शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्यातील शहीदांना श्रद्धांजली, आजचा विजय भारतीय सैन्यदलाला समर्पित - सूर्यकुमार यादव
2
IND vs PAK : आम्ही काहीच विसरलेलो नाही! दुबईतून टीम इंडियाचा पाकला दिला स्पष्ट संदेश
3
IND vs PAK : सूर्यानं सिक्सर मारत संपवली मॅच! टीम इंडियाचा दबावात दिमाखदार विजय
4
भारत कणखर, अमेरिका झाला हतबल; म्हणे, “आमच्याकडून २५ किलो मक्याचं एक पोतं घ्यायला तयार नाही”
5
“महाराष्ट्रात सामाजिक वीण उसवतेय, समाजात कटूता निर्माण होणारे निर्णय घेतले जातायत”: शरद पवार
6
IND vs PAK : कुलदीप यादवची हॅटट्रिक हुकली; पण पाक विरुद्ध ३ विकेट्स घेत साधला साधला मोठा डाव
7
“ओबीसी असो किंवा मराठा असो, सगळ्या समाजाचे हित हेच सरकार करू शकते”: CM देवेंद्र फडणवीस
8
IND vs PAK : पाकच्या National Anthem ऐवजी DJ वाल्या बाबूनं वाजवलं भलतंच गाणं; व्हिडिओ व्हायरल
9
IND vs PAK : परंपरा मोडत भारतीयांची भावना जपली! सूर्यानं हात न मिळवता पाक कॅप्टनकडे फिरवली पाठ (VIDEO)
10
हृदय पिळवटून टाकणारी घटना; चिमुकलीला जिवंत गाडले, ग्रामस्थांना रडण्याचा आवाज आला अन्...
11
IND vs PAK : 'हार्दिक' स्वागत! पहिल्याच चेंडूवर सैम अयूबच्या पदरी भोपळा
12
“पंतप्रधान मोदी यांनी परराष्ट्र धोरणबाबत विचार करणे अपेक्षित, नेपाळ अडचणीत...”: शरद पवार
13
"गढूळ विचाराच्या लोकांवर थुंकतो; आता व्हायचे ते होऊ द्या", जरांगे पाटलांची हाकेंवर जहरी टीका
14
“अजून काय अन्याय व्हायचा राहिला? आमच्या हक्काचे दिले नाही”; मनोज जरांगेंचे अजितदादांना उत्तर
15
IND vs PAK : दुबईत पाकच्या बाजूनं लागला नाणफेकीचा कौल; सेम गेम प्लॅनसह मैदानात उतरली टीम इंंडिया
16
मारुतीच्या या 8-सीटर कारच्या किंमतीत मोठी कपात, ₹61,000 पर्यंत होईल फायदा; जाणून घ्या नवी किंमत
17
'कोणताही भारतीय खेळाडू पाकिस्तानविरुद्ध खेळू इच्छित नाही, पण...', सुरेश रैनाचे मोठे वक्तव्य
18
अमेरिकेतील टेक्सास राज्यात 'शरिया कायद्यावर' बंदी; मुस्लिम संघटनांचा आक्रोश
19
क्रिकेटच्या नावाखाली उद्धव ठाकरे राजकारण करत आहेत; चंद्रशेखर बावनकुळेंची टीका
20
"व्यक्तीचा निर्णय जनहिताचा, राष्ट्रहिताचा असेल, तर ती संस्कृती"; CM योगींच्या हस्ते २९८ कोटींच्या प्रकल्पांचे लोकार्पण 

शेतकरी संपाला ‘समृद्धी’ची जोड

By admin | Updated: June 1, 2017 01:25 IST

राज्यातील दहा जिल्ह्णांमधून जाणाऱ्या व हजारो शेतकऱ्यांना बाधित करणाऱ्या समृद्धी महामार्गाच्या विरोधाची जोड देण्यात आली

लोकमत न्यूज नेटवर्कनाशिक : गुरुवारपासून सुरू होणाऱ्या शेतकऱ्यांच्या राज्यव्यापी संपाची व्याप्ती वाढविण्यासाठी राज्यातील दहा जिल्ह्णांमधून जाणाऱ्या व हजारो शेतकऱ्यांना बाधित करणाऱ्या समृद्धी महामार्गाच्या विरोधाची जोड देण्यात आली असून, शेतकरी कर्जमुक्ती व बिनव्याजी कर्जपुरवठ्याच्या मागणीबरोबरच समृद्धी महामार्ग रद्द करण्यावरही शेतकऱ्यांनी भर दिला आहे. शेतमालाचे घसरलेले भाव, कर्जबाजारीपणा, नापिकी यामुळे राज्यातील शेतकरी आत्महत्येचा मार्ग अवलंबत असून, त्यात दिवसागणिक वाढ होत चालली आहे. शासन दरबारी वेळोवेळी शेतमालाला हमी भाव मिळावा यासाठी शेतकऱ्यांनी पाठपुरावा व आंदोलने करूनही त्याची दखल घेतली गेली नाही. विधिमंडळ अधिवेशनात शेतकऱ्यांना कर्जमुक्ती देण्याची मागणी करण्यात आली, त्यासाठी विरोधी पक्षांनी राज्यव्यापी संघर्ष यात्रा काढूनही काहीच उपायोग होत नसल्याचे पाहून शेतकऱ्यांनी राज्यव्यापी संप करण्याचा निर्णय घेतला असून, चालू खरीप हंगामात कोणतेही पीक न घेण्याचे ठरविण्यात आले व त्याची सुरुवात १ जून म्हणजेच मान्सूनच्या तोंडावर करण्यात येत आहे. राज्यातील दहा जिल्ह्णांमधून जाणाऱ्या समृद्धी महामार्गामुळे हजारो शेतकरी बाधित होणार असून, त्यांनी या मार्गाला उघड उघड विरोध दर्शविला आहे. अशा परिस्थितीत या शेतकऱ्यांनाही संपात सहभागी करून घेण्यात आले आहे. त्यामुळेच की काय संपकरी शेतकऱ्यांच्या मागण्यांमध्ये समृद्धी महामार्ग रद्द करा ही मागणीही समाविष्ट करण्यात आली आहे. या संपात सक्रिय असलेल्या किसान सभेने शेतकरी संपाच्या पार्श्वभूमीवर गुरुवारी ‘समृद्धी कुणाची, शेतकऱ्यांची की सरकारची?’ या पुस्तिकेचे प्रकाशन करण्याचे निश्चित केले आहे. शेतकरी संपाला पाठिंबा देणाऱ्या शेतकऱ्यांना या पुस्तिकेच्या प्रकाशन सोहळ्याचे आमंत्रण देण्यात आल्याने समृद्धीचे पाठबळही वाढणार आहे.