दावा
9
शाहबाज सरकार पुन्हा तोंडावर आपटलं; सौदी अरेबियाने 50,000 पाकिस्तानी भिकाऱ्यांना हाकलून लावलं
10
"ये 21वीं सदी का भारत है…!"; ओमानमधील भारतीयांना पंतप्रधान मोदींचा संदेश, मिळाला सर्वोच्च सन्मान
11
१२ वर्षांपासून अंथरुणाला खिळून, तरुणाला इच्छामरण देण्याची आई-वडिलांची मागणी, सुप्रीम कोर्ट म्हणाले...
12
“दोन्ही NCP एकत्र येणार असतील, तर शरद पवार गटासोबत जाणार नाही”; उद्धवसेनेने स्पष्टच सांगितले
13
SMAT Final 2025 : विराट फेल! बाकी सर्वांच्या २०० प्लस स्ट्राइक रेटसह धावा अन् झारखंडनं रचला इतिहास
14
माणिकराव कोकाटे मंत्रिमंडळातून बाहेर! अजित पवारांनी CM फडणवीसांकडे पाठवला राजीनामा
15
डॉलर नाही तर हे आहे जगातील सर्वात शक्तिशाली चलन, मोजावे लागतात तब्बल २९४ रुपये
16
185 रुपयांच्या शेअरमध्ये 5881% ची आश्चर्यचकित करणारी तेजी; आता BSE ची अ‍ॅक्शन, व्यवहार बंद!
17
Ishan Kishan Century : ईशान किशनची विक्रमी सेंच्युरी! सर्वाधिक षटकारांचाही सेट केला नवा रेकॉर्ड
18
महाराष्ट्र भूषण राम सुतार यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार; वृद्धापकाळाने झालेले निधन
19
"अजूनही अश्लील प्रश्न विचारतात, घाणेरड्या नावाने हाक मारतात..."; MMS कांडवर स्पष्टच बोलली अंजली
20
"आता काँग्रेस विसर्जित करायला हवी...!"; का आणावा लागला नवा कायदा? G RAM G संदर्भात शिवराज सिंह स्पष्टच बोलले
Daily Top 2Weekly Top 5

विजेचा बसेना मेळ, शेतकऱ्यांच्या जीवाशी खेळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 27, 2018 17:08 IST

खेडलेझुंगे : राज्यातील शेती आणि शेतकºयांसंदर्भात सरकार घेत असलेले काही निर्णय शेतकºयांना अडचणीचे ठरत आहेत. कृषिपंपांसाठी देण्यात येणाºया विजेच्या ...

ठळक मुद्देभरनियमनामुळे पिकांना पाणी देण्याचे नियोजन कोलमडले

खेडलेझुंगे : राज्यातील शेती आणि शेतकºयांसंदर्भात सरकार घेत असलेले काही निर्णय शेतकºयांना अडचणीचे ठरत आहेत. कृषिपंपांसाठी देण्यात येणाºया विजेच्या वेळेत झालेल्या बदलामुळे शेतकरी बेजार झालेले आहे. सप्ताहातील सोमवार ते गुरु वार रात्री ११ ते ७ वाजेपर्यंत शुक्र वार ते रविवार सकाळी ७.३० ते ३.३० पर्यंत वीज देण्यात येते. परिणामी परिसरातील शेतकºयांना दिवस-रात्र शेतातच मुक्काम करण्याची वेळ आली आहे. मध्यरात्री वीज येण्यामुळे पिकांना पाणी देणे त्रासदायक ठरणार आहे. तसेच रात्रीच्या वेळी साप, विंचवासह हिंस्त्र श्वापदांच्या हल्ल्यासही सामोरे जावे लागणार आहे.परिसरात सोमवार ते गुरु वार रात्री व शुक्र वार ते रविवार दिवसा थ्री फ्रेज वीज दिली जाते. उद्योगाच्या तुलनेत कृषिपंपांसाठी फार कमी वीज दिली जाते. दिवसाकाठी अवघ्या आठ तास उपलब्ध होणाºया विजेत शेतकºयांना पिकांना पाणी द्यावे लागत आहे.अवकाळी पाऊस आणि शेत मालालाही बाजार नाही त्यामुळे आधीच शैतकरी हैराण झालेला आहे.त्यात याप्रमाणे भरनियमन असल्याने शेतमजुरांच्या मजुरीतही वाढ झालेली आहे. कारण ज्या दिवशी रात्री लाईट असते त्या दिवशी शेतमजुरांना सुट्टी द्यावी लागते. जर शेतमजुर दुसºया ठिकाणी कामास निघुन गेला तर पुन्हा शेतकºयांसमोर शेतमजुर शोधण्यासाठी भटकंती करावी लागते. त्यामुळे ५-६ हजार एकरी कांदा लागडीची मजुरी ही तब्बल ८-१० हजार रुपये मोजावे लागत आहे. त्यामुळे शेतकरी अजुन कर्जबाजारी होणार आहे.शुक्र वार ते रविवार सकाळी ७.३० वाजता लाईट असते परंतु शेतीवर शेतमजुर कामकाजासाठी येत नाही. तसेच दुपारी ३.३० ला विज जाणार असल्याने त्यापुढे लागवडीचे किंवा इतर शेतीचे कामे बंद ठेवावी लागत आहे. परिणामीे शेतकºयांना मोठ्या आर्थिक समस्येला सामोरे जावे लागत आहे.खेडलेझुंगे येथील गोरख गायकवाड या शेतकºयांचे शेतात कांदा लागडीचे काम सुरु आहे. परंतु विजेच्या भारिनयमनामुळे शेतमजुर मिळणे अवघड होवुन बसले होते. यावर त्यांनी विज निर्मिती करणारा यंत्र ट्रॅक्टरला बसविले. त्यासाठी एका तासाला २ ते ३ लिटर डिझेलचा खर्च होणार आहे. परंतु हा आर्थिक भार सोसुन त्यांनी कांदा लागवड सुरु ठेवलेली आहे. त्यांना एकरी लागवडीकामी येणारा डिझेल खर्च ८००० (एका तासासाठी) २४० शेत बांधणे २००० एकर याप्रमाणे खर्च फक्त लागडीसाठी येणार आहे.विजेच्या वेळेत बदल करातांत्रिक बिघाड झाल्यास मिहना मिहना वीज गायब होणार असल्याने शेतकर्यांना पिकांसाठी पाण्याचे चक्र पूर्ण करण्यासाठी तारेवरची कसरत करावी लागणार आहे. मध्यरात्री देण्यात येणाºया विजेच्या वेळेत बदल करण्याची मागणी शेतकºयांकडून केली जात आहे. मध्यरात्री वीज येण्यामुळे पिकांना पाणी देणे अडचणीचे ठरणार आहे. त्याऐवजी सकाळी दहा सायंकाळी सहा वाजेपर्यंत उपलब्घ करावी. दहा तास दिली जाणारी वीज आता आठ तासांवर आणण्यात आली आहे. यामुळे पिकांना पाणी देण्याचे शेतकºयांचे नियोजन कोलमडणार आहे.सहकारी व संघटीत करण्यात येणाºया पाणीपुरवठा योजना अडचणीत येणार आहेत. सरकारकडून सातत्याने शेतकºयांसोबत दुजाभाव केला जात असल्याची भावना शेतकरी व्यक्त करत आहेत.सरकार आणि विज वितरम कंपन्या शेतकºयांच्या जीवाशी खेळत असल्याचे दिसुन येते. मध्यरात्री देण्यात येणारी वीज शेतकºयांसाठी तोट्याची आहे. अनेक महिला शेतकºयांना तर पिकांना पाणी देता येणे शक्य होणार नाही. त्यामुळे रात्रीचे भारनियमन बंद करण्यात यावे.रात्रीच्या भारनियमनामुळे शेतकºयांना आता शेतात मुक्कामाची वेळ आली आहे. उन्हाची तीव्रता वाढत असल्याने पिके सुकू नयेत, यासाठी मोठ्या प्रयत्नाने उपलब्ध होईल तेथून पाणी आणून शेतकरी पिके जगवण्याचा प्रयत्न करत आहे; मात्र भारनियमनाच्या वेळेत जाचक बदल करून वीज वितरण कंपनी शेतकºयांच्या जीवाशी खेळत आहेत.मी मागील एक ते दिड महिन्यापासुन कांदा लागवडीसाठी मजुर शोधत आहे. विजेचा लपंडाव, अवकाळी पाऊस, शेतमालाला भाव नाही, पाण्याची सोय नाही त्यामुळे शेती करणे दिवसेंदिवस अवघड होत आहे. त्यात सरकार आणि विज वितरण कंपन्या शेतकºयांकरीता असहकार करीत असल्याने मध्यरात्री देण्यात येणारी वीज शेतकºयांसाठी तोट्याची आहे. अनेक महिला शेतकºयांना तर पिकांना पाणी देता येणे शक्य होत नाही. त्यामुळे रात्रीचे भारनियमन बंद करण्यात यावे.- गोरख गायकवाड, शेतकरी.