शहरं
Join us  
Trending Stories
1
महायुती सरकारचं १०० दिवसांचं प्रगती पुस्तक जाहीर; २४ टक्के मिळवत 'हा' विभाग ठरला नापास
2
दारूची बाटली फुटली अन् वाद झाला; मैत्री झाली पण, नंतर...; सीसीटीव्हीमुळे उलगडली व्यक्तीच्या हत्येची कहाणी
3
आजपासून ११ राज्यांतील १५ बँका बंद, ग्रामीण बँकांचं मर्जर; One State-One RRB पॉलिसी झाली लागू
4
'...तर एकनाथ शिंदेच मुख्यमंत्री झाले असते'; शहाजीबापू पाटलांनी कारणही सांगितले
5
“पूर्वी विरोधक दिलदार होते, आता कुठल्याही कामाला चांगले म्हणत नाही”; अजित पवारांचा खोचक टोला
6
जयंती विशेष:हिंदू धर्म पुनरुत्थानाचे जनक, प्रतिकूल काळात धर्मरक्षण करणारे आद्य शंकराचार्य
7
पाकिस्तानच्या हालचाली सुरु; ISI प्रमुखांकडे दिली मोठी जबाबदारी, सीमेवरील चौक्यांवर पुन्हा लावले झेंडे
8
भारताला मिळणार संधी! अमेरिकेच्या बाजारात विकणार केवळ इंडिया मेड आयफोन; चीनला झटका
9
पहलगाम हल्ल्यानंतर चक्र फिरली! बॉलिवूड अभिनेत्रीच्या सिनेमावर आता पाकिस्तानात बंदी, ९ मे रोजी होणार होता रिलीज
10
भारतानं उचललं आणखी एक पाऊल; 'नोटीस टू एअरमन' जारी करत पाकिस्तानला दिला दणका
11
Pahalgam Terror Attack : "लहान मुलं आईपासून कशी दूर राहतील?; एकटं पाकिस्तानला पाठवणं अशक्य, हे खूप वेदनादायक"
12
२६ वर्ष पोलीस सेवेनंतरही कॉन्स्टेबलला भारत सोडण्याचे आदेश; हायकोर्टानं थांबवले, प्रकरण काय?
13
Pahalgam Terror Attack: दहशतवाद्यांनी शेवटच्या क्षणी बदलला प्लॅन; आधी टार्गेटवर होतं 'हे' पर्यटन स्थळ, केलेली रेकी
14
“जातनिहाय जनगणना निर्णय फसवा, जनतेची दिशाभूल करणारा, सरकारी भूमिका दुटप्पी”: प्रकाश आंबेडकर
15
मध्यरात्री भारत-पाकिस्तानात खणखणला फोन; तणाव कमी करण्यासाठी कुणी घेतला पुढाकार?
16
Bhendwal Bhavishyvani 2025: शत्रू भारताचं काही वाकडे करू शकणार नाहीत, परंतु...; प्रसिद्ध भेंडवळची भविष्यवाणी
17
मलायकाला अटक होणार? कोर्टात हजर न झाल्यास अजामीनपात्र वॉरंट निघणार; नक्की प्रकरण काय?
18
युट्यूबच्या माध्यमातून गुंतवणूकदारांची दिशाभूल, सेबीची मोठी कारवाई; शेअरमध्ये गुंतवणूकीचा दिलेला सल्ला
19
गुरु-राहु-केतु गोचर: ७ राशींना मे महिना दमदार, अचानक धनलाभ; पैसा राहील, धनलक्ष्मी प्रसन्न!
20
माहिरा खान ते हानिया आमिर, पाकिस्तानी कलाकारांचे इन्स्टाग्राम अकाऊंट भारताकडून 'बॅन'

विजेचा बसेना मेळ, शेतकऱ्यांच्या जीवाशी खेळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 27, 2018 17:08 IST

खेडलेझुंगे : राज्यातील शेती आणि शेतकºयांसंदर्भात सरकार घेत असलेले काही निर्णय शेतकºयांना अडचणीचे ठरत आहेत. कृषिपंपांसाठी देण्यात येणाºया विजेच्या ...

ठळक मुद्देभरनियमनामुळे पिकांना पाणी देण्याचे नियोजन कोलमडले

खेडलेझुंगे : राज्यातील शेती आणि शेतकºयांसंदर्भात सरकार घेत असलेले काही निर्णय शेतकºयांना अडचणीचे ठरत आहेत. कृषिपंपांसाठी देण्यात येणाºया विजेच्या वेळेत झालेल्या बदलामुळे शेतकरी बेजार झालेले आहे. सप्ताहातील सोमवार ते गुरु वार रात्री ११ ते ७ वाजेपर्यंत शुक्र वार ते रविवार सकाळी ७.३० ते ३.३० पर्यंत वीज देण्यात येते. परिणामी परिसरातील शेतकºयांना दिवस-रात्र शेतातच मुक्काम करण्याची वेळ आली आहे. मध्यरात्री वीज येण्यामुळे पिकांना पाणी देणे त्रासदायक ठरणार आहे. तसेच रात्रीच्या वेळी साप, विंचवासह हिंस्त्र श्वापदांच्या हल्ल्यासही सामोरे जावे लागणार आहे.परिसरात सोमवार ते गुरु वार रात्री व शुक्र वार ते रविवार दिवसा थ्री फ्रेज वीज दिली जाते. उद्योगाच्या तुलनेत कृषिपंपांसाठी फार कमी वीज दिली जाते. दिवसाकाठी अवघ्या आठ तास उपलब्ध होणाºया विजेत शेतकºयांना पिकांना पाणी द्यावे लागत आहे.अवकाळी पाऊस आणि शेत मालालाही बाजार नाही त्यामुळे आधीच शैतकरी हैराण झालेला आहे.त्यात याप्रमाणे भरनियमन असल्याने शेतमजुरांच्या मजुरीतही वाढ झालेली आहे. कारण ज्या दिवशी रात्री लाईट असते त्या दिवशी शेतमजुरांना सुट्टी द्यावी लागते. जर शेतमजुर दुसºया ठिकाणी कामास निघुन गेला तर पुन्हा शेतकºयांसमोर शेतमजुर शोधण्यासाठी भटकंती करावी लागते. त्यामुळे ५-६ हजार एकरी कांदा लागडीची मजुरी ही तब्बल ८-१० हजार रुपये मोजावे लागत आहे. त्यामुळे शेतकरी अजुन कर्जबाजारी होणार आहे.शुक्र वार ते रविवार सकाळी ७.३० वाजता लाईट असते परंतु शेतीवर शेतमजुर कामकाजासाठी येत नाही. तसेच दुपारी ३.३० ला विज जाणार असल्याने त्यापुढे लागवडीचे किंवा इतर शेतीचे कामे बंद ठेवावी लागत आहे. परिणामीे शेतकºयांना मोठ्या आर्थिक समस्येला सामोरे जावे लागत आहे.खेडलेझुंगे येथील गोरख गायकवाड या शेतकºयांचे शेतात कांदा लागडीचे काम सुरु आहे. परंतु विजेच्या भारिनयमनामुळे शेतमजुर मिळणे अवघड होवुन बसले होते. यावर त्यांनी विज निर्मिती करणारा यंत्र ट्रॅक्टरला बसविले. त्यासाठी एका तासाला २ ते ३ लिटर डिझेलचा खर्च होणार आहे. परंतु हा आर्थिक भार सोसुन त्यांनी कांदा लागवड सुरु ठेवलेली आहे. त्यांना एकरी लागवडीकामी येणारा डिझेल खर्च ८००० (एका तासासाठी) २४० शेत बांधणे २००० एकर याप्रमाणे खर्च फक्त लागडीसाठी येणार आहे.विजेच्या वेळेत बदल करातांत्रिक बिघाड झाल्यास मिहना मिहना वीज गायब होणार असल्याने शेतकर्यांना पिकांसाठी पाण्याचे चक्र पूर्ण करण्यासाठी तारेवरची कसरत करावी लागणार आहे. मध्यरात्री देण्यात येणाºया विजेच्या वेळेत बदल करण्याची मागणी शेतकºयांकडून केली जात आहे. मध्यरात्री वीज येण्यामुळे पिकांना पाणी देणे अडचणीचे ठरणार आहे. त्याऐवजी सकाळी दहा सायंकाळी सहा वाजेपर्यंत उपलब्घ करावी. दहा तास दिली जाणारी वीज आता आठ तासांवर आणण्यात आली आहे. यामुळे पिकांना पाणी देण्याचे शेतकºयांचे नियोजन कोलमडणार आहे.सहकारी व संघटीत करण्यात येणाºया पाणीपुरवठा योजना अडचणीत येणार आहेत. सरकारकडून सातत्याने शेतकºयांसोबत दुजाभाव केला जात असल्याची भावना शेतकरी व्यक्त करत आहेत.सरकार आणि विज वितरम कंपन्या शेतकºयांच्या जीवाशी खेळत असल्याचे दिसुन येते. मध्यरात्री देण्यात येणारी वीज शेतकºयांसाठी तोट्याची आहे. अनेक महिला शेतकºयांना तर पिकांना पाणी देता येणे शक्य होणार नाही. त्यामुळे रात्रीचे भारनियमन बंद करण्यात यावे.रात्रीच्या भारनियमनामुळे शेतकºयांना आता शेतात मुक्कामाची वेळ आली आहे. उन्हाची तीव्रता वाढत असल्याने पिके सुकू नयेत, यासाठी मोठ्या प्रयत्नाने उपलब्ध होईल तेथून पाणी आणून शेतकरी पिके जगवण्याचा प्रयत्न करत आहे; मात्र भारनियमनाच्या वेळेत जाचक बदल करून वीज वितरण कंपनी शेतकºयांच्या जीवाशी खेळत आहेत.मी मागील एक ते दिड महिन्यापासुन कांदा लागवडीसाठी मजुर शोधत आहे. विजेचा लपंडाव, अवकाळी पाऊस, शेतमालाला भाव नाही, पाण्याची सोय नाही त्यामुळे शेती करणे दिवसेंदिवस अवघड होत आहे. त्यात सरकार आणि विज वितरण कंपन्या शेतकºयांकरीता असहकार करीत असल्याने मध्यरात्री देण्यात येणारी वीज शेतकºयांसाठी तोट्याची आहे. अनेक महिला शेतकºयांना तर पिकांना पाणी देता येणे शक्य होत नाही. त्यामुळे रात्रीचे भारनियमन बंद करण्यात यावे.- गोरख गायकवाड, शेतकरी.