शहरं
Join us  
Trending Stories
1
काँग्रेस-शरद पवारांसोबत आघाडी करून शिंदेसेनेने २ नगरपरिषदेत भाजपाच्या तोंडचा घास हिसकावला
2
नांदेडमधील लोह्यात एकाच कुटुंबातील सहाही उमेदवारांचा पराभव, ‘घराणेशाही संपवू’ म्हणणाऱ्या भाजपचा धुव्वा
3
वंचित बहुजन आघाडी दुर्लक्षित राहिली, पण एक नगराध्यक्ष पदासह या ठिकाणांवर मारलीय बाजी
4
नगराध्यक्ष एकाचा, बहुमत दुसऱ्याचे! जनतेतून निवडीमुळे नगर परिषदांत 'पॉवर गेम' रंगणार; ५ वर्षे संघर्षाची ठिणगी?
5
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २२ डिसेंबर २०२५: प्रिय व्यक्तीची भेट होईल, अचानक पदोन्नती होण्याचीही शक्यता!
6
संपादकीय: नगरांचा जनादेश सत्तेला, काँग्रेस पक्ष राज्यात जिवंत असल्याचे...
7
U19 Asia Cup: 'हाय व्होल्टेज' राडा! भारतीय युवा संघाने गमावला आशिया चषक; पाक पीसीबी प्रमुखांच्या हस्ते पदक स्वीकारण्यास नकार
8
‘नगरां’च्या निवडणुकीत मारली बाजी; भाजप ‘धुरंधर’ तर ठाकरेंचा धुव्वा उडाला
9
पक्षाने माझी शक्ती कमी केली- मुनगंटीवार; सत्तारूढ अन् विरोधकांमधील नेत्यांनी कुठे राखली प्रतिष्ठा
10
भारताविरुद्ध बांगलादेशात षड्‌यंत्र! कोण कोण रचतेय...
11
महामुंबईत भाजप-शिंदेसेनेचाच ‘आवाज’; प्रत्येकी पाच नगराध्यपदांवर विजय; अजित पवार गटही दमदार
12
रेल्वे प्रवाशांना नवीन वर्षाचा 'झटका'! २६ डिसेंबरपासून भाडेवाढ लागू; लांब पल्ल्याचा प्रवास आणि 'AC' कोच महागणार
13
दिशाभूल करणाऱ्या प्रचारामुळे संघाबद्दल काही लोकांमध्ये गैरसमज; संघाचा कोणीही शत्रू नाही :  सरसंघचालक मोहन भागवत
14
आमदारांचे पगार की जनतेची थट्टा? ओडिशात २००% पगारवाढीने रणकंदन; पाहा महाराष्ट्रासह कोणत्या राज्यात किती मिळतो पगार!
15
‘हा फोटो बघ’ असा मेसेज तुम्हालाही आलाय का? व्हॉट्सॲप ‘हायजॅक’चे नवे संकट!
16
२४ डिसेंबरला ब्लूबर्ड ब्लॉक-२ चे हाेणार उड्डाण ; अमेरिकेतील एएसटी स्पेस मोबाइलसोबत इस्रोचा करार
17
काश्मीरमध्ये ‘चिल्ला-ए-कलां’ प्रारंभ; प्रचंड थंडीच्या मोसमाची सुरुवात
18
डे-वन टेक-ऑफ घेण्यासाठी नवी मुंबई विमानतळ सज्ज; २५ डिसेंबरपासून व्यावसायिक उड्डाणांना हाेणार सुरुवात
19
आज मुंबई आयआयटीत  रंगणार ‘टेकफेस्ट’चा जागर; तंत्रज्ञानाचा महाकुंभ अनुभवण्याची तरुणाईला संधी
20
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
Daily Top 2Weekly Top 5

कांद्याचा बसेना मेळ अन् टोमॅटोचा झाला खेळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 10, 2021 04:19 IST

जळगाव नेऊर : येवला तालुक्यातील शेतकऱ्यांचे मुख्य पीक म्हणजे कांदा, टोमॅटो. या पिकावर शेतकऱ्यांचे पुढील अर्थचक्र अवलंबून असते पण ...

जळगाव नेऊर : येवला तालुक्यातील शेतकऱ्यांचे मुख्य पीक म्हणजे कांदा, टोमॅटो. या पिकावर शेतकऱ्यांचे पुढील अर्थचक्र अवलंबून असते पण सहा महिने कांदा साठवणूक करूनही त्यातून चार पैसे पदरात पडत नसतील तर कांदा साठवणूक करायची कशाला? असा प्रश्न शेतकऱ्यांना भेडसावत आहे. कारण गत दोन वर्षांपासून शेतकऱ्यांना साठवणूक केलेल्या कांद्यातून तोटाच सहन करावा लागत आहे.

अडीच हजारावर गेलेला कांदा सहा महिने चाळीत ठेवूनही शेतकऱ्यांना सरासरी बाराशे ते तेराशे भावाने विकावा लागत असल्याने शेतकऱ्यांचे अर्थचक्र बिघडल्याने पुढील खरिपातील लागवडीवर परिणाम होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. तसेच कांदा चाळीत मोठ्या प्रमाणात सडत असल्याने याचा तोटाही शेतकऱ्यांना सहन करावा लागत आहे. शासनाने शेतकऱ्यांना कांदाचाळी उभारण्यासाठी अनुदान दिले, याचा फायदा शेतकऱ्यांनी घेतला आणि शेतकऱ्यांनी कांदा चाळीची उभारणी केली, पण हाच कांदा सहा महिने चाळीत ठेवूनही तोट्यावर विकावा लागत असेल त्याचा परिणाम शेतकऱ्यांच्या कांदा साठवणुकीवर होत आहे.

साठवून ठेवलेल्या कांद्यातून चार पैसे होतील व त्या पैशावर आपण पुढील पिके उभे करू या आशेवर असलेल्या शेतकऱ्यांचा मात्र तोंडचा घास पळाला असून पुढील पिके उभी करण्यासाठी आहे त्या भावाने कांदा विकावा लागत आहे.

मागील वर्षी शेतकऱ्यांना टोमॅटोतून बऱ्यापैकी पैसे मिळाले, त्यामुळे मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांनी टोमॅटो लागवडी केल्या, एक एकर टोमॅटो पीक उभे करण्यासाठी साधारणपणे एक लाखाच्या आसपास खर्च येतो. यामध्ये ड्रीप, बांबू, तार, मल्चिंग पेपर, सुताळी, मजुरी असा खर्च करून शेतकऱ्यांना आज मात्र या टोमॅटो पिकातून खर्चदेखील वसूल होत नसल्याने त्यांच्यावर टोमॅटो पिकामध्ये नांगर घालण्याची वेळ आली आहे.

कोट...

आतातर अनेक शेतकऱ्यांनी तर जनावरांचा चारा म्हणून टोमॅटोचा उपयोग केला आहे. एकूणच कांदा आणि टोमॅटोच्या आगारात शेतकऱ्यांचे मात्र आर्थिक गणित बिघडले असून मोठ्या प्रमाणात शेतकरी कर्जबाजारी होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

प्रतिक्रिया

भाववाढीच्या आशेने मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांना कांदा साठवणूक केली, पण आता दिवसेंदिवस कांदा खराब होत असून आधीच अडीच हजारावर गेला कांदा सरासरी बाराशे ते तेराशे रुपयांवर आल्याने शेतकऱ्यांना तोटा सहन करावा लागत आहे.

-

मल्हारी दराडे, कांदा उत्पादक शेतकरी. (०६ टमाटा, ०६ कांदा)

060921\205106nsk_26_06092021_13.jpg~060921\205106nsk_27_06092021_13.jpg

चाळीत सडत असलेला कांदा.~टमाटा.