शहरं
Join us  
Trending Stories
1
‘ऑपरेशन सिंदूर’नंतर भारतीय रेल्वेचा मोठा निर्णय, उधमपूर-जम्मू-दिल्ली विशेष ट्रेन चालवणार
2
Operation Sindoor Live Updates: राज्यांना आपत्कालीन अधिकारांचा वापर करण्याची परवानगी, गृह मंत्रालयाचा निर्णय
3
‘ऑपरेशन सिंदूर’नंतर RSSची मोदी सरकारच्या पाठीवर कौतुकाची थाप, भारतीय सैन्याचे केले अभिनंदन
4
भारत-पाक तणावादरम्यान सोन्याच्या दरात पुन्हा घसरण, खरेदीपूर्वी पाहा काय आहेत नवे दर?
5
India Pakistan War: 'आमचे पंतप्रधान भित्रे, ते मोदींचे नाव घ्यायला घाबरतात'; पाकिस्तानी खासदाराने त्यांच्याच सरकारला सुनावले
6
India Pakistan Vidoe: पाकिस्तानने डागलेली उखळी तोफ थेट घरावर, क्षणात दिसेनासं झालं, बघा काय घडलं?
7
यशस्वी जैस्वालचा यू-टर्न ! गोवा नव्हे, मुंबई संघाकडूनच क्रिकेट खेळणार... काय दिलं कारण?
8
हसतं-खेळतं कुटुंब उद्ध्वस्त! पाकिस्तानच्या गोळीबारात जुळ्या भावंडांचा मृत्यू
9
पाक लष्कर प्रमुखाला मिळाली विशेष 'पॉवर'; पाकिस्तानी सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय
10
लग्नाच्या अवघ्या १५व्या दिवशीच नवरीनं उडवली सासरची झोप; नवरदेवालाही लावला चुना अन्...  
11
Mumbai: टाटा मेमोरियल हॉस्पिटलला बॉम्बने उडवून देण्याची धमकी; भारत- पाकिस्तान तणावादरम्यान मेल
12
उद्यापासून महाराष्ट्रातील या ठिकाणी पेट्रोल पंपावर UPI पेमेंट बंद; कारण काय? जाणून घ्या...
13
तुमच्या मुलांच्या उच्च शिक्षणासाठी आर्थिक नियोजन कसे करावे? महागाई लक्षात घेऊन 'या' टिप्स फॉलो करा
14
India Pakistan: 'ये कोई तरीका है भीख मांगने का'; भारताच्या 'पीआयबी'ने पाकिस्तानची उडवली खिल्ली 
15
मागे कोण उभं आहे बघा, शवपेट्यांना लपटलेले झेंडे बघा; भारताने जगाला दाखवला पाकचा खरा चेहरा
16
Operation Sindoor वर मुकेश अंबानींचं वक्तव्य, पंतप्रधानांचा उल्लेख करत केलं 'हे' वक्तव्य 
17
"घाबरण्याची गरज नाही..," भारत-पाक तणावादरम्यान इंडियन ऑईलनं पेट्रोल-डिझेलवर केलं मोठं वक्तव्य
18
"पुढचं आईस्क्रीम आता लाहोरमध्येच खाईन"; कर्तव्यावर परतलेल्या जवानाचा व्हिडीओ पाहून वाटेल अभिमान!
19
India Pakistan: पाकिस्तानच्या मिसाईल्स फटाक्यासारख्या फुस्स; पंजाबमध्ये सापडली पाडलेली क्षेपणास्त्रे, बघा व्हिडीओ
20
सलमान खान आर्मी ऑफिसरच्या भूमिकेत, गलवान व्हॅलीतील भारत-चीन युद्धावर येणार सिनेमा

कांद्याचा बसेना मेळ अन् टोमॅटोचा झाला खेळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 10, 2021 04:19 IST

जळगाव नेऊर : येवला तालुक्यातील शेतकऱ्यांचे मुख्य पीक म्हणजे कांदा, टोमॅटो. या पिकावर शेतकऱ्यांचे पुढील अर्थचक्र अवलंबून असते पण ...

जळगाव नेऊर : येवला तालुक्यातील शेतकऱ्यांचे मुख्य पीक म्हणजे कांदा, टोमॅटो. या पिकावर शेतकऱ्यांचे पुढील अर्थचक्र अवलंबून असते पण सहा महिने कांदा साठवणूक करूनही त्यातून चार पैसे पदरात पडत नसतील तर कांदा साठवणूक करायची कशाला? असा प्रश्न शेतकऱ्यांना भेडसावत आहे. कारण गत दोन वर्षांपासून शेतकऱ्यांना साठवणूक केलेल्या कांद्यातून तोटाच सहन करावा लागत आहे.

अडीच हजारावर गेलेला कांदा सहा महिने चाळीत ठेवूनही शेतकऱ्यांना सरासरी बाराशे ते तेराशे भावाने विकावा लागत असल्याने शेतकऱ्यांचे अर्थचक्र बिघडल्याने पुढील खरिपातील लागवडीवर परिणाम होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. तसेच कांदा चाळीत मोठ्या प्रमाणात सडत असल्याने याचा तोटाही शेतकऱ्यांना सहन करावा लागत आहे. शासनाने शेतकऱ्यांना कांदाचाळी उभारण्यासाठी अनुदान दिले, याचा फायदा शेतकऱ्यांनी घेतला आणि शेतकऱ्यांनी कांदा चाळीची उभारणी केली, पण हाच कांदा सहा महिने चाळीत ठेवूनही तोट्यावर विकावा लागत असेल त्याचा परिणाम शेतकऱ्यांच्या कांदा साठवणुकीवर होत आहे.

साठवून ठेवलेल्या कांद्यातून चार पैसे होतील व त्या पैशावर आपण पुढील पिके उभे करू या आशेवर असलेल्या शेतकऱ्यांचा मात्र तोंडचा घास पळाला असून पुढील पिके उभी करण्यासाठी आहे त्या भावाने कांदा विकावा लागत आहे.

मागील वर्षी शेतकऱ्यांना टोमॅटोतून बऱ्यापैकी पैसे मिळाले, त्यामुळे मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांनी टोमॅटो लागवडी केल्या, एक एकर टोमॅटो पीक उभे करण्यासाठी साधारणपणे एक लाखाच्या आसपास खर्च येतो. यामध्ये ड्रीप, बांबू, तार, मल्चिंग पेपर, सुताळी, मजुरी असा खर्च करून शेतकऱ्यांना आज मात्र या टोमॅटो पिकातून खर्चदेखील वसूल होत नसल्याने त्यांच्यावर टोमॅटो पिकामध्ये नांगर घालण्याची वेळ आली आहे.

कोट...

आतातर अनेक शेतकऱ्यांनी तर जनावरांचा चारा म्हणून टोमॅटोचा उपयोग केला आहे. एकूणच कांदा आणि टोमॅटोच्या आगारात शेतकऱ्यांचे मात्र आर्थिक गणित बिघडले असून मोठ्या प्रमाणात शेतकरी कर्जबाजारी होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

प्रतिक्रिया

भाववाढीच्या आशेने मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांना कांदा साठवणूक केली, पण आता दिवसेंदिवस कांदा खराब होत असून आधीच अडीच हजारावर गेला कांदा सरासरी बाराशे ते तेराशे रुपयांवर आल्याने शेतकऱ्यांना तोटा सहन करावा लागत आहे.

-

मल्हारी दराडे, कांदा उत्पादक शेतकरी. (०६ टमाटा, ०६ कांदा)

060921\205106nsk_26_06092021_13.jpg~060921\205106nsk_27_06092021_13.jpg

चाळीत सडत असलेला कांदा.~टमाटा.