शहरं
Join us  
Trending Stories
1
उबाठा म्हणजे युज ॲण्ड थ्रो पार्टी, त्यांचा जीव मुंबई महानगरपालिकेच्या तिजोरीत; एकनाथ शिंदे यांची टीका
2
Pahalgam Terror Attack: कलमा पढायला सांगितलं, पँट काढली अन्...! पहलगाममध्ये दहशतवाद्यांचा उन्माद; धर्म विचारून २७ जणांची हत्या
3
हा देशाच्या एकता व अखंडतेवर हल्ला, पहलगाम हल्ल्याचा संघाकडून निषेध
4
हॉस्टेलच्या रूममध्येच 'ती'ने संपविले जीवन; सोलापुरातील धक्कादायक घटना
5
KL राहुलचं एकमद कूल सेलिब्रेशन! मग संजीव गोयंका यांच्या हातात हात दिला; पण... (VIDEO)
6
लग्नानंतर सातव्या दिवशीच नौदलाच्या अधिकाऱ्याची दहशतवाद्यांकडून हत्या; हनिमूनसाठी गेले होते विनय नरवाल
7
अमरनाथ यात्रेपूर्वी जम्मू-काश्मीरमध्ये मोठा दहशतवादी हल्ला; TRF च्या टेरर मॉड्यूलने चिंता वाढली
8
चोरीच्या आरोपातून दोन तरूणांना बैलबंडीला जुंपले; व्हीडिओ व्हायरल, १० जणांवर गुन्हा दाखल
9
IPL 2025 LSG vs DC : लखनौच्या संघासमोर केएल राहुलचा रुबाब; सिक्सर मारत संपवली मॅच
10
पहलगाम मध्ये तुमच्या ओळखीचे कुणी अडकले असेल तर 'या' तीन क्रमांकावर साधू शकता संपर्क
11
Rishabh Pant : पंतनं हिंमत दाखवली नाही की, तो किंमत शून्य झालाय? एक निर्णय अन् अनेक प्रश्न
12
महाराष्ट्रातल्या दोन पर्यटकांचा पहलगाम हल्ल्यात मृत्यू; पर्यटक जखमी असल्याची CM फडणवीसांची माहिती
13
"तुला मारणार नाही, जा आणि मोदींना सांग"; पतीची डोळ्यांसमोर हत्या केल्यानंतर दहशतवाद्यांनी पत्नीला धमकावलं
14
दररोज फक्त ₹7 ची बचत करा अन् दरमहा ₹5000 मिळवा; जाणून घ्या सरकारी योजनेचे फायदे...
15
जम्मू-काश्मीरमध्ये मोठा दहशतवादी हल्ला; नाव विचारुन झाडल्या गोळ्या, 27 जणांच्या मृत्यूची भीती
16
मराठी मुलीच्या वडिलांना, काकांना दहशतवाद्यांनी नाव विचारून डोळ्यांदेखत गोळ्या घातल्या- एकनाथ शिंदे
17
"सरकारला धन्यवाद, पण पुन्हा एकदा सांगतो..."; हिंदी सक्तीच्या माघारीनंतर राज ठाकरेंचे ट्विट
18
पहलगाममध्ये टीआरएफने घडवला नरसंहार; दहशतवादी संघटनेने पत्र जारी करुन सांगितले कारण
19
'दोषींना सोडणार नाही, कठोर शिक्षा...', पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर PM मोदींची तीव्र प्रतिक्रिया
20
‘यूपीएससी’त प्रज्ञाचक्षू विद्यार्थ्यांमध्ये मनू गर्ग देशात अव्वल

मंगळवारी होणार रंगयुद्ध : ढोलताशाच्या गजरात रंगांची उधळण रंगपंचमीसाठी येवला सज्ज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 3, 2018 23:58 IST

येवला : उत्सवप्रेमींचे शहर म्हणून येवला शहर ओळखले जाते. रंगपंचमीनिमित्त निर्माण होणारे इंद्रधनुष्याचे मनोहारी दृश्य केवळ वर्णन करून भागणार नाही.

ठळक मुद्देमहिलादेखील रंग खेळण्यात आघाडीवररंग खेळणाºयांची संख्याही वाढली

येवला : उत्सवप्रेमींचे शहर म्हणून येवला शहर ओळखले जाते. रंगपंचमीनिमित्त निर्माण होणारे इंद्रधनुष्याचे मनोहारी दृश्य केवळ वर्णन करून भागणार नाही, तर रंगपंचमीची मजा लुटण्यासाठी येवल्याला यावे लागेल. या दिवशी सकाळपासूनच गल्लीबोळात परस्परांवर रंग टाकत स्वत:चीच तोंडे आकर्षक पद्धतीने रंगवून घेत युवक-युवतींचे थवे फिरत असतात. महिलादेखील रंग खेळण्यात आघाडीवर असतात. रंगपंचमी आली की शहरातील दोन्ही दिशेच्या तालमी आणि विविध मंडळे परस्परांच्या विरुद्ध दिशेने येऊन बैलगाडीवर ठेवलेल्या पिंपांतील रंग ढोलताशा, हलकडीच्या गजरात परस्परांवर उधळून मजा लुटतात. किमान ४० ते ५० बैलगाड्या व त्यावर असणाºया पिंपांतील रंगांचे सपके परस्परांवर मारून रंगपंचमी साजरी करण्याची परंपरा आहे. गेल्या २० ते २५ वर्षांपासून बैलगाड्यांची जागा ट्रॅक्टरने घेतली आहे. ट्रॅक्टर ट्रॉलीमुळे पिंपांची संख्या वाढली आहे. रंग खेळणाºयांची संख्याही वाढली आहे. रंगाचा पहिला सामना मंगळवारी (दि.६) सायंकाळी ५ वाजता टिळक मैदानात होईल. ढोलताशांच्या गजरात जोशपूर्ण वातावरणात प्रत्येक तरुण रंगात न्हाऊन निघणार आहे. डी.जे. रोडवर एक सायंकाळी ६ वाजता कार्यक्रमाचे नियोजन करण्यात आले आहे. रंगपंचमीचा उत्साह दिवसेंदिवस वाढतच आहे. अशा या पारंपरिक रंगांचे सामने आनंदाने उत्साहात पार पडावेत म्हणून विविध नेतेमंडळी, पहिलवान काळजी घेत आहेत.होळी ते रंगपंचमी अशा पाच दिवसात बालाजी मंदिराच्या प्रांगणात बालाजीचा उत्सव धूमधडाक्यात साजरा होतो. आराध्य दैवत बालाजी यांना पाळण्यात बसविले जाते. सोबत मंडप, विद्युत दिव्यांचा झगमगाट असतो. परंपरागत पणत्यांची रोषणाई वेगळीच छाप पाडते. या पणत्यांच्या तेलासाठी आजही येवल्यातील गंगाराम छबीलदासशेठ पेढीतून खर्च दिला जातो. ही एक जुनी परंपरा आहे. या पेढीतील व्यक्ती आजही रंगपंचमीच्या दिवशी रात्री ८ वाजता बालाजी मंदिर परिसरात येतात. बालाजीच्या अंगावर रंग व गुलाल उधळतात. या मंदिराचे पुजारी बालाजीचे दूत बनून शेठजींच्या अंगावर रंग उडवतात. देव आणि मानव यांच्यात जणूकाही प्रातिनिधिक स्वरुपात रंगपंचमी खेळली जाते. अनेक वर्षांची ही परंपरा आजही तेवढ्याच उत्साहाने सुरू आहे हे विशेष. रात्री ८ वाजता क्षत्रिय गल्लीतून ढोलताशांच्या गजरात सटवाईच्या सोंगाची मिरवणूक काढण्यात येणार आहे. सटवाई देवतेपुढे वेताळाचे सोंग घेण्याची येथील यमासा क्षत्रिय यांच्या कुटुंबाची प्रथा आहे.