शहरं
Join us  
Trending Stories
1
"सैनिकांचे मनोबल तोडू नका"; पहलगाम हल्ल्याची चौकशी करण्याची मागणी करणाऱ्यांना कोर्टाने फटकारले
2
पेट्रोल-डिझेलचे दर कमी होणार का? कच्च्या तेलाच्या दरात मोठी घसरण
3
नाशिक: पोलिसांच्या हाताला झटका देऊन पळालेला क्रिश सापडला, कुठे बसला होता लपून?
4
कोण आहे 'तो' चोर? ज्याचं सर्वच करताहेत भरभरून कौतुक; कोट्यवधी रुपये चोरले अन्...
5
३५ वर्ष हेच सुरू, काश्मिरींना खूप त्रास सहन करावा लागतो; पहलगामवरून फारूक अब्दुल्ला थेट बोलले
6
कर्मचाऱ्याचे पीएफ ट्रान्सफर होणार कंपनीच्या मंजुरीविना, नोकरी बदलताना प्रक्रिया होणार सुलभ
7
Matheesha Pathirana: 'त्याला लवकरात लवकर श्रीलंकेला पाठवा' पंजाबविरुद्धच्या पराभवानंतर मथिशा पाथिराना होतोय ट्रोल
8
पहलगाम हल्ल्याच्या लिंक शोधतेय ATS! तपासला सुरुवा होताच रुग्णालयात पोहोचली सीमा हैदर; जाणून घ्या संपूर्ण प्रकरण
9
UPI युजर्ससाठी दिलासादायक बातमी, आता प्रत्येक ट्रान्झॅक्शन १५ सेकंदात होणार; स्टेटसही लवकर कळणार
10
अमृता खानविलकरची Waves summit मध्ये हजेरी, 'थलायवा'सोबत फोटो शेअर करत म्हणाली...
11
“राज्य किती कमजोर झाले याची श्वेतपत्रिका काढा, दिल्लीसमोर झुकणारा महाराष्ट्र निर्माण झाला”
12
Pahalgam Terror Attack : "तुमची आजी जिवंत असती तर पहलगाम हल्ला झाला नसता"; राहुल गांधींना भेटताच शुभमचे वडील भावुक
13
“आरक्षणाची ५० टक्क्यांची मर्यादा हटवावी, जातनिहाय जनगणनेची कालमर्यादा जाहीर करावी”: काँग्रेस
14
"समस्या दाढीची नाही, तर..."; पतीला सोडून दीरासोबत पळाली होती वहिनी, कहानीत नवा ट्विस्ट
15
प्रत्येक पाकिस्तानीने भारत सोडला पाहिजे, भारत सरकारने परतण्याची अंतिम मुदत वाढवली
16
“जातनिहाय जनगणना निर्णयाचे श्रेय राहुल गांधींनाच, सरकारला गुडघे टेकायला लागले”: संजय राऊत
17
भरत जाधव यांनी शेतात बांधलंय राधाकृष्णाचं मंदिर, म्हणाले- "मुंबईत येताना वडिलांनी कृष्णाचा फोटो आणला आणि... "
18
भारतानं एअरस्पेस केली बंद, जाणून घ्या पाकिस्तानला कसा बसणार फटका; 'इतकं' होणार नुकसान
19
पतीला लागला नाद! एका महिलेसोबत रंगेहाथ पकडल्यानंतर दुसरीसोबत गेला पळून, पत्नीने...
20
इलेक्ट्रिक शॉक, हाडे मोडली, डोळे, मेंदूही काढला,अन्...: महिला पत्रकाराचा भयावह अंत

वसाहत सरकारी; रहिवासी भाडेकरी

By admin | Updated: March 26, 2017 23:56 IST

इंदिरानगर :पांडवनगरी परिसरात सरकारी कर्मचाऱ्यांसाठी बांधण्यात आलेल्या सरकारी सदनिकांचा लाभ संबंधित लाभधारक न घेता भाडेकरी घेत असल्याची बाब समोर आली आहे.

संजय शहाणे : इंदिरानगरयेथील पांडवनगरी परिसरात सरकारी कर्मचाऱ्यांसाठी विशेष योजनेतून बांधण्यात आलेल्या सरकारी सदनिकांचा लाभ संबंधित लाभधारक न घेता भाडेकरी घेत असल्याची बाब समोर आली आहे. या परिसरात सरकारी वसाहतीमध्ये भाडेकरारावर घरे मिळत असल्याने सरकारी वसाहत ही भाडेकरूंची वसाहत बनली आहे. शासनाच्या मूळ उद्देशाला यामुळे धक्का बसला असून, या प्रकरणाची चौकशी करण्यात यावी, अशी मागणी होत आहे. पांडवनगरी परिसरात सरकारी कर्मचाऱ्यांसाठी विशेष सवलतीत घरे बांधून दिली आहेत. परंतु बहुतेक कर्मचाऱ्यांनी आपली घरे ही भाडेतत्त्वावर इतरांना दिली आहेत. शासकीय कर्मचाऱ्यांचा हा व्यवसायच बनला असून स्वत: आलिशान घरात राहून सरकारी घरे मात्र भाड्याने देण्याचे प्रकार वाढीस लागले आहेत. या प्रकारामुळे ज्या गरजू कामगारांना खऱ्याअर्थाने घरांची गरज आहे त्यांना मात्र घरे मिळण्यास अडचणी येत आहेत. सुमारे पंधरा वर्षांपूर्वी जीआयएस सरकारी कर्मचाऱ्यांसाठी विशेष सवलतीतून या ठिकाणी गृहनिर्माण संस्था उभ्या राहिल्या आहेत. या योजनेंतर्गत जे सरकारी कर्मचारी घरापासून वंचित आहेत त्यांच्यासाठी सदर योजना राबविण्यात येते. त्यानुसार पांडवनगरीमध्ये सुमारे दोन हजार सदनिका बांधण्यात आल्या आहेत. मात्र सुमारे ७५ टक्के सदनिकांमध्ये आजच्या स्थितीत भाडेकरी मुक्कामास आहेत. ज्यांच्या मालकीची ही घरे आहेत ते सरकारी कर्मचारी या ठिकाणी न राहाता घरे भाड्याने देण्याचा व्यवसाय करू लागले आहेत.पोलीस ठाणेही अनभिज्ञ  प्रत्येक घरमालकाने आपल्या घरातील भाडेकरूची माहिती पोलीस ठाण्यात नोंद करावी, असे शासनाचे आदेश आहेत. असे असतानाही पांडवनगरीतील भाडेकरूंबाबत मालकांनी कोणतीही माहिती पोलीस ठाण्याला दिलेली नाही. त्यामुळे पोलीस आणि संबंधित खात्याचीही लाभधारक कर्मचाऱ्यांकडून फसवणूक केली जात असल्याचाच हा प्रकार मानला जात आहे. विशेष म्हणजे ही घरे देताना सरकारी कर्मचाऱ्यांना आपल्या घरात कोण राहातो याची पुरेशी माहितीदेखील नसते. कारण एजंटच्या मार्फत सदनिकांमध्ये भाडेकरू दाखल होत आहेत. सर्वकाही व्यवहार हा केवळ एजंटच्या भरवशावरच सुरू असून, घरमालकाला दरमहा भाडे मिळावे एवढेच माहीत असते. त्यामुळे शासकीय मालमत्तेचा दुरुपयोग होत आहे, शिवाय धोकादेखील पत्करला जात आहे.  सदनिकाधारक काही कर्मचारी नाशिकमध्येच आहेत तर काही बदलीच्या ठिकाणी आहेत. त्यांच्या घरात सध्या भाडेकरी आहेत. अन्यत्र या कर्मचाऱ्यांची स्वतंत्र घरे आहेत, त्यामुळे ते या सरकारी वसाहतीमध्ये राहायला येण्यास तयार नाहीत.